शहरं
Join us  
Trending Stories
1
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
2
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
3
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
4
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
5
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
6
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीची संतापजनक पोस्ट, नेमके प्रकरण काय?
7
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
8
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
9
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
10
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...
11
एकट्याने पाकिस्तानी आक्रमण परतवलेले, त्यानंतर रहस्यमयी मृत्यू; आजही भारतीय सैन्याला सियाचिनमध्ये वाचवितात ओपी बाबा
12
Gold Price on 28 April : अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं झालं स्वस्त, पाहा १० ग्रॅम सोन्यासाठी किती खर्च करावा लागणार
13
'पंचायत'च्या मेकर्सची आणखी एक हटके वेबसीरिज, 'ग्राम चिकित्सालय'मधून उडणार हास्याचे फवारे!
14
पहलगामधील हल्ल्याबाबत काश्मीरच्या विधानसभेतून ओमर अब्दुल्लांनी व्यक्त केला संताप, म्हणाले, ‘’मागच्या २६ वर्षांनंतर…’’ 
15
...म्हणून ८ वर्षांनी मोठ्या अविनाश नारकर यांच्यासोबत केलं लग्न, ऐश्वर्या यांनी सांगितलं कारण
16
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
17
आईनं हॉस्पिटलसाठी जीवाचं रान केले तरी तिच्यावर ही वेळ आली; मनीषाच्या मुलांची व्यथा
18
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
19
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
20
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट

पावणे दोन लाखांवर शेतकऱ्यांना मिळणार महासन्मानचा लाभ

By दिनेश पठाडे | Updated: June 16, 2023 12:23 IST

राज्य शासनाकडून मार्गदर्शक सूचना जारी; पीएम किसानचे लाभार्थी पात्र.

दिनेश पठाडे, वाशिम : पीएम किसान योजनेच्या धर्तीवर राज्य शासनाने नमो शेतकरी महासन्मान निधी योजना सुरु करण्याची घोषणा अर्थसंकल्पीय अधिवेशनात केली होती. त्यानुसार १५ जून रोजी मार्गदर्शक सूचना जारी करण्यात आल्या आहेत.  पीएम किसानचा लाभ घेत असलेल्या जिल्ह्यातील   १ लाख ८० हजार ३०२ शेतकऱ्यांना योजनेचा लाभ मिळणार आहे.

प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजने अंतर्गत वर्षाला सहा हजार रुपये पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केले जातात. त्याच धर्तीवर राज्य शासनाने नमो शेतकरी महासन्मान निधी योजना आणली असून शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये दरवर्षी सहा हजार रुपये तीन टप्प्यात प्रत्येकी दोन हजार याप्रमाणे जमा होणार आहेत. सदर योजनेकरिता केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचना प्रमाण म्हणून गृहित धरण्यात येणार आहेत. पीएम किसान पोर्टलवर नोंदणी केलेले व केंद्र शासनाच्या निकषानुसार लाभास पात्र ठरलेले सर्व लाभार्थी नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या लाभासाठी पात्र असणार आहेत.

तसेच केंद्र शासनाने निकषांमध्ये केलेले बदल तात्काळ या योजनेसाठी देखील लागू होणार आहेत. पीएम किसान  पोर्टलवर नव्याने नोंदणी होऊन लाभ मिळालेले पात्र लाभार्थींना देखील लाभ मिळणार आहे.  राज्य शासनाने मार्गदर्शक सूचना जारी केल्याने पीएम किसान योजनेचा लाभ घेत असलेल्या सर्व  पात्र शेतकऱ्यांना महासन्मान लाभ मिळणार आहे.  मात्र, ज्या शेतकऱ्यांनी ई-केवायसी आणि बँक खात्याला आधार जोडणी केली नसेल, अशा शेतकऱ्यांना योजनेच्या लाभापासून वंचित राहावे लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी आगामी हप्त्यापूर्वी तत्काळ केवायसी आणि बँक खात्याला आधार जोडणी करुन घेणे अनिवार्य आहे. योजने अंतर्गत अपात्र असतानाही लाभार्थीस लाभ प्रदान करण्यात आल्यास सदर रकमेची लाभधारकाकडून रक्कम वसूल केली जाणार आहे. त्यासाठी वसुली महसूल यंत्रणेमार्फत केली जाणार आहे.तीन हप्त्यात मिळणार प्रत्येकी २ हजार

राज्य शासनाने जाहीर केलेल्या मार्गदर्शक सूचनानुसार महासन्मान योजने अंतर्गत वर्षाला सहा हजार रुपये पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात वर्ग केले जाणार आहेत. केंद्र शासनाच्या पीएम किसान योजनेप्रमाणेच तीन टप्प्यात प्रत्येकी २ हजार रुपये मिळणार आहेत. वर्षातील पहिला हप्ता एप्रिल ते जुलै, दुसरा ऑगस्ट ते  नोव्हेंबर आणि तिसरा हप्ता डिसेंबर ते मार्च या कालावधीत वर्ग केला जाणार आहे. यामुळे शेतकऱ्यांना एकाचवेळी दोन्ही योजनेचा निधी मिळणार आहे.

टॅग्स :Agriculture Sectorशेती क्षेत्रFarmerशेतकरी