शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

शेतकऱ्यांनी फिरविली मालेगाव बाजार समितीमधील नाफेडच्या केंद्राकडे  पाठ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 20, 2018 14:52 IST

वाशिम :  मालेगाव बाजार समितीमध्ये आधिच उशिरा सुरु केलेल्या नाफेड खरेदी केंद्रामुळे शेतकऱ्यांचा माल पडून राहिला. खरेदी केंद्र सुरु केल्यानंतर हेक्टरी ४ क्विंटलच खरेदी करण्याचा नियम शेतकऱ्यांना डोकेदुखी ठरत असल्याने शेतकऱ्यांनी  नाफेडच्या केंद्राकडे पाठ फिरविल्याचे दिसून येत आहे.

ठळक मुद्देमालेगाव बाजार समितीमध्ये आधिच उशिरा सुरु केलेल्या नाफेड खरेदी केंद्रामुळे शेतकऱ्यांचा माल पडून राहिला. परंतु मालासाठी लावलेल्या निकषामुळे नोंदणीकृत शेतकऱ्यांनी त्याकडे पाठ फिरविली आहे.  हेक्टरी केवळ चार क्विंटल खरेदी करण्याच्या निकषामुळे इतर माल शेतकऱ्यांनी कुठे विकावा असा प्रश्न निर्माण झाला आहे.

वाशिम :  मालेगाव बाजार समितीमध्ये आधिच उशिरा सुरु केलेल्या नाफेड खरेदी केंद्रामुळे शेतकऱ्यांचा माल पडून राहिला. खरेदी केंद्र सुरु केल्यानंतर हेक्टरी ४ क्विंटलच खरेदी करण्याचा नियम शेतकऱ्यांना डोकेदुखी ठरत असल्याने शेतकऱ्यांनी  नाफेडच्या केंद्राकडे पाठ फिरविल्याचे दिसून येत आहे.

साधारणता शेतकऱ्यांना हेक्टरी दहा ते बारा क्विंटल तुरीचे उत्पादन झाले आहे. तुरीला बाजारपेठेत योग्य भाव मिळत नसल्याने अडचणीत आलेल्या शेतकºयांसाठी नाफेडमार्फत तूर खरेदी करण्याचा निर्णय शासनाने घेतला. त्यानुसार मालेगाव बाजार समितीमध्ये नाफेडचे तूर खरेदी केंद्र मागील काही दिवसांपासून सुरु झाले. परंतु ही खरेदी करतांना हेक्टरी केवळ चार क्विंटल खरेदी करण्याच्या निकषामुळे इतर माल शेतकऱ्यांनी कुठे विकावा असा प्रश्न निर्माण झाला आहे. यामुळे शेतकरी नाफेडच्या खरेदी केंद्रावर जावून चौकशीनंतर मालच बाजार समितीमध्ये आणतांना दिसून येत नाहीत. तालुका खरेदी विक्री संघामार्फत नोंदणीकृत शेतकºयांना बाजार समितीत माल आणण्यासाठी मोबाईलवर संदेश देण्यात येत आहेत. परंतु मालासाठी लावलेल्या निकषामुळे नोंदणीकृत शेतकऱ्यांनी त्याकडे पाठ फिरविली आहे.  या संदर्भात शेतकºयांनी जिल्हा मार्केट अधिकारी तराळे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी हेक्टरी खरेदीत वाढ व्हावी यासाठी प्रयत्न सुरु असल्याचे सांगितले. 

 

शासनाने शेतकºयांचा रोष लक्षात घेवून हेक्टरी किमान १० क्विंटल तूर नाफेडमार्फत खरेदी करावी.              शेतकऱ्यांकडे तूर शिल्लक असतांना ती अर्धाी बाजार समितीला विकणार व बाकीच्या विकण्यासाठी कुठे जाणार यासाठी प्रशासनाने विचार करुन हा निकष बदलणे गरजेचे आहे. आपण यासाठी सतत प्रयत्न करीत असून शेतकºयांचा जास्तीत जास्त माल कसा घेता येईल यासाठी प्रयत्न चालविले आहेत. 

 - भगावान शिंदे, अध्यक्ष, तालुका खरेदी विक्री संस्था

शासनाने लादलेली मर्यादा अतिशय अन्यायकारक असून शेतकºयांनी पिकविलेले अर्धे धान्य (तूर) शासकीय खरेदी केंद्रावर दयावे तर उर्वरित धान्याची विक्री कुठे करावी.  शासनाने शासकीय खरेदी केंद्रावर कमीत कमी एकरी सहा क्विंटल तूर खरेदी करावी. या संदर्भात आपण वरिष्ठांना पण सूचना, मॅसेज केले आहेत. परंतु अद्याप यावर कोणताच निर्णय न झाल्याने आमच्यासारखे शेतकरी अडचणीत आले आहेत.          

 - गजानन लहाने, शेतकरी, तिवळी

टॅग्स :washimवाशिमMalegaonमालेगांवMarket committee washimबाजार समिती वाशिम