शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
6
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
7
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
8
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
9
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
10
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
11
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
12
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
13
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
14
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
15
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
16
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
17
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
18
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
19
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
20
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
Daily Top 2Weekly Top 5

शेतकऱ्यांनी फिरविली मालेगाव बाजार समितीमधील नाफेडच्या केंद्राकडे  पाठ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 20, 2018 14:52 IST

वाशिम :  मालेगाव बाजार समितीमध्ये आधिच उशिरा सुरु केलेल्या नाफेड खरेदी केंद्रामुळे शेतकऱ्यांचा माल पडून राहिला. खरेदी केंद्र सुरु केल्यानंतर हेक्टरी ४ क्विंटलच खरेदी करण्याचा नियम शेतकऱ्यांना डोकेदुखी ठरत असल्याने शेतकऱ्यांनी  नाफेडच्या केंद्राकडे पाठ फिरविल्याचे दिसून येत आहे.

ठळक मुद्देमालेगाव बाजार समितीमध्ये आधिच उशिरा सुरु केलेल्या नाफेड खरेदी केंद्रामुळे शेतकऱ्यांचा माल पडून राहिला. परंतु मालासाठी लावलेल्या निकषामुळे नोंदणीकृत शेतकऱ्यांनी त्याकडे पाठ फिरविली आहे.  हेक्टरी केवळ चार क्विंटल खरेदी करण्याच्या निकषामुळे इतर माल शेतकऱ्यांनी कुठे विकावा असा प्रश्न निर्माण झाला आहे.

वाशिम :  मालेगाव बाजार समितीमध्ये आधिच उशिरा सुरु केलेल्या नाफेड खरेदी केंद्रामुळे शेतकऱ्यांचा माल पडून राहिला. खरेदी केंद्र सुरु केल्यानंतर हेक्टरी ४ क्विंटलच खरेदी करण्याचा नियम शेतकऱ्यांना डोकेदुखी ठरत असल्याने शेतकऱ्यांनी  नाफेडच्या केंद्राकडे पाठ फिरविल्याचे दिसून येत आहे.

साधारणता शेतकऱ्यांना हेक्टरी दहा ते बारा क्विंटल तुरीचे उत्पादन झाले आहे. तुरीला बाजारपेठेत योग्य भाव मिळत नसल्याने अडचणीत आलेल्या शेतकºयांसाठी नाफेडमार्फत तूर खरेदी करण्याचा निर्णय शासनाने घेतला. त्यानुसार मालेगाव बाजार समितीमध्ये नाफेडचे तूर खरेदी केंद्र मागील काही दिवसांपासून सुरु झाले. परंतु ही खरेदी करतांना हेक्टरी केवळ चार क्विंटल खरेदी करण्याच्या निकषामुळे इतर माल शेतकऱ्यांनी कुठे विकावा असा प्रश्न निर्माण झाला आहे. यामुळे शेतकरी नाफेडच्या खरेदी केंद्रावर जावून चौकशीनंतर मालच बाजार समितीमध्ये आणतांना दिसून येत नाहीत. तालुका खरेदी विक्री संघामार्फत नोंदणीकृत शेतकºयांना बाजार समितीत माल आणण्यासाठी मोबाईलवर संदेश देण्यात येत आहेत. परंतु मालासाठी लावलेल्या निकषामुळे नोंदणीकृत शेतकऱ्यांनी त्याकडे पाठ फिरविली आहे.  या संदर्भात शेतकºयांनी जिल्हा मार्केट अधिकारी तराळे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी हेक्टरी खरेदीत वाढ व्हावी यासाठी प्रयत्न सुरु असल्याचे सांगितले. 

 

शासनाने शेतकºयांचा रोष लक्षात घेवून हेक्टरी किमान १० क्विंटल तूर नाफेडमार्फत खरेदी करावी.              शेतकऱ्यांकडे तूर शिल्लक असतांना ती अर्धाी बाजार समितीला विकणार व बाकीच्या विकण्यासाठी कुठे जाणार यासाठी प्रशासनाने विचार करुन हा निकष बदलणे गरजेचे आहे. आपण यासाठी सतत प्रयत्न करीत असून शेतकºयांचा जास्तीत जास्त माल कसा घेता येईल यासाठी प्रयत्न चालविले आहेत. 

 - भगावान शिंदे, अध्यक्ष, तालुका खरेदी विक्री संस्था

शासनाने लादलेली मर्यादा अतिशय अन्यायकारक असून शेतकºयांनी पिकविलेले अर्धे धान्य (तूर) शासकीय खरेदी केंद्रावर दयावे तर उर्वरित धान्याची विक्री कुठे करावी.  शासनाने शासकीय खरेदी केंद्रावर कमीत कमी एकरी सहा क्विंटल तूर खरेदी करावी. या संदर्भात आपण वरिष्ठांना पण सूचना, मॅसेज केले आहेत. परंतु अद्याप यावर कोणताच निर्णय न झाल्याने आमच्यासारखे शेतकरी अडचणीत आले आहेत.          

 - गजानन लहाने, शेतकरी, तिवळी

टॅग्स :washimवाशिमMalegaonमालेगांवMarket committee washimबाजार समिती वाशिम