शहरं
Join us  
Trending Stories
1
Plane Crash: बोइंग विमानाचे 'दिवसच खराब'... अहमदाबाद अपघातानंतर आणखी ४ विमानांचे 'इमर्जन्सी लँडिंग'
2
आजचे राशीभविष्य - १७ जून २०२५, सरकारी कामे सफल होतील, मोठ्यांचा सहवास लाभेल
3
Mumbai Rain: मुंबईत काही तासांत ८६ मिमी पावसाची नोंद; पडझडीमुळे ३ जखमी 
4
Bombay HC: लाज वाटली पाहिजे, ११ वर्षांपासून...; मानखुर्द बालगृहातील पार्टीबद्दल हायकोर्टाचा संताप!
5
एका विमानात तांत्रिक दोष, दुसऱ्याला बॉम्बची धमकी!
6
नालेसफाई भ्रष्टाचार: तीन अभियंत्यांवर ठपका, ठेकेदार पुरोहित काळ्या यादीत 
7
Maharashtra Weather: कुठे ऊन तर कुठे पाऊस? राज्यात पावसाच्या दाेन तऱ्हा!
8
Census 2027: जनगणनेचा खर्च १३ हजार कोटी, तुम्हाला विचारले जाणार ३६ प्रश्न
9
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
10
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
11
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
12
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
13
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
14
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
15
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
16
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
17
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
18
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
19
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका

शेतकरी, शेतमजुरांनी थाटला रसवंतीचा व्यवसाय!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 09:21 IST

शिरपूर जैन : रब्बी हंगाम जवळपास संपुष्टात आला असून, शेतातील कामे संपल्याने मालेगाव ते रिसोड या मार्गावरील शेतकरी, शेतमजुुरांनी ...

शिरपूर जैन : रब्बी हंगाम जवळपास संपुष्टात आला असून, शेतातील कामे संपल्याने मालेगाव ते रिसोड या मार्गावरील शेतकरी, शेतमजुुरांनी रसवंतीची कास धरली आहे. ४५ किलोमीटरच्या रस्त्यावर सुमारे ५० रसवंत्या सध्या सुरू झाल्याचे दिसून येत आहे. राष्ट्रीय महामार्गाच्या निर्मितीमुळे रोजगाराचीही निर्मिती झाल्याचा सूर यानिमित्ताने उमटत आहे.

गत तीन वर्षांपासून मालेगाव - शिरपूर - रिसोड - सेनगाव - हिंगोली या ९७ किलोमीटर अंतराच्या रस्त्याचे रुंदीकरण सुरू होते. जवळपास ५०० कोटी रुपये खर्च करून या महामार्गाचे काम आता पूर्ण झाले आहे. या रस्त्याला राष्ट्रीय महामार्गाचा दर्जा देऊन ४६१ बी हा क्रमांक देण्यात आला आहे. रस्त्याचे रुपडे पालटल्याने पूर्वीपेक्षा अधिक रहदारी वाढली आहे. ही बाब हेरून मालेगाव ते रिसोड यादरम्यान आसपासच्या गावांमधील शेतकरी, शेतमजुरांनी जवळपास ५० ते ६० रसवंती लावल्या आहेत. यासह चहाची दुकाने, लहान-मोठी हॉटेल, सिंचन सुविधा असलेल्या बहुतांश शेतकऱ्यांनी ‘सर्विसिंग सेंटर’ उघडली आहेत. रस्ता विकासामुळे मोठ्या प्रमाणात युवकांना रोजगार व शेतकऱ्यांना संलग्न व्यवसाय निर्मिती झाल्याचे चित्र मालेगाव - रिसोड रस्त्यावर पाहायला मिळत आहे.

..................................

कोट :

शिरपूरपासून हिंगोलीपर्यंतच्या राष्ट्रीय महामार्गाचे रुंदीकरण होऊन या रस्त्याला राष्ट्रीय महामार्गाचा दर्जा मिळाला. वाहनांची संख्या व रहदारी वाढल्याने व्यवसाय होईल, या उद्देशाने रसवंती आणि वाहने धुण्याचे ‘सर्विसिंग सेंटर’ सुरू केले आहे. गेल्या काही दिवसांपासून व्यवसायातून चांगली मिळकत होत आहे.

वैभव नारायण चोपडे

शेतकरी, शिरपूर जैन