शहरं
Join us  
Trending Stories
1
"पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 2047 पर्यंत देशाचे नेतृत्व करावे, आजवर असा नेता पाहिला नाही..." - मुकेश अंबानी
2
प्रसिद्धीचा मुद्दा, अजितदादांचा फडणवीसांकडे रोख;  म्हणाले, “जाहिरात करावी तर देवाभाऊंसारखी”
3
आरोपीला पकडण्यासाठी गेलेल्या पोलिसांवर प्राणघातक हल्ला: अनेक पोलिस एम्समध्ये दाखल
4
कार अन् ट्रकचा भीषण अपघात; एकाच कुटुंबातील सात जणांचा जागीच मृत्यू
5
लोकांच्या हातात जादाचे २ लाख कोटी उरणार; जीएसटी कपातीवर अर्थमंत्र्यांचा अंदाज
6
VIRAL : 'थार' घेऊन डिलिव्हरी बॉय पार्सल द्यायला आला, बघणारा प्रत्येकजण अवाक् झाला! व्हिडीओ होतोय व्हायरल
7
"बाप्पा तुम्ही खूप भाग्यवान, नांगरलं कुणी, पेरलं कुणी अन्..."; पंकजा मुंडेंचा खासदार बजरंग सोनवणेंना टोला
8
आमिर खानला नाही आवडली दादासाहेब फाळकेंवरील सिनेमाची स्क्रिप्ट, नक्की कारण काय?
9
ऑनलाइन मागवलेल्या बिर्याणीत झुरळ, घटनेने उडाली खळबळ; कुठे घडला 'हा' किळसवाणा प्रकार?
10
टाटा-इन्फोसिससह 'या' शेअर्समध्ये वाढ! सलग दुसऱ्या दिवशी सेन्सेक्स-निफ्टी वधारले, कुठे झाली घसरण?
11
World Athletics Championships 2025 : नीरज चोप्राची फायनलमध्ये धडक; इथंही IND vs PAK महामुकाबला?
12
२५,००० रुपयांच्या पगारात आलिशान कार अन् फ्लॅट शक्य आहे! तज्ज्ञांनी सांगितलं गुंतवणुकीचं सूत्र
13
याला म्हणतात नशीब! आदिवासी महिलेला सापडले ३ मौल्यवान हिरे; रातोरात झाली लखपती
14
GST कपाती नंतर मध्यमवर्गींना आणखी एक भेट मिळणार? ऑक्टोबरमध्ये RBI घेणार मोठा निर्णय
15
'या' कंपनीनं अचानक बंद केला आपला व्यवसाय, आता शेअर विकण्यासाठी रांगा; ₹१३१ वर आला भाव
16
एटापल्लीच्या जंगलात पोलीस आणि नक्षलवाद्यांत जोरदार चकमक, दोन महिला माओवाद्यांना मारण्यात यश
17
पितृपक्ष २०२५ गुरुपुष्यामृत योग: लक्ष्मी-स्वामींची कायम कृपा, ५ गोष्टी करा, लाभ-पुण्य मिळवा!
18
टेस्लाने जे मॉडेल भारतात लाँच केले, त्याच्या काचा फोडून बाहेर पडतायत अमेरिकेतील लोक...
19
देशभरात तपासणी अन् औषधे मोफत; पीएम मोदींच्या हस्ते ‘स्वस्थ नारी योजने’चा शुभारंभ
20
पितृपक्ष २०२५: पितृपक्षात मृत्यू येणे चांगले, पण अंत्यविधिला गेल्यावर स्मशानात काढू नका 'हे' शब्द

शेतकरी, शेतमजुरांनी थाटला रसवंतीचा व्यवसाय!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 09:21 IST

शिरपूर जैन : रब्बी हंगाम जवळपास संपुष्टात आला असून, शेतातील कामे संपल्याने मालेगाव ते रिसोड या मार्गावरील शेतकरी, शेतमजुुरांनी ...

शिरपूर जैन : रब्बी हंगाम जवळपास संपुष्टात आला असून, शेतातील कामे संपल्याने मालेगाव ते रिसोड या मार्गावरील शेतकरी, शेतमजुुरांनी रसवंतीची कास धरली आहे. ४५ किलोमीटरच्या रस्त्यावर सुमारे ५० रसवंत्या सध्या सुरू झाल्याचे दिसून येत आहे. राष्ट्रीय महामार्गाच्या निर्मितीमुळे रोजगाराचीही निर्मिती झाल्याचा सूर यानिमित्ताने उमटत आहे.

गत तीन वर्षांपासून मालेगाव - शिरपूर - रिसोड - सेनगाव - हिंगोली या ९७ किलोमीटर अंतराच्या रस्त्याचे रुंदीकरण सुरू होते. जवळपास ५०० कोटी रुपये खर्च करून या महामार्गाचे काम आता पूर्ण झाले आहे. या रस्त्याला राष्ट्रीय महामार्गाचा दर्जा देऊन ४६१ बी हा क्रमांक देण्यात आला आहे. रस्त्याचे रुपडे पालटल्याने पूर्वीपेक्षा अधिक रहदारी वाढली आहे. ही बाब हेरून मालेगाव ते रिसोड यादरम्यान आसपासच्या गावांमधील शेतकरी, शेतमजुरांनी जवळपास ५० ते ६० रसवंती लावल्या आहेत. यासह चहाची दुकाने, लहान-मोठी हॉटेल, सिंचन सुविधा असलेल्या बहुतांश शेतकऱ्यांनी ‘सर्विसिंग सेंटर’ उघडली आहेत. रस्ता विकासामुळे मोठ्या प्रमाणात युवकांना रोजगार व शेतकऱ्यांना संलग्न व्यवसाय निर्मिती झाल्याचे चित्र मालेगाव - रिसोड रस्त्यावर पाहायला मिळत आहे.

..................................

कोट :

शिरपूरपासून हिंगोलीपर्यंतच्या राष्ट्रीय महामार्गाचे रुंदीकरण होऊन या रस्त्याला राष्ट्रीय महामार्गाचा दर्जा मिळाला. वाहनांची संख्या व रहदारी वाढल्याने व्यवसाय होईल, या उद्देशाने रसवंती आणि वाहने धुण्याचे ‘सर्विसिंग सेंटर’ सुरू केले आहे. गेल्या काही दिवसांपासून व्यवसायातून चांगली मिळकत होत आहे.

वैभव नारायण चोपडे

शेतकरी, शिरपूर जैन