शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशमध्ये हिंदूंवर होत असलेल्या अत्याचारावरून मुंबईपासून दिल्लीपर्यंत संताप, तीव्र आंदोलने
2
‘उद्धवसेनेसाठी मुंबई सोन्याची अंडी देणारी कोंबडी’,एकनाथ शिंदे यांची टीका  
3
कणकवलीचे नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट, शिंदेसेनेत प्रवेश करणार? चर्चांना उधाण
4
अवजड ट्रक नियंत्रण सुटून कारवर उलटला, भीषण अपघातात पाच जणांचा मृत्यू 
5
पाकिस्तानला 'लॉटरी' लागली... १,३५,००,००,००,०००च्या बोलीवर PIA एअरलाईन्सचा सौदा पक्का !
6
IND W vs SL W : गोलंदाजीत शर्मा; फलंदाजीत वर्मा! दुसऱ्या टी-२० सामन्यातही लंकेसमोर टीम इंडियाचा डंका!
7
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
8
खरंच दारूच्या नशेत बेधुंद होते इंग्लंड क्रिकेटपटू? ECB नं चौकशीची तयारी दाखवली, पण...
9
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
10
उल्हासनगर: शिंदेसेनेत 'जुने विरुद्ध नवे' संघर्ष; तरुणांना संधी देण्याची युवासेनेची मागणी
11
IND W vs SL W : 'शर्माजी की बेटी' वैष्णवीसह श्री चरणीनं घेतली श्रीलंकेच्या बॅटर्सची फिरकी!
12
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
13
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
14
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
15
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
16
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
17
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
18
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
19
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
20
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

अखेर ग्रामीण बँकेची शाखा आॅनलाइन पोर्टलवर 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 4, 2017 19:39 IST

इंझोरी: आॅनलाइन अर्ज सादर करण्यासाठीच्या पोर्टलवर कारंजा येथील विदर्भ ग्रामीण कोकण बँकेच्या शाखेचे नाव २ सप्टेंबर रोजी रात्री समाविष्ट करण्यात आले. या संदर्भात लोकमतने २६ आॅगस्टच्या अंकात ‘कर्जमाफीच्या आॅनलाइन पोर्टलवरून बँक गायब’ या मथळ्याखाली, तर १ सप्टेंबरच्या अंकात ’कारंजा शाखेतील कर्जमाफीचे अर्ज वाशिम शाखेच्या नावे’ या मथळ्याखाली वृत्त प्रकाशित करून प्रशासनाचे लक्ष वेधले होते. त्याची दखल घेऊन प्रशासनाने या बँकेचे नाव अखेर आॅनलाइन पोर्टलवर समाविष्ट केले. 

ठळक मुद्देशेतक-यांची समस्या निकाली अर्ज सादर करण्याची प्रक्रिया सुरू

लोकमत न्यूज नेटवर्कइंझोरी: आॅनलाइन अर्ज सादर करण्यासाठीच्या पोर्टलवर कारंजा येथील विदर्भ ग्रामीण कोकण बँकेच्या शाखेचे नाव २ सप्टेंबर रोजी रात्री समाविष्ट करण्यात आले. या संदर्भात लोकमतने २६ आॅगस्टच्या अंकात ‘कर्जमाफीच्या आॅनलाइन पोर्टलवरून बँक गायब’ या मथळ्याखाली, तर १ सप्टेंबरच्या अंकात ’कारंजा शाखेतील कर्जमाफीचे अर्ज वाशिम शाखेच्या नावे’ या मथळ्याखाली वृत्त प्रकाशित करून प्रशासनाचे लक्ष वेधले होते. त्याची दखल घेऊन प्रशासनाने या बँकेचे नाव अखेर आॅनलाइन पोर्टलवर समाविष्ट केले. शासनाने शेतकºयांना दीड लाख रुपर्यांपर्यत सरसकट कर्जमाफी देण्याचे ठरविले. यासाठी शेतकºयांकडून आॅनलाईन अर्ज घेण्यासाठी शासनाच्यावतीने तयार करण्यात आलेल्या आपले सरकार आॅनलाईन पोर्टलवर विदर्भ कोकण ग्रामीण बँकेच्या कारंजा लाड शाखेचे नावच नसल्याने या शाखेच्या कर्जदार शेतकºयांना अर्ज सादर करणे अशक्य झाले होते. या संदर्भात लोकमतने वृत्त प्रकाशित करून प्रशासनाचे लक्ष वेधल्यानंतर बँकेच्या वरिष्ठ अधिकाºयांनी कारंजा शाखेच्या बँकेतील कर्जदार शेतकºयांना वाशिम शाखेच्या नावे कर्जमाफीचे अर्ज सादर करण्याचा पर्याय उपलब्ध करून दिला. त्यानंतर अनेक शेतकºयांनी वाशिम शाखेच्या नावे अर्जही सादर केले; परंतु पुढे त्यांचे अर्ज नामंजूर झाल्यास संबंधित सर्व शेतकरºयांना पात्र असतानाही कर्जमाफीपासून वंचित राहावे लागण्याची भितीही होती. या पृष्ठभूमीवर लोकमतने वृत्त प्रकाशित करून बँके सह जिल्हा प्रशासनाचे लक्ष वेधले. त्यानंतर लगेचच दुसºया दिवशी या बँकेच्या कारंजा शाखेचे नाव कर्जमाफीसाठी अर्ज सादर करावयाच्या आॅनलाइन पोर्टलवर समाविष्ट करण्यात आले. आता २ सप्टेंबर रोजी बँकेने ही दखल घेतली असली तरी, उर्वरित १३ दिवसांत या बँकेतील हजारो कर्जदार शेतकºयांना येत्या १५ सप्टेंबरपर्यंत कर्जमाफीचे अर्ज सादर करता येतील का, असा प्रश्न उपस्थित होत आहे.