शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash Deep Maiden Fifty : 'नाईट वॉचमन' आकाशदीपनं उडवली इंग्लंडची झोप! ठोकली सॉलिड 'फिफ्टी'
2
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
3
आकाशदीपची फिफ्टी पाहून गिल-जड्डूला सेंच्युरीचं फिल! बॅटसह हेल्मेट उंचावण्याची केली डिमांड (VIDEO)
4
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
5
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
6
"शिंदे गटाच्या मोर्चाचे लक्ष्य चुकले; मोर्चाच काढायचा तर फडणवीसांच्या बंगल्यावर काढा’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा टोला 
7
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
8
जिममध्ये व्यायाम करत असतानाच आला हार्ट ॲटॅक, उदयोन्मुख क्रिकेटपटूचा मृत्यू
9
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
10
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
11
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
12
कॉफीसोबत झुरळंही रगडली जातात, कॉफीत असतातच झुरळं! खोटं वाटतंय, वाचा FDA काय सांगतेय..
13
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
14
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
15
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
16
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
17
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
18
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
19
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
20
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!

शेतकरी, शेतमजुरांनी थाटला रसवंतीचा व्यवसाय!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 09:21 IST

शिरपूर जैन : रब्बी हंगाम जवळपास संपुष्टात आला असून, शेतातील कामे संपल्याने मालेगाव ते रिसोड या मार्गावरील शेतकरी, शेतमजुुरांनी ...

शिरपूर जैन : रब्बी हंगाम जवळपास संपुष्टात आला असून, शेतातील कामे संपल्याने मालेगाव ते रिसोड या मार्गावरील शेतकरी, शेतमजुुरांनी रसवंतीची कास धरली आहे. ४५ किलोमीटरच्या रस्त्यावर सुमारे ५० रसवंत्या सध्या सुरू झाल्याचे दिसून येत आहे. राष्ट्रीय महामार्गाच्या निर्मितीमुळे रोजगाराचीही निर्मिती झाल्याचा सूर यानिमित्ताने उमटत आहे.

गत तीन वर्षांपासून मालेगाव - शिरपूर - रिसोड - सेनगाव - हिंगोली या ९७ किलोमीटर अंतराच्या रस्त्याचे रुंदीकरण सुरू होते. जवळपास ५०० कोटी रुपये खर्च करून या महामार्गाचे काम आता पूर्ण झाले आहे. या रस्त्याला राष्ट्रीय महामार्गाचा दर्जा देऊन ४६१ बी हा क्रमांक देण्यात आला आहे. रस्त्याचे रुपडे पालटल्याने पूर्वीपेक्षा अधिक रहदारी वाढली आहे. ही बाब हेरून मालेगाव ते रिसोड यादरम्यान आसपासच्या गावांमधील शेतकरी, शेतमजुरांनी जवळपास ५० ते ६० रसवंती लावल्या आहेत. यासह चहाची दुकाने, लहान-मोठी हॉटेल, सिंचन सुविधा असलेल्या बहुतांश शेतकऱ्यांनी ‘सर्विसिंग सेंटर’ उघडली आहेत. रस्ता विकासामुळे मोठ्या प्रमाणात युवकांना रोजगार व शेतकऱ्यांना संलग्न व्यवसाय निर्मिती झाल्याचे चित्र मालेगाव - रिसोड रस्त्यावर पाहायला मिळत आहे.

..................................

कोट :

शिरपूरपासून हिंगोलीपर्यंतच्या राष्ट्रीय महामार्गाचे रुंदीकरण होऊन या रस्त्याला राष्ट्रीय महामार्गाचा दर्जा मिळाला. वाहनांची संख्या व रहदारी वाढल्याने व्यवसाय होईल, या उद्देशाने रसवंती आणि वाहने धुण्याचे ‘सर्विसिंग सेंटर’ सुरू केले आहे. गेल्या काही दिवसांपासून व्यवसायातून चांगली मिळकत होत आहे.

वैभव नारायण चोपडे

शेतकरी, शिरपूर जैन