शहरं
Join us  
Trending Stories
1
'ऑपरेशन सिंदूरमध्ये ८ विमाने पडली'; 'टॅरिफ'ने भारत-पाक युद्ध थांबवल्याचा ट्रम्प यांचा नवा गौप्यस्फोट
2
आजचे राशीभविष्य,०७ नोव्हेंबर २०२५: नवे कार्य हाती घेऊ नका; मतभेद होणार नाहीत याची दक्षता घ्यावी
3
“शेतकऱ्यांना मोफत नको म्हणणाऱ्या अजित पवारांना फुकटात जमिनी लाटण्याचा भस्म्या”: काँग्रेस
4
एकनाथ शिंदेंचा अजितदादांना धक्का! २५ सरपंच, पदाधिकाऱ्यांसह बड्या नेत्याचा शिवसेनेत प्रवेश
5
राजस्थानमध्ये पकडला गेला 'ओसामा'; इंटरनेट कॉलिंगवर ४ वर्षांपासून होता अफगाणिस्तानातील दहशतवाद्यांच्या संपर्कात
6
राणेंच्या काॅलेजमध्ये MBBS प्रवेशासाठी मागितले ९ लाख रुपये, CETने दिले चाैकशीचे आदेश
7
३ राजयोगात कार्तिक संकष्ट चतुर्थी: ८ राशींवर बाप्पा-धनलक्ष्मी कृपा; पैसा-पदोन्नती-भाग्योदय!
8
अग्रलेख: लोकशाहीवरच प्रश्नचिन्ह! एच-फाईल्स अन् निवडणूक प्रक्रियेवरील विश्वासालाच तडा
9
गंगर कन्स्ट्रक्शनवर १०० कोटींच्या फसवणुकीचा गुन्हा दाखल; एकच फ्लॅट दोघांना विकला!
10
हास्यास्पद खर्चमर्यादा अन् पैशांची उधळपट्टी... आगामी निवडणुकांमध्ये रंगणार वर्चस्वाची लढाई
11
२ अभियंत्यांना वाचवण्यासाठी रेल्वे कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाने घेतला २ निष्पाप प्रवाशांचा बळी
12
अजित पवारांचे पुत्र पार्थ यांचा जमीन घोटाळा; ३०० कोटींत खरेदी केली १८०० कोटींची जमीन
13
तोपर्यंत 'त्या' नागरिकाला मतदानाचा अधिकार नाही; युवतीच्या अर्जावर ६ आठवड्यांत निर्णय घ्या!
14
नेरळ-माथेरान मिनी ट्रेनचे इंजिन पुन्हा धडधडले; मोठ्यांसह बच्चेकंपनी खूश; वेळापत्रकही जाहीर
15
शिंदेसेनेला अंगावर घेणारे भाजपाचे आमदार संजय केळकर निवडणूक प्रमुख; महायुतीची शक्यता दुरावली
16
ठाणे, दिवा अन् कल्याणमध्येही प्रवाशांचे प्रचंड हाल; लोकल कर्जतकडे वळवल्याने प्रवासी संतप्त
17
शिंदेसेना-भाजपचे परस्परांना युती तोडून टाकण्याचे आव्हान; दोन्ही गटांची एकमेकांवर टीकास्त्र
18
मेट्रोची भाडेवाढ? समितीसाठी केंद्राकडे प्रस्ताव; अंधेरी, दहिसर मेट्रो भाडे वाढण्याची शक्यता
19
येत्या ११ नोव्हेंबरला प्रभागात कोणाची लागणार लॉटरी? मुंबईकरांसह सर्वपक्षीय नगरसेवकांचे लक्ष
20
प्रसिद्ध गायिका आणि अभिनेत्री सुलक्षणा पंडित यांचं निधन, मुंबईतील रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास

राष्ट्रसंतांचे चरणस्पर्शाने पावन झालेले ‘लाडेगाव’

By admin | Updated: April 29, 2017 14:49 IST

३० एप्रिल हा राष्ट्रसंतांचा जयंती दिवस असून, या औचित्यावर  समस्त  लाडेगाववासियांनी त्यांच्या  स्मृती जागविल्या.

ग्रामस्थांनी जपल्या स्मृती : उद्या तुकडोजी महाराजांची जयंतीकारंजा लाड : मानवतेचे महान पुजारी व ग्रामगीतेच्या माध्यमातून  सर्वधर्म  समभावाची शिकवण देणारे वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज ६० वर्षांपूर्वी कारंजातील लाडेगावला भेट दिले. त्यांच्या चरणस्पर्शाने लाडेगाव पावण झाले. त्यावेळी राष्ट्रसंतांंनी लोकसहभागासतून या ठिकाणी बंधाऱ्याची निर्मिती करून एक प्रेरणा ग्रामस्थांच्या मनात निर्माण केल्याने   या गावातील समस्या कायमची मिटली. ३० एप्रिल हा राष्ट्रसंतांचा जयंती दिवस असून, या औचित्यावर  समस्त  लाडेगाववासियांनी त्यांच्या  स्मृती जागविल्या. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचा सहवास म्हणजे जीवनातील एक अमुल्य ठेवा होय. असे मत गुरुदेवप्रेमींनी व्यक्त केले.राष्ट्रसंत तुकडोजी महाराज १९५७ मध्ये लाडेगाव येथे आले होते. त्यावेळी  गावकऱ्यांच्या सहकार्याने महाराजांनी लोकसहभागातून  गावाशेजारी बंधाऱ्याचे बांधकाम केले. हा बंधारा लाडेगाववासियांसाठी प्रेरणादायक ठरला असून, आजही तो त्याची साक्ष देत आहे.  स्वावलंबन, सेंद्रीय शेती, परसबाग,  खादी कपड्याचा वापर, व्यसनमुक्ती, सामुदायीक प्रार्थना, ध्यान,रामधुन, सर्वधर्म समभाव, ग्रामसफाई गाव तंटामुक्त, स्वच्छता अभियान, ग्रामसभा, लोकसहभागातून गावाचा विकास, सामुहिक विवाह सोहळा,  मुलांवर संस्कार आदि विषयाची गावकऱ्यांनी अंमलबजावणी करावी म्हणून  राष्ट्रसंतांनी या ठिकाणी एक  महिन्याच्या प्रशिक्षण वर्गाचे आयोजन करण्याचे आवाहनही  केले आणि गावातील देवराव पाटील सवाई यांच्या पुढाकाराने  हे प्रशिक्षण पार पडले. या शिबिराच्या समारोपीय कार्यक्रमाला वंदनीय राष्ट्रसंतांनी खुद्द हजेरी लावली होती. प्रशिक्षण वर्गात तालुक्यातील शहा, काजळेश्वर, दिघी, अर्लीमदापूर, यासह  असंख्य गावातील गुरुदेव भक्त शिबिरात सहभागी होते.  या  दरम्यान  गाव शेजारी असणाऱ्य  बेंबळा  नदीला पुर आल्यास गावाला पाण्यापासून धोका होता, मात्र महाराजांनी लोक सहभागातून गावाला लागुन मातीचा बांध बांधण्यास गावकऱ्यांना प्रवृत्त केले व बंधारा  बांधला. कधी काळी नदीला पुर आल्यास  त्यापासून संरक्षणासाठी हा बांध उपयोगी ठरतो.  राष्ट्रसंतांच्या विचाराने प्रेरीत झालेल्या गावात अजुनही गुरुदेव सेवा मंडळाची शाखा कार्यरत आहे.गावात नित्यनियमाने सर्वधर्मीय  सामुदायीक  प्रार्थना मंदिरात सकाळी  सामुदायिक  ध्यान व सायंकाळची  प्रार्थना रामधुन हा कार्यक्रम  ६० वर्षापासून सुरु आहे.