शहरं
Join us  
Trending Stories
1
थरारक घटना! टेकऑफनंतर काही मिनिटांतच Air India विमानाचा यू टर्न; हवेत अडकला प्रवाशांचा श्वास
2
Mumbai Crime: मुंबईतील धक्कादायक प्रकार! चालत्या लोकलमधून मुलीला खाली फेकलं; Video व्हायरल, आरोपीला पकडलं
3
भीषण अपघात! इंडोनेशियात डिव्हायडरला धडकून बस महामार्गावर उलटली, १६ जणांचा मृत्यू
4
सहा पक्षांच्या जय, पराजयाचा संदेश काय? भाजपपेक्षा एकनाथ शिंदेंना सर्वाधिक यश? एवढा विस्तृत लेख कुठेच मिळणार नाही...
5
बॉलिवूडचे चर्चेतले चेहरे अक्षय खन्ना-सनी देओल २९ वर्षांनंतर एकत्र दिसणार? 'या' सिनेमाची चर्चा
6
लग्नाच्या आदल्या रात्री वडील ओरडले; नवरदेवाच्या लागलं मनाला, वरातीऐवजी घरातून निघाली अंत्ययात्रा!
7
कोट्यधीश होण्याचे स्वप्न आता होणार पूर्ण! २१X१०X१२ हा फॉर्म्युला वापरा; ५१ व्या वर्षी व्हाल मालामाल
8
पैसा दुप्पट करणारी सरकारी स्कीम; विना जोखीम 'इतक्या' महिन्यांत तुमचे पैसे होतील दुप्पट
9
केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू अजमेर दर्ग्यावर चादर चढवणार; म्हणाले, "दुआ करने जा रहा हूं..."
10
मित्रपक्षांना चर्चेत गुंतवत स्वबळाचाच डाव टाकण्याची भाजपाची खेळी?; इच्छुकही करतायेत 'डबल गेम'
11
भाडं वाढणार; १००, २००, ५०० कोटी नाही तर, 'इतक्या' कोटींचा होणार रेल्वेला बंपर फायदा, जाणून घ्या
12
एस एस राजामौलींच्या 'वाराणसी'चं बजेट १३०० कोटी? प्रियंका चोप्रा म्हणाली, "अर्धे पैसे माझ्या..."
13
शरीफ उस्मान हादी यांचा मारेकरी देश सोडून पळाला? बांगलादेश पोलिसांनी सत्य परिस्थिती केली स्पष्ट
14
Stock Markets Today: शेअर बाजारात जोरदार तेजी, सेन्सेक्स ३४० अकांनी तर निफ्टी ११५ अंकांनी वधारला; IT Stocks सुस्साट
15
देशभक्तीला बॉक्स ऑफिसवरील यशाचा फॉर्म्युला समजणं हा अपमान..., विकी कौशलची स्पष्ट प्रतिक्रिया
16
भाजपाच्या नजरेने RSS कडे पाहणे चुकीचे; सरसंघचालक मोहन भागवत यांनी असं विधान का केले?
17
Post Office मध्ये जमा करा ₹२,००,००० आणि मिळवा ₹८९,९९० चं फिक्स व्याज, पैसेही सुरक्षित आणि मिळणार सरकारची गॅरेंटी
18
काँग्रेस-शरद पवारांसोबत आघाडी करून शिंदेसेनेने २ नगरपरिषदेत भाजपाच्या तोंडचा घास हिसकावला
19
'धुरंधर'च्या 'शरारत' गाण्यातून तमन्ना भाटियाला दिग्दर्शकाने दाखवला बाहेरचा रस्ता, म्हणाला- "मला सिनेमात आयटम साँग..."
20
'बांगलादेशातील अराजकतेला युनूस जबाबदार, भारतासोबतचे संबंधही बिघडवले'; शेख हसीना यांचा जोरदार हल्लाबोल
Daily Top 2Weekly Top 5

हातातोंडाशी आलेला घास हिरावल्याने शेतकरी त्रस्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 25, 2021 04:39 IST

जिलह्यात झालेल्या गारपीट व अवकाळी पावसामुळे जवळपास ५ हेक्टरवरील बिजवाई कांदा, मूग, पपई, टरबूज, आंबा या पिकांचे प्रचंड ...

जिलह्यात झालेल्या गारपीट व अवकाळी पावसामुळे जवळपास ५ हेक्टरवरील बिजवाई कांदा, मूग, पपई, टरबूज, आंबा या पिकांचे प्रचंड नुकसान झाले. हातातोंडाशी आलेला घास यामुळे हिरावल्याने शेतकरी पुरते हतबल झाले असून पुढील खर्च कसा करावा असा प्रश्न शेतकऱ्यांपुढे निर्मण झाला आहे. या नैसर्गिक संकटामुळे जिल्ह्यातील वाशिम, रिसोड, मालेगाव, मंगरूळपीर, कारंजा आणि मानोरा या सर्वच तालुक्यांमधील पिकांचे नुकसान झाले. असे असतांना प्रशासनाने ४ हजार ८८० हेक्टर क्षेत्रावरील नुकसान झाल्याचा अंदाज प्रशासनाने वर्तविला आहे. परंतु यामध्ये कारंजा तालुक्यात नुकसानच झाले नसल्याचे म्हणणे आहे. या भागातही वादळ वाऱ्यासह पाऊस येऊन अनेक घरांची पडझड झाली व पिकांचे नुकसान झाले आहे. यासंदर्भात शेतकऱ्यांनी संबधितांना निवेदनही दिले आहेत. तरी प्रशासनाने लक्ष देऊन नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देऊन त्यांना दिलासा द्यावा, अशी मागणी विविध शेतकरी संघटनांसह शेतकरी करीत आहेत.

.......................

शिरपुरात सर्वाधिक बिजवाई कांद्याचे नुकसान

शिरपूर येथील शेतकरी काही वर्षापासून स्पर्धात्मक शेतीकडे वळले होते. कांदा बिजवाई, हळद असे खर्चिक पिके घेऊ लागले. गावामधील एकमेकाकडे पाहून मोठ्या प्रमाणात शेतकरी स्पर्धात्मक शेती करू लागले. परिणामतः वाशिम जिल्ह्यात सर्वाधिक हळद उत्पादक शेतकरी शिरपूर मध्ये आहेत. यावर्षी बिजवाई कांदा लागवडही शेकडो शेतकऱ्यांनी केली होती. मात्र गारपीट व वादळी पावसाने कांदा बिजवाई पीक उद्ध्वस्त करून टाकले. गारपिटीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्याकडून शासनाकडून त्वरित योग्य ती नुकसान भरपाई मिळावी, अशी अपेक्षा शिरपूर येथील शेतकरी व्यक्त केली आहे. परिसरात पंचनामे करण्यात येत आहेत.

..............

शेतकऱ्यांची निवेदन

हाताताेंडाशी आलेला घास हिरावल्याने आता उदरनिर्वाह कसा करायचा असा प्रश्न करीत कृषी विभागाकडे त्वरित आर्थिक मदतीची मागणी शेतकरी करीत आहेत.