शहरं
Join us  
Trending Stories
1
छत्रपती संभाजीनगरात एमआयएममध्ये 'राडा'; अधिकृत उमेदवारावर पक्ष कार्यकर्त्यांचाच हल्ला!
2
Ishan Kishan ने ठोकली सलग दोन शतकं, तरीही संघातून बाहेर; BCCIच्या आदेशानंतर घरी का परतला?
3
"भाजपाच्या पाठिंब्याशिवाय शिंदेसेना जिंकू शकत नाही"; मीरा-भाईंदरमध्ये महायुतीसाठी अटीशर्ती
4
दिल्लीकडून खेळताना किंग कोहलीची ‘विराट’ कामगिरी! नव्या विश्वविक्रमासह ऑस्ट्रेलियन दिग्गजाला धोबीपछाड
5
"धर्म आणि विज्ञान यांच्यात कुठलाही संघर्ष नाही; दोघांचेही ध्येय एकच...!" नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
6
पित्याला मृत्युच्या दाढेतून ओढलं, थेट मगरीशी भिडला, चिमुकल्या अजयराजच्या शौर्याची कहाणी!
7
पुतण्यानेच रचला चुलत्याच्या हत्येचा कट; पराभवाचा बदला घेण्यासाठी मंगेश काळोखेंची हत्या, तटकरेंच्या निकटवर्तीयावरही गुन्हा दाखल
8
"कितीही अडथळे आले तरी परत आणणारच"; मोदी-माल्यांच्या लंडनमधील ‘त्या’ मस्करीला भारताचं चोख प्रत्युत्तर
9
"लोकं अडकून पडलेत, मुलांचं शिक्षण रखडलंय"; H1B व्हिसा मुद्द्यावर भारताची अमेरिकेशी चर्चा
10
जावळ काढण्याच्या प्रथेत आईचेही बळजबरीने मुंडन; दौंडमधील महिलांची राज्य महिला आयोगाकडे तक्रार
11
Viral Video: "ही कार आहे... बाईक नाही!" नको त्या कारणावरून जोडप्यामध्ये पेटला वाद, व्हिडीओ व्हायरल
12
पदकं फेकली, प्रमाणपत्रं फाडली, भाजपा खासदारांच्या क्रीडा महोत्सवात खेळाडूंचा संताप, कारण काय?
13
"दोषींना शिक्षा झालीच पाहिजे..."; बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येवरून भारताने सुनावलं
14
थरकाप उडवणारा VIDEO! चिनी शस्त्रांची पुन्हा पोलखोल, थायलंड विरोधात वापरताना रॉकेट सिस्टिमचाच स्फोट; कंबोडियाच्या 8 जवानांचा मृत्यू
15
GenZ पिढीच्या मुलांवर माझा विश्वास, हीच मुलं भारताला 'विकसित राष्ट्र' बनवतील- पंतप्रधान मोदी
16
४५ वर्षाचा गड कोसळला, भाजपानं रचला इतिहास; १ मत फिरवलं अन् 'या' महापालिकेत बसवला महापौर
17
भाजपा आमदारांच्या ‘ब्राह्मण भोजना’मुळे उत्तर प्रदेशच्या राजकारणात खळबळ, भाजपामध्ये चाललंय काय? 
18
काही केलं तरी रात्री झोपच येत नाही? मग करा 'हे' एक छोटसं काम; १० मिनिटांत व्हाल डाराडूर
19
Shehnaaz Gill : "इथे सगळे राक्षस, मी खूप स्ट्रगल...", शहनाज गिलची झाली फसवणूक, इंडस्ट्रीबद्दल मोठा खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

शेतीसाठी पाणी द्या किंवा पिकांची नुकसान भरपाई म्हणून हेक्टरी २० हजार रुपये द्या! 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 23, 2017 14:35 IST

वाशिम: आम्हाला शेतीसाठी पाणी द्या किंवा पेरणी केलेल्या पिकांची नुकसान भरपाई म्हणून हेक्टरी २० हजार रुपये द्या, अशी मागणीच जिल्हाधिकाºयांकडे त्यांच्यावतीने करण्यात आली आहे. 

ठळक मुद्देप्रकल्पातील उपसा बंद केल्याने पिके अडचणीत शेतकऱ्यांचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

वाशिम: जिल्ह्यात यंदा पाणीटंचाईची स्थिती निर्माण झाली आहे. अशात जिल्हा पाणी आरक्षण समितीने सर्वच प्रकल्प आणि बॅरेजेसमधील शेतीसाठी होणारा उपसा थांबविण्याचे निर्देश दिले. त्यामुळे यंदा रब्बीची पेरणी केलेल्या शेतकºयांची पिके संकटात सापडली आहेत. प्रशासनाच्या नियोजनशुन्य कारभारामुळे हा प्रकार घडल्याचा आरोप शेतकरी करीत असून, आम्हाला शेतीसाठी पाणी द्या किंवा पेरणी केलेल्या पिकांची नुकसान भरपाई म्हणून हेक्टरी २० हजार रुपये द्या, अशी मागणीच जिल्हाधिकाºयांकडे त्यांच्यावतीने करण्यात आली आहे. 

जिल्ह्यात यंदा ८४ टक्के पाऊस पडल्यामुळे प्रकल्पातील पाणीसाठ्याची स्थिती बिकट आहे. अनेक प्रकल्प आटले असून, उन्हाळ्याच्या दिवसांत जिल्हाभरात पाणीटंचाई तीव्र होणार आहे. या पृष्ठभूमीवर पाणी आरक्षण समितीने जिल्ह्यातील ९२ प्रकल्पातील पाणी पिण्यासाठी राखीव केले; परंतु हा निर्णय घेण्यापूर्वीच शेतकºयांनी प्रकल्प किंवा बॅरेजेसमधील पाण्याच्या भरवशावर रब्बीची पेरणी केली आहे. आता जिल्हा प्रशासनाने बॅरेजेस आणि प्रकल्पातील पाणी शेतीसाठी वापरण्यास प्रतिबंध घातला आहे. त्यामुळे रब्बीची पिके अडचणीत सापडली आहेत. प्रशासनाने रब्बीच्या पूर्वीच हे नियोजन केले असते तर, शेतकºयांनी पेरणी केली नसती, असे शेतकºयांचे म्हणने असून, आता जिल्हा प्रशासनाने पाणी उपशावर घातलेला प्रतिबंध रद्द करावा किंवा बॅरेजेस आणि प्रकल्पातील पाण्याच्या भरवशावर रब्बीची पेरणी केलेल्या शेतकºयांना हेक्टरी २० रुपये नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी शेतकºयांनी केली आहे. विशेष म्हणजे राज्याचे कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांच्या रयत क्रांती संघटनेतील वाशिम जिल्हाध्यक्ष अरविंद अहिरे पाटील, जिल्हा प्रवक्ता उध्दव ढेकळे यांच्यासह युवा तालुका प्रतिनिधी गणेश वायचाळ, शिवाजी गोटे, के.पी. कापसे,  टी.जी. वायचाळ, अनिल वानखडे,  गणेश वायचाळ, विजय गायकवाड, तुळशिराम गोटे, नारायणराव देशमुख, तुळशीराम गोटे, पवार आदिंनी ही मागणी केली आहे.

टॅग्स :Farmerशेतकरी