शहरं
Join us  
Trending Stories
1
बडगुजर यांच्या प्रवेशावरून भाजपमध्ये घमासान, बावनकुळे अंधारात, गिरीश महाजन यांचा पुढाकार
2
अश्रूंचा बांध फुटला... राजवीर यांना शेवटचा निरोप देताना पत्नी कर्नल दीपिका चौहान भावूक ( Video )
3
MHT CET 2025 Result: एमएचटी सीईटीच्या परीक्षेत पीसीएममध्ये राज्यातील २२ जण अव्वल!
4
"डॉक्टर मी प्रयोग करुन येतो, नंतर ऑपरेशन करा"; नाटकाच्या ३ तास आधी मराठी अभिनेत्याला हृदयविकाराचा झटका
5
इराण-इस्त्रायल यांच्यातील युद्धात कोण बनणार शांतीदूत?; चीन आणि रशियानेही दिली ऑफर
6
Sonam Raghuwanshi: सोनम आणि तिच्या बॉयफ्रेंडने कशी केली राजाची हत्या? पोलीस आरोपींना घेऊन 'त्या' ठिकाणी
7
प्रक्षेपण सुरू असतानाच झाला होता हल्ला, आता इस्राइलच्या नाकावर टिच्चून त्या महिला अँकरने दिल्या बातम्या  
8
"भारतीय एजंट्सनं अपहरण केलं होतं..," फरार हिरे व्यापारी मेहुल चोक्सीचा खळबळजनक दावा
9
आर. अश्विनच्या टीमवरील बॉल टेम्परिंगचा आरोप खरा की, खोटा? TNPL आयोजकांनी निर्णय दिला, आता...
10
तुम्ही 'या' क्षेत्रात काम करताय का? सरकार दरमहा देणार ३,००० रुपये, आजच अर्ज करा!
11
अहमदाबाद विमान अपघातात २३ वर्षीय क्रिकेटपटूचा दुर्दैवी मृत्यू; टीमने वाहिली श्रद्धांजली
12
कधीही अण्वस्त्र तयार करू शकणार नाही इराण? G7 शिखर परिषदेतून तेहरानला इशारा; या सर्व देशांचा इस्रायलला पाठिंबा
13
Groww, Zerodha सह टॉप ब्रोकर्सनं २ महिन्यांत गमावले ४.७ लाख अ‍ॅक्टिव्ह ग्राहक, काय आहे कारण?
14
Israel Iran Conflict : अमेरिका आता इराणवर हल्ला करणार? ट्रम्प यांनी दिला इशारा; म्हणाले, तेहरान रिकामे करा...
15
'केवळ एका फोन कॉलने इराण-इस्रायल युद्ध थांबवता येऊ शकतं..."; परराष्ट्र मंत्री अराघची यांचा दावा
16
"इराणच्या अयातुल्ला खामेनींना संपवल्यानंतरच हा संघर्ष थांबेल"; बेंजामिन नेतन्याहूंचे मोठे विधान
17
Devendra Fadnavis: स्थलांतरित शाळाबाह्य मुलांना जबरदस्तीने शाळेत आणा, मुख्यमंत्र्यांचे आवाहन
18
'सैराट'मधील हा अभिनेता लवकरच गर्लफ्रेंडसोबत बांधणार लग्नगाठ, ती दिसायला आहे खूप सुंदर
19
UPI Changes: ट्रान्झॅक्शन टाईम, बॅलन्स चेक लिमिट... UPI शी निगडीत या मोठ्या बदलांबाबत जाणून घ्या 
20
रस्त्यावरील लोखंडी वस्तूमुळे पायाला पडले १८ टाके, महापालिकेचा ढिसाळ कारभार अभिनेत्रीला पडला महागात

शेतकऱ्यांनो, पेरणीसाठी सोयाबीन जपून ठेवा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 11, 2021 04:42 IST

गतवर्षीच्या खरीप हंगामात अनेक शेतकऱ्यांनी शेतात पेरलेले सोयाबीनचे बियाणे उगवलेच नाही. काही शेतकऱ्यांच्या शेतातील सोयाबीनवर रोग, किडींचा प्रादुर्भाव झाला. ...

गतवर्षीच्या खरीप हंगामात अनेक शेतकऱ्यांनी शेतात पेरलेले सोयाबीनचे बियाणे उगवलेच नाही. काही शेतकऱ्यांच्या शेतातील सोयाबीनवर रोग, किडींचा प्रादुर्भाव झाला. परतीच्या पावसाने सोयाबीनची गुणवत्ता ढासळली. या समस्यांमुळे उत्पादन क्षमता खालावल्याने पुढील हंगामात सोयाबीन बियाण्यांची निश्चितपणे टंचाई निर्माण होणार असल्याचे संकेत मिळत आहेत. या पृष्ठभूमीवर शेतकऱ्यांनी शेतातील उत्पादित सोयाबीन पूर्णत: विकून न टाकता काही सोयाबीन बियाण्यांसाठी जपून ठेवावे.

सोयाबीनच्या सर्वच जाती सुधारित असल्यामुळे दरवर्षी नवीन बियाणे खरेदी करण्याची आवश्यकता नाही. त्यामुळे ज्या शेतकऱ्यांकडे चांगल्या प्रतीचे सोयाबीन आहे, त्यांनी घरीच तीनवेळा उगवणक्षमता तपासून स्वत:ला आवश्यक असणारे व स्वकीयांना लागणारे सोयाबीन राखून ठेवल्यास बियाण्याच्या अडचणीवर मात करता येऊ शकते. सोबतच दुसऱ्या गावातील शेतकऱ्यांनासुद्धा बाजारभावाने बियाणे विक्री केल्यास त्यांनाही मदत होणार आहे. यातून संबंधित शेतकऱ्यास आर्थिक फायदादेखील होऊ शकतो. त्यामुळे सोयाबीन पूर्णत: विकून न टाकता राखून ठेवावे, असे आवाहन तालुका कृषी अधिकारी घोडेकर यांनी केले आहे.