शहरं
Join us  
Trending Stories
1
लाडकी बहीण योजनेत e-KYC करताना चूक झाली? सरकारने दिली दुरुस्तीची संधी; ‘ही’ आहे शेवटची तारीख
2
फुटबॉलचा जादूगार २२ मिनिटेच का थांबला? मेस्सीचे लगेचच स्टेडियम सोडण्याचे खरे कारण आले समोर
3
"या मुलांना धडा शिकवायला हवाच"; वरळी हिट-अँड-रन प्रकरणात कोर्टाचा दणका, मिहिर शाहचा जामीन फेटाळला
4
टीम इंडियाचं नेमकं कुठं चुकतंय? गौतम गंभीरच्या रणनीतीवर रॉबिन उथप्पाची टीका
5
“आता येत्या २ महिन्यात एकनाथ शिंदे पुन्हा CM होतील असे वाटतेय”; कुणी केली भविष्यवाणी?
6
"मगरीचे अश्रू, बंगालचा अपमान...", मेस्सीच्या कार्यक्रमात गोंधळ; BJP-TMC मध्ये आरोप-प्रत्यारोप
7
प्रवाशांनो… वंदे भारत, राजधानीने प्रवास करताय? ‘हा’ नियम अनिवार्य; अन्यथा तिकीट मिळणार नाही!
8
५१००० हजारांचे कोल्हापुरी चप्पल थेट निघाले प्राडाच्या गावी; एक ग्रॅम ही वजनात फरक नसलेली एकमेव जोड
9
डोंबिवलीत पुन्हा प्रदूषण; रस्त्यावर गुलाबी रंग; पर्यावरणमंत्री पंकजा मुंडे म्हणाल्या, 'तथ्ये तपासून कारवाई करू'
10
सिडकोच्या घरांमध्ये मोठी सूट; लॉटरीपूर्वीच किमती १० टक्क्यांनी घटल्या, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा मोठा निर्णय
11
जंगलात एक कोटींच्या शेळ्या सोडणे हास्यास्पद; वनमंत्र्यांच्या बिबट्यांच्या उपायांची अजित पवारांनी उडवली खिल्ली
12
'धन्यवाद तिरुवनंतपुरम'; थरूर यांच्या बालेकिल्ल्यात भाजपचा झेंडा! पंतप्रधान मोदींनी मानले केरळच्या जनतेचे आभार
13
केरळच्या राजधानीत भाजपाचा ऐतिहासिक विजय, डाव्या पक्षांचा अनेक वर्षांपासूनचा बालेकिल्ला ढासळला
14
साता जन्माची साथ ८ दिवसांत सुटली; नववधू बॉयफ्रेंडसोबत पसार, नवऱ्याची शोधण्यासाठी वणवण
15
“महापालिका निवडणुकीत युतीबाबत चर्चा करून एकत्र निर्णय बसून घेऊ”; अजित पवारांनी केले स्पष्ट
16
...तर थेट मुख्य सचिवांवरच हक्कभंग आणू; राहुल नार्वेकरांचा विधानसभेत संताप, नेमके काय घडले?
17
नवा ट्विस्ट! "पवन सिंहला धमकी दिली नाही, जे करतो ते..."; लॉरेन्स बिश्नोई गँगचा ऑडिओ व्हायरल
18
शरद पवार यांच्या वाढदिवसाच्या पार्टीत राहुल गांधी आणि गौतम अदानी आले आमने-सामने, त्यानंतर घडलं असं काही...
19
Lionel Messi : Video - "फ्रॉड करून गेला, १२ हजारांचं तिकीट..."; मेस्सीची झलक न दिसल्याने फॅन्स प्रचंड चिडले
20
लग्नाच्या नावाखाली अल्पवयीन मुलींचा सौदा; राज ठाकरेंच्या पत्रावर CM फडणवीस म्हणाले, "९० टक्के मुली परत आल्या"
Daily Top 2Weekly Top 5

कट्टरतावाद, द्वेषाचे राजकारण देशासाठी घातक- बाळासाहेब थोरात

By संतोष वानखडे | Updated: October 2, 2022 20:55 IST

भारत जोडो यात्रेचा घेतला आढावा

वाशिम : सध्या सर्वत्र जाती-जातींमध्ये तेढ निर्माण होऊन कट्टरतावाद वाढत आहे. प्रेम व जिव्हाळ्याच्या नात्याऐवजी द्वेषाची भावना रुजत आहे. मात्र कट्टरतावाद व द्वेषाचे राजकारण देशासाठी घातक आहे, असे प्रतिपादन माजी मंत्री तथा काॅंग्रेसचे विधीमंडळ नेते बाळाळासाहेब थोरात यांनी रविवारी (दि.२) रात्री ७ वाजता स्थानिक शासकिय विश्रामगृह येथे पत्रकार परिषदेत केले.

काॅंग्रेस नेते, खासदार राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा सुरू असून, ही यात्रा वाशिम जिल्ह्यातूनही जाणार असल्याने पूर्वतयारीचा आढावा घेण्यासाठी वाशिम येथे आले असता, थोरात यांनी पत्रकारांशी संवाद साधला. ते म्हणाले की, देशात एकतेचा संदेश देण्यासाठी काँग्रेस पक्षाने राहुल गांधी यांच्या नेतृत्वात कन्याकुमारी ते काश्मिर भारत जोडो यात्रा काढण्यात आली आहे. संतांची आणि समाजसुधारकांची भूमी असलेल्या महाराष्ट्रातही जनतेचा विश्वास मिळणार असल्याचा आशावाद त्यांनी यावेळी व्यक्त केला. नांदेड, हिंगोली मार्गे वाशिम जिल्ह्यात नोव्हेंबर महिन्यात ही यात्रा आगमन करणार असल्याची माहिती थोरात यांनी यावेळी दिली. लोकशाहीवर ज्यांचा विश्वास आहे, त्यांनी भारत जोडो यात्रेत सहभागी व्हावे, असेही थोरात म्हणाले. यावेळी आमदार व काँग्रेस कमिटीचे जिल्हाध्यक्ष अमित झनक, माजी मंत्री शिवाजीराव मोघे, यशोमती ठाकूर, एड.दिलीपराव सरनाईक यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.