शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर मग ऑपरेशन सिंदूर तरी कुठे चुकीचे होते?" मुनीर यांच्यावर पाकिस्तानी मौलानांचा कडाडून हल्ला
2
सुधीर मुनगंटीवारांनी 'राज्यभर दौरा गुंडाळला', भाजप नेत्यांसोबत आज चर्चा; ठाकरे बंधुबद्दलही बरंच बोलले
3
"माझाही फोटो आहे, सर्वांचेच...!"; एपस्टीन फाइल्सवर ट्रम्प स्पष्टच बोलले, बिल क्लिंटन यांच्यासंदर्भात काय म्हणाले?
4
WhatsApp: नव्या पद्धतीने हॅक जात आहे व्हॉट्सॲप, सरकारने दिला काळजी घेण्याचा सल्ला
5
बांगलादेशमधील दीपूच्या मृत्यूप्रकरणी दिल्लीत VHP चे निदर्शने; बांगलादेश परराष्ट्र मंत्रालयाने भारतीय उच्चायुक्तांना बोलावले
6
अखेर चीनने आयडिया चोरलीच! भारताच्या UPI सोबत स्पर्धा करण्यासाठी ॲप लाँच केले... 'Nihao China'
7
Video - हृदयद्रावक! डीजेवर नाचताना आक्रित घडलं, २३ वर्षीय तरुण खाली कोसळला अन्...
8
"तिथं मी बुलेटप्रूफ कारशिवाय बाहेर पडू शकत नाही!"; कारण... अफगाणिस्तान स्टार क्रिकेटर राशीद खानचा खुलासा
9
“१०० टक्के ठाकरे बंधूंना १०० जागा मिळतील, युतीची केवळ घोषणा बाकी, जागावाटप पूर्ण”: संजय राऊत
10
“काँग्रेसचा विषय नक्कीच संपलेला आहे, पण निकालानंतर गरज लागली तर…”; संजय राऊतांचे मोठे विधान
11
ठाकरे बंधुंमधील दादर, शिवडीचा तिढा अखेर सुटला, मोठ्या भावासाठी धाकट्याने घेतले झुकते माप
12
महापालिका निवडणूक २०२६ : प्रस्तावच नाही; काँग्रेस-'वंचित'ची युती होणार की नाही? गोंधळ कायम 
13
दीपूचंद्र दासच्या मित्रांनीच केली 'गद्दारी', मारणाऱ्या धर्मांध जमावातच झाले सामील अन्...! सामोर आलं धक्कादायक सत्य
14
खळबळजनक! सकाळी एन्काऊंटर, संध्याकाळी फरार; पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पळाला आरोपी
15
महाविकास आघाडी फुटणार? सुप्रिया सुळे म्हणाल्या, "...तर आम्ही इतर पर्यायांचा विचार करू"
16
पहाटे ५ ची वेळ, उर्फी जावेद घाबरलेल्या अवस्थेत पोलिस स्टेशनमध्ये पोहोचली; नक्की काय घडलं?
17
इंडिगो एअरलाइन्स मार्चनंतर तुर्कीकडून घेतलेली विमानांचे उड्डाण करणार नाही; DGCA ने दिला स्पष्ट नकार
18
सोलापुरात अजित पवारांचा भाजपाला धक्का! अतुल पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश
19
आठ कोटी, बारा पानांची चिठ्ठी आणि स्वतःवरच झाडली गोळी; Ex IPS अमर सिंग चहल यांची प्रकृती गंभीर, असा निर्णय का घेतला?
20
८ लाखांच्या गुंतवणुकीवर मिळवा ३,२८,००० रुपये फिक्स व्याज! ज्येष्ठ नागरिकांसाठी पोस्टाची 'खास' भेट
Daily Top 2Weekly Top 5

विद्युत पुरवठ्यात वारंवार व्यत्यय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 20, 2021 04:47 IST

वाशिम : रेतीघाटांचे लिलाव पाच वर्षांपासून झालेले नाहीत. यामुळे घरांचे बांधकाम अडचणीत सापडण्यासोबतच घरकुले, शौचालयांच्या बांधकामावरही परिणाम होत आहे. ...

वाशिम : रेतीघाटांचे लिलाव पाच वर्षांपासून झालेले नाहीत. यामुळे घरांचे बांधकाम अडचणीत सापडण्यासोबतच घरकुले, शौचालयांच्या बांधकामावरही परिणाम होत आहे.

................

रस्ता दुरुस्तीकडे लक्ष पुरवा!

वाशिम : वाशिम-अकोला महामार्गावरून आययूडीपी काॅलनीत जाणाऱ्या रस्त्याची दुरवस्था झालेली आहे. मोठमोठे खड्डे पडल्याने वाहने चालविणे कठीण झाले आहे. रस्ता दुुरुस्तीकडे लक्ष देण्याची मागणी होत आहे.

................

देयके अदा करण्याचे आवाहन

वाशिम : शहरातील घरगुती विद्युत ग्राहकांकडे लाखो रुपये थकबाकी असल्याने महावितरण आर्थिक अडचणीत सापडले आहे. ही बाब लक्षात घेता ग्राहकांनी देयके अदा करावीत, असे आवाहन कार्यकारी अभियंता आर.जी. तायडे यांनी केले.

.................

वाशिममध्ये प्लास्टिक बंदीचा फज्जा

वाशिम : शहरी भागामध्ये बंदी घातलेल्या प्लास्टिक पिशव्यांचा वापर होऊ नये, याकरिता मध्यंतरी दंडात्मक कारवाई करण्यात आली; मात्र त्यानंतर कारवाईत खंड पडल्यामुळे प्लास्टिक बंदीचा पूर्णत: फज्जा उडाला आहे.

..............

कर्ज तत्काळ मंजूर करण्याचे आवाहन

वाशिम : मुख्यमंत्री रोजगार योजनेतून निर्धारित निकषांप्रमाणे पात्र लाभार्थींना विनाविलंब कर्ज मंजूर करण्याच्या शासनाच्या सूचना आहेत. त्याचे पालन करावे, असे आवाहन जिल्हा अग्रणी बँकेचे व्यवस्थापक दत्तात्रय निनावकर यांनी केले.

....................

‘फायर ऑडिट’ करण्याची मागणी

वाशिम : व्यापारी संकुलांमध्ये अग्नी अवरोधक यंत्र बसवून दरवर्षी ‘फायर ऑडिट’ व्हायला हवे, अशा शासनाच्या सूचना आहेत. त्यानुसार या महत्त्वाच्या प्रश्नाकडे लक्ष पुरविण्याची मागणी नागरिकांमधून होत आहे.

................

जऊळका येथे रस्त्यांची दुरवस्था

वाशिम : गावातील अंतर्गत रस्ते आधीच खराब झाले होते. आता अधूनमधून कोसळत असलेल्या पावसामुळे रस्त्यांवर चिखल साचून अधिकच दुरवस्था झाली आहे. यामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत.

..............

बसफेऱ्या नियमित सोडण्याची मागणी

वाशिम : एस. टी. महामंडळाच्या वाशिम, रिसोड आगारातील अकोला, शिरपूर मार्गावरच्या काही दैनंदिन बसफेऱ्या अनियमित आहेत. त्या नियमित सोडण्यात याव्यात, अशी मागणी आकाश कांबळे यांनी बुधवारी केली.

..................

रिक्त पदे तत्काळ भरण्याची मागणी

वाशिम : मालेगाव तालुक्यात पटवारी, कृषी सहायक, सचिव यासारख्या महत्त्वाच्या पदांवर प्रभारी कर्मचारी कार्यरत आहेत. त्यांच्यावर गाव विकासाची भिस्त आहे. रिक्त पदे भरण्याची मागणी राजाराम टोंचर यांनी सोमवारी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली.

................

‘बेटी बचाओ...’ मोहिमेची जनजागृती आवश्यक

वाशिम : शासनाने स्त्री-भ्रूणहत्या रोखण्यासाठी ‘बेटी बचाओ, बेटी पढाओ’ ही योजना राबविण्याचा निर्णय घेतला आहे. ही योजना यशस्वी होण्यासाठी व्यापक जनजागृती व्हावी, अशी मागणी प्रवीण गोटे यांनी बुधवारी केली.

.....................

विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीची अद्याप प्रतीक्षा

वाशिम : शासनाच्या विविध योजनेंतर्गत तालुक्यातील अनेक विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती अद्यापपर्यंत त्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात आली नाही. याप्रकरणी जिल्हाधिकाऱ्यांनीच आता दखल घेण्याची मागणी विद्यार्थ्यांमधून होत आहे.

..................

ग्रामीण भागात सिलिंडरची बेकायदा वाहतूक

वाशिम : ज्वलनशील वायू म्हणून ओळखल्या जाणाऱ्या स्वयंपाकाच्या गॅस-सिलिंडरची ग्रामीण भागात बेकायदा वाहतूक केली जात आहे. सुरक्षेच्या दृष्टीने धोकादायक ठरू पाहणारा हा प्रकार रोखण्यासाठी प्रशासनाने पुढाकार घेण्याची मागणी होत आहे.

.................

आरोग्यविषयक योजनेची अंमलबजावणी व्हावी

वाशिम : गोरगरीब रुग्णांना मोफत आरोग्य सेवेचा लाभ घेता यावा, शासनाने अंमलात आणलेल्या आरोग्यविषयक योजनांची जिल्ह्यात प्रभावी अंमलबजावणी व्हावी, अशी मागणी उमेश कुटे यांनी केली.

...................

अवैध प्रवासी वाहतूक जोमात

वाशिम : वाशिम-अनसिंग, वाशिम-कनेरगाव मार्गावर अवैध प्रवासी वाहतूक मोठ्या प्रमाणात सुरू आहे. पोलिसांनी याप्रकरणी कारवाई करावी, अशी मागणी युवा सेनेच्यावतीने जिल्हा पोलीस अधीक्षकांकडे करण्यात आली.

..............

उपकेंद्राची क्षमता वाढविण्याबाबत निवेदन

वाशिम : राजगाव येथील ३३ केव्ही वीज उपकेंद्रावरून विजेची होणारी मागणी व पुरवठ्यातील असमतोल पाहता, वीज उपकेंद्राची क्षमता वाढवून देण्याची मागणी ग्रामस्थांमधून होत आहे.

.............

प्रमुख चौकांचे सौंदर्यीकरण रखडले

वाशिम : शहरातील प्रमुख चौकांचे विद्रुपीकरण झाले आहे. यासह वाहतुकीचाही बिकट प्रश्न उभा ठाकला आहे. प्रमुख चौकांचे सौंदर्यीकरण करून वाहतूक सुरळीत ठेवावी, अशी मागणी अनिल चव्हाण यांनी नगर परिषदेकडे बुधवारी केली.