शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजप आणि RSS मध्ये कुठलाही वाद नाही; संघप्रमुख मोहन भागवतांची स्पष्टोक्ती
2
कोल्हापुरातील शेतकऱ्यांना शक्तिपीठ महामार्गाबाबत दिलासा? राज्य सरकारने दिले आदेश; वाचा सविस्तर
3
नाशिकच्या देवळाली कॅम्पजवळ सैनिकाचे हँग ग्लायडर एका घरावर कोसळले; सरावादरम्यान दुर्घटना
4
'हम दो हमारे तीन', प्रत्येक कुटुंबात तीन मुले असावीत': आरएसएस प्रमुख मोहन भागवत
5
Vidarbha Rain Alert: विदर्भातील 'या' जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर वाढणार, IMD ने दिला सतर्कतेचा इशारा
6
डॉन ‘डॅडी’ला जामीन मंजूर, पण शुक्रवारी सुटकेची शक्यता कमीच
7
अथर्व सुदामेनंतर आता डॅनी पंडितने शेअर केलेल्या रीलची चर्चा, दिला हिंदू-मुस्लीम ऐक्याचा संदेश
8
‘पोक्सो’ प्रकरणात आरोपी कुकला २० वर्षे सक्तमजुरी, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल
9
विश्वासघातकी पक्षांनी 'समृद्ध उत्तर प्रदेश' ही ओळखच मिटवली; CM आदित्यनाथ यांचा सपा, काँग्रेसवर हल्ला
10
Video: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपती बाप्पाचं घेतलं दर्शन
11
जगभरात सर्वात वेगवान इंटरनेट असणारे १० देश; भारत कितव्या स्थानावर, जाणून घ्या
12
भयावह! हुंड्यासाठी जाळून मारणाऱ्या निक्कीच्या वडिलांनाही पैशांची हाव; सुनेचा गंभीर आरोप
13
पवनारातून होणार शक्तिपीठ महामार्गाची पायाभरणी, शासनाचा आदेश निघाला!
14
वीज कोसळून २९ शेळ्यांचा जागीच मृत्यू, रखवालदार बचावले; जैतापूर गावातील घटनेने खळबळ
15
तब्बल ७०० किलोमीटर दूर गर्लफ्रेंडला भेटायला गेला, पण तिने बॉयफ्रेंडसोबत जे केलं ते ऐकून बसेल धक्का!
16
जपानमध्ये स्मार्टफोनवर निर्बंध! मोबाईल दिवसातून फक्त २ तास वापरू शकता, नियम काय आहेत?
17
हायवाच्या धडकेत रिक्षाचा चक्काचूर, सहा जण जागीच ठार; गावावर कोसळला दुःखाचा डोंगर
18
विपिन भाटी खरं बोलतोय? निक्की हत्याकांडात झाला मोठा खुलासा, पोलिसांच्या तपासात नवा ट्विस्ट!
19
Asia Cup : संजूनं भक्कम केली ओपनिंगची दावेदारी! 'खंबीर' खेळीमुळं गंभीरचा प्लॅन फिस्कटणार?
20
रशियाचा पुन्हा एकदा युक्रेनवर मोठा हल्ला; ६२९ मिसाईल आणि ड्रोन डागले, अनेकांचा मृत्यू

‘तीच ती’ कारणे देणे ५१३ जणांना भोवले !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 13, 2021 04:41 IST

वाशिम : कोरोना विषाणू संसर्गाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्ह्यात ९ मेपासून कडक निर्बंध लागू केले असून, अत्यावश्यक कारणाशिवाय रस्त्यावर फिरणाऱ्या ...

वाशिम : कोरोना विषाणू संसर्गाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्ह्यात ९ मेपासून कडक निर्बंध लागू केले असून, अत्यावश्यक कारणाशिवाय रस्त्यावर फिरणाऱ्या नागरिकांवर पोलीस यंत्रणेकडून दंडात्मक कारवाई केली जात आहे. दवाखाना, मेडिकलमध्ये जात आहे, अंत्यसंस्कारासाठी जात आहे, अशी तीच ती कारणे देताना ठोस पुरावा देऊ न शकणाऱ्या ५१३ जणांवर गत दोन दिवसात दंडात्मक कारवाई करण्यात आली.

जिल्ह्यात कोरोना विषाणू संसर्गाचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढत आहे. कोरोना विषाणू संसर्गाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्य शासनाने १५ एप्रिलपासून संचारबंदी लागू केली असून, या नियमाची प्रभावी अंमलबजावणी करण्याच्या सूचना दिल्या आहेत. दरम्यान, जिल्ह्यात कोरोनाचा आलेख चढताच असल्याने ही साखळी तोडण्यासाठी ९ मेपासून कडक निर्बंध लागू करण्यात आले आहेत. १५ मेपर्यंत कडक निर्बंध लागू राहणार असून, या दरम्यान मेडिकल, दवाखाने, अंत्यसंस्कार आदी अत्यावश्यक कारणांशिवाय कुणीही रस्त्यावर विनाकारण फिरू नये, असे स्पष्ट निर्देश जिल्हा प्रशासनाने दिले आहेत. या निर्देशाची प्रभावी अंमलबजावणी म्हणून वाशिम शहरात प्रमुख चौकांत बंदोबस्त तैनात करण्यात आला. सकाळच्या सुमारास वाहनचालकांची कसून चौकशी केली जात असून, ठोस कारण आढळून आले नाही तर दंडात्मक कारवाई केली जाते. गत दोन दिवसात या मोहिमेदरम्यान ५१३ जणांनी दवाखाना, मेडिकलचे खोटे कारण देत कारवाई टाळण्याचा प्रयत्न केला. दवाखाना, मेडिकलच्या कागदपत्रांची मागणी करीत पोलिसांनी त्यांचा हा खोटारडेपणा हाणून पाडला. जवळपास ७३ हजारांचा दंड ठोठावला असून, अत्यावश्यक कारणाशिवााय कुणीही घराबाहेर पडू नये, असे आवाहन पोलीस यंत्रणेने केले.