शहरं
Join us  
Trending Stories
1
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
2
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
3
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
4
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
5
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
6
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
7
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
8
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
9
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
10
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
11
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
12
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
13
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
14
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
15
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
16
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
17
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
18
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
19
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
20
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
Daily Top 2Weekly Top 5

पावणे दोन लाखांवर शेतकऱ्यांना मिळणार महासन्मानचा लाभ

By दिनेश पठाडे | Updated: June 16, 2023 12:23 IST

राज्य शासनाकडून मार्गदर्शक सूचना जारी; पीएम किसानचे लाभार्थी पात्र.

दिनेश पठाडे, वाशिम : पीएम किसान योजनेच्या धर्तीवर राज्य शासनाने नमो शेतकरी महासन्मान निधी योजना सुरु करण्याची घोषणा अर्थसंकल्पीय अधिवेशनात केली होती. त्यानुसार १५ जून रोजी मार्गदर्शक सूचना जारी करण्यात आल्या आहेत.  पीएम किसानचा लाभ घेत असलेल्या जिल्ह्यातील   १ लाख ८० हजार ३०२ शेतकऱ्यांना योजनेचा लाभ मिळणार आहे.

प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजने अंतर्गत वर्षाला सहा हजार रुपये पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केले जातात. त्याच धर्तीवर राज्य शासनाने नमो शेतकरी महासन्मान निधी योजना आणली असून शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये दरवर्षी सहा हजार रुपये तीन टप्प्यात प्रत्येकी दोन हजार याप्रमाणे जमा होणार आहेत. सदर योजनेकरिता केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचना प्रमाण म्हणून गृहित धरण्यात येणार आहेत. पीएम किसान पोर्टलवर नोंदणी केलेले व केंद्र शासनाच्या निकषानुसार लाभास पात्र ठरलेले सर्व लाभार्थी नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या लाभासाठी पात्र असणार आहेत.

तसेच केंद्र शासनाने निकषांमध्ये केलेले बदल तात्काळ या योजनेसाठी देखील लागू होणार आहेत. पीएम किसान  पोर्टलवर नव्याने नोंदणी होऊन लाभ मिळालेले पात्र लाभार्थींना देखील लाभ मिळणार आहे.  राज्य शासनाने मार्गदर्शक सूचना जारी केल्याने पीएम किसान योजनेचा लाभ घेत असलेल्या सर्व  पात्र शेतकऱ्यांना महासन्मान लाभ मिळणार आहे.  मात्र, ज्या शेतकऱ्यांनी ई-केवायसी आणि बँक खात्याला आधार जोडणी केली नसेल, अशा शेतकऱ्यांना योजनेच्या लाभापासून वंचित राहावे लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी आगामी हप्त्यापूर्वी तत्काळ केवायसी आणि बँक खात्याला आधार जोडणी करुन घेणे अनिवार्य आहे. योजने अंतर्गत अपात्र असतानाही लाभार्थीस लाभ प्रदान करण्यात आल्यास सदर रकमेची लाभधारकाकडून रक्कम वसूल केली जाणार आहे. त्यासाठी वसुली महसूल यंत्रणेमार्फत केली जाणार आहे.तीन हप्त्यात मिळणार प्रत्येकी २ हजार

राज्य शासनाने जाहीर केलेल्या मार्गदर्शक सूचनानुसार महासन्मान योजने अंतर्गत वर्षाला सहा हजार रुपये पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात वर्ग केले जाणार आहेत. केंद्र शासनाच्या पीएम किसान योजनेप्रमाणेच तीन टप्प्यात प्रत्येकी २ हजार रुपये मिळणार आहेत. वर्षातील पहिला हप्ता एप्रिल ते जुलै, दुसरा ऑगस्ट ते  नोव्हेंबर आणि तिसरा हप्ता डिसेंबर ते मार्च या कालावधीत वर्ग केला जाणार आहे. यामुळे शेतकऱ्यांना एकाचवेळी दोन्ही योजनेचा निधी मिळणार आहे.

टॅग्स :Agriculture Sectorशेती क्षेत्रFarmerशेतकरी