शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानात मोठी घडामोड! इम्रान खान तुरुंगातून बाहेर येणार? एकाचवेळी आठ प्रकरणांत मिळाला जामीन 
2
राजनाथ सिंह आणि फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंना फोन करून पाठिंबा मागितला; संजय राऊतांचा दावा
3
'मुघल आणि ब्रिटिशांनंतर जे काही उरले, काँग्रेस-सपाने लुटले', योगी आदित्यनाथांची बोचरी टीका
4
सप्टेंबरनंतर देशात अन् राज्यात मोठ्या राजकीय घडामोडी घडतील; अंजली दमानियांचा दावा, म्हणाल्या...
5
नजर खाली, काकाचा हातात हात...लग्नासाठी आलेली ५ स्थळे नाकारणारी अर्चना तिवारी घरी कशी पोहचली?
6
ऑनलाइन गेमिंगवर बंदी येण्यापूर्वी झुनझुनवालांची 'या' कंपनीतून एक्झिट; निखिल कामत, मधुसूदन केला यांना अजूनही विश्वास?
7
वाहतूक नियम मोडल्याचे चलन येताच फाईन भरा, ७५ टक्क्यांपर्यंत सूट मिळणार; महाराष्ट्रात विचार सुरु...
8
"पावसाळी अधिवेशनात लोकसभेत केवळ ३७ तास चर्चा, संसदेचा खर्च खासदारांकडून वसूल करा’’, नाराज खासदाराने केली मागणी
9
"बाळासाहेब थोरातांच्या केसालाही धक्का लावण्याची गोडसेच्या औलादीमध्ये धमक नाही", हर्षवर्धन सपकाळ यांनी ठणकावले
10
घरात काय चाललंय ते कळेना! पाक दिग्गज टीम इंडियात डोकावत श्रेयस अय्यरवर बोलला, म्हणे...
11
'का ग कुठे गेली होती?', सुनेत्रा पवारांबद्दलचा प्रश्न ऐकून अजित पवारांनी पत्रकार परिषदेतच जोडले हात
12
१२%, २८% चा GST स्लॅब संपवण्याचा प्रस्ताव राज्यांच्या अर्थमंत्र्यांच्या गटानं स्वीकारला, सामान्यांना मिळणार मोठा दिलासा
13
Raigad Boat Accident: मोठी बातमी! रायगडच्या समुद्रात मासेमारी बोट बुडाली, बचाव कार्य सुरू; व्हिडीओ व्हायरल
14
रशियाची सर्वात शक्तिशाली युद्धनौका S-400 बटालियनसह समुद्रात दाखल, पुतिन काय करतायत..?
15
"वरण-भात माझं आवडीचं जेवण", ट्रोल झाल्यावर विवेक अग्निहोत्रींची पलटी, म्हणाले- "मला अक्कल आली तेव्हा..."
16
Gold Silver Price 21 August: सोन्याच्या दरातील घसरण थांबली, चांदीमध्ये ₹१७४५ ची तेजी, सोनं किती महाग झालं? जाणून घ्या
17
Viral Video : जंगलात राहणाऱ्या व्यक्तीने आयुष्यात पहिल्यांदा खाल्ला रसगुल्ला; प्रतिक्रिया पाहून तुम्हीही खूश व्हाल!
18
'या' सरकारी योजनेत ज्येष्ठांना ५ वर्षांत मिळेल १२,००,००० पेक्षा जास्त व्याज; कोण घेऊ शकतो लाभ?
19
Video: कुत्रा येणाऱ्या-जाणाऱ्यांवर सतत भुंकायचा; टोळक्याने मालकालाच लाठ्या-काठ्यांनी बेदम चोपले...
20
नशीब असावं तर असं! पावसापासून वाचण्यासाठी दुकानात शिरली, काही वेळाने करोडपती बनून बाहेर आली

चार हजार क्विंटल माल भिजला

By admin | Updated: April 16, 2015 01:32 IST

अवकाळी पावसाचा परिणाम; वाशिम बाजार समिती प्रशासनाचा हलगर्जीपणा

वाशिम : स्थानिक कृषिउत्पन्न बाजार समिती प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे १५ एप्रिल रोजी शेतकर्‍यांचा सुमारे चार हजार क्विंटल माल पावसाच्या पाण्याने भिजला. एवढा गंभीर प्रकार घडूनही बाजार समितीच्या कार्यालयात शेतकर्‍यांचे गार्‍हाणे ऐकून घेण्यासाठी कुणीच जबाबदार व्यक्ती हजर नव्हती. तथापि, नैसर्गिक संकटांमुळे आधीच जेरीस आलेले शेतकरी अवकाळी पावसाच्या दणक्याचेही बळी ठरले आहेत. वाशिम जिल्ह्यात सर्वदूर गेल्या सात ते आठ दिवसांपासून वादळी वारा व अवकाळी पावसाने थैमान घातले आहे. दररोज दुपारच्या सुमारास आकाशात ढग जमून विजांच्या कडकडाटात पावसाला सुरुवात होत आहे. नित्यनेमाप्रमाणे १५ एप्रिल रोजीदेखील दुपारी ३ च्या सुमारास जोरदार पावसाला प्रारंभ झाला. यादरम्यान कृषिउत्पन्न बाजार समितीमध्ये ओट्याच्या खाली ठेवण्यात आलेला हजारो क्विंटल हरभरा, सोयाबीन, तूर हा माल पावसाच्या तावडीत सापडला. सलग एक तास झालेल्या या पावसामुळे बाजार समितीत धान्यासभोवताल पाणीच पाणी साचले होते. बाजार समिती प्रशासनाने ओट्यावर माल ठेवू न दिल्यामुळे तद्वतच खरेदीस मोठा विलंब लावल्याने धान्य भिजल्याचा आरोप शेतकर्‍यांनी केला. यादरम्यान नुकसानग्रस्त शेतकर्‍यांनी कैफियत मांडण्याकरिता बाजार समितीचे कार्यालय गाठले; मात्र यावेळी तेथे सचिवांसोबत इतर एकही जबाबदार व्यक्ती हजर नव्हती. १६ एप्रिल रोजी बाजार समिती बंद असल्याने पावसाच्या पाण्याने भिजलेले धान्य पुन्हा पोत्यात भरून घरी नेण्याशिवाय शेतकर्‍यांसमोर कुठलाही पर्याय राहिला नव्हता.