शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
3
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
4
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
5
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
6
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
7
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
8
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
9
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
10
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
11
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
12
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
13
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
14
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
15
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
16
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
17
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
18
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
19
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
20
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
Daily Top 2Weekly Top 5

२९ हजार शेतक-यांचे पीककर्ज पुनर्गठन

By admin | Updated: July 18, 2015 02:16 IST

पुनर्गठनाचा आकडा १८१.३४ कोटीवर.

वाशिम : शेतकर्‍यांचा रेटा आणि प्रशासनाचा दंडुका यामुळे १५ जुलैअखेर पीककर्ज पुनर्गठनाचा आकडा १८१.३४ कोटीवर गेला आहे. जिल्हय़ातील एकूण २९ हजार ६६८ शेतकरी लाभार्थींनी पुनर्गठनाचा लाभ घेतला आहे. २0१३ मधील अतवृष्टी, २0१४ मधील कोरडा दुष्काळ आणि २0१५ च्या फेब्रुवारी ते मार्च महिन्यातील गारपिटीने शेतकर्‍यांच्या हिरव्या स्वप्नावर पाणी फेरले. कोरडा दुष्काळ, अवकाळी पाऊस व गारपिटीने शेतकरी अगोदरच गारद झालेला आहे. त्यातच वन्यप्राण्यांचा हैदोस, अल्प बाजारभावाने भर टाकली. शेतकर्‍यांना मदतीचा हात म्हणून २0१४-१५ या आर्थिक वर्षातील पीककर्जाचे पुनर्गठण करण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेले आहेत. २0१४-१५ या आर्थिक वर्षात जिल्हय़ातील ९९ हजार १९४ शेतकरी सभासदांनी एकूण ६६३ कोटी ९८ लाख रुपयांच्या पीककर्जाचा लाभ घेतला होता. सदर शेतकरी पीककर्ज पुनर्गठनासाठी पात्र आहेत. पुनर्गठनास नकार देणार्‍या बँक प्रशासनाविरूद्ध एफआयआर दाखल करण्याचे आदेश विभागीय आयुक्त ज्ञानेश्‍वर राजुरकर व जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी दिले होते. १५ जुलैपर्यंत विविध राष्ट्रीयीकृत बँकांनी २९ हजार ६६८ शेतकरी लाभार्थींना १८१.३४ कोटी रुपयांच्या कर्जाचे पुनर्गठन करण्यात आले आहे. बँक ऑफ बडोदाने १५८ शेतकर्‍यांचे १८.६ लाख, बँक ऑफ महाराष्ट्राने १९५ शेतकर्‍यांचे १८.७ लाख, सेंट्रल बँक ऑफ इंडियाने ९५३ शेतकर्‍यांचे ७0 लाख, स्टेट बँक ऑफ इंडियाने २११२ शेतकर्‍यांचे १.८६ कोटी, युनियन बँक ऑफ इंडियाने ३८६ शेतकर्‍यांचे २९.८ लाख, एसडीएफसी बँकेने २२१ शेतकर्‍यांचे ३७.४ लाख, डीसीसी बँकेने २0 हजार ३६८ शेतकर्‍यांचे १0९.५६ कोटी रुपयांच्या पीककर्जाचे पुनर्गठण, अशी आकडेवारी आहे. २0१५ मध्ये मृग नक्षत्रात समाधानकारक पाऊस झाल्याने शेतकरी सुखावून गेला; मात्र हा आनंद जणू औटघटकेचा ठरत आहे.