शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

शेतकऱ्यांनी कृषीपंप वीजबिल सवलतीचा लाभ घ्यावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 14, 2021 04:37 IST

महावितरणच्या वीजबिल सवलत योजनेच्या जनजागृतीसाठी १२ मार्च रोजी सकाळी १० वाजता कारंजा तालुक्यातील बांबर्डा येथे शेतकऱ्यांच्या बैठकीचे आयोजन ...

महावितरणच्या वीजबिल सवलत योजनेच्या जनजागृतीसाठी १२ मार्च रोजी सकाळी १० वाजता कारंजा तालुक्यातील बांबर्डा येथे शेतकऱ्यांच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी कनिष्ठ अभियंता रविंद्र गिरी, जीवन इंगळे, लाईनमन वानखडे यांच्यासह महावितरण कर्मचारी व शेतकऱ्यांची उपस्थिती होती. कृषिपंपाच्या वीजबिल थकबाकीतून मुक्त होण्यासाठी महावितरणने कृषी वीजबिल सवलत योजना २०२० जाहीर केली असून, या योजनेंतर्गत वसुल रकमेच्या ३३ टक्के रकमेचा त्याच ग्राहकांच्या पायाभूत सुविधांसाठी वापर करण्यात येणार आहे. माहे सप्टेंबर २०१५ पूर्वीच्या वीज थकबाकीवरील व्याज व विलंब आकार या योजनेंतर्गत पूर्णपणे माफ करण्यात येणार असून केवळ मूळ थकबाकीच्या वसुलीसाठी ग्राह्य धरली जाणार आहे. या धोरणानुसार कृषीपंप ग्राहकांनी प्रथम वर्षी थकबाकी भरल्यास त्यांना ५० टक्के अतिरिक्त सूट मिळणार असून दुसऱ्या वर्षी भरल्यास ३० टक्के व तिसऱ्या वर्षी भरल्यास २० टक्के अतिरिक्त सूट मिळणार आहे. थकबाकी नसणाऱ्या व नियमित वीजबिल भरणाऱ्या कृषी ग्राहकांना या योजनेच्या कालावधीत चालू वीजबिलावर अतिरिक्त पाच टक्के सवलत मिळणार आहे. शिवाय या योजने अंतर्गत कृषीपंप वीजबिलाच्या माध्यमातून भरणा झालेली रक्कम त्याच गावातील वीज समस्या सोडविण्यासाठी वापरण्यात येणार आहे. त्यामुळे कृषीपंपधारक शेतकऱ्यांनी या वीजबिल सवलतीचा लाभ घेण्याचे आवाहन महावितरणचे सहायक अभियंता विनय बोळे यांनी केले आहे.