शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Railway Accident: ठाण्याजवळ रेल्वे दुर्घटना! धावत्या ट्रेनमधून ट्रॅकवर पडले प्रवासी, पाच जणांचा मृत्यू; बचावकार्य सुरू
2
'आम्ही कोणत्याही पक्षाशी...' ठाकरे बंधूंच्या युतीच्या चर्चेवर आदित्य ठाकरे स्पष्टच बोलले!
3
इकडे पोलिस मेघालय-मध्य प्रदेशात शोधत राहिली; तिकडे 'बेवफा' सोनम युपीत सापडली...
4
Vat Purnima 2025: वडाची पूजा झाल्यावर 'हा' श्लोक म्हणायला विसरू नका, तरच पूर्ण होईल व्रत!
5
भारतात पहिल्यांदाच MCX नं केलं असं काम की विक्रमी उच्चांकी स्तरावर पोहोचले शेअर्स, जाणून घ्या
6
"आमची मुलगी असं का करेल? असं करायचं असतं, तर ती..."; सोनमच्या वडिलांची पहिली प्रतिक्रिया काय?
7
"गेल्या १० वर्षांपासून मी मानसोपचार...", अमृता सुभाषने केला खुलासा; कारणही सांगितलं
8
अनिल अंबानींची कंपनी करणार ₹५००० कोटींची गुंतवणूक; संरक्षण क्षेत्रात इतिहास रचण्यास तयार
9
७ वर्षांत एफडीआयमध्ये महाराष्ट्र टॉप, परदेशातील सर्वाधिक गुंतवणूक राज्यात; पायाभूत सुविधांतील सुधारणा ठरतेय मोठ्या फायद्याची
10
आऊट देताच महिला अंपायरवर भडकला अश्निन, रागाच्या भरात पॅडवर मारली बॅट!
11
हनिमूनसाठी नाही तर कायमचे संपवायला घेऊन गेली होती सोनम; पतीच्या हत्येप्रकरणी अखेर अटक
12
Sonam Raghuwanshi: राजा रघुवंशीची हत्या करण्यासाठी सोनमने घेतली तिघांची मदत; दोघांना अटक, एक फरार
13
"भ्रष्टाचार संपवायचा असेल, तर 500 रुपयांची नोट बंद केली पाहिजे"; मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांचे विधान चर्चेत
14
कुटुंबासोबत साजरी केली ईद, अचानक रुग्णालयात दाखल झाली 'बिग बॉस' विजेती अभिनेत्री
15
Bank Of Baroda, HDFC Bank नं ग्राहकांना दिली खुशखबर; कर्जाच्या व्याजदरात केली कपात, पाहा नवे दर
16
रणबीर कपूर-आलियाचा नवा आलिशान बंगला तयार, सोशल मीडियावर दिसली पहिली झलक
17
५ वर्षांत थेट ५ लाखांचा फायदा! गुंतवणूकीसाठी एकदम बेस्ट आहे पोस्टाची ‘ही’ स्कीम
18
मान्सून एक्स्प्रेसला ‘बॅड पॅच’; १३ जूनपासून पुन्हा धो-धो..., शेतकरी सक्रिय मोसमी पावसाच्या प्रतीक्षेत
19
सिनेसृष्टीतील लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने केलं थाटामाटात लग्न, आदिनाथ कोठारेची खास उपस्थिती

हा तर जीवघेणा प्रवास !

By admin | Updated: June 2, 2015 02:15 IST

वाशिम जिल्ह्यात वाहनधारकांकडून क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी वाहतूक.

वाशिम : जिल्हय़ात अपघाताच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. जिल्हय़ात सर्रास जीवघेणा प्रवास सुरू असून, याकडे संबंधितांचे साफ दुर्लक्ष दिसून येत आहे. १ जून रोजी जिल्हय़ात क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी वाहतूक करणारी वाहने आढळून आलीत; मात्र संबंधित विभागाला याचे काही सोयरसूतक दिसून आले नाही. जिल्हय़ातील वाशिम, कारंजा, रिसोड, मालेगाव, मानोरा व मंगरुळपीर या सहाही तालुक्यांमध्ये होत असलेल्या अवैध प्रवासी वाहतुकीसह प्रवासी क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी कोंबून बसविल्या जात असल्याचे १ मे रोजी दिसून आले. उन्हाळय़ाच्या अनेकांना सुट्टया व लग्नसराईमुळे व अपुर्‍या बसेसच्या संख्येमुळे नागरिक खासगी वाहतुकीकडे वळत आहे. खासगी वाहतूकदार याचा गैरफायदा घेत वाहनाच्या क्षमतेपेक्षा प्रवासी वाहनात कोंबतांना दिसून येत आहेत. प्रवासी वाहतूक करणारे वाहने कमी पैशामध्ये प्रवाशांना प्रवास करीत असल्याने प्रवाशांचा ओढा याकडे दिसून येत असला तरी, त्यांच्या जीवित्वास धोका निर्माण झाला आहे. नव्यानेच रुजू झालेल्या व कर्तव्यतत्पर म्हणून ज्यांची ख्याती आहे अशा जिल्हा पोलीस अधीक्षक विनिता साहू यांनी याकडे लक्ष देणे गरजेच झाले आहे. प्रवासी प्रवास करताना वाहनाला लटकून, कोणी चालकाच्या बाजूला बसून प्रवास करताना दिसून येत आहेत. जिल्हय़ामध्ये अवैध प्रवासी वाहतुकीसंदर्भात सद्य:स्थितीत धडक कारवाई मोहीम सुरू आहे. या धडक मोहिमेत गोरगरीब वाहनधारकांवर कारवाई अन् प्रवाश्यांच्या जीवित्वाशी खेळणार्‍यांना बगल असे चित्र जिल्हय़ात आहे. अनेक ठिकाणी वाहतूक पोलिसांसमोरून सदर प्रकार सुरू असताना याकडे दुर्लक्ष केल्याचे दिसून आले. या संदर्भात जिल्हा वाहतूक शाखेचे प्रमुख यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही.