शहरं
Join us  
Trending Stories
1
'केवळ एका फोन कॉलने इराण-इस्रायल युद्ध थांबवता येऊ शकतं..."; परराष्ट्र मंत्री अराघची यांचा दावा
2
"इराणच्या अयातुल्ला खामेनींना संपवल्यानंतरच हा संघर्ष थांबेल"; बेंजामिन नेतन्याहूंचे मोठे विधान
3
क्रिकेटच्या इतिहासात असं पहिल्यांदाच घडलं, सलग तीन वेळा टाय झाला टी-२० सामना, अखेर असा लागला निकाल
4
तुमच्या नोकरीवर टांगती तलवार? मे महिन्यात बेरोजगारीचा दर वाढला, 'या' लोकांना सर्वाधिक फटका
5
"ट्रम्प यांचं वर्तन अनिश्चित, ट्रेड तेव्हाच जेव्हा टॅरिफबाबत..," भारतानं अमेरिकेसमोर ठेवली मोठी अट
6
Sheetal Chaudhary: बॉयफ्रेंडनेच केली शीतलची हत्या! अपघाताचा बनाव, पण सुनील अडकला; हत्येचे कारण अखेर समोर   
7
Israel-Iran War: संरक्षणावर किती खर्च करतात इराण आणि इस्रायल? कोणत्या सैन्याची ताकद आहे जास्त
8
आजचे राशीभविष्य - १७ जून २०२५, सरकारी कामे सफल होतील, मोठ्यांचा सहवास लाभेल
9
Thane: ट्रेकिंगला गेले असता पाय घसरुन दरीत कोसळला, ठाण्यातील धक्कादायक प्रकार!
10
"सगळे या..सगळे या...", मराठीत बोलून के-पॉप स्टार जॅक्सन वांगनं सर्वांना केलं थक्क, व्हिडीओ होतोय व्हायरल
11
"थोडी माणुसकी दाखवा"; अपघातानंतर रडत व्यथा मांडणाऱ्या डॉक्टरचा नवा व्हिडीओ समोर; म्हणाला, "मी खूप बोलून गेलो..."
12
Plane Crash: बोइंग विमानाचे 'दिवसच खराब'... अहमदाबाद अपघातानंतर आणखी ४ विमानांचे 'इमर्जन्सी लँडिंग'
13
लेख: आता सीरियाचं 'लक्ष' महिलांच्या कपड्यांवर
14
प्रवाशांना मार्गदर्शक सूचना द्या, रेल्वे नोडल अधिकारी नेमा, यंत्रणांना निर्देश
15
आजचा अग्रलेख: मारेकऱ्यांच्या मुसक्या आवळा!
16
Mumbai Rain: मुंबईत काही तासांत ८६ मिमी पावसाची नोंद; पडझडीमुळे ३ जखमी 
17
Bombay HC: लाज वाटली पाहिजे, ११ वर्षांपासून...; मानखुर्द बालगृहातील पार्टीबद्दल हायकोर्टाचा संताप!
18
एका विमानात तांत्रिक दोष, दुसऱ्याला बॉम्बची धमकी!
19
नालेसफाई भ्रष्टाचार: तीन अभियंत्यांवर ठपका, ठेकेदार पुरोहित काळ्या यादीत 
20
Maharashtra Weather: कुठे ऊन तर कुठे पाऊस? राज्यात पावसाच्या दाेन तऱ्हा!

शेतीसाठी पाणी द्या किंवा पिकांची नुकसान भरपाई म्हणून हेक्टरी २० हजार रुपये द्या! 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 23, 2017 14:35 IST

वाशिम: आम्हाला शेतीसाठी पाणी द्या किंवा पेरणी केलेल्या पिकांची नुकसान भरपाई म्हणून हेक्टरी २० हजार रुपये द्या, अशी मागणीच जिल्हाधिकाºयांकडे त्यांच्यावतीने करण्यात आली आहे. 

ठळक मुद्देप्रकल्पातील उपसा बंद केल्याने पिके अडचणीत शेतकऱ्यांचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

वाशिम: जिल्ह्यात यंदा पाणीटंचाईची स्थिती निर्माण झाली आहे. अशात जिल्हा पाणी आरक्षण समितीने सर्वच प्रकल्प आणि बॅरेजेसमधील शेतीसाठी होणारा उपसा थांबविण्याचे निर्देश दिले. त्यामुळे यंदा रब्बीची पेरणी केलेल्या शेतकºयांची पिके संकटात सापडली आहेत. प्रशासनाच्या नियोजनशुन्य कारभारामुळे हा प्रकार घडल्याचा आरोप शेतकरी करीत असून, आम्हाला शेतीसाठी पाणी द्या किंवा पेरणी केलेल्या पिकांची नुकसान भरपाई म्हणून हेक्टरी २० हजार रुपये द्या, अशी मागणीच जिल्हाधिकाºयांकडे त्यांच्यावतीने करण्यात आली आहे. 

जिल्ह्यात यंदा ८४ टक्के पाऊस पडल्यामुळे प्रकल्पातील पाणीसाठ्याची स्थिती बिकट आहे. अनेक प्रकल्प आटले असून, उन्हाळ्याच्या दिवसांत जिल्हाभरात पाणीटंचाई तीव्र होणार आहे. या पृष्ठभूमीवर पाणी आरक्षण समितीने जिल्ह्यातील ९२ प्रकल्पातील पाणी पिण्यासाठी राखीव केले; परंतु हा निर्णय घेण्यापूर्वीच शेतकºयांनी प्रकल्प किंवा बॅरेजेसमधील पाण्याच्या भरवशावर रब्बीची पेरणी केली आहे. आता जिल्हा प्रशासनाने बॅरेजेस आणि प्रकल्पातील पाणी शेतीसाठी वापरण्यास प्रतिबंध घातला आहे. त्यामुळे रब्बीची पिके अडचणीत सापडली आहेत. प्रशासनाने रब्बीच्या पूर्वीच हे नियोजन केले असते तर, शेतकºयांनी पेरणी केली नसती, असे शेतकºयांचे म्हणने असून, आता जिल्हा प्रशासनाने पाणी उपशावर घातलेला प्रतिबंध रद्द करावा किंवा बॅरेजेस आणि प्रकल्पातील पाण्याच्या भरवशावर रब्बीची पेरणी केलेल्या शेतकºयांना हेक्टरी २० रुपये नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी शेतकºयांनी केली आहे. विशेष म्हणजे राज्याचे कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांच्या रयत क्रांती संघटनेतील वाशिम जिल्हाध्यक्ष अरविंद अहिरे पाटील, जिल्हा प्रवक्ता उध्दव ढेकळे यांच्यासह युवा तालुका प्रतिनिधी गणेश वायचाळ, शिवाजी गोटे, के.पी. कापसे,  टी.जी. वायचाळ, अनिल वानखडे,  गणेश वायचाळ, विजय गायकवाड, तुळशिराम गोटे, नारायणराव देशमुख, तुळशीराम गोटे, पवार आदिंनी ही मागणी केली आहे.

टॅग्स :Farmerशेतकरी