शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

विविध समित्यांचे गठण रखडले; कार्यकर्ते वाऱ्यावर!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 19, 2021 04:45 IST

संतोष वानखडे वाशिम : महाविकास आघाडी सरकारचा पावणेदोन वर्षाचा कार्यकाळ संपुष्टात येत असतानाही, जिल्हा किंवा तालुकास्तरावरील विविध समित्यांचे गठण ...

संतोष वानखडे

वाशिम : महाविकास आघाडी सरकारचा पावणेदोन वर्षाचा कार्यकाळ संपुष्टात येत असतानाही, जिल्हा किंवा तालुकास्तरावरील विविध समित्यांचे गठण अद्याप झाले नाही. या समितीवर अशासकीय सदस्य म्हणून वर्णी केव्हा लागणार, या प्रतीक्षेत असलेल्या कार्यकर्त्यांच्या पदरी निराशाच पडत असल्याने, तिन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांमधून नाराजीचा सूर उमटत आहे.

नोव्हेंबर २०१९ मध्ये राज्यात सत्तांतर झाल्याने जिल्हा व तालुकास्तरीय विविध समित्यादेखील आपसूकच बरखास्त झाल्या. शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेस हे तिन्ही पक्ष एकत्र येऊन राज्यात महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाले. वर्षानुुवर्षे पक्षासाठी काम केलेल्या कार्यकर्त्यांचा सन्मान म्हणून कार्यकर्त्यांना जिल्हा किंवा तालुकास्तरीय समितीवर अशासकीय सदस्य म्हणून संधी दिली जाते. राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांची वर्णी लावण्यासाठी अशासकीय कमिट्यांचा पर्याय राजकीय नेत्यांकडे असतो. जिल्हास्तरावरील जवळपास २२, तर तालुकास्तरावरील १० ते १२ समित्या आहेत. यात पालकमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली जवळपास १४ ते १७ समित्या आहेत. महाविकास आघाडी सरकारचा पावणेदोन वर्षांचा कालावधी संपुष्टात येत असतानाही, केवळ दोन समित्यांचा अपवाद वगळता उर्वरित एकाही समितीचे गठण होऊ शकले नाही. विविध समित्यांमध्ये अशासकीय सदस्य म्हणून नियुक्ती प्रक्रियेस प्रचंड विलंब होत असल्याने कार्यकर्त्यांमध्येही खदखद आहे. वर्षानुवर्षे पक्षांसाठी अविरत काम करायचे आणि समितीमध्ये अशासकीय सदस्य म्हणून साधी नियुक्तीदेखील नाही, अशी खंत निष्ठावंत कार्यकर्त्यांमधून व्यक्त केली जात आहे.

०००००००००००००००

केवळ दोन समित्यांवर नियुक्ती!

जिल्हा नियोजन समिती आणि जिल्हा खणिकर्म समिती अशा दोन समित्यांमध्ये अशासकीय सदस्य म्हणून कार्यकर्त्यांची वर्णी लागली आहे. उर्वरित जिल्हा विद्युत मंडळ समन्वय समिती, जिल्हास्तरीय रोजगार हमी योजना समिती, सार्वजनिक वितरण व्यवस्था दक्षता समिती, जिल्हा दक्षता व नियंत्रण समिती, अपंग कल्याण समिती, जिल्हा ग्राहक संरक्षण परिषद, तालुकास्तरीय संजय गांधी निराधार समिती, तांडा सुधार वस्ती समिती, लोककलावंत समिती, कृषी विभागाची आत्मा समिती, जिल्हा भ्रष्टाचार निर्मूलन समिती, बालकामगार सल्लागार समिती यांसह अन्य समित्यांचे गठण रखडले आहे.

०००००००००००००००

कार्यकर्त्यांना संधीच नाही; पक्ष वाढेल कसा?

स्थानिक पातळीवर पक्षवाढीसाठी कार्यकर्ते, पदाधिकारी जिवाचे रान करीत असतात. पक्षाचा कुणी नेता जिल्ह्यात येत असेल, तर पक्षाची ताकद दिसावी म्हणून किंवा एखादे आंदोलन असेल, तर पक्षाचा झेंडा खांद्यावर देऊन कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांनाच पुढे केले जाते; मग समितीवर अशासकीय सदस्य म्हणून निवड करताना कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांचा विचार का केला जात नाही? असा प्रश्न निष्ठावंत कार्यकर्त्यांमधून उपस्थित केला जात आहे. कार्यकर्त्यांना संधीच दिली जात नसेल, तर पक्ष वाढेल कसा? असा सूर तिन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांमधून उमटत आहे.