शहरं
Join us  
Trending Stories
1
हवामान विभागाची मोठी भविष्यवाणी! शेतकऱ्यांनो, सावधान... महाराष्ट्रात पुढील १५ दिवस पाऊस...
2
कुलगाममध्ये तिसऱ्या दिवशीही चकमक सुरू; आतापर्यंत तीन दहशतवादी ठार, या वर्षातील सर्वात मोठी कारवाई
3
पनवेलमध्ये राडा झाला...! राज ठाकरेंच्या इशाऱ्यानंतर पनवेलमधील लेडीज बारवर मनसेचा हल्ला 
4
मुद्द्याची गोष्ट : टॅरिफच्या खेळीने चेकमेट कोण? कुणाला बसणार फटका?
5
भारतीयांनी घाम गाळून ज्या वस्तू बनवल्या, त्याच तुम्ही खरेदी करा; व्यापाऱ्यांनीही पुढाकार घ्यावा; पंतप्रधान मोदींचं आवाहन
6
आजचे राशीभविष्य ३ ऑगस्ट २०२५ : सांसारिक गोष्टी बाजूला ठेवाल, गूढ रहस्यमय विद्येत रमाल
7
'अटके'वरून शाब्दिक युद्ध रंगलं; "...तर अटक करून दाखवाच"; राज ठाकरे यांचं मुख्यमंत्र्यांना थेट आव्हान!
8
‘भीमराया…’ गीताची जन्मकथा सांगताना सरन्यायाधीश गवईंचा गळा दाटला! सुरेश भटांनी कसे लिहिले भीमरायाचे वंदना गीत? ऐकवली संपूर्ण कहाणी
9
प्रज्वल रेवण्णाला बलात्कारप्रकरणी जन्मठेप, १० लाख रुपयांचा दंडही; पीडित महिलेला ७ लाख रु. भरपाई देण्याचा आदेश
10
"हमे अयोध्या का मंदिर आरडीएक्स से उडाना है, पचास बंदे चाहिए..."; शिरूरच्या तरुणाला कराचीतून मेसेज, १ लाखाची ऑफर! गुन्हा दाखल
11
रस्ते गिळलेली अतिक्रमणे होणार नियमित; महसूल विभागाचा मोठा निर्णय
12
मिठी नदीच्या सफाई कामात झालेल्या कथित घोटाळ्याप्रकरणी ईडीचे आठ ठिकाणी छापे 
13
सहाव्या वर्षी वडिलांना एक चाल सांगितली अन्...; कोनेरू हम्पीची खास आठवण
14
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
15
IND vs ENG : "मी रोहित भाईला पाहिलं अन्..." शतकी खेळीनंतर यशस्वीनं शेअर केली ती खास गोष्ट (VIDEO)
16
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
17
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
18
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
19
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
20
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप

शेतकरी मार्गदर्शन सभांचा निर्णय ‘तकलादू’!

By admin | Updated: April 19, 2017 01:15 IST

कृषी विभागाची उदासिनता : शासनाच्या अनेक योजनांपासून शेतकरी अद्याप अनभिज्ञ

वाशिम : केंद्र व राज्य पुरस्कृत कृषीविषयक योजनांबाबत मार्गदर्शन करण्यासाठी कृषी विभागामार्फत प्रत्येक गुरुवारी जिल्हास्तरावर शेतकऱ्यांसाठी मार्गदर्शन सभा आयोजित करण्याचा निर्णय ७ मार्च २०१७ रोजी घेण्यात आला. मात्र, तेव्हापासून आजतागायत एकही सभा झालेली नाही. त्यामुळे सभांचा निर्णय पूर्णत: तकलादू ठरल्याची बाब समोर आली आहे. कृषी विभागामार्फत दरवर्षी केंद्र व राज्य पुरस्कृत योजना राबविल्या जातात. त्यात विस्तार, फलोत्पादन व मृद संधारण, गुण नियंत्रण, सांख्यिकी आदिंचा समावेश आहे. विस्तार योजनेअंतर्गत शेतकऱ्यांकरिता विविध पिकांची पीक प्रात्यक्षिके घेतली जातात. याअंतर्गत कृषी विद्यापीठामार्फत संशोधित नवीन वाणांच्या बियाण्यांचे वाटप करण्यात येते. कृषि निविष्ठा उत्पादन वाढीसाठी देण्यात येतात. याव्यतिरिक्त रोटाव्हेटर, पेरणीयंत्र, मळणीयंत्र, बीबीएफ संयंत्र, पीक संरक्षण उपकरणे, एच.डी.पी.ई. पाईप, मिनी दालमिल, गोदाम बांधकाम, बीज प्रक्रिया सयंत्र, राज्यांतर्गत, राज्याबाहेर, परदेश अभ्यासदौरे, प्रशिक्षण कार्यक्रम आदी बाबींचा इच्छूक शेतकऱ्यांना शासनाकडील मार्गदर्शक सुचनेनुसार अनुदानाचा लाभ देण्यात येतो. तसेच राष्ट्रीय फलोत्पादन अभियान व राष्ट्रीय कृषि विकास योजनेअंतर्गत सामुहिक शेततळे, शेडनेट, पॉली हाऊस, कांदाचाळ आदिंचा अनुदानावर लाभ देण्यात येतो. महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेतंर्गत १०० टक्के अनुदानावर फळझाड लागवडीसाठी अनुदान दिले जाते. मृद संधारण योजनेअंतर्गत शेतकऱ्यांच्या शेतावर विहीर पुर्नभरण, नाला सरळीकरण व खोलीकरण, खोल सलग समतल चर, ढाळीचे बांध, सिंमेट नालाबांध, माती नालाबांध व गाळ काढणे ही कामे घेण्यात येतात.तथापि, कृषी विभागाच्या याच महत्वाकांक्षी योजनांविषयी शेतकऱ्यांना इत्यंभूत माहिती असणे आवश्यक आहे. त्यासाठी जिल्हास्तरावर दर गुरुवारी सकाळी ११ वाजता जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातील आत्मा सभागृहात मार्गदर्शन सभा आयोजित करण्याचा निर्णय ७ मार्चला घेण्यात आला. मात्र, तेव्हापासून एकदाही यासंदर्भातील सभा घेण्याचे औदार्य कृषी विभागाने दाखविलेले नाही. सहाही तालुक्यांमध्ये आठवडाभर होणार होते सभांचे आयोजनजिल्हास्तराप्रमाणेच तालुकास्तरावर देखील शेतकरी मार्गदर्शन सभांचे आयोजन केले जाणार होते. त्यानुसार, रिसोड तालुका कृषि अधिकारी यांच्या स्तरावर दर सोमवारी, मालेगाव तालुका कृषि अधिकारी दर मंगळवारी, मंगरूळपीर तालुका कृषि अधिकारी दर बुधवारी, मानोरा तालुका कृषि अधिकारी दर शुक्रवारी, कारंजा तालुका कृषि अधिकारी यांच्या स्तरावर दर शनिवारी मार्गदर्शन सभा होणार होती. परंतू जिल्हास्तराप्रमाणेच तालुकास्तरावरही कुठलीच सभा अद्याप झालेली नाही. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये याप्रती रोष व्यक्त होत आहे. जिल्हाभरात कृषीविषयक मार्गदर्शन सभा घेण्याचा निर्णय जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयाचाच होता. मात्र, मध्यंतरी उद्भवलेल्या काही तांत्रीक अडचणींमुळे एकही सभा अद्याप होवू शकली नाही. असे असले तरी यंदाच्या गुरूवारपासून सभांचे नियोजन केले जाईल.- दत्तात्रेय गावसाने, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी