शहरं
Join us  
Trending Stories
1
‘दोन शून्यां’ची बेरीज केली, त्यावर कितीही शून्य जोडले तरी…; भाजपाचा ठाकरे बंधूंना खोचक टोला
2
BEST Election Results: ना ठाकरे बंधू, ना भाजपा; शशांक राव यांच्या पॅनलला १४ जागा, आकडेवारी पाहाच
3
दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांच्यावर हल्ला; जनसुनावणीदरम्यान कागद हातात दिला, केस ओढले अन्....
4
व्हाट्सॲप युजर्ससाठी महत्त्वाची बातमी: 'Meta AI' मुळे ग्रुप चॅट्सची प्रायव्हसी धोक्यात? पेटीएम संस्थापकांचा दावा
5
बेस्ट निवडणूक २०२५: शशांक राव-महायुती पॅनलची बाजी, ठाकरे बंधू चितपट; विजयी उमेदवारांची यादी
6
HDFC बँकेच्या ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी! २२-२३ ऑगस्टला 'या' ऑनलाईन सेवा राहणार बंद
7
BEST Election Results: 'ब्रँडचे बॉस एकही जागा जिंकले नाहीत'; बेस्ट निवडणुकीतील पराभवावरुन ठाकरे बंधूंना भाजपचा टोला
8
India-China Trade: भारत की चीन.. या मैत्रीचा सर्वाधिक फायदा कोणाला होणार? काय सांगते आकडेवारी
9
महाराष्ट्र जलमय... पिके खरडली, घरे बुडाली; मराठवाड्यात ११ जीव गेले, ४९८ जनावरे दगावली
10
शेअर बाजाराची फ्लॅट सुरुवात; Nifty रेड झोनमध्ये, 'या' शेअर्समध्ये दिसली मोठी तेजी
11
"एकटीच राहते, मुलगा माझ्यासोबत राहत नाही...", ७९ वर्षीय उषा नाडकर्णी जगताहेत एकाकी जीवन, दुःख व्यक्त करत म्हणाल्या...
12
पंतप्रधान, मुख्यमंत्री असो अथवा मंत्री...; ३० दिवसांपेक्षा अधिक काळ तुरुंगात राहिल्यास खुर्ची जाणार! आज संसदेत ३ विधेयकं सादर होणार
13
आजचे राशीभविष्य, २० ऑगस्ट २०२५: नवीन कार्याच्या प्रारंभात अडचणी; व्यवसायात अपेक्षित सहकार्य
14
थकबाकी तिप्पट, व्याज चार पट; सरकारवर वाढतोय कर्जाचा डोंगर; सध्याची रक्कम २०० लाख कोटींवर
15
मुंबईची 'लाइफ'लाइन पाण्यात; रायगड, पुणे परिसराला आजही 'रेड अलर्ट', नांदेड जिल्ह्यात आठ बळी
16
पावसाची दहशत! ८००हून जास्त लोकल रद्द; २५०+ विमानांना फटका, भुयारी मेट्रो स्थानकांवर पाणीगळती
17
काच फोडून मोनोचे प्रवासी बाहेर! 'एवढेच व्हायचे बाकी होते', प्रवाशांच्या संतप्त प्रतिक्रिया
18
वाहतूक बंद, साचले पाणी; परिस्थितीचा गैरफायदा घेत ॲप आधारित खासगी वाहनांची मनमानी भाडेवाढ
19
सोन्याचे दागिने ‘एसआयपी’वर घ्यावे का? पैसे भरताना ज्वेलरची बाजारातील पतही तपासा
20
मिठी नदी धोका पातळीपर्यंत; रहिवाशांचा गोंधळ; गर्दी नियंत्रित करताना यंत्रणेच्या नाकीनऊ

वन्यप्राण्यांपासून पीक संरक्षणासाठी शेतकऱ्यांची शेतातच ‘जागल’ !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 25, 2021 04:34 IST

वाशिम : मालेगाव तालुक्यातील मुंगळा परिसरात वन्यप्राण्यांनी धुमाकूळ घातल्याने पिकांचे संरक्षण म्हणून अनेक शेतकऱ्यांवर शेतात जागल करण्याची वेळ आली ...

वाशिम : मालेगाव तालुक्यातील मुंगळा परिसरात वन्यप्राण्यांनी धुमाकूळ घातल्याने पिकांचे संरक्षण म्हणून अनेक शेतकऱ्यांवर शेतात जागल करण्याची वेळ आली आहे.

यंदा शेतकऱ्यांना विविध संकटांना सामोरे जावे लागत आहे. मध्यंतरी पावसाने दडी मारल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली होती. आता गत दहा दिवसांपासून कमी-अधिक प्रमाणात पाऊस असल्याने शेतात पाणी साचत आहे. त्यातच काही ठिकाणी वन्यप्राण्यांनी हैदोस घातल्याने पिकांची नासाडीदेखील होत आहे. मुंगळा परिसरात निलगाय, रोहि, रानडुकर, हरिण, वानर आदी वन्यप्राणी सोयाबीन, तूर, मूग, उडीद आदी पिके फस्त करीत असल्याचे चित्र पाहावयास मिळते. जंगलाशेजारी शेती असणाऱ्या शेतकऱ्यांची चिंता यामुळे अधिकच वाढत आहे. वन्यप्राण्यांपासून पिकांचे संरक्षण म्हणून मुृंगळा परिसरातील काही शेतकरी शेतातच ‘खोपडी’ तयार करून ’जागल’ करीत आहेत. वन्यप्राण्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी शेतकऱ्यांनी वनविभागाकडे वारंवार केली. मात्र, वन्यप्राण्यांचा बंदोबस्त अद्यापही झाला नसल्याने शेतकऱ्यांमधून संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत.

००००

जंगली भागातील शेतीला तारेचे कुंपण असावे !

जिल्ह्यात जंगली भागालगत असलेल्या शेतातील पिकांचे नुकसान वन्यप्राण्यांकडून होत आहे. जंगलाला लागून असलेल्या कार्यक्षेत्राला तसेच शेतीला तारेचे कूंपन असावे, अशी मागणी मुंगळा परिसरातील शेतकऱ्यांनी केली आहे.

००००

नुकसान झाल्यास अल्प भरपाई !

वन्यप्राण्यांकडून पिकांचे नुकसान झाल्यास वनविभागाकडून अल्प भरपाई मिळते, असा दावा शेतकऱ्यांनी केला. नुकसानभरपाईसाठी प्रस्ताव तयार करणे, वनविभागाकडे वारंवार चकरा मारणे यातच अर्धी शक्ती वाया जाते, असाही सूर शेतकऱ्यांमधून उमटत आहे.