शहरं
Join us  
Trending Stories
1
हवामान विभागाची मोठी भविष्यवाणी! शेतकऱ्यांनो, सावधान... महाराष्ट्रात पुढील १५ दिवस पाऊस...
2
कुलगाममध्ये तिसऱ्या दिवशीही चकमक सुरू; आतापर्यंत तीन दहशतवादी ठार, या वर्षातील सर्वात मोठी कारवाई
3
पनवेलमध्ये राडा झाला...! राज ठाकरेंच्या इशाऱ्यानंतर पनवेलमधील लेडीज बारवर मनसेचा हल्ला 
4
मुद्द्याची गोष्ट : टॅरिफच्या खेळीने चेकमेट कोण? कुणाला बसणार फटका?
5
भारतीयांनी घाम गाळून ज्या वस्तू बनवल्या, त्याच तुम्ही खरेदी करा; व्यापाऱ्यांनीही पुढाकार घ्यावा; पंतप्रधान मोदींचं आवाहन
6
आजचे राशीभविष्य ३ ऑगस्ट २०२५ : सांसारिक गोष्टी बाजूला ठेवाल, गूढ रहस्यमय विद्येत रमाल
7
'अटके'वरून शाब्दिक युद्ध रंगलं; "...तर अटक करून दाखवाच"; राज ठाकरे यांचं मुख्यमंत्र्यांना थेट आव्हान!
8
‘भीमराया…’ गीताची जन्मकथा सांगताना सरन्यायाधीश गवईंचा गळा दाटला! सुरेश भटांनी कसे लिहिले भीमरायाचे वंदना गीत? ऐकवली संपूर्ण कहाणी
9
प्रज्वल रेवण्णाला बलात्कारप्रकरणी जन्मठेप, १० लाख रुपयांचा दंडही; पीडित महिलेला ७ लाख रु. भरपाई देण्याचा आदेश
10
"हमे अयोध्या का मंदिर आरडीएक्स से उडाना है, पचास बंदे चाहिए..."; शिरूरच्या तरुणाला कराचीतून मेसेज, १ लाखाची ऑफर! गुन्हा दाखल
11
रस्ते गिळलेली अतिक्रमणे होणार नियमित; महसूल विभागाचा मोठा निर्णय
12
मिठी नदीच्या सफाई कामात झालेल्या कथित घोटाळ्याप्रकरणी ईडीचे आठ ठिकाणी छापे 
13
सहाव्या वर्षी वडिलांना एक चाल सांगितली अन्...; कोनेरू हम्पीची खास आठवण
14
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
15
IND vs ENG : "मी रोहित भाईला पाहिलं अन्..." शतकी खेळीनंतर यशस्वीनं शेअर केली ती खास गोष्ट (VIDEO)
16
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
17
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
18
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
19
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
20
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप

खाजगी गोदामात माल ठेवणे भोवणार

By admin | Updated: July 4, 2014 00:04 IST

तालुका कृषी अधिकारी कार्यालयाला दिलेले बी-बियाण,रासायनिक 0खते,कीटकनाशके कृषी सेवा केन्द्राच्या गोदामात ठेवण्याच्या प्रकरण आहे.

मानोरा : तालुक्यात विविध योजनेच्या माध्यमातूने शेतकर्‍यांना वाटपासाठी तालुका कृषी अधिकारी कार्यालयाला दिलेले बी-बियाण,रासायनिक खते,कीटकनाशके राधाकृष्ण कृषी सेवा केन्द्राच्या गोदामात ठेवण्याच्या प्रकरणाची दखल घेऊन वाशिम येथील जिल्हा कृषी अधीक्षक हिंदुराव चव्हाण २ जुलै रोजी पथकासह मानोरा येथे चौकशीकरिता दाखल झाले.यामुळे हे प्रकरण तालुका कृषी विभागाला महागात पडणार असल्याचे दिसून येत आहे.मानोरा येथील तालुका कृषी विभागांतर्गत शेतकरी बांधवाकरिता ज्वारी, उडीद, मुंग, तूर, सोयाबीन बियाणे तसेच युरिया, सल्फेट, तननाशक आणि किटकनाशक आदी साहित्य शासनाकडून तालुका कृषी विभागाला पुरविण्यात आले होते. मानोरा येथील राधाकृष्ण कृषी सेवा केंद्र यांच्या खाजगी गोडावूनमध्ये तालुका कृषी विभागाने सदर माल कुठलाच करार न करता ठेवला. याविरोधात १ जुलैला प्रा.ओम बलोदे,सुजाता शेरे, मनोज खडसे आणि संतोष पुरी यांनी पुढाकार घेऊन कृषी अधिकारी गुलाब राठोड सोबत गोडावूनची पाहणी केली असता राधाकृष्ण कृषी सेवा केंद्राच्या बी-बियाणे व रासायनिक ठेवण्याच्या गोडावूनमध्ये तालुका कृषी विभागाचा माल व राधाकृष्ण कृषी सेवा केंद्राचा माल आढळून आला. यामुळे वाशिम येथील जिल्हा कृषी अधीक्षक हिंदुराव चव्हाण, उपविभागीय अधिकारी इंगळे, तंत्रअधिकारी सचिन कांबळे, गुणवत्ता नियंत्रण अधिकारी उलेमाले हे तालका कृषी विभागाच्या कार्यालयात येवून सदर प्रकरणाची चौकशीला सुरूवात केली. यात प्रामुख्याने तालुका कृषी विभागाकडे गोडावून भाड्याने घेण्यासाठी पैसे नसल्यामुळे हंगामात शासनाकडून येणारे साहित्य, बी-बियाणे, रासायनिक खते, कीटकनाशक आदी साहित्य नाममात्र २ हजार रूपये भाड्याने देता येते. तीन महिन्याचे ६ हजार देता येते.कृषी सेवा केंद्र संचालकांना परवाना देताना त्या परवान्यात तरतूद केलेली असते असे जिल्हा कृषी अधीक्षक हिंदुराव चव्हाण यांनी सांगितले.शेतकर्‍यासाठी पाठविलेला माल शेतकर्‍यापर्यंत पोहोचला नसेल परस्पर विक्री केला असल्यास सदर अधिकारी, कर्मचारी याची गय केली जाणार नाही असेही त्यांनी सांगितले. सदर प्रकरणी आपण विभागीय आयुक्त अमरावती तसेच सहसंचालक यांच्याकडे दाद मागणार वेळप्रसंगी आमरण उपोषण करू असे प्रस्तुत प्रतिनिधी बोलताना अनौपचारिक बोलताना सांगीतले प्रा.ओम बलोदे यांनी सांगीतले.