शहरं
Join us  
Trending Stories
1
भर सभागृहात निशिकांत दुबे आणि वर्षा गायकवाड यांच्यात तू- तू मै मै!
2
भीक मागण्यासाठी पुण्यातून चिमुरडीचे अपहरण; तुळजापुरातील ५ जणांची टोळी गजाआड
3
नागपुरात चोरट्यांचा आतंक; दिवसाढवळ्या कारची काच फोडून २५ लाख पळवले!
4
२२ एप्रिलचा बदला २२ मिनिटांत घेतला, भारतीयांना अपेक्षित कारवाई केली- पंतप्रधान नरेंद्र मोदी
5
ऑपरेशन सिंदूरदरम्यान भारताने PoK परत का घेतला नाही? काँग्रेसच्या प्रश्नावर मोदींनी दिलं असं उत्तर  
6
१० मे रोजी युद्धविरामाचा निर्णय कुणाच्या सांगण्यावरून झाला? अखेर पंतप्रधान नरेंद्र मोदीचं लोकसभेत मोठं विधान
7
"बबिताजींसोबत माझं शूटिंग असतं तेव्हा..."; 'तारक मेहता' फेम जेठालालने सांगितली 'मन की बात'
8
मुंबईत संतापजनक घटना! भावासोबत खेळत असलेल्या १० वर्षांच्या मुलीवर गार्डनमध्ये नेऊन अत्याचार
9
मोबाईल शॉपमध्ये गेली मुलगी, दुकानदाराने आत खेचलं, शटर लावून टाकलं अन् केलं 'दुष्कृत्य'
10
"तुम्ही तर ऑपरेशन सिंदूरच्या रात्रीच युद्धविराम केला, लढण्याची…’’, राहुल गांधींची टीका   
11
Pune Rave Party: 'त्या' रुममध्ये पुन्हा होणार होती रेव्ह पार्टी; तपासातून पोलिसांच्या हाती नवी माहिती
12
"इंदिरा गांधींसारखी हिंमत असेल, तर मोदींनी इथे सांगावं की, डोनाल्ड ट्रम्प खोटारडे आहेत", राहुल गांधींचा हल्लाबोल
13
Nashik Kumbh Mela: शिवीगाळ, हाणामारी अन् जिवे मारण्याच्या धमक्या; पुरोहितांचे दोन गट आमने-सामने
14
कमी किंमतीत टॉप-क्लास फीचर्स; रेडमीच्या बजेट फोनचा बाजारात धमाका!
15
"माफ करणार नाही, रक्ताचा बदला रक्ताने..."; निमिषा प्रियाची फाशी टाळणं आता अशक्य? समोर आलं पत्र
16
Mumbai Water Cut: मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! गुरुवारी 'या' भागांत १४ तासांसाठी पाणीपुरवठा राहणार बंद
17
Operation Mahadev : 'ऑपरेशन महादेव' नंतर पहलगाममधील दहशतवाद्यांना कसे ओळखले? धक्कादायक माहिती आली समोर
18
२६/११ चा उल्लेख करत प्रियंका गांधींचे अमित शाहांवर टीकास्त्र; म्हणाल्या, तेव्हा मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांनी...
19
भाजपाची नवी खेळी! महापालिका निवडणुकीआधी काँग्रेसच्या माजी मंत्र्याचा झाला पक्षप्रवेश
20
IND vs ENG : फिल्डिंगसाठी राबलेला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळणार की, नव्या चेहऱ्याला 'लॉटरी' लागणार?

वाशिम जिल्ह्यात शासकीय खरेदी केंद्रांना कापसाची प्रतिक्षा  

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 8, 2017 14:45 IST

वाशिम: जिल्ह्यात दीड महिन्यापूर्वी शासकीय कापूस खरेदी केंद्र सुरू करण्यात आले असले तरी, भावातील फरकामुळे शेतकºयांचा कल खासगी व्यापाºयांकडेच असल्याने जिल्ह्यातील तीनपैकी एकाही शासकीय खरेदी केंद्रावर अद्याप क्विंटलभर कपाशीचीही खरेदी होऊ शकली नाही. 

ठळक मुद्देभावातील फरकामुळे शेतकऱ्यांचा कल खासगी व्यापाऱ्यांकडेवाशिम जिल्ह्यात तीन ठिकाणी शासकीय खरेदी केंद्र २५ आॅक्टोबरपासून सुरू केले आहेत. शासनाने प्रति क्विंटल ४३२० रुपये हमीभाव जाहीर केले तर व्यापाऱ्यांकडून ४७०० रुपयांपेक्षा अधिक भाव दिले जात आहेत.

 

वाशिम: जिल्ह्यात दीड महिन्यापूर्वी शासकीय कापूस खरेदी केंद्र सुरू करण्यात आले असले तरी, भावातील फरकामुळे  शेतकऱ्यांचा कल खासगी व्यापाऱ्यांकडेच असल्याने जिल्ह्यातील तीनपैकी एकाही शासकीय खरेदी केंद्रावर अद्याप क्विंटलभर कपाशीचीही खरेदी होऊ शकली नाही. 

शासनाने सीसीआयकरीता कापूस पणन महासंघामार्फत कापसाची शासकीय खरेदी करण्यासाठी वाशिम जिल्ह्यात तीन ठिकाणी शासकीय खरेदी केंद्र २५ आॅक्टोबरपासून सुरू केले आहेत. मंगरुळपीर, कारंजा आणि मंगरुळपीर या तीन ठिकाणी हे केंद्र कार्यरत आहेत. या केंद्रावर कपाशीची खरेदी करण्यासाठी ग्रेडरची नियुक्तीही करण्यात आली. त्याशिवाय खरेदीसाठी शेतकºयांची आॅनलाइन नोंदणीही केली. सुरुवातीच्या ८ ते १० दिवसांत तिन्ही ठिकाणी मिळून ७० पेक्षा अधिक शेतकºयांनी कपाशीच्या विक्रीसाठी नोंदणीही केली; परंतु शासनाने यंदा कपाशीसाठी प्रति क्विंटल ४३२० रुपये हमीभाव जाहीर केले तर व्यापाºयांकडून शेतकºयांना ४७०० रुपयांपेक्षा अधिक भाव दिले जात आहेत. त्यामुळे नोंदणी करणाºया शेतकºयांनीही शासकीय खरेदी केंद्राऐवजी व्यापाºयांनाच पसंती दर्शविली आहे. प्रत्यक्षात व्यापाºयांच्या भावात आणि शासनाच्या हमीभावात केवळ ३५० ते ४०० रुपयांची तफावत आहे. तथापि, शेतकºयांना इतर पर्याय नसल्याने त्यांना व्यापाºयांकडे कापूस विकण्याशिवाय पर्यायच उरला नाही. त्यातही वाशिम जिल्ह्याबाहेर ५ हजार रुपये प्रति क्विंटलचे दर मिळत असल्याने जिल्ह्यातील शेतकरी अकोला, यवतमाळसारख्या जिल्ह्यात कपाशी नेत असल्याचे दिसत आहे. त्यामुळे गेल्या दीड महिन्याच्या काळातही शासकीय खरेदी केंद्रावर अद्याप एक क्विंटल कपाशीसुद्धा खरेदी झालेली नाही. कारंजा आणि मानोरा तालुक्यात कपाशीचा पेरा मोठ्या प्रमाणात आहे. कारंजात कपाशीला चांगला बाजार असला तरी, मानोरा आणि मंगरुळपीरमध्ये कपाशीसाठी योग्य दर मिळू शकणारी खाजगी बाजारपेठच नाही. त्यामुळे मंगरुळपीर तालुक्यातील कापूस उत्पादक अकोला, येथे, तर मानोरा तालुक्यातील कापूस उत्पादक यवतमाळ जिल्ह्यात कपाशीची विक्री करण्यावर भर देत आहेत. परिणामी जिल्ह्यातील शासकीय खरेदी केंद्र कापसाविना ओस पडली आहे.