शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! शरद पवारांनी भाकरी फिरवली! जयंत पाटलांचा राजीनामा; या नेत्याकडे जाणारा सूत्रे
2
१२ किल्ल्यांचा युनेस्को यादीत समावेश, राज ठाकरे म्हणाले, "ही अतिशय आनंदाची बाब, त्यासोबतच..."
3
“एसटीने घडविले ९ लाख ७१ हजार भाविक-प्रवाशांना विठ्ठल दर्शन”; प्रताप सरनाईकांची माहिती
4
ना कोणता साईड बिझनेस, ना जास्त पगार.., ४५ व्या वर्षी रिटायरमेंट आणि ४.७ कोटींची नेटवर्थ, कसं झालं हे शक्य?
5
नेपाळ मार्गे भारताला हादरवण्याचा प्लॅन, जैश अन् लष्करची मोठी योजना उघड
6
छत्रपती संभाजीनगर: समृद्धी महामार्गावरील टोल नाक्यावर गोळीबार, कर्मचाऱ्याच्या पोटात लागली गोळी
7
Radhika Yadav : राधिकाला मारण्यापूर्वी स्वत:लाच संपवणार होते वडील; टेनिसपटूच्या हत्या प्रकरणात पुन्हा नवा ट्विस्ट
8
अल्पवयीन मुलासह दोघांना करायला लावला ओरल सेक्स; मुंबईतून अपहरण, पुण्याला नेईपर्यंत बेदम मारहाण, घडलं काय?
9
पत्नीच्या शस्त्रक्रियेसाठी जामीन मिळवला अन् बाहेर येताच फरार झाला सिद्धू मूसेवाला हत्याकांडातील आरोपी!  
10
चातुर्मासातील पहिले पंचक रविवारपासून, अजिबात करू नका ‘ही’ कामे; ५ दिवस ठरणार अत्यंत अशुभ?
11
"राधिका यादवला लग्न करायचं होतं, पण..."; शेजाऱ्यानं काही भलतंच सांगितलं! काय म्हणाला?
12
Electric Car: एका चार्जवर ३ देश फिरले, 'या' इलेक्ट्रिक कारची गिनीज बूकमध्ये नोंद होणार!
13
Plane Crash: पायलट म्हणाला, 'तू फ्यूल बंद का केलं?'; एअर इंडिया विमान अपघाताबद्दल स्फोटक माहिती आली समोर
14
"सैफ रुग्णालयात असताना करीना कपूरच्या कारवरही हल्ला झाला", रोनित रॉयचा धक्कादायक खुलासा
15
Tarot Card: या सप्ताहात परिस्थितीचा करा स्वीकार, भावनेत न गुंतता करा सारासार विचार!
16
Air India Plane Crash: टेकऑफ ते क्रॅश होईपर्यंत 'त्या' ९८ सेकंदात काय झालं?; AAIB चा रिपोर्ट, धक्कादायक खुलासे
17
अमृता सुभाषची झाली फसवणूक? ठळक अक्षरात लिहिलं CHEATED; "ह्याबद्दल बोलूच पण..."
18
अन्न-पाणीही मिळेना, लोकांची होतेय तडफड! गाझामध्ये मदत केंद्राजवळच ७९८ लोकांचा मृत्यू
19
चातुर्मासातील पहिली संकष्ट चतुर्थी: चंद्रोदय वेळ काय? बाप्पा होईल प्रसन्न, ‘असे’ करा पूजन
20
Maharashtra Co-op Bank case: आमदार रोहित पवार यांच्याविरोधात ईडीने दाखल केले पुरवणी आरोपपत्र

दोन ठिकाणी शासकीय कार्यालयांना आग

By admin | Updated: April 24, 2017 02:20 IST

कारंजा येथे वन विभाग, तर आसोला येथे शाळेचा समावेश : लाखोंचे नुकसान

वाशिम: जिल्ह्यात दोन वेगवेगळ्या शासकीय कार्यालयाला आग लागल्याची घटना रविवार, २३ एप्रिल रोजी घडली. कारंजा येथे वन विभागाच्या कार्यालयातील संगणकासह दस्ताऐवज जळून खाक झाले, तर आसोला येथे जिल्हा परिषद शाळेच्या इमारतीला व लागूनच असलेल्या गोठ्याला आग लागली.कारंजा लाड : येथील मंगरुळवेश जवळील वन विभागाच्या कार्यालयाला आग लागून त्या आगीत वन विभागाच्या कार्यालयातील संगणकासह दस्ताऐवज जळून खाक झाले.रविवारी सुट्टी असल्याने कार्यालयात कोणीही हजर नसताना संगणकाच्या खोलीतून धूर येत असल्याचे महिला वन कर्मचाऱ्याचे पती शरद मोकरणे यांच्या लक्षात आले. त्यांनी वन विभागाच्या कर्मचाऱ्यांना तशी माहिती देऊन अग्निशमन दलाला पाचारण केले. या आगीमध्ये दोन संगणक संच, दोन स्कॅनर, एक कलर प्रिंटर, एक दूरध्वनी संच, दोन सिलिंग फॅन व फर्निचर जळून खाक झाले. कारंजा वन विभाग कार्यालयाच्या चार खोल्यात ही आग लागली. यामध्ये वन गुन्हे प्रकरणे, कॅशबुक, गुन्हे नोंदवही, आवक जावक रजिस्टर, वन्य प्राणी हल्ला नुकसान प्रकरणे, हरित सेना नोंदणी फॉर्म, असे दस्ताऐवजसुद्धा जळून खाक झाले. प्राथमिक अंदाजानुसार संगणक खोलीतील शॉर्ट सर्कीटमुळे ही आग लागल्याचे सांगण्यात आले. या आगीत दीड ते दोन लाख रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. दरम्यान, वाशिम येथील अधिकारी आर.बी. गवई, यांनी घटनास्थळाला भेट दिली. या आगीसंबंधी पोलिसात तक्रार दाखल केली असून, पोलीस, लाईनमन व वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी आग विझविण्याचा प्रयत्न केला. आग विझविण्याचे साहित्य उपलब्ध असूनदेखील आगीच्या रुद्रावतारामुळे त्या साहित्यापर्यंत पोहोचता आले नाही, अशी माहिती वनपरिक्षेत्र अधिकारी डी.एस. डोंगरे यांनी दिली.मोप : रिसोड तालुक्यातील आसोला येथे जुन्या जिल्हा परिषद शाळेच्या इमारतीला आग लागली व त्या शेजारील गोठासुद्धा जळून खाक झाला. गावकऱ्यांच्या सतर्कतेमुळे गोठ्यातील जनावरांना बाहेर काढल्याने प्राणीहानी टळली.मारोतीच्या पाराजवळ जिल्हा परिषद शाळेची जुनी जीर्ण इमारत असून त्यालगत गावकऱ्यांचे गोठे आहेत. २३ एप्रिल रोजी अचानक आग लागली. गावकऱ्यांच्या सतर्कतेने गोठ्यातील जनावरांना सोडल्याने प्राणहानी टळली. आग गावात पसरु नये म्हणून उपाययोजना केल्यामुळे पुढील अनर्थ टळला. त्यानंतर अग्निशमन दलाची गाडी गावात दाखल झाली व आग विझविण्यात आली. शाळेची इमारत व नारायण पाचरणे यांचा जनावरांचा गोठा जळून खाक झाला. यावेळी संपूर्ण गावकऱ्यांनी आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी पाण्याची व्यवस्था व प्रयत्न केले.