शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! उद्धव ठाकरेंसह २ प्रमुख नेते 'शिवतीर्थ'वर दाखल; मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची घेतली भेट
2
नेपाळच्या माजी पंतप्रधानांना पत्नीसह बेदम मारले; जमावाच्या तावडीतून सैन्यानं कसं वाचवले?
3
जीएसटी कपातीच्या तोंडावर TVS NTORQ 150 लाँच; नव्या रुपात आली हायपर स्पोर्ट्स स्कूटर
4
'हॉटेल जाळले, लोक पर्यटकांनाही सोडत नाहीत'; नेपाळमध्ये अडकलेल्या भारतीय महिलेने सांगितली आपबिती
5
फेसबुक, इन्स्टाग्राम की ट्विटर सर्वाधिक कमाई नेमकी कुठून होते? जाणून घ्या सविस्तर
6
चीन अन् पाकसह भारतीय सैन्यही बेलारूसला पोहचले; रशियाच्या खेळीनं NATO देशांची धडधड वाढली, कारण...
7
आलिशान कार, ३२ किलो सोन्या-चांदीची बिस्किटं, दागिने; काँग्रेस आमदाराकडे कोट्यवधींचं घबाड
8
दिल्ली पोलिसांची मोठी कारवाई, देशभरातून ९ संशयित ISIS दहशतवादी ताब्यात!
9
पोलिसांना पाहताच उठून उभा राहिला पाण्यात पडलेला मृतदेह, व्हिडीओ काढणारे झाले अवाक्
10
HDFC Bank च्या ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी! 'या' दिवशी ९० मिनिटांसाठी बंद राहणार UPI सेवा, जाणून घ्या
11
दुधाचे भाव कमी होणार! अमूल-मदर डेअरीचे दूध किती रुपयांनी स्वस्त होणार? कंपनीकडून निर्णयाचं स्वागत
12
राहा फिट! वेट लॉससाठी व्हायरल होतंय ६-६-६ वॉकिंग चॅलेंज; बारीक होण्याचा सुपरहिट फॉर्म्युला?
13
भुजबळ म्हणाले, "हैदराबाद गॅझेटचा जीआर रद्द करा", विखे पाटलांनी दिलं उत्तर, म्हणाले "रद्द करण्याची गरज नाही"
14
वीज बिलाची चिंता सोडा, पिकांना भरपूर पाणी द्या; उपसा योजनांच्या वीज सवलतीस २ वर्षे मुदतवाढ
15
बाप बडा न भैया, सबसे बडा रुपैया! जमिनीच्या वाटणीसाठी मृतदेह २ दिवस ठेवला घरात
16
Raja Raghuvanshi : सोनम बेवफा! "तो जिवंत आहे की मेला?", राजा रघुवंशीचा काटा काढल्यावर पत्नीने विचारलेला प्रश्न
17
समृद्धी महामार्गावर खिळे ठोकून दुरुस्ती की घातपाताचा प्रयत्न? अनेक वाहने पंक्चर, प्रवासी संतप्त
18
पितृपक्ष 2025: श्राद्धाचा नैवेद्य ठेवताना डावीकडून उजवीकडे पाणी फिरवतात; का ते माहितीय का?
19
गेली कबुतरे कुणीकडे? दाणे विक्रेत्यांनीही गाशा गुंडाळला; दादरचा कबुतरखाना पूर्णपणे बंद
20
नवी मुंबईतील 'त्या' बांधकामांना 'ओसी' देऊ नये; विधान परिषद सभापतींचे आदेश

दोन ठिकाणी शासकीय कार्यालयांना आग

By admin | Updated: April 24, 2017 02:20 IST

कारंजा येथे वन विभाग, तर आसोला येथे शाळेचा समावेश : लाखोंचे नुकसान

वाशिम: जिल्ह्यात दोन वेगवेगळ्या शासकीय कार्यालयाला आग लागल्याची घटना रविवार, २३ एप्रिल रोजी घडली. कारंजा येथे वन विभागाच्या कार्यालयातील संगणकासह दस्ताऐवज जळून खाक झाले, तर आसोला येथे जिल्हा परिषद शाळेच्या इमारतीला व लागूनच असलेल्या गोठ्याला आग लागली.कारंजा लाड : येथील मंगरुळवेश जवळील वन विभागाच्या कार्यालयाला आग लागून त्या आगीत वन विभागाच्या कार्यालयातील संगणकासह दस्ताऐवज जळून खाक झाले.रविवारी सुट्टी असल्याने कार्यालयात कोणीही हजर नसताना संगणकाच्या खोलीतून धूर येत असल्याचे महिला वन कर्मचाऱ्याचे पती शरद मोकरणे यांच्या लक्षात आले. त्यांनी वन विभागाच्या कर्मचाऱ्यांना तशी माहिती देऊन अग्निशमन दलाला पाचारण केले. या आगीमध्ये दोन संगणक संच, दोन स्कॅनर, एक कलर प्रिंटर, एक दूरध्वनी संच, दोन सिलिंग फॅन व फर्निचर जळून खाक झाले. कारंजा वन विभाग कार्यालयाच्या चार खोल्यात ही आग लागली. यामध्ये वन गुन्हे प्रकरणे, कॅशबुक, गुन्हे नोंदवही, आवक जावक रजिस्टर, वन्य प्राणी हल्ला नुकसान प्रकरणे, हरित सेना नोंदणी फॉर्म, असे दस्ताऐवजसुद्धा जळून खाक झाले. प्राथमिक अंदाजानुसार संगणक खोलीतील शॉर्ट सर्कीटमुळे ही आग लागल्याचे सांगण्यात आले. या आगीत दीड ते दोन लाख रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. दरम्यान, वाशिम येथील अधिकारी आर.बी. गवई, यांनी घटनास्थळाला भेट दिली. या आगीसंबंधी पोलिसात तक्रार दाखल केली असून, पोलीस, लाईनमन व वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी आग विझविण्याचा प्रयत्न केला. आग विझविण्याचे साहित्य उपलब्ध असूनदेखील आगीच्या रुद्रावतारामुळे त्या साहित्यापर्यंत पोहोचता आले नाही, अशी माहिती वनपरिक्षेत्र अधिकारी डी.एस. डोंगरे यांनी दिली.मोप : रिसोड तालुक्यातील आसोला येथे जुन्या जिल्हा परिषद शाळेच्या इमारतीला आग लागली व त्या शेजारील गोठासुद्धा जळून खाक झाला. गावकऱ्यांच्या सतर्कतेमुळे गोठ्यातील जनावरांना बाहेर काढल्याने प्राणीहानी टळली.मारोतीच्या पाराजवळ जिल्हा परिषद शाळेची जुनी जीर्ण इमारत असून त्यालगत गावकऱ्यांचे गोठे आहेत. २३ एप्रिल रोजी अचानक आग लागली. गावकऱ्यांच्या सतर्कतेने गोठ्यातील जनावरांना सोडल्याने प्राणहानी टळली. आग गावात पसरु नये म्हणून उपाययोजना केल्यामुळे पुढील अनर्थ टळला. त्यानंतर अग्निशमन दलाची गाडी गावात दाखल झाली व आग विझविण्यात आली. शाळेची इमारत व नारायण पाचरणे यांचा जनावरांचा गोठा जळून खाक झाला. यावेळी संपूर्ण गावकऱ्यांनी आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी पाण्याची व्यवस्था व प्रयत्न केले.