शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
2
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
3
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
4
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
5
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
6
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
7
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
8
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
9
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
10
२०२५ मधील शेवटची अंगारकी चतुर्थी: वर्षभर कृपा-लाभाची सुवर्ण संधी; ‘अशी’ करा गणेश उपासना
11
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
12
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
13
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
14
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
15
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
16
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
17
IPL 2026: प्रिती झिंटाचा मास्टरस्ट्रोक! लिलावात बोली लावली, तिकडे पठ्ठ्याने केली तुफानी खेळी
18
"मी हरियाणामध्ये हिंदू महिलेचे 'घूंघट' खेचले असते तर...", नीतीश कुमारांच्या हिजाब वादावर काय म्हणाले उमर अब्दुल्ला?
19
७१ व्या वर्षी रेखा यांनी केलं लग्न? भर कार्यक्रमात स्वतःच केला मोठा खुलासा; म्हणाल्या, "प्रेम आहे तर..."
20
प्यारवाली लव्हस्टोरी! ब्रेकअपनंतर शोधला डिजिटल पार्टनर; चक्क AI बॉयफ्रेंडसोबत बांधली लग्नगाठ
Daily Top 2Weekly Top 5

पीकविम्याने घडविला सेतू सुविधा केंद्रावरच शेतक-यांना मुक्काम!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 5, 2017 17:43 IST

प्रधानमंत्री पीकविमा योजनेची अंतिम मुदत ४ ऑगस्टपर्यंत असल्याचे शासनाने जाहीर केल्यानंतर यादिवशी सेतू सुविधा केंद्रांवर शेतक-यांची अक्षरश: झुंबड उडाली.

वाशिम, दि. 5 - प्रधानमंत्री पीकविमा योजनेची अंतिम मुदत ४ ऑगस्टपर्यंत असल्याचे शासनाने जाहीर केल्यानंतर यादिवशी सेतू सुविधा केंद्रांवर शेतक-यांची अक्षरश: झुंबड उडाली. मात्र, ‘सर्व्हर डाऊन’च्या तांत्रिक अडचणींमुळे रात्री उशीरापर्यंत अर्ज स्विकारलेच गेले नाहीत. परिणामी, रात्रीच्या सुमारास गावी परत जाण्याची सोय नसल्याने शेकडो शेतक-यांना सेतू सुविधा केंद्रावरच मुक्काम करावा लागल्याचा प्रकार कारंजात घडला.जिल्ह्यातील नऊ पिकांकरिता लागू करण्यात आलेल्या पिकविमा योजनेची अंतीम मुदत पुर्वी ३१ जुलै २०१७ होती. मात्र, शेतक-यांकडून अपेक्षित प्रतिसाद न मिळाल्याने त्यास शासनाने ५ ऑगस्टपर्यंत मुदतवाढ दिली. अशातच २ ऑगस्टला निर्णय फिरवत मुदत ४ ऑगस्टपर्यंत करण्यात आली. मात्र, अर्ज ऑफलाईन नव्हे; तर ऑनलाईन स्विकारण्याची अट टाकण्यात आली. पुन्हा तिस-यांदा ४ ऑगस्टला सायंकाळी निर्णय बदलण्यात येवून ५ ऑगस्ट रोजी सायंकाळी ५ वाजेपर्यंत पीकविमा काढण्यास मंजूरी मिळाल्याचे निर्देश जिल्हा प्रशासनाकडे धडकले. एकूणच या सर्व गदारोळात प्रशासनासोबतच शेतक-यांचीही चांगलीच गोची झाली. दरम्यान, महा ई-सेवा केंद्र आणि आपले सरकार सेवा केंद्र या दोन्हीही संस्थांमार्फत ‘ऑनलाईन’ अर्ज स्विकारत असताना ‘सर्व्हर डाऊन’ची तांत्रिक अडचण उद्भवल्यामुळे ४ ऑगस्टला दिवसभर ताटकळत बसलेल्या शेतक-यांचे अर्ज रात्री उशीरापर्यंतही स्विकारले गेले नाहीत. कारंजा येथील सेतू सुविधा केंद्रावर घडलेल्या या प्रकारामुळे शेतक-यांना काम न होताच त्याचठिकाणी मिळेल त्या जागेवर झोपून रात्र काढावी लागली. यामुळे शेतक-यांमध्ये तीव्र संताप व्यक्त करण्यात आला.