शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs PAK Asia Cup Final : दुबईत विजयाचा जल्लोष झाला; पण टीम इंडियानं बहिष्कारानं केला शेवट; नेमकं काय घडलं?
2
IND vs PAK: आधी 'सिंदूर', आता विजय 'तिलक'! भारताने आशिया कप जिंकला, पाकिस्तान पराभूत
3
IND v PAK: हिंदुस्थान झिंदाबाद! भारत जिंकल्यावर काश्मीरमध्ये लष्करी जवान, नागरिकांचा जल्लोष
4
IND vs PAK: "खेळाच्या मैदानात 'ऑपरेशन सिंदूर' आणि..."; पंतप्रधान मोदींनी पाकिस्तानला डिवचलं
5
IND vs PAK : सिक्सर मारला तिलक वर्मानं अन् चर्चा गौतम गंभीरची; ड्रेसिंग रुममधील व्हिडिओ व्हायरल
6
IND vs PAK Final : अडचणीत आणणाऱ्या पाकला नडला! तिलक वर्माची कडक फिफ्टी!
7
VIDEO: हिशेब चुकता... हॅरिस रौफची दांडी गुल केल्यावर जसप्रीत बुमराहचं 'मिसाईल' सेलिब्रेशन
8
Suryakumar Yadav Out Or Not Out : सूर्याचा कॅच नीट पकडला की, पाक कॅप्टनकडून चिटींग? (VIDEO)
9
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या बाल व शिशू स्वयंसेवकांचा विजयादशमी उत्सव उत्साहात संपन्न
10
सांगलीत चारित्र्याच्या संशयातून पत्नीची गळा चिरून हत्या, मग पती स्वत:हून पोलिस ठाण्यात हजर
11
खेड: भीमा नदीपात्रात कार बुडून एकाचा मृत्यू; पाण्याचा अंदाज न आल्याने घटना घडल्याचा अंदाज
12
IND vs PAK Final : कुलदीपची कमाल! ओव्हर हॅटट्रिकसह मारला 'चौकार'; जोमात सुरुवात करून पाक कोमात
13
कर्तव्यनिष्ठ! वडिलांचे अंत्यसंस्कार झाले, दुसऱ्याच दिवशी धाराशिवचे 'सीईओ' मदतीसाठी बांधावर धावले!
14
तुमच्या कॅप्टनचं तुम्ही बघा, आमच्याच आम्ही बघतो! IND vs PAK Final मध्ये टॉस वेळी काय घडलं? (VIDEO)
15
“नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना महायुती सरकारने तत्काळ भरीव मदत द्यावी, अन्यथा...”: हर्षवर्धन सपकाळ
16
युवराज, उथप्पा, रैनाची मालमत्ता ED जप्त करणार? मनी लॉड्रिंग प्रकरणात आली महत्त्वाची अपडेट
17
“पाक लिंक खोटी, जेलमध्ये भेटायला दिले नाही, ते गांधीवादी...”; सोनम वांगचूकच्या पत्नीचा दावा
18
रेल्वे इंजिनमध्ये आता टँकरने डिझेल भरता येणार; शेडमध्ये जाण्याची गरज भासणार नाही!
19
जळगावमध्ये माजी महापौरांच्या फार्म हाऊसवर सुरू होतं धक्कादायक काम, पोलिसांची धाड, ८ जण अटकेत
20
IND vs PAK Final, Asia Cup 2025 : सूर्यानं टॉस जिंकला; हार्दिक पांड्या 'आउट'! रिंकूला संधी; कारण...

गणेश मूर्तींच्या सुरक्षिततेबाबत मंडळे गाफील!

By admin | Updated: September 12, 2016 03:00 IST

वाशिम जिल्हय़ातील चित्र; अनेक ठिकाणी मंडपात कोणीच नाही, पोलिसांचेही दुर्लक्ष.

वाशिम, दि. ११ : मांगल्य, पावित्र्य आणि उत्साहाचे प्रतीक असलेला गणेशोत्सव जिल्ह्यात धूमधडाक्यात साजरा करण्यात येत आहे. दुसरीकडे गणरायांच्या मूर्तीची सुरक्षितता जपण्याबाबत बहुतांश गणेश मंडळं गाफील असल्याचे वास्तव ह्यलोकमतह्णच्या स्टिंग ऑपरेशनमध्ये निदर्शनास आले आहे. १0 सप्टेंबरच्या रात्री १२ ते २ वाजेदरम्यान लोकमत चमूने, जिल्हय़ातील वाशिम, मालेगाव, रिसोड, मंगरुळपीर , कारंजा व मानोरा या तालुक्याच्या ठिकाणी गणेश मंडळांनी स्थापन केलेल्या विविध ठिकाणच्या मंडपांच्या पाहणीतून हा प्रकार समोर आला.वाशिम जिल्हय़ात ६४६ सार्वजनिक गणेश मंडळांची स्थापना झाल्याची नोंद प्रशासन दप्तरी असली, तरी यापेक्षा जास्त गणेशोत्सव मंडळांनी ङ्म्रींची स्थापना केलेली आहे. गणेशोत्सवादरम्यान कायदा-सुव्यवस्था अबाधित राखण्याबरोबरच संभाव्य अनुचित प्रकार टाळण्यासाठी पोलीस विभागाच्यावतीने चोख बंदोबस्त ठेवला असला, तरी तो शहरातील मुख्य चौकांपुरताच र्मयादित दिसून येत आहे. रात्री ११ वाजतानंतर पोलिसांच्या गस्तशिवाय कुठेही विशेष व्यवस्था करण्यात आली नसल्याचे दिसून आले. जिल्हय़ातील गणरायांच्या मूर्ती रात्रीच्या सुमारास किती सुरक्षित आहेत, रात्रीची पोलीस गस्त व पोलीस बंदोबस्त तसेच स्वयंसेवकांची निगराणी कशी आहे, याची पडताळणी करण्यासाठी जिल्हय़ातील गणेश मंडळांनी स्थापन केलेल्या शहरातील विविध भागाच्या मंडपांची पाहणी करण्यात आली. यावेळी प्रमुख चौकातील मंडपांच्या पाहणीसह गल्लीबोळीतील मंडळाच्या पाहणीत बहुतांश मंडपांच्या आसपासही कुणीच नसल्याचे प्रकर्षाने दिसून आले, तर काही ठिकाणी मात्र मंडळातील सदस्याची उपस्थिती दिसून आली. अनेक मंडपाच्या आतमध्येही कुणीच नसल्याचे जाणवले. गणरायांच्या काही मूर्ती रामभरोसे असल्याचे कॅमेर्‍यात कैद झाले. सुरक्षा व्यवस्था गाफील असल्यामुळे या मूर्तींची विटंबना होण्याची शक्यता नाकारता येत नाही. तसेच धार्मिक वाद निर्माण होण्याची घटनाही घडू शकते. या पृष्ठभूमीवर खबरदारी घेणे गरजेचे असताना बहुतांश गणोशोत्सव मंडळं गाफील असल्याचे स्टिंग ऑपरेशनमधून दिसून आला.*वाशिम शहरामध्ये रात्री ११ ते १२.३0 वाजेदरम्यान ह्यलोकमतह्णच्या चमूने पाहणी केली असता अनेक गणेश मंडळाचे पदाधिकारी आढळून आले, तर गल्लीबोळीतील मंडपातील ङ्म्रींच्या मूर्ती मात्र असुरक्षित आढळून आल्यात.*मालेगाव येथे रात्री १२.३0 ते १ वाजेदरम्यान गणेश मंडळाचे गेट ओढलेले आढळून आले*रिसोड येथे मंडपाला साधा कपडा लावून आतमध्ये कोणीही आढळून आले नाही*कारंजा येथे बहुतांश ठिकाणी मंडपामध्ये युवक झोपलेले आढळून आले.*मानोरा येथे सुद्धा गणेश मंडळाने स्थापन करण्यात आलेल्या मंडपामध्ये कोणीच दिसून आले नाही. अनेक सार्वजनिक गणेश मंडळांनी ङ्म्रींची मूर्ती स्थापन करुन मूर्ती संरक्षणाबाबत कोणतीच खबरदारी घेतलेली दिसून आली नाही. *मंगरुळपीर येथे तर काही ठिकाणी मंडपस्थळी आसपास कोणीच नव्हते. तर एका ठिकाणी तर चक्क रात्री १२.३0 वाजताच्या दरम्यान गणपतीला पडद्याने झाकूनसुद्धा ठेवण्यात आलेले नव्हते, अशी परिस्थिती अनेक ठिकाणी आढळून आली.