शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
2
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
3
२६ निष्पाप लोकांना मारणारा हाशिम मुसा निघाला स्पेशल पॅरा कमांडो; हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचा सहभाग असल्याची शंका
4
भारताच्या प्रतिका रावलने एकदिवसीय क्रिकेटमध्ये रचला इतिहास, केली 'अशी' कामगिरी!
5
CMF Phone 2 Pro लाँच, किंमत एवढी स्वस्त की...; या रेंजमध्ये पहिल्यांदाच टेलिफोटो कॅमेरा सेटअप...
6
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला करतात चैत्र गौरीची पाठवणी; पण कशी? जाणून घ्या!
7
मोफत रेशनचा लाभ घेणाऱ्यांसाठी शेवटची संधी? हे काम आजच करा अन्यथा कार्डवरुन नाव वगळणार
8
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
9
मराठमोळ्या अभिनेत्रीने अमेरिकेत बनवलं पापड आणि कुरडई, व्हिडीओ केला शेअर
10
मुकेश अंबानींनी जगातील अब्जाधीशांना टाकलं मागे, एका दिवसात कमावले ₹४४,२९३ कोटी रुपये
11
Vaibhav Suryavanshi : "आई ३ तास ​​झोपायची, वडिलांनी नोकरी सोडली...", वैभव सूर्यवंशीने सांगितला IPL पर्यंतचा प्रवास
12
काश्मीरमध्ये ४८ पर्यटन स्थळे बंद; दहशतवाद्यांची घरे पाडल्यामुळे स्लिपर सेलकडून मोठ्या हल्ल्याची शक्यता
13
'फॅमिली मॅन' फेम अभिनेत्याची हत्या? मित्रांसोबत गेला होता पिकनिकला, कुटुंबियांनी व्यक्त केला संशय
14
पाकिस्तानने भारतासाठी हवाई क्षेत्र बंद केले, परंतू भारताचे वापरतोय; ते ही बंद करण्याचा विचार...
15
आप पदाधिकाऱ्याच्या मुलीचा कॅनडामध्ये संशयास्पद मृत्यू; आठवडाभरापासून होती बेपत्ता
16
"गावातल्या मुलाला आपण स्वीकारणारच नाही का?"; 'झापुक झुपूक'च्या ट्रोलिंगबद्दल केदार शिंदे स्पष्टच बोलले
17
'भालू' फेम अभिनेते, निर्माते आणि दिग्दर्शक प्रकाश भेंडे यांचं निधन
18
कॅनडामध्ये ट्रम्प विरोधाने निवडणूक फिरली; ट्रुडोंच्या पक्षाचे मार्क कार्नी नवे पंतप्रधान होणार
19
Akshaya Tritiya 2025: सोने खरेदी शक्य नाही? मग अक्षय्य तृतीयेला घरी आणा कामधेनुची मूर्ती!
20
वैभव सूर्यवंशीच्या तुफान फटकेबाजीवर बॉलिवूडकरही फिदा! युवा क्रिकेटपटूवर केला कौतुकाचा वर्षाव

शेतकऱ्यांनो, पेरणीसाठी सोयाबीन जपून ठेवा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 11, 2021 04:42 IST

गतवर्षीच्या खरीप हंगामात अनेक शेतकऱ्यांनी शेतात पेरलेले सोयाबीनचे बियाणे उगवलेच नाही. काही शेतकऱ्यांच्या शेतातील सोयाबीनवर रोग, किडींचा प्रादुर्भाव झाला. ...

गतवर्षीच्या खरीप हंगामात अनेक शेतकऱ्यांनी शेतात पेरलेले सोयाबीनचे बियाणे उगवलेच नाही. काही शेतकऱ्यांच्या शेतातील सोयाबीनवर रोग, किडींचा प्रादुर्भाव झाला. परतीच्या पावसाने सोयाबीनची गुणवत्ता ढासळली. या समस्यांमुळे उत्पादन क्षमता खालावल्याने पुढील हंगामात सोयाबीन बियाण्यांची निश्चितपणे टंचाई निर्माण होणार असल्याचे संकेत मिळत आहेत. या पृष्ठभूमीवर शेतकऱ्यांनी शेतातील उत्पादित सोयाबीन पूर्णत: विकून न टाकता काही सोयाबीन बियाण्यांसाठी जपून ठेवावे.

सोयाबीनच्या सर्वच जाती सुधारित असल्यामुळे दरवर्षी नवीन बियाणे खरेदी करण्याची आवश्यकता नाही. त्यामुळे ज्या शेतकऱ्यांकडे चांगल्या प्रतीचे सोयाबीन आहे, त्यांनी घरीच तीनवेळा उगवणक्षमता तपासून स्वत:ला आवश्यक असणारे व स्वकीयांना लागणारे सोयाबीन राखून ठेवल्यास बियाण्याच्या अडचणीवर मात करता येऊ शकते. सोबतच दुसऱ्या गावातील शेतकऱ्यांनासुद्धा बाजारभावाने बियाणे विक्री केल्यास त्यांनाही मदत होणार आहे. यातून संबंधित शेतकऱ्यास आर्थिक फायदादेखील होऊ शकतो. त्यामुळे सोयाबीन पूर्णत: विकून न टाकता राखून ठेवावे, असे आवाहन तालुका कृषी अधिकारी घोडेकर यांनी केले आहे.