शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानसोबत क्रिकेट नकोच..; IND-PAK सामन्यावर प्रियंका चतुर्वेदींचे सरकारला आवाहन
2
मोठी बातमी! एल्फिन्स्टन ब्रिज उद्या मध्यरात्रीपासून बंद; जाणून घ्या पर्यायी मार्ग...
3
Asia Cup 2025 BAN vs HK : कॅप्टन लिटन दासची 'फिफ्टी'; बांगलादेशनं मॅच जिंकली, पण...
4
'रशियन तेल खरेदी थांबवा अन्यथा...',अमेरिकन मंत्री हॉवर्ड लुटनिकची भारताला पुन्हा धमकी
5
छत्तीसगडमध्ये भीषण चकमक! १ कोटीचा इनाम असलेला मोडेम बाळकृष्णसह १० नक्षलवादी ठार 
6
परदेशात कोणत्या गुप्त बैठकांसाठी जाता? CRPF च्या पत्रावरुन भाजपने राहुल गांधींना घेरले
7
Mustafizur Rahman Stunning Catch : विकेटचा रकाना कोरा; पण मुस्ताफिझुरनं बेस्ट कॅचसह केली हवा (VIDEO)
8
'लष्करी शक्तीच्या जोरावर पाच पट मोठ्या भारताला...', पाकिस्तानच्या संरक्षणमंत्र्यांनी पुन्हा गरळ ओकली
9
खासदार प्रशांत पडोळे अपघातातून थोडक्यात बचावले ; नक्षलग्रस्त भागात शासकीय सुरक्षा व्यवस्था न दिल्याचा मुद्दा चर्चेत
10
Asia Cup 2025 : बाबरनं षटकार मारत रुबाब झाडला! पण दुसऱ्याच चेंडूवर गोलंदाजानं असा घेतला बदला (VIDEO)
11
शाळेच्या वेळेत मुले गावभर फिरले, गावकरी शाळेत जाऊन पाहतात तर काय? विद्येच्या मंदिरात नशेचा नंगा नाच !
12
जगातील सर्वात मोठ्या सोने तस्करांपैकी एक नेपाळच्या जेलमधून पळाला; ३८०० किलो सोने...
13
दुपारी आनंदानं बहिणीशी बोलली अन् संध्याकाळी सगळं संपवलं! जळगावच्या नवविवाहितेनं उचललं टोकाचं पाऊल
14
'आमच्या जीआरला हात लावला तर ओबीसी आरक्षणालाही कोर्टात आव्हान देऊ'; जरांगेंचा इशारा
15
आप खासदार संजय सिंह जम्मू-काश्मीरमध्ये नजरकैदेत; अरविंद केजरीवालांचा भाजपवर निशाणा...
16
नेपाळमधील वाद थांबेना, आता एकमेकांशी भिडले आंदोलकांचे दोन गट, समोर आलं असं कारण
17
बाजारात सलग सातव्या दिवशी तेजी; निफ्टी २५,००० च्या पुढे, सेन्सेक्सही विक्रमी पातळीवर; 'या' क्षेत्रात मोठी वाढ
18
जिंकलंस भावा! जवानाने आई-वडिलांचा 'असा' केला मोठा सन्मान; Video पाहून म्हणाल 'एक नंबर'
19
बीडमध्ये २३ दिवसांत तीन सरकारी अधिकाऱ्यांचा मृत्यू; आता विस्तार अधिकाऱ्याने संपवले जीवन
20
सीपी राधाकृष्णन यांचा महाराष्ट्राच्या राज्यपालपदाचा राजीनामा, आता गुजरातच्या राज्यपालांकडे जबाबदारी

विविध समित्यांचे गठण रखडले; कार्यकर्ते वाऱ्यावर!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 19, 2021 04:45 IST

संतोष वानखडे वाशिम : महाविकास आघाडी सरकारचा पावणेदोन वर्षाचा कार्यकाळ संपुष्टात येत असतानाही, जिल्हा किंवा तालुकास्तरावरील विविध समित्यांचे गठण ...

संतोष वानखडे

वाशिम : महाविकास आघाडी सरकारचा पावणेदोन वर्षाचा कार्यकाळ संपुष्टात येत असतानाही, जिल्हा किंवा तालुकास्तरावरील विविध समित्यांचे गठण अद्याप झाले नाही. या समितीवर अशासकीय सदस्य म्हणून वर्णी केव्हा लागणार, या प्रतीक्षेत असलेल्या कार्यकर्त्यांच्या पदरी निराशाच पडत असल्याने, तिन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांमधून नाराजीचा सूर उमटत आहे.

नोव्हेंबर २०१९ मध्ये राज्यात सत्तांतर झाल्याने जिल्हा व तालुकास्तरीय विविध समित्यादेखील आपसूकच बरखास्त झाल्या. शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेस हे तिन्ही पक्ष एकत्र येऊन राज्यात महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाले. वर्षानुुवर्षे पक्षासाठी काम केलेल्या कार्यकर्त्यांचा सन्मान म्हणून कार्यकर्त्यांना जिल्हा किंवा तालुकास्तरीय समितीवर अशासकीय सदस्य म्हणून संधी दिली जाते. राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांची वर्णी लावण्यासाठी अशासकीय कमिट्यांचा पर्याय राजकीय नेत्यांकडे असतो. जिल्हास्तरावरील जवळपास २२, तर तालुकास्तरावरील १० ते १२ समित्या आहेत. यात पालकमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली जवळपास १४ ते १७ समित्या आहेत. महाविकास आघाडी सरकारचा पावणेदोन वर्षांचा कालावधी संपुष्टात येत असतानाही, केवळ दोन समित्यांचा अपवाद वगळता उर्वरित एकाही समितीचे गठण होऊ शकले नाही. विविध समित्यांमध्ये अशासकीय सदस्य म्हणून नियुक्ती प्रक्रियेस प्रचंड विलंब होत असल्याने कार्यकर्त्यांमध्येही खदखद आहे. वर्षानुवर्षे पक्षांसाठी अविरत काम करायचे आणि समितीमध्ये अशासकीय सदस्य म्हणून साधी नियुक्तीदेखील नाही, अशी खंत निष्ठावंत कार्यकर्त्यांमधून व्यक्त केली जात आहे.

०००००००००००००००

केवळ दोन समित्यांवर नियुक्ती!

जिल्हा नियोजन समिती आणि जिल्हा खणिकर्म समिती अशा दोन समित्यांमध्ये अशासकीय सदस्य म्हणून कार्यकर्त्यांची वर्णी लागली आहे. उर्वरित जिल्हा विद्युत मंडळ समन्वय समिती, जिल्हास्तरीय रोजगार हमी योजना समिती, सार्वजनिक वितरण व्यवस्था दक्षता समिती, जिल्हा दक्षता व नियंत्रण समिती, अपंग कल्याण समिती, जिल्हा ग्राहक संरक्षण परिषद, तालुकास्तरीय संजय गांधी निराधार समिती, तांडा सुधार वस्ती समिती, लोककलावंत समिती, कृषी विभागाची आत्मा समिती, जिल्हा भ्रष्टाचार निर्मूलन समिती, बालकामगार सल्लागार समिती यांसह अन्य समित्यांचे गठण रखडले आहे.

०००००००००००००००

कार्यकर्त्यांना संधीच नाही; पक्ष वाढेल कसा?

स्थानिक पातळीवर पक्षवाढीसाठी कार्यकर्ते, पदाधिकारी जिवाचे रान करीत असतात. पक्षाचा कुणी नेता जिल्ह्यात येत असेल, तर पक्षाची ताकद दिसावी म्हणून किंवा एखादे आंदोलन असेल, तर पक्षाचा झेंडा खांद्यावर देऊन कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांनाच पुढे केले जाते; मग समितीवर अशासकीय सदस्य म्हणून निवड करताना कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांचा विचार का केला जात नाही? असा प्रश्न निष्ठावंत कार्यकर्त्यांमधून उपस्थित केला जात आहे. कार्यकर्त्यांना संधीच दिली जात नसेल, तर पक्ष वाढेल कसा? असा सूर तिन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांमधून उमटत आहे.