शहरं
Join us  
Trending Stories
1
"इंग्रजीचा पुरस्कार अन् भारतीय भाषांचा तिरस्कार हे योग्य नाही, आपली भाषा..."; CM फडणवीसांचे राज यांना उत्तर
2
हैदराबादच्या बेगमपेट विमानतळाला बॉम्बने उडवण्याची धमकी; सुरक्षा यंत्रणा अलर्टवर, शोधमोहिम सुरू
3
सोनमने २५ दिवसांत केला ११२ वेळा फोन, तो संजय वर्मा कोण? राजा रघुवंशी हत्या प्रकरणाला नवं वळण  
4
मुकेश अंबानींनी लावलं जबरदस्त डोकं, ५०० कोटींच्या गुंतवणूकीतून कमावले ९००० कोटी रुपये
5
पंतप्रधान नरेंद्र मोदी ३७ दिवस शांत बसले अन् आता..; मोदी-ट्रम्प चर्चेवर काँग्रेसचा निशाणा
6
खासगी टेलिकॉम कंपन्यांचे धाबे दणाणले; लवकरच सुरू होणार BSNL ची 5G सेवा; नावही ठरले...
7
करून दाखवलं! ११ व्या वर्षी लग्न... समाजासमोर 'तो' झुकला नाही, स्वप्नासाठी लढला; होणार डॉक्टर
8
BMC School: १३ वर्षांत मुंबई महापालिकेच्या १३१ मराठी शाळा बंद!
9
मुलांच्या उच्च शिक्षणाची चिंता सतावतेय? SIP, SSY आणि PPF मधून करा करोडपती होण्याची तयारी!
10
गुरुचरित्रात ‘असे’ येते गणेशाचे अद्भूत वर्णन; बाप्पाच्या महात्म्याचा संदर्भ कुठे, कसा येतो?
11
डोनाल्ड ट्रम्प यांनी विचारलं, कॅनडातून परतताना अमेरिकेत थांबू शकता? पंतप्रधान मोदींनी दिला नकार, म्हणाले...
12
'मम्मीने दरवाजा उघडला, काशी काका आता आले अन्...'; 9 वर्षाच्या मुलाने सांगितले कशी झाली बापाची हत्या?
13
'आता पुन्हा शरद पवारांकडे जायचे नाही, असं ठरवलंय'; पवारांचा निष्ठावंत दुखावला, बळीराम काका साठेंनी मन केलं मोकळं
14
Swami Samartha: 'भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे' हे स्वामींचे वचन; पण आहे 'ही' एक अट!
15
रोहित शर्माच्या पत्नीचा पाठलाग करत घरापर्यंत पोहोचला, फोटोही काढू लागला, पाहतात रितिकाचा राग अनावर, त्यानंतर...  
16
हिंदी सक्तीवरून राज ठाकरेंचं महाराष्ट्रातील शाळांच्या मुख्याध्यापकांना खुलं पत्र, वाचा जसच्या तसं...
17
कुंडलीत ‘या’ स्थानी राहु-केतु आहेत? अपार धनलाभ, भरघोस भरभराट; कुणी काही वाकडे करू शकणार नाही!
18
Mumbai: नियोजनाच्या अभावामुळे विक्रोळीत वाहतूककोंडी
19
Israel Iran War : 'मोसाद'ची नवीन खेळी!, इराण अलर्टवर, नागरिकांना मोबाईलमधून WhatsApp डिलिट करण्याचे आदेश
20
दूधवाल्याची चूक अन् छत्रपती संभाजीनगरजवळ कारसह दोन बस एकमेकांवर धडकल्या

शेतकऱ्यांनी फिरविली मालेगाव बाजार समितीमधील नाफेडच्या केंद्राकडे  पाठ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 20, 2018 14:52 IST

वाशिम :  मालेगाव बाजार समितीमध्ये आधिच उशिरा सुरु केलेल्या नाफेड खरेदी केंद्रामुळे शेतकऱ्यांचा माल पडून राहिला. खरेदी केंद्र सुरु केल्यानंतर हेक्टरी ४ क्विंटलच खरेदी करण्याचा नियम शेतकऱ्यांना डोकेदुखी ठरत असल्याने शेतकऱ्यांनी  नाफेडच्या केंद्राकडे पाठ फिरविल्याचे दिसून येत आहे.

ठळक मुद्देमालेगाव बाजार समितीमध्ये आधिच उशिरा सुरु केलेल्या नाफेड खरेदी केंद्रामुळे शेतकऱ्यांचा माल पडून राहिला. परंतु मालासाठी लावलेल्या निकषामुळे नोंदणीकृत शेतकऱ्यांनी त्याकडे पाठ फिरविली आहे.  हेक्टरी केवळ चार क्विंटल खरेदी करण्याच्या निकषामुळे इतर माल शेतकऱ्यांनी कुठे विकावा असा प्रश्न निर्माण झाला आहे.

वाशिम :  मालेगाव बाजार समितीमध्ये आधिच उशिरा सुरु केलेल्या नाफेड खरेदी केंद्रामुळे शेतकऱ्यांचा माल पडून राहिला. खरेदी केंद्र सुरु केल्यानंतर हेक्टरी ४ क्विंटलच खरेदी करण्याचा नियम शेतकऱ्यांना डोकेदुखी ठरत असल्याने शेतकऱ्यांनी  नाफेडच्या केंद्राकडे पाठ फिरविल्याचे दिसून येत आहे.

साधारणता शेतकऱ्यांना हेक्टरी दहा ते बारा क्विंटल तुरीचे उत्पादन झाले आहे. तुरीला बाजारपेठेत योग्य भाव मिळत नसल्याने अडचणीत आलेल्या शेतकºयांसाठी नाफेडमार्फत तूर खरेदी करण्याचा निर्णय शासनाने घेतला. त्यानुसार मालेगाव बाजार समितीमध्ये नाफेडचे तूर खरेदी केंद्र मागील काही दिवसांपासून सुरु झाले. परंतु ही खरेदी करतांना हेक्टरी केवळ चार क्विंटल खरेदी करण्याच्या निकषामुळे इतर माल शेतकऱ्यांनी कुठे विकावा असा प्रश्न निर्माण झाला आहे. यामुळे शेतकरी नाफेडच्या खरेदी केंद्रावर जावून चौकशीनंतर मालच बाजार समितीमध्ये आणतांना दिसून येत नाहीत. तालुका खरेदी विक्री संघामार्फत नोंदणीकृत शेतकºयांना बाजार समितीत माल आणण्यासाठी मोबाईलवर संदेश देण्यात येत आहेत. परंतु मालासाठी लावलेल्या निकषामुळे नोंदणीकृत शेतकऱ्यांनी त्याकडे पाठ फिरविली आहे.  या संदर्भात शेतकºयांनी जिल्हा मार्केट अधिकारी तराळे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी हेक्टरी खरेदीत वाढ व्हावी यासाठी प्रयत्न सुरु असल्याचे सांगितले. 

 

शासनाने शेतकºयांचा रोष लक्षात घेवून हेक्टरी किमान १० क्विंटल तूर नाफेडमार्फत खरेदी करावी.              शेतकऱ्यांकडे तूर शिल्लक असतांना ती अर्धाी बाजार समितीला विकणार व बाकीच्या विकण्यासाठी कुठे जाणार यासाठी प्रशासनाने विचार करुन हा निकष बदलणे गरजेचे आहे. आपण यासाठी सतत प्रयत्न करीत असून शेतकºयांचा जास्तीत जास्त माल कसा घेता येईल यासाठी प्रयत्न चालविले आहेत. 

 - भगावान शिंदे, अध्यक्ष, तालुका खरेदी विक्री संस्था

शासनाने लादलेली मर्यादा अतिशय अन्यायकारक असून शेतकºयांनी पिकविलेले अर्धे धान्य (तूर) शासकीय खरेदी केंद्रावर दयावे तर उर्वरित धान्याची विक्री कुठे करावी.  शासनाने शासकीय खरेदी केंद्रावर कमीत कमी एकरी सहा क्विंटल तूर खरेदी करावी. या संदर्भात आपण वरिष्ठांना पण सूचना, मॅसेज केले आहेत. परंतु अद्याप यावर कोणताच निर्णय न झाल्याने आमच्यासारखे शेतकरी अडचणीत आले आहेत.          

 - गजानन लहाने, शेतकरी, तिवळी

टॅग्स :washimवाशिमMalegaonमालेगांवMarket committee washimबाजार समिती वाशिम