शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

हातातोंडाशी आलेला घास हिरावल्याने शेतकरी त्रस्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 25, 2021 04:39 IST

जिलह्यात झालेल्या गारपीट व अवकाळी पावसामुळे जवळपास ५ हेक्टरवरील बिजवाई कांदा, मूग, पपई, टरबूज, आंबा या पिकांचे प्रचंड ...

जिलह्यात झालेल्या गारपीट व अवकाळी पावसामुळे जवळपास ५ हेक्टरवरील बिजवाई कांदा, मूग, पपई, टरबूज, आंबा या पिकांचे प्रचंड नुकसान झाले. हातातोंडाशी आलेला घास यामुळे हिरावल्याने शेतकरी पुरते हतबल झाले असून पुढील खर्च कसा करावा असा प्रश्न शेतकऱ्यांपुढे निर्मण झाला आहे. या नैसर्गिक संकटामुळे जिल्ह्यातील वाशिम, रिसोड, मालेगाव, मंगरूळपीर, कारंजा आणि मानोरा या सर्वच तालुक्यांमधील पिकांचे नुकसान झाले. असे असतांना प्रशासनाने ४ हजार ८८० हेक्टर क्षेत्रावरील नुकसान झाल्याचा अंदाज प्रशासनाने वर्तविला आहे. परंतु यामध्ये कारंजा तालुक्यात नुकसानच झाले नसल्याचे म्हणणे आहे. या भागातही वादळ वाऱ्यासह पाऊस येऊन अनेक घरांची पडझड झाली व पिकांचे नुकसान झाले आहे. यासंदर्भात शेतकऱ्यांनी संबधितांना निवेदनही दिले आहेत. तरी प्रशासनाने लक्ष देऊन नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देऊन त्यांना दिलासा द्यावा, अशी मागणी विविध शेतकरी संघटनांसह शेतकरी करीत आहेत.

.......................

शिरपुरात सर्वाधिक बिजवाई कांद्याचे नुकसान

शिरपूर येथील शेतकरी काही वर्षापासून स्पर्धात्मक शेतीकडे वळले होते. कांदा बिजवाई, हळद असे खर्चिक पिके घेऊ लागले. गावामधील एकमेकाकडे पाहून मोठ्या प्रमाणात शेतकरी स्पर्धात्मक शेती करू लागले. परिणामतः वाशिम जिल्ह्यात सर्वाधिक हळद उत्पादक शेतकरी शिरपूर मध्ये आहेत. यावर्षी बिजवाई कांदा लागवडही शेकडो शेतकऱ्यांनी केली होती. मात्र गारपीट व वादळी पावसाने कांदा बिजवाई पीक उद्ध्वस्त करून टाकले. गारपिटीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्याकडून शासनाकडून त्वरित योग्य ती नुकसान भरपाई मिळावी, अशी अपेक्षा शिरपूर येथील शेतकरी व्यक्त केली आहे. परिसरात पंचनामे करण्यात येत आहेत.

..............

शेतकऱ्यांची निवेदन

हाताताेंडाशी आलेला घास हिरावल्याने आता उदरनिर्वाह कसा करायचा असा प्रश्न करीत कृषी विभागाकडे त्वरित आर्थिक मदतीची मागणी शेतकरी करीत आहेत.