शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
2
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
3
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
4
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
5
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
6
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
7
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
8
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
9
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
10
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
11
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
12
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
13
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
14
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
15
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
16
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
17
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
18
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
19
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
20
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प

शेतीसाठी पाणी द्या किंवा पिकांची नुकसान भरपाई म्हणून हेक्टरी २० हजार रुपये द्या! 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 23, 2017 14:35 IST

वाशिम: आम्हाला शेतीसाठी पाणी द्या किंवा पेरणी केलेल्या पिकांची नुकसान भरपाई म्हणून हेक्टरी २० हजार रुपये द्या, अशी मागणीच जिल्हाधिकाºयांकडे त्यांच्यावतीने करण्यात आली आहे. 

ठळक मुद्देप्रकल्पातील उपसा बंद केल्याने पिके अडचणीत शेतकऱ्यांचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

वाशिम: जिल्ह्यात यंदा पाणीटंचाईची स्थिती निर्माण झाली आहे. अशात जिल्हा पाणी आरक्षण समितीने सर्वच प्रकल्प आणि बॅरेजेसमधील शेतीसाठी होणारा उपसा थांबविण्याचे निर्देश दिले. त्यामुळे यंदा रब्बीची पेरणी केलेल्या शेतकºयांची पिके संकटात सापडली आहेत. प्रशासनाच्या नियोजनशुन्य कारभारामुळे हा प्रकार घडल्याचा आरोप शेतकरी करीत असून, आम्हाला शेतीसाठी पाणी द्या किंवा पेरणी केलेल्या पिकांची नुकसान भरपाई म्हणून हेक्टरी २० हजार रुपये द्या, अशी मागणीच जिल्हाधिकाºयांकडे त्यांच्यावतीने करण्यात आली आहे. 

जिल्ह्यात यंदा ८४ टक्के पाऊस पडल्यामुळे प्रकल्पातील पाणीसाठ्याची स्थिती बिकट आहे. अनेक प्रकल्प आटले असून, उन्हाळ्याच्या दिवसांत जिल्हाभरात पाणीटंचाई तीव्र होणार आहे. या पृष्ठभूमीवर पाणी आरक्षण समितीने जिल्ह्यातील ९२ प्रकल्पातील पाणी पिण्यासाठी राखीव केले; परंतु हा निर्णय घेण्यापूर्वीच शेतकºयांनी प्रकल्प किंवा बॅरेजेसमधील पाण्याच्या भरवशावर रब्बीची पेरणी केली आहे. आता जिल्हा प्रशासनाने बॅरेजेस आणि प्रकल्पातील पाणी शेतीसाठी वापरण्यास प्रतिबंध घातला आहे. त्यामुळे रब्बीची पिके अडचणीत सापडली आहेत. प्रशासनाने रब्बीच्या पूर्वीच हे नियोजन केले असते तर, शेतकºयांनी पेरणी केली नसती, असे शेतकºयांचे म्हणने असून, आता जिल्हा प्रशासनाने पाणी उपशावर घातलेला प्रतिबंध रद्द करावा किंवा बॅरेजेस आणि प्रकल्पातील पाण्याच्या भरवशावर रब्बीची पेरणी केलेल्या शेतकºयांना हेक्टरी २० रुपये नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी शेतकºयांनी केली आहे. विशेष म्हणजे राज्याचे कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांच्या रयत क्रांती संघटनेतील वाशिम जिल्हाध्यक्ष अरविंद अहिरे पाटील, जिल्हा प्रवक्ता उध्दव ढेकळे यांच्यासह युवा तालुका प्रतिनिधी गणेश वायचाळ, शिवाजी गोटे, के.पी. कापसे,  टी.जी. वायचाळ, अनिल वानखडे,  गणेश वायचाळ, विजय गायकवाड, तुळशिराम गोटे, नारायणराव देशमुख, तुळशीराम गोटे, पवार आदिंनी ही मागणी केली आहे.

टॅग्स :Farmerशेतकरी