शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशमध्ये हिंदूंवर होत असलेल्या अत्याचारावरून मुंबईपासून दिल्लीपर्यंत संताप, तीव्र आंदोलने
2
‘उद्धवसेनेसाठी मुंबई सोन्याची अंडी देणारी कोंबडी’,एकनाथ शिंदे यांची टीका  
3
कणकवलीचे नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट, शिंदेसेनेत प्रवेश करणार? चर्चांना उधाण
4
अवजड ट्रक नियंत्रण सुटून कारवर उलटला, भीषण अपघातात पाच जणांचा मृत्यू 
5
पाकिस्तानला 'लॉटरी' लागली... १,३५,००,००,००,०००च्या बोलीवर PIA एअरलाईन्सचा सौदा पक्का !
6
IND W vs SL W : गोलंदाजीत शर्मा; फलंदाजीत वर्मा! दुसऱ्या टी-२० सामन्यातही लंकेसमोर टीम इंडियाचा डंका!
7
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
8
खरंच दारूच्या नशेत बेधुंद होते इंग्लंड क्रिकेटपटू? ECB नं चौकशीची तयारी दाखवली, पण...
9
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
10
उल्हासनगर: शिंदेसेनेत 'जुने विरुद्ध नवे' संघर्ष; तरुणांना संधी देण्याची युवासेनेची मागणी
11
IND W vs SL W : 'शर्माजी की बेटी' वैष्णवीसह श्री चरणीनं घेतली श्रीलंकेच्या बॅटर्सची फिरकी!
12
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
13
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
14
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
15
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
16
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
17
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
18
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
19
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
20
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

शेतकरी मार्गदर्शन सभांचा निर्णय ‘तकलादू’!

By admin | Updated: April 19, 2017 01:15 IST

कृषी विभागाची उदासिनता : शासनाच्या अनेक योजनांपासून शेतकरी अद्याप अनभिज्ञ

वाशिम : केंद्र व राज्य पुरस्कृत कृषीविषयक योजनांबाबत मार्गदर्शन करण्यासाठी कृषी विभागामार्फत प्रत्येक गुरुवारी जिल्हास्तरावर शेतकऱ्यांसाठी मार्गदर्शन सभा आयोजित करण्याचा निर्णय ७ मार्च २०१७ रोजी घेण्यात आला. मात्र, तेव्हापासून आजतागायत एकही सभा झालेली नाही. त्यामुळे सभांचा निर्णय पूर्णत: तकलादू ठरल्याची बाब समोर आली आहे. कृषी विभागामार्फत दरवर्षी केंद्र व राज्य पुरस्कृत योजना राबविल्या जातात. त्यात विस्तार, फलोत्पादन व मृद संधारण, गुण नियंत्रण, सांख्यिकी आदिंचा समावेश आहे. विस्तार योजनेअंतर्गत शेतकऱ्यांकरिता विविध पिकांची पीक प्रात्यक्षिके घेतली जातात. याअंतर्गत कृषी विद्यापीठामार्फत संशोधित नवीन वाणांच्या बियाण्यांचे वाटप करण्यात येते. कृषि निविष्ठा उत्पादन वाढीसाठी देण्यात येतात. याव्यतिरिक्त रोटाव्हेटर, पेरणीयंत्र, मळणीयंत्र, बीबीएफ संयंत्र, पीक संरक्षण उपकरणे, एच.डी.पी.ई. पाईप, मिनी दालमिल, गोदाम बांधकाम, बीज प्रक्रिया सयंत्र, राज्यांतर्गत, राज्याबाहेर, परदेश अभ्यासदौरे, प्रशिक्षण कार्यक्रम आदी बाबींचा इच्छूक शेतकऱ्यांना शासनाकडील मार्गदर्शक सुचनेनुसार अनुदानाचा लाभ देण्यात येतो. तसेच राष्ट्रीय फलोत्पादन अभियान व राष्ट्रीय कृषि विकास योजनेअंतर्गत सामुहिक शेततळे, शेडनेट, पॉली हाऊस, कांदाचाळ आदिंचा अनुदानावर लाभ देण्यात येतो. महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेतंर्गत १०० टक्के अनुदानावर फळझाड लागवडीसाठी अनुदान दिले जाते. मृद संधारण योजनेअंतर्गत शेतकऱ्यांच्या शेतावर विहीर पुर्नभरण, नाला सरळीकरण व खोलीकरण, खोल सलग समतल चर, ढाळीचे बांध, सिंमेट नालाबांध, माती नालाबांध व गाळ काढणे ही कामे घेण्यात येतात.तथापि, कृषी विभागाच्या याच महत्वाकांक्षी योजनांविषयी शेतकऱ्यांना इत्यंभूत माहिती असणे आवश्यक आहे. त्यासाठी जिल्हास्तरावर दर गुरुवारी सकाळी ११ वाजता जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातील आत्मा सभागृहात मार्गदर्शन सभा आयोजित करण्याचा निर्णय ७ मार्चला घेण्यात आला. मात्र, तेव्हापासून एकदाही यासंदर्भातील सभा घेण्याचे औदार्य कृषी विभागाने दाखविलेले नाही. सहाही तालुक्यांमध्ये आठवडाभर होणार होते सभांचे आयोजनजिल्हास्तराप्रमाणेच तालुकास्तरावर देखील शेतकरी मार्गदर्शन सभांचे आयोजन केले जाणार होते. त्यानुसार, रिसोड तालुका कृषि अधिकारी यांच्या स्तरावर दर सोमवारी, मालेगाव तालुका कृषि अधिकारी दर मंगळवारी, मंगरूळपीर तालुका कृषि अधिकारी दर बुधवारी, मानोरा तालुका कृषि अधिकारी दर शुक्रवारी, कारंजा तालुका कृषि अधिकारी यांच्या स्तरावर दर शनिवारी मार्गदर्शन सभा होणार होती. परंतू जिल्हास्तराप्रमाणेच तालुकास्तरावरही कुठलीच सभा अद्याप झालेली नाही. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये याप्रती रोष व्यक्त होत आहे. जिल्हाभरात कृषीविषयक मार्गदर्शन सभा घेण्याचा निर्णय जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयाचाच होता. मात्र, मध्यंतरी उद्भवलेल्या काही तांत्रीक अडचणींमुळे एकही सभा अद्याप होवू शकली नाही. असे असले तरी यंदाच्या गुरूवारपासून सभांचे नियोजन केले जाईल.- दत्तात्रेय गावसाने, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी