शहरं
Join us  
Trending Stories
1
"भारतावर टीका करणारे देशच रशियासोबत व्यापार करताहेत"; ट्रम्प यांना भारताने दाखवला आरसा, आकडेवारीसह सुनावले
2
"...त्यामुळे मी भारतावरील टॅरिफ भरपूर वाढवणार आहे"; अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा इशारा
3
DSP सिराजचा ऑन ड्युटी फॉर्म्युला! सर्वाधिक विकेट्स अन् १००० पेक्षा अधिक चेंडू टाकण्याचा मोठा पराक्रम
4
धक्कादायक! नागपुरात भर रस्त्यावर महिला पोलिसाला मारहाण करत विनयभंग
5
मोबाईलसाठी रेल्वेतील प्रवाशाच्या हातावर फटका, तरुणाने गमावला पाय; २० हजार रुपयेही पळवले
6
Pahalgam Attack: ते दहशतवादी पाकिस्तानी असल्याचे लष्कराने म्हटले नाही; संरक्षण मंत्रालयाचा खुलासा
7
१२,००० सॅमसंग स्मार्टफोनने भरलेला ट्रक चोरीला गेला; चोरट्यांनी ९१ कोटींच्या वस्तू लंपास केल्या
8
IND vs ENG : एक मालिका अन् दोन मालिकावीर! गंभीरमुळं गिलसोबत हॅरी ब्रूकला मिळाला हा पुरस्कार
9
अमित शाह मोडणार देशाच्या गृहमंत्र्यांचा रेकॉर्ड! जम्मू काश्मीरबद्दल सरकार घेणार आणखी एक मोठा निर्णय?
10
मारहाण, शिवीगाळ असं काहीच घडलं नाही; पुणे पोलिसांनी मुलींचे सगळेच आरोप फेटाळले
11
'भारत आगीशी खेळत आहे'; डोनाल्ड ट्रम्प, एस. जयशंकर यांच्याबद्दल खोटी विधाने केली पोस्ट, 'एक्स'ने खातीच केली बंद
12
iPhone 16: पहिल्यांदाच आयफोन १६ च्या खरेदीवर एवढी मोठी सूट!
13
भारत रशियाला युक्रेनविरुद्ध युद्धासाठी अप्रत्यक्षपणे निधी पुरवतोय, अमेरिकेचा आरोप!
14
येमेनमध्ये निमिषा प्रियाच्या अडचणी वाढल्या! मृताच्या भावाने पत्र लिहून केली मोठी मागणी
15
Siraj, IND vs ENG: 'तो' एक शब्द अन् सिराजने फिरवला अख्खा सामना... टीम इंडियाच्या विजयानंतर उघड केलं गुपित
16
आपच्या सत्येंद्र जैन यांना दिलासा, CBIच्या क्लोजर रिपोर्टवर कोर्टाचं शिक्कामोर्तब
17
माझा 'तो' व्हिडीओ रोहित पवारांना कुणी पाठवला? मंत्री मेघना बोर्डीकर म्हणाल्या...
18
राज ठाकरेंच्या 'मराठी'नंतर नितीश कुमारांची 'बिहारी' घोषणा; शिक्षक भरतीत नोकरी बिहारींनाच मिळणार
19
Siraj, IND vs ENG: ‘पूरा खोल दिए पाशा...’; सिराजच्या 'मॅचविनिंग' गोलंदाजीवर ओवेसींची हैदराबादी शैलीत स्तुती
20
कमाल झाली राव! रशियन महिलेने सांगितली भारतीय पुरुषाशी लग्न करण्याची खास कारणं, जिंकलं मन

न्याय द्या अन्यथा महाराष्ट्र राज्य सोडण्याची परवानगी द्या, पांगरीवासीयांचे मुख्यमंत्र्यांना साकडे

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 26, 2018 14:34 IST

ज्या राज्यात आमचा जन्म झाला, त्याच राज्यात आमच्यावर अन्याय होत आहे. १४ वर्षांचा वनवास भोगून सुध्दा राज्य सरकार आम्हाला न्याय देवू शकत नसेल तर आम्हाला राज्य सोडून जाण्याची परवानगी द्यावी अशी मागणी मंगरूळपीर तालुक्यातील पांगरी महादेव येथील नागरिकांनी गुरूवारी मुख्यमंत्र्यांकडे निवेदनाद्वारे केली.

शेलूबाजार : ज्या राज्यात आमचा जन्म झाला, त्याच राज्यात आमच्यावर अन्याय होत आहे. १४ वर्षांचा वनवास भोगून सुध्दा राज्य सरकार आम्हाला न्याय देवू शकत नसेल तर आम्हाला राज्य सोडून जाण्याची परवानगी द्यावी अशी मागणी मंगरूळपीर तालुक्यातील पांगरी महादेव येथील नागरिकांनी गुरूवारी मुख्यमंत्र्यांकडे निवेदनाद्वारे केली.

सन २००३ मध्ये अकोला जिल्ह्यातून वाशिम जिल्ह्यातील मंगरूळपीर तालुक्यात समाविष्ट करण्यात आलेल्या पांगरी येथील नागरिकांची समस्या शासन, प्रशासन  अद्याप सोडवू शकले नाही. पांगरी येथे अद्याप स्वतंत्र ग्रामपंचायत नाही किंवा इतर कोणत्याही ग्रामपंचायतशी या गावाला गट ग्रामपंचायत म्हणून जोडण्यात आले नाही. केवळ रहिवासी दाखला मिळाला म्हणून नजीकच्या तºहाळा ग्रामपंचायतशी जोडण्यात आले आहे. हा अन्याय गत १४ ते १५ वर्षांपासून सहन करणाºया पांगरीवासियांचा आता संयमाचा अंत होत असून, न्याय द्यावा अन्यथा थेट राज्य सोडण्याची परवानगी द्यावी, अशी टोकाची भूमिका घेण्याची वेळ गावकºयांवर आली आहे. पांगरी येथील नागरिकांना कोणत्याही शासकीय योजनांचा लाभ मिळत नाही. सर्वांसाठी घरे अशी घोषणा केंद्र व राज्य शासनाने केलेली आहे. मात्र, शासन दप्तरी कोणत्याही ग्रामपंचायतीला सदर गाव जोडण्यात आले नसल्याने या गावात अद्याप घरकुल योजना पोहोचू शकली नाही. सिंचन विहिरीसाठी मंगरूळपीर पंचायत समितीकडे प्रस्ताव दाखल केले आहेत. मात्र, ग्राम पंचायत अस्तित्वात नसल्याने या प्रस्तावाची साधी दखलही घेण्यात आली नाही. मंगरूळपीर तालुक्यात समाविष्ठ असलेल्या या गावातील जिल्हा परिषद शाळा, अंगणवाडी व महावितरणाचा कारभार अजूनही अकोला जिल्ह्यातून चालतो, ही शोकांतिका आहे. शैक्षणिक कामासाठी पालक, विद्यार्थी व शिक्षकांना बार्शीटाकळी पंचायत समिती गाठावी लागते. विशेष बाब म्हणून स्वतंत्र ग्राम पंचायतचा दर्जा मिळावा किंवा अन्य ग्रामपंचायतशी गट ग्रामपंचायत म्हणून पांगरीला दर्जा मिळावा यासाठी जिल्हा परिषद प्रशासनाने शासनाकडे प्रस्ताव सादर केलेला आहे. अद्यापही हा प्रस्ताव लालफितशाहीतच अडकलेला आहे. न्याय मिळत नसल्याचे पाहून शेवटी गावकºयांनी टोकाची भूमिका घेत एकतर न्याय द्यावा अन्यथा महाराष्ट्र राज्य सोडून  जाण्याची परवानगी द्यावी, अशी मागणी थेट मुख्यमंत्र्यांकडे निवेदनाद्वारे केली.  निवेदनावर विष्णू रामुजी मंजुळकर, ज्ञानदेव राठोड यांच्यासह ग्रामस्थांच्या स्वाक्षरी आहेत.