शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशमध्ये हिंदूंवर होत असलेल्या अत्याचारावरून मुंबईपासून दिल्लीपर्यंत संताप, तीव्र आंदोलने
2
‘उद्धवसेनेसाठी मुंबई सोन्याची अंडी देणारी कोंबडी’,एकनाथ शिंदे यांची टीका  
3
कणकवलीचे नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट, शिंदेसेनेत प्रवेश करणार? चर्चांना उधाण
4
अवजड ट्रक नियंत्रण सुटून कारवर उलटला, भीषण अपघातात पाच जणांचा मृत्यू 
5
पाकिस्तानला 'लॉटरी' लागली... १,३५,००,००,००,०००च्या बोलीवर PIA एअरलाईन्सचा सौदा पक्का !
6
IND W vs SL W : गोलंदाजीत शर्मा; फलंदाजीत वर्मा! दुसऱ्या टी-२० सामन्यातही लंकेसमोर टीम इंडियाचा डंका!
7
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
8
खरंच दारूच्या नशेत बेधुंद होते इंग्लंड क्रिकेटपटू? ECB नं चौकशीची तयारी दाखवली, पण...
9
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
10
उल्हासनगर: शिंदेसेनेत 'जुने विरुद्ध नवे' संघर्ष; तरुणांना संधी देण्याची युवासेनेची मागणी
11
IND W vs SL W : 'शर्माजी की बेटी' वैष्णवीसह श्री चरणीनं घेतली श्रीलंकेच्या बॅटर्सची फिरकी!
12
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
13
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
14
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
15
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
16
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
17
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
18
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
19
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
20
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

तूर विक्रीसाठी शेतकऱ्यांची नाफेड केंद्रांवर कसरत!

By admin | Updated: April 18, 2017 01:25 IST

मंगरूळपीर येथे सेना जिल्हाप्रमुखांची अधिकाऱ्यांशी चर्चा : शेतमाल मोजणीसाठी शेतकऱ्यांची गैरसोय

वाशिम : हमीभावात तुरीची विक्री करण्यासाठी शेतकरी मोठ्या संख्येने नाफेड खरेदी केंद्रावर येत आहेत. मात्र, पूर्वीच्याच तुरीची मोजणी न झाल्याने नाफेड केंद्रावर वाहनांच्या रांगा लागत आहेत.शासनाने तुरीला ५०५० रुपये हमीभाव जाहीर केलेला आहे. मात्र, कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये ३६०० ते ४२०० दरम्यान तुरीला बाजारभाव मिळत आहे. हमीभावात तुरीची विक्री करण्यासाठी शेतकरी नाफेड केंद्रावर मोठ्या संख्येने जात आहेत. मात्र, बारदाण्याचा अभाव व अन्य कारणांमुळे नाफेडचे केंद्र मध्यंतरी बंद होते. त्यानंतर वाशिम, मंगरूळपीर व कारंजा येथील नाफेड केंद्र सुरू झाले, तर मालेगाव, रिसोड येथील नाफेडचे तूर खरेदी केंद्र अद्यापही बंदच आहे. वाशिम, मंगरूळपीर येथे पूर्वीच्याच तुरीची मोजणी सुरू आहे. त्यातही नवीन तूर विक्रीसाठी येत असल्याने बाजार समिती परिसरात शेतमालाच्या वाहनांची रांग लागत आहे. हमीभावात तुरीची विक्री करताना शेतकऱ्यांची धावपळ होत आहे.मंगरुळपीर : मागील दहा दिवसांपासून बंद असलेली नाफेड तूर खरेदी शेवटी शिवसेना जिल्हाप्रमुख राजेश पाटील यांचे आक्रमकतेमुळे तत्काळ १७ एप्रिल रोजी दुपारपासून सुरू करण्यात आली.येथील नाफेड खरेदी केंद्र बंद असल्याने मागील दहा दिवसांपासून ताटकळत असलेला तालुक्यातील शेतकरी हतबल झाला होता. तुरीचे खचाखच भरलेली पोती, भाड्याने आणलेल्या ट्रॅक्टरमध्ये होती. मात्र तूर खरेदीचा मुहूर्त निघेना, शेवटी शिवसेना जिल्हाप्रमुख राजेश पाटील यांनी प्रभारी तहसीलदार यांच्या मदतीने उपविभागीय अधिकारी राजेश पारनाईक यांच्याशी सोमवारी चर्चा केली. शेतकऱ्यांची गैरसोय खपवून घेणार नाही, अशी आक्रमक भूमिका घेत तातडीने तूर खरेदी केंद्र सुरू करावे अन्यथा शिवसेना स्टाइलने आंदोलन करण्याचा इशारा सेना जिल्हाप्रमुख राजेश पाटील यांनी दिला होता. उपविभागीय अधिकाऱ्यांनी मध्यस्थी करून संबंधिताना या प्रकाराबाबत गंभीरता दर्शवून तत्काळ तूर खरेदी सुरू करण्याचे निर्देश दिले. त्यानंतर सोमवारी दुपारी दोन वाजतापासून नाफेडची तूर खरेदीस प्रारंभ झाला. यामुळे मागील दहा दिवसांपासून नाफेड केंद्रावर असणाऱ्या शेतकऱ्यांनी सुटकेचा नि:श्वास घेतला. मंगरूळपीर नाफेड केंद्र परिसरात शेतमालाच्या वाहनांच्या रांगा लागल्या आहेत. रिसोड : येथील नाफेड खरेदी केंद्र अद्यापही सुरू करण्यात आले नाही. सात दिवसांची मुदतवाढ देऊनही नाफेड केंद्र बंद असल्याने शेतकऱ्यांना नाईलाजास्तव कमी बाजारभावाने अन्यत्र तूर विकण्याची वेळ आली आहे. बाजार समिती किंवा अन्य खासगी व्यापाऱ्यांना हमीभावापेक्षा कमी दराने तूर विकावी लागत असल्याने शेतकऱ्यांना आर्थिक फटका बसत आहे.