शहरं
Join us  
Trending Stories
1
पर्यावरणप्रेमींच्या तीव्र विरोधासमोर केंद्र सरकार झुकलं, ‘अरवली’ला वाचवण्यासाठी घेतला मोठा निर्णय   
2
बीडच्या ‘सह्याद्री देवराई’ला भीषण आग; अभिनेते सयाजी शिंदे यांनी जोपासलेली हजारो झाडे संकटात
3
थायलंड-कंबोडिया सीमेवरील विष्णूची मूर्ती बुलडोझरने पाडली, भारताने घेतला तीव्र आक्षेप  
4
बांगलादेशमध्ये हिंसाचार सुरूच, पेट्रोल बॉम्ब हल्ल्यानंतर आता मध्यरात्री ढाका विद्यापीठात मोडतोड
5
नाताळाच्या पूर्वसंध्येला बांगलादेशची राजधानी हादरली, पेट्रोल बॉम्बच्या स्फोटात एकाचा मृत्यू
6
नवीन वर्षात बदलणार काँग्रेसचं 'पॉवर' समीकरण; प्रियांका गांधींना मिळणार महत्त्वाची जबाबदारी
7
IPL 2026 आधीच RCBच्या स्टार खेळाडूला होणार अटक? तब्बल ५ कोटी मोजून घेतलंय संघात
8
पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी सक्षम ताटेची आई व प्रेयसीचा आत्मदहनाचा प्रयत्न, दिला निर्वाणीचा इशारा...
9
‘प्लॅन २०४९’, चीनची भारताच्या अरुणाचल प्रदेशवर नजर, लष्करी बळावर कब्ज्याची तयारी
10
"आम्हाला मतदान केलं तर प्रश्न सोडवू, पण दुसरीकडे केलं तर..."; नितेश राणेंचा मतदारांना इशारा
11
VIDEO: धावत्या ट्रेनमध्ये WWE स्टाईल राडा! 'इंटरसिटी'मध्ये प्रवाशांमध्ये तुफान हाणामारी
12
Sukesh Chandrashekhar : "माय लव्ह, हे तेच घर आहे जे..."; जेलमध्ये असलेल्या सुकेशने जॅकलिनला गिफ्ट केला आलिशान बंगला
13
Vijay Hazare Trophy: ४०० हून अधिक धावांचं लक्ष्य ४७.३ षटकांतच गाठलं, कर्नाटकच्या संघाची इतिहासात नोंद!
14
'मला पंतप्रधान मोदींना भेटायचे आहे', उन्नाव बलात्कार पीडिता राहुल गांधींना म्हणाली...
15
प्रेमविवाह फसला; लग्नाच्या दुसऱ्या दिवसापासून जोडपे झाले वेगळे, ८ दिवसांत घटस्फोट
16
Smartphones: २०२५ मधील 'टॉप ५' पैसा वसूल स्मार्टफोन, यादीत मोठ्या ब्रँड्सचा समावेश!
17
रेल्वे प्रवासादरम्यान माजी मंत्र्यांच्या बॅगवर चोरांचा डल्ला, फोन, रोख रक्कम आणि दागिने लंपास
18
इंडिगोच्या वर्चस्वाला धक्का; केंद्र सरकारकडून ‘या’ दोन नव्या विमान कंपन्यांना मान्यता
19
Prashant Jagtap Resignation: २७ वर्षांची साथ सोडली; प्रशांत जगतापांचा राष्ट्रवादी शरद पवार पक्षाला रामराम
20
“राहुल गांधींसारखे पार्ट टाइम राजकारणी होऊ नका, कठोर मेहनत घेत राहा”; नितीन नबीन यांचा संदेश
Daily Top 2Weekly Top 5

राष्ट्रसंतांचे चरणस्पर्शाने पावन झालेले ‘लाडेगाव’

By admin | Updated: April 29, 2017 14:49 IST

३० एप्रिल हा राष्ट्रसंतांचा जयंती दिवस असून, या औचित्यावर  समस्त  लाडेगाववासियांनी त्यांच्या  स्मृती जागविल्या.

ग्रामस्थांनी जपल्या स्मृती : उद्या तुकडोजी महाराजांची जयंतीकारंजा लाड : मानवतेचे महान पुजारी व ग्रामगीतेच्या माध्यमातून  सर्वधर्म  समभावाची शिकवण देणारे वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज ६० वर्षांपूर्वी कारंजातील लाडेगावला भेट दिले. त्यांच्या चरणस्पर्शाने लाडेगाव पावण झाले. त्यावेळी राष्ट्रसंतांंनी लोकसहभागासतून या ठिकाणी बंधाऱ्याची निर्मिती करून एक प्रेरणा ग्रामस्थांच्या मनात निर्माण केल्याने   या गावातील समस्या कायमची मिटली. ३० एप्रिल हा राष्ट्रसंतांचा जयंती दिवस असून, या औचित्यावर  समस्त  लाडेगाववासियांनी त्यांच्या  स्मृती जागविल्या. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचा सहवास म्हणजे जीवनातील एक अमुल्य ठेवा होय. असे मत गुरुदेवप्रेमींनी व्यक्त केले.राष्ट्रसंत तुकडोजी महाराज १९५७ मध्ये लाडेगाव येथे आले होते. त्यावेळी  गावकऱ्यांच्या सहकार्याने महाराजांनी लोकसहभागातून  गावाशेजारी बंधाऱ्याचे बांधकाम केले. हा बंधारा लाडेगाववासियांसाठी प्रेरणादायक ठरला असून, आजही तो त्याची साक्ष देत आहे.  स्वावलंबन, सेंद्रीय शेती, परसबाग,  खादी कपड्याचा वापर, व्यसनमुक्ती, सामुदायीक प्रार्थना, ध्यान,रामधुन, सर्वधर्म समभाव, ग्रामसफाई गाव तंटामुक्त, स्वच्छता अभियान, ग्रामसभा, लोकसहभागातून गावाचा विकास, सामुहिक विवाह सोहळा,  मुलांवर संस्कार आदि विषयाची गावकऱ्यांनी अंमलबजावणी करावी म्हणून  राष्ट्रसंतांनी या ठिकाणी एक  महिन्याच्या प्रशिक्षण वर्गाचे आयोजन करण्याचे आवाहनही  केले आणि गावातील देवराव पाटील सवाई यांच्या पुढाकाराने  हे प्रशिक्षण पार पडले. या शिबिराच्या समारोपीय कार्यक्रमाला वंदनीय राष्ट्रसंतांनी खुद्द हजेरी लावली होती. प्रशिक्षण वर्गात तालुक्यातील शहा, काजळेश्वर, दिघी, अर्लीमदापूर, यासह  असंख्य गावातील गुरुदेव भक्त शिबिरात सहभागी होते.  या  दरम्यान  गाव शेजारी असणाऱ्य  बेंबळा  नदीला पुर आल्यास गावाला पाण्यापासून धोका होता, मात्र महाराजांनी लोक सहभागातून गावाला लागुन मातीचा बांध बांधण्यास गावकऱ्यांना प्रवृत्त केले व बंधारा  बांधला. कधी काळी नदीला पुर आल्यास  त्यापासून संरक्षणासाठी हा बांध उपयोगी ठरतो.  राष्ट्रसंतांच्या विचाराने प्रेरीत झालेल्या गावात अजुनही गुरुदेव सेवा मंडळाची शाखा कार्यरत आहे.गावात नित्यनियमाने सर्वधर्मीय  सामुदायीक  प्रार्थना मंदिरात सकाळी  सामुदायिक  ध्यान व सायंकाळची  प्रार्थना रामधुन हा कार्यक्रम  ६० वर्षापासून सुरु आहे.