शहरं
Join us  
Trending Stories
1
Sushila Karki: सुशीला कार्की आहेत तरी कोण? नेपाळच्या पंतप्रधानाच्या शर्यतीत आघाडीवर!
2
डोनाल्ड ट्रम्प यांच्या निकटवर्तीयाची गोळ्या झाडून हत्या, विद्यापीठातील कार्यक्रमात घडलेल्या घटनेने अमेरिकेत खळबळ
3
युतीबाबत एक पाऊल पुढे! शिवतीर्थावर उद्धव-राज यांच्यात अडीच तास चर्चा, बंधुऐक्याची ‘फ्रेम’ ठरली 
4
नेपाळमधील तुरुंगात झालेल्या संघर्षात पाच जणांचा मृत्यू, देशभरातील सुमारे ७००० कैदी फरार
5
आजचे राशीभविष्य- ११ सप्टेंबर २०२५: आजचा दिवस लाभदायी, नियोजित कामे पूर्ण होतील!
6
Maratha Reservation: हैदराबाद गॅझेटियर अधिसूचनेला मुंबई उच्च न्यायालयात आव्हान; काय आहे याचिकेत?
7
सोने-चांदीने गुंतवणूकदार मालामाल, गेल्या एका वर्षात मिळाले सोन्यातून ४४ तर चांदीतून ४५ टक्के रिटर्न
8
अग्रलेख: राधाकृष्णन आता देशाचे! नव्या उपराष्ट्रपतींनी हे लक्षात ठेवायला हवेच
9
विम्याचा हप्ता दहा वर्षांत दुप्पट! कंपन्यांकडून ग्राहकांची लूट; भीती दाखवून प्रीमियमवाढ
10
‘डीवाय पाटील’ बीकेसीत उभारणार शैक्षणिक संकुल; दहा भूखंड भाडेतत्त्वावर देण्याचा निर्णय
11
‘कोहिनूर’ची ‘बहीण’ ११७ वर्षांनी दिसणार! या बहिणीचं नाव आहे ‘दरिया-ए-नूर’ 
12
भाडेकरार, भाडेवाढीशिवाय घरे रिकामी करणार नाही; नायगाव बीडीडी प्रकल्पग्रस्तांचा म्हाडाला कडक इशारा
13
Maratha Reservation: राज्यात आजपर्यंत दिलेल्या कुणबी प्रमाणपत्रांची श्वेतपत्रिका काढावी; ओबीसी मंत्रिमंडळ उपसमितीची भूमिका
14
विशेष लेख: एका परिवर्तनशील, सहृदय नेतृत्वाचा अमृतमहोत्सव
15
नेपाळमध्ये देशभरात संचारबंदी लागू; महाराष्ट्रातील १०० पर्यटकांसह शेकडो प्रवासी अडकले 
16
भारत-अमेरिका यांच्यात चर्चेची दारे खुली होणार; पंतप्रधान मोदी म्हणाले, "ट्रम्प यांच्याशी..."
17
नेपाळनंतर फ्रान्समध्येही जनतेचा उद्रेक; २५० निदर्शकांना अटक 
18
Asia Cup 2025 : बुमराहच्या परफेक्ट यॉर्करशिवाय ही गोष्ट ठरली लक्षवेधी; कारण ६ वर्षांनी असं घडलं
19
सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान; बालेंद्र शाहांचा पाठिंबा, आंदोलकांना केले आवाहन...
20
नागपुरातील कडबी चौकाजवळ भर रस्त्यावर व्यापाऱ्यावर गोळीबार, ५० लाखांची लूट

खाद्यतेलाचा वारंवार वापर; होऊ शकतो कॅन्सर !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 24, 2021 04:48 IST

वाशिम : घरात तळीव पदार्थ तयार केल्यानंतर उरलेले तेल पुन्हा वापरण्याची सवय प्रत्येकालाच असते. महागाईच्या या काळात तसे करणे ...

वाशिम : घरात तळीव पदार्थ तयार केल्यानंतर उरलेले तेल पुन्हा वापरण्याची सवय प्रत्येकालाच असते. महागाईच्या या काळात तसे करणे चुकीचेदेखील नाही; मात्र हा प्रकार जिवावर बेतू शकतो. खाद्यतेलाचा वारंवार वापर केल्याने कॅन्सरसारख्या महाभयंकर आजारालाही सामोरे जावे लागू शकते. त्यामुळे शक्यतोवर तेलाचा पुनर्वापर टाळणेच आरोग्याच्या दृष्टीने सोयीस्कर आहे. हाॅटेल्स, टपऱ्यांमध्ये मात्र बिनदिक्कतपणे तेलाचा वारंवार वापर केला जातो. हा कायद्याने गुन्हा असला तरी अन्न प्रशासन विभागाकडून मात्र कारवाईकडे दुर्लक्ष केले जात आहे.

स्वयंपाकाचे तेल एकदा वापरले की पुन्हा कधीही वापरू नये, कारण ते खराब व्हायला सुरुवात होते आणि तेलामध्ये ट्रान्स-फॅटी ॲसिडचे प्रमाण वाढू लागते, जे आरोग्यासाठी घातक ठरू शकते. विशेषतः थंड तेल पुन्हा गरम करणे टाळायला हवे, कारण त्यात ‘स्मोकिंग पॉईंट्स’ खूप कमी असतात. मोहरीचे तेल, राईस ब्रान ऑइल पुन्हा एकदा वापरता येतात, परंतु तरीही ते टाळण्याचा सल्ला दिला जातो.

................

बॉक्स...

तेलाचा पुनर्वापर आरोग्याला घातक

तळीव पदार्थांसाठी वापर झालेल्या खाद्यतेलात त्यानंतर ‘फ्री रॅडिकल्स’ तयार होतात. त्यामुळे असे तेल दीर्घकाळ वापरणे हानिकारक आहे. फ्री रॅडिकल्स कार्सिनोजेनिक असू शकतात, जे शरीरावर परिणाम करतात. त्यातूनच कोलेस्टेरॉलची समस्या वाढण्याची शक्यता आहे. अनेकांना घशात जळजळ, हृदयाशी संबंधित आजार यासह एखाद्याप्रसंगी कॅन्सरही होऊ शकतो, असे सिद्ध झालेले आहे.

...............

बॉक्स...

रस्त्यावर न खाल्लेलेच बरे

भजी, मुगाचे वडे, समोसा, कचोरी, जिलेबी यासह इतरही अनेक प्रकारचे तळीव पदार्थ रस्त्यावर थाटलेल्या टपऱ्यांवर सहज मिळतात. या पदार्थांसाठी खाद्यतेलाचा वारंवार वापर केला जातो. नियमानुसार, हा प्रकार हानिकारक आहे. त्यामुळे रस्त्यावरील टपऱ्यांवर तळीव खाद्यपदार्थ खाण्याचा मोह आवरलेलाच बरा, असे जाणकारांचे मत आहे.

...................

कोट :

हृदयाशी संबंधित आजार बळावू शकतात

मुळात खाद्यतेलाचा अधिक वापर शरीरासाठी हानिकारक आहे. त्यातच तळीव पदार्थ तयार केल्यानंतर त्याच तेलाचा वारंवार वापर करणे अत्यंत घातक ठरू शकते. फ्री रॅडिकल्समुळे कोलेस्टेरॉलची समस्या निर्माण होत असल्याने हृदयाशी संबंधित आजार बळावू शकतात. नागरिकांनी याबाबत जागरूकता बाळगायला हवी.

- डॉ. प्रवीण ठाकरे, वाशिम

..............

किडनीवरही होऊ शकतो परिणाम

खाद्यतेलाचा वारंवार वापर केल्याने आरोग्यावर दीर्घकाळ परिणाम होऊ शकतो. रक्तवाहिन्यांमध्ये यामुळे अडथळा निर्माण होऊन कालांतराने त्याचा परिणाम किडनीवरही होण्याची शक्यता अधिक असते. त्यामुळे तळीव पदार्थ तयार केल्यानंतर उरणारे तेल शक्यतोवर वापरात आणूच नये.

- डॉ. पंकज गोटे, वाशिम

.............

...तर होईल गुन्हा दाखल

नियमानुसार दिवसाला ५० लिटर तेलाचा वापर करणाऱ्या अन्नविक्रेत्यांना तीन वेळाच खाद्यतेलाचा वापर करता येतो. त्यानंतर तेलाची योग्य विल्हेवाट लावणे बंधनकारक आहे. ५० लिटरपेक्षा कमी तेलाचा वापर करणाऱ्यांनी तेल पुनर्वापर करूच नये; अन्यथा गुन्हा दाखल होऊ शकतो.

- नीलेश ताथोड, निरीक्षक, अन्न प्रशासन विभाग

.............

अहो आश्चर्यम, एकावरही कारवाई नाही

खाद्यतेलाचा पुनर्वापर करणे हा कायद्याने गुन्हा आहे. अन्न व औषध प्रशासन धडक कारवाईची मोहीम हाती घेऊन याप्रकरणी संबंधितांवर कारवाई करू शकते. प्रत्यक्षात मात्र या विभागाची भूमिका यासंदर्भात पूर्वीपासूनच उदासीन राहिलेली आहे. त्यामुळेच वाशिम जिल्ह्यात खाद्यतेलाचा पुनर्वापर करणाऱ्या एकावरही आतापर्यंत कारवाई झालेली नाही.