शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

नाफेड केंद्रांवर शेतकऱ्यांची झुंबड

By admin | Updated: May 16, 2017 01:38 IST

वाशिम : येत्या ३१ मेपर्यंत शासकीय तूर खरेदी होणार असल्याने हमीभावात तूरीची विक्री व्हावी म्हणून जिल्हाभरातील शेतकऱ्यांनी नाफेड केंद्रांवर एकच गर्दी केल्याचे चित्र दिसून येत आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : येत्या ३१ मेपर्यंत शासकीय तूर खरेदी होणार असल्याने हमीभावात तूरीची विक्री व्हावी म्हणून जिल्हाभरातील शेतकऱ्यांनी नाफेड केंद्रांवर एकच गर्दी केल्याचे चित्र दिसून येत आहे.सन २०१३ ते २०१५ या दरम्यान निसर्गाची साथ मिळाली नसल्याने शेतकऱ्यांना अपेक्षीत उत्पादन घेता आले नाही. खरिप हंगामात पावसाच्या अनियमित हजेरीने शेतकऱ्यांना दुबार, तिबार पेरणीला सामोरे जावे लागले. त्यानंतर पावसाने दगा दिल्याने उत्पादनात प्रचंड घट आली. रब्बी हंगामात अवकाळी पाऊस व गारपिटीने शेतकऱ्यांच्या स्वप्नांची राखरांगोळी केली होती. सलग तीन वर्षे वाशिम जिल्हा दुष्काळाच्या छायेत होता. शासनाने दुष्काळग्रस्त जिल्हा म्हणून घोषितही केले होते. सन २०१६ या वर्षात निसर्गाने साथ दिल्याने शेतकऱ्यांना अपेक्षीत उत्पादन घेता आले. मात्र, या वर्षातच शेतमालाचे बाजारभाव गडगडल्याने शेतकऱ्यांसाठी ‘अच्छे दिन’ आलेच नाहीत. शासनाने तूरीला ५०५० रुपये हमीभाव जाहिर केलेला आहे. मात्र, बाजार समित्यांमध्ये हमीभाव मिळत नसल्याने शेतकरी नाफेड केंद्रांवर मोठ्या संख्येने वळत आहेत. मध्यंतरी शासनाने नाफेडची तूर खरेदी बंद केली होती. शेतकऱ्यांची मागणी लक्षात घेता ३१ मे पर्यंत शासकीय तूर खरेदी होणार आहे. प्रथम नाफेड केंद्रांवर नोंदणी करून ‘टोकन’ घेणाऱ्या शेतकऱ्यांचीच तूर खरेदी केली जाणार आहे. ग्रेडर व गोदामाचे नियोजन नसल्याने १२ मे पर्यंत नाफेड केंद्रावर तूर खरेदीला सुरूवात होऊ शकली नव्हती. १३ मे पासून जिल्ह्यात वाशिम, मालेगाव, कारंजा व मंगरूळपीर येथे शासकीय खरेदी सुरू आहे. मानोरा येथे नाफेड केंद्र नाही तर रिसोड बाजार समितीत नाफेडची खरेदी सुरू होऊ शकली नाही. टोकन घेण्यासाठी मालेगाव, वाशिम, कारंजा व मंगरूळपीर येथे शेतकऱ्यांची झुंबड उडत असल्याचे चित्र सोमवारी दिसून आले. ट्रक्टर व अन्य प्रकारच्या वाहनांमध्ये तूर आणली जात आहे. टोकन घेताना वाहन क्रमांक नोंदविणे आवश्यक असल्याने शेतकऱ्यांना अगोदरच ‘वाहन’ बुक करण्याची वेळ आली आहे.