शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! भारताने जपानला मागे टाकले; जगातील चौथी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनला
2
Corona Virus : टेन्शन वाढलं! देशात कोरोनाचे नवे व्हेरिएंट NB.1.8.1 आणि LF.7 ची एन्ट्री; कुठे आढळले रुग्ण?
3
"जे अमेरिकेने सहन केले, ते आम्हीही सहन करत आहोत", शशी थरूर यांनी पाकिस्तानला थेट सुनावले!
4
लग्न खर्च वाढलाय? आता काळजी नाही! बँका देतायत 'वेडिंग लोन', असा मिळवा लाखोंचा सपोर्ट!
5
देशात पहिली...! ओलाची रोडस्टर मोटरसायकल पुण्यात आली; कुठे पहायला मिळणार?
6
भयंकर! २५ हजारांच्या कर्जासाठी मुलगा ठेवला गहाण, मिळाला मृतदेह; काळजात चर्र करणारी घटना
7
"मुलाला कडेवर घेऊ शकत नाही"; अभिनेत्रीच्या डोळ्यात पाणी, गंभीर आजाराचा केला खुलासा
8
VIDEO: थोडक्यात वाचली जिनिलिया, कारमध्ये बसत असताना ड्रायव्हरकडून नकळत झाली चूक अन्...
9
कोर्टातून पळून गेलेला आरोपी मनसेच्या कार्यालयात पोहोचला! नेत्याला दिली धमकी, मुंबईत घडली धक्कादायक घटना 
10
साप्ताहिक राशीभविष्य: राहु-केतु-शुक्र गोचर, शनि जयंती; ६ राशींना लाभ, ६ राशींना तापदायक काळ!
11
भारताची ताकद पाहून पाकिस्तान घाबरला, देशाच्या सुरक्षेसाठी उचललं मोठं पाऊल! म्हणाला "आमचा शेजारी खतरनाक.."
12
भर उन्हाळ्यात दिल्ली पाण्यात बुडाली; पावसाचा कहर, जागोजागी पाणी तुंबले
13
खासदार असलेली ही अभिनेत्री घेणार घटस्फोट? Ex गर्लफ्रेंडसोबत पतीच्या वाढत्या संबंधामुळे नात्यात दुरावा
14
ऐकावं ते नवलच! 'या' देशात शरीराच्या वजनाइतकं मिळत कर्ज, लठ्ठपणा ठरतं श्रीमंतीच लक्षण
15
२१ व्या वर्षी परमवीर चक्र मिळालेल्या सैनिकाची खरी कहाणी, 'इक्कीस' सिनेमाची घोषणा, बिग बींचा नातू प्रमुख भूमिकेत
16
आजचे राशीभविष्य २५ मे २०२५ : धन- संपत्ति, मान - सन्मानाची प्राप्ती
17
केंद्र अन् राज्यांनी ‘टीम इंडिया’प्रमाणे काम केल्यास काहीही अशक्य नाही; PM मोदी यांचे आवाहन
18
काळजी नको, सगळे सुरळीत होईल; राहुल गांधींचा दिलासा, सीमाभागातील मृतांच्या कुटुंबांचे सांत्वन
19
५ वर्षांत एक ट्रिलियन डॉलर्स अर्थव्यवस्थेचे लक्ष्य; 'महाराष्ट्राचेही व्हिजन २०४७': CM फडणवीस
20
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आग्रही; पण विधिमंडळाच्या नीतिमूल्य समितीची अद्याप प्रतीक्षाच

खत, बियाण्यांची दरवाढ; लागवड खर्च वाढणार!

By admin | Updated: June 14, 2016 02:11 IST

शेत मशागतीची कामे पूर्ण : खरीप हंगामातील पेरणीसाठी शेतकरी सज्ज.

सुनील काकडे / वाशिमगेल्या तीन वर्षांंपासून सततचा दुष्काळ सहन करीत असणार्‍या शेतकर्‍यांना किमान यंदा तरी दमदार पाऊस होऊन जोमदार उत्पन्न हाती येईल, अशी अपेक्षा लागून आहे. दरम्यान, जिल्ह्यात जवळपास सर्वच ठिकाणी शेतमशागतीची कामे पूर्ण झाली असून, शेतकरी खरिपातील पेरणीसाठी सज्ज झाले आहेत. दुसरीकडे खत, बी-बियाणे यासह रासायनिक औषधीचे दर वाढल्याने यंदा लागवड खर्चातदेखील वाढ होणार असल्याची शक्यता वर्तविली जात आहे.वाशिम जिल्ह्यात नगदी आणि हमखास पीक म्हणून ओळखल्या जाणार्‍या सोयाबीनला शेतकर्‍यांची प्रथम पसंती आहे. सोयाबीनचे कोठार म्हणून ओळख मिळविलेल्या वाशिम जिल्ह्यात यंदाच्या खरीप हंगामातही सोयाबीनचाच विक्रमी पेरा होणार असल्याची माहिती कृषी विभागाने दिली. दरम्यान, गेल्या तीन वर्षाचा पाऊस, पीकपेरा आणि हाती आलेल्या प्रत्यक्ष उत्पादनाचा विचार केल्यास निसर्गाचा लहरीपणा, पावसातील अनियमितता आदी कारणांमुळे शेतकर्‍यांच्या पदरी केवळ निराशाच पडल्याचे दिसून येते. खरीप आणि त्यापाठोपाठ रब्बी हंगामातही खासगी तथा बँकांकडून कर्ज उचलणार्‍या शेतकर्‍यांना किमान लागवड खर्चाइतकेही उत्पन्न न मिळाल्यामुळे त्यांच्या अडचणींमध्ये भर पडली आहे. असे असताना झाले गेले विसरून शेतकरी पुन्हा एकदा नव्या जोमाने २0१६ च्या खरीप हंगामाला सामोरे जात आहे. मात्र, यंदाही मृग नक्षत्र सुरू होऊन ५ दिवस उलटल्यानंतरही मोठय़ा पावसाची हजेरी अद्याप लागलेली नाही. दुसरीकडे शेत मशागतीपासून बी-बियाणे, खत, रासायनिक औषधीचे दर गगनाला भिडल्यामुळे सर्वसामान्य शेतकरी अक्षरश: जेरीस आले आहेत. सध्या शेतकर्‍यांना प्रती ३0 किलोच्या सोयाबीन बियाणे बॅगसाठी २४00 रुपये मोजावे लागत आहेत; तर खताची एक बॅग किमान हजार रुपयाला मिळत आहे. याशिवाय काडीकचरा वेचणे, नांगरण, वखरण आदी शेतमशागतीच्या कामांसाठी एकरी सुमारे ५ ते ६ हजार रुपये खर्च लागलेला आहे. तथापि, पावसाने किमान यंदातरी अपेक्षित साथ द्यावी, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.