शहरं
Join us  
Trending Stories
1
"चिंताजनक परिस्थिती..!", लोकलमधल्या गर्दीवर कोर्टाची टिप्पणी, मृत्यू रोखण्यासाठी कोणता सल्ला दिला? 
2
घरातून निघाले पण...; नवविवाहित जोडपे ६ दिवसांपासून बेपत्ता; पोलिसांचा शोध सुरू
3
इराणच्या मदतीला चीन धावला; युद्ध साहित्य घेऊन ड्रॅगनची तीन विमाने तेहरानमध्ये दाखल...
4
IPL मधील टॉपर 'टेस्ट'मध्ये फेल; पदार्पणाच्या सामन्यात पदरी पडला भोपळा!
5
Iran Sejjil Missile: इराणची सेजिल मिसाईल किती विध्वंस करू शकते, का होतेय इतकी चर्चा?
6
'गरिबांच्या मुलांनी इंग्रजी भाषा शिकावी, हे BJP-RSS ला नकोय', राहुल गांधींचा हल्लाबोल
7
एअर इंडियाच्या विमानाला पुणे विमानतळावर लँडिंग करण्यापूर्वीच पक्ष्याची धडक, परतीचे उड्डाण रद्द
8
ENG vs IND : केएल राहुल-यशस्वी जैस्वालची कमाल! ११ वर्षांत कुणाला जमलं नाही ते जोडीनं करुन दाखवलं
9
"मी प्लेन क्रॅश करेन..."; फ्लाईट अटेंडंटशी वाद झाल्यावर महिलेने घातला गोंधळ, दिली धमकी
10
मोठी बातमी...! "इराणचा अणुऊर्जा प्रकल्प सुरक्षित, इस्रायलनं दिला मोठा शब्द; रशियाचा दावा
11
Rain Update : कोकणात अतिवृष्टीचा इशारा! उर्वरीत महाराष्ट्रात कसा असणार पाऊस? जाणून घ्या
12
कोण आहेत इराणचे नवे इंटेलिजेंस चीफ जनरल माजिद खादेमी? जाणून घ्या त्यांच्याबद्दल..
13
भाजपा नगरसेवकांनी पक्षाविरोधातच पुकारलं बंड; नगराध्यक्षाविरोधातच आणला अविश्वास ठराव
14
गांगुली-द्रविडनंतर आता साई सुदर्शन! इंग्लंडच्या मैदानात जुळून आला कमालीचा योगायोग
15
Vastu Shastra: लक्ष्मी आणि कुबेराची प्रतिमा असेल जर प्रत्येक घरी, तर सुख वैभव नांदेल दारी!
16
अहमदाबादच्या विमान अपघातातून रमेश वाचले, पण आता घराबाहेर पडणंही झालं कठीण! कारण काय? 
17
ड्रॅगनला मिरची का झोंबली?; संतापलेल्या चीनने रेड लाईन क्रॉस करून या देशात पाठवली ६१ लढाऊ विमाने
18
निसा देवगण बॉलिवूडमध्ये करणार पदार्पण? अभिनेत्री काजोल म्हणाली...
19
Ashadhi Wari 2025 : वारीतून स्त्री-पुरुषांप्रमाणेच किन्नरांनाही समतेची, सन्मानाची वागणूक 
20
इराण-इस्रायल युद्धात आता हुकूमशहाची 'एन्ट्री'...! ट्रम्प, नेतन्याहूंना दिली थेट धमकी, म्हणाले...

परीक्षा देऊन उत्तीर्ण होणारेच आयटीआय प्रवेशाला मुकण्याची भीती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 22, 2021 04:44 IST

वाशिम : यंदा मूल्यमापन आधारित निकालामुळे दहावीच्या परीक्षेत लाखो विद्यार्थ्यांना अधिक गुण मिळाले असून, या गुणांमुळेच विद्यार्थ्यांना आयटीआयसारख्या तांत्रिक ...

वाशिम : यंदा मूल्यमापन आधारित निकालामुळे दहावीच्या परीक्षेत लाखो विद्यार्थ्यांना अधिक गुण मिळाले असून, या गुणांमुळेच विद्यार्थ्यांना आयटीआयसारख्या तांत्रिक शिक्षणाच्या प्रवेश प्रक्रियेत तुलनेत अधिक संधी प्राप्त झाली आहे. या प्रकारामुळे गतवर्षी परिश्रम घेऊन प्रत्यक्ष परीक्षा देत उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांवर आयटीआयच्या प्रवेशात अन्याय होत असल्याचे दिसते. त्यामुळे गतवर्षीच्या उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी जागा राखीव ठेवण्याची मागणी होत आहे.

सन २०२०-२१ या शैक्षणिक सत्रात राज्यभरातील कोणत्याही शाळेत दहावीचे वर्ग भरले नाहीत. नंतर शासनाने दहावीची परीक्षा रद्द करून मूल्यमापनाच्या आधारे दहावीचा निकाल लावण्याचे निर्देश दिले. यामुळे दहावीच्या विद्यार्थ्यांना परीक्षा सुद्धा देण्याचा त्रास घ्यावा लागला नाही. आता प्रत्यक्ष यातील बहुसंख्य विद्यार्थी खरोखर प्रतिभावान आणि आयटीआयच्या प्रवेशास पात्र असतीलही, परंतु मूल्यमापन पद्धतीचा काही विद्यार्थ्यांना लाभ झाला, असे म्हणणेही वावगे ठरू नये. मूल्यमापन पद्धतीच्या आधारे लावलेल्या निकालातील उत्तीर्ण विद्यार्थ्यांना कुठल्याही प्रवेशप्रक्रियेत अधिक गुणांमुळे संधी अधिक मिळत आहे, तर गतवर्षी प्रत्यक्ष परीक्षा देऊन परिश्रमाने गुण मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांवर मात्र अन्याय होत आहे. आयटीआयला प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना याचा अधिक फटका बसत आहे. त्यामुळे आयटीआयच्या प्रवेशापासून वंचित होण्याची वेळ लाखो विद्यार्थ्यांवर आली आहे.

--------

भीतीपोटी लाखावर विद्यार्थ्यांनी अर्जच केले नाहीत.

मूल्यमापन आधारित निकालामुळे यंदा उत्तीर्ण झालेले आणि गतवर्षी परीक्षा देऊन उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांत गुण आणि गुणवत्तेत मोठी तफावत निर्माण झाल्याचे दिसते. अशात आयटीआय प्रवेश प्रक्रियेत यंदाच्या उत्तीर्ण विद्यार्थ्यांनाच अधिक संधी असून, आपणास प्रवेश मिळणार नाही, अशी भीती गतवर्षी परीक्षा देऊन उत्तीर्ण होणाऱ्या लाखो विद्यार्थ्यांत निर्माण झाली आहे. त्यामुळे यंदा एक लाखाहून अधिक विद्यार्थ्यांनी आयटीआयच्या प्रवेशासाठी अर्जच केले नसल्याची माहिती आहे.

--------------------------

कोट : आयटीआयच्या प्रवेशप्रक्रियेत यंदा कोणताही बदल करण्यात येणार नाही. दरवर्षीप्रमाणे यंदाही गुणवत्तेवर आधारित पद्धतीनेच आयटीआयचे प्रवेश निश्चित होतील. गतवर्षीच्या विद्यार्थ्यांसाठी अर्थात २०१९-२० मध्ये परीक्षा देऊन उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी जागा राखीव ठेवण्याचा निर्णय नाही.

- विनोद बोंदरे,

अवर सचिव, कौशल्य विकास विभाग

महाराष्ट्र शासन

--------------------------

कोट : गतवर्षी मी दहावीच्या परीक्षेत ६० टक्के गुण प्राप्त केले असून, आयटीआयला प्रवेश घेण्याची माझी इच्छा आहे. परंतु यंदा मूल्यमापन पद्धतीमुळे दहावीच्या निकालाचा टक्का वाढला. तसेच विद्यार्थ्यांना मोठ्या प्रमाणात गुणही मिळाले. त्यामुळे आम्हांला प्रवेश मिळण्याची शक्यता कमी असल्याने मी अर्ज करण्याच्या मन:स्थितीत नाही.

-ऋतिका जाधव,

दहावी उत्तीर्ण विद्यार्थिनी

-----------------

कोट : मी प्रत्यक्ष परीक्षा देऊन दहावीत ६२ टक्के गुण प्राप्त केले आहेत. आयटीआयला प्रवेश घेण्याची माझी इच्छा आहे, परंतु यावर्षी मूल्यमापन पद्धतीमुळे अनेक विद्यार्थ्यांना ८० टक्क्यांहून अधिक गुण मिळाले आहेत. त्यामुळे आम्हांला आयटीआयला प्रवेश मिळण्याची शाश्वतीच राहिली नाही.

-कृष्णा बेलखेडे,

दहावी उत्तीर्ण विद्यार्थी