शहरं
Join us  
Trending Stories
1
Tariff on Pharma: डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा तडाखा! औषधांवर १०० टक्के टॅरिफ, भारतीय कंपन्यांची चिंता वाढली
2
‘मला बळीचा बकरा बनवला जातोय’ सोनम वांगचूक यांचा आरोप; केंद्रीय गृहमंत्रालयाकडून कारवाई सुरूच
3
पंजाब राज्य एका हेक्टरला ५० हजार देते मग महाराष्ट्राने ८५०० का? ओमराजे निंबाळकरांचा सरकारला सवाल
4
मदतीच्या आड आता निकषांचा डोंगर! हातातोंडाशी आलेल्या पिकांचा चिखल, शेतीचे वाळवंट अन् हताश शेतकरी
5
आजचे राशीभविष्य- २६ सप्टेंबर २०२५, मान- सन्मान व प्राप्तीत वाढ होईल;वाद होण्याच्या शक्यतेमुळे वाणी संयमित ठेवा
6
मदत करा...मदत करा...! आपत्तीग्रस्तांचा नेत्यांसमोर टाहो, बांधावर फुटले अश्रूंचे बांध
7
का होतेय ढगफुटी..? दिवसा बाष्पीभवन वेगाने होतेय; ढग जमतात अन् रात्रीतून सुरू होतो कहर
8
मुंबई महानगरातील विकास कामांना ९५४ कोटींचा ‘बुस्टर’; MMRDA ला राज्य सरकारची मदत
9
PAK vs BAN: Live मॅचमध्ये कॉमेडी! दोन्हीं बॅटर स्ट्राइक एन्डला; तरी Run Out करायला नाही जमलं (VIDEO)
10
‘शक्ती’रूप! धावत्या रेल्वेतून मिसाइल लॉन्च; अशी कामगिरी करणारा भारत ठरला जगातील चौथा देश
11
पावसाने गावे खरडली, नेत्यांची धुंदी कधी उतरेल?; निदान पंधरा दिवस राजकारणाला फुलस्टॉप द्या
12
केवळ मुंबईच नव्हे, तर राज्यभर सर्वच शहरांमध्ये जाहिरात फलक (पुन्हा) कोसळण्याच्या आत जागे व्हा
13
भैरप्पा गेले, पण हे लेखनपर्व कधीच काळाच्या पडद्याआड जाणार नाही
14
एलएलबी ३ वर्षे अभ्यासक्रमासाठी यंदा विक्रमी प्रवेश; आतापर्यंत २२ हजार जणांनी प्रवेश घेतले
15
पिके पाण्यात, स्वप्न वाहून गेले; कर्जाचा फास कसा सोडवायचा, पुढे शेती करायला पैसा कुठून आणायचा?
16
एससी उपवर्गीकरणाचा निर्णय तीन महिन्यांत घेऊ; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
17
अवैध बांधकामांवर कारवाई न करणाऱ्या अधिकाऱ्यांची चौकशी का नाही केली?; हायकोर्टाचा एसआयटीला सवाल
18
Maharashtra Flood: “महाराष्ट्र सरकारने शेतकऱ्यांना पूर्ण मदत करावी, मदतकार्याला गती द्यावी”; राहुल गांधींचे आवाहन
19
लालबागचा राजा संकटात धावून आला; शेतकरी बांधव, पूरग्रस्तांना मंडळाकडून ५० लाखांची मदत घोषित
20
17 पैकी 12 जणांची मंत्रिमंडळातून होणार 'सुट्टी'! या राज्यात भाजप करणार मोठी 'सर्जरी'? मंत्रीपदासाठी या नव्या नावांची चर्चा!

सोयाबीन अनुदानापासून शेतकरी वंचित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 15, 2017 19:47 IST

मानोरा: आॅक्टोंबर, डिसेंबर २०१६ या आर्थिक वर्षामध्ये सोयाबीन विक्री केलेल्या शेतकºयांना मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान  सोसावे लागल्याने अशा सोयाबीन उत्पादक शेतकºयांना २०० रु. प्रती क्विंटल दराने अनुदान देण्यात शासन निर्णय घेवुन जवळपास १० महिन्याचा कालावधी उलटुनही प्रत्यक्षात शेतकºयांच्या ही रक्कम पदरात पडलीच नाही. 

ठळक मुद्देदहा महिन्यापासून प्रतिक्षा २४ हजार शेतकºयांचे प्रस्ताव

लोकमत न्यूज नेटवर्कमानोरा: आॅक्टोंबर, डिसेंबर २०१६ या आर्थिक वर्षामध्ये सोयाबीन विक्री केलेल्या शेतकºयांना मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान  सोसावे लागल्याने अशा सोयाबीन उत्पादक शेतकºयांना २०० रु. प्रती क्विंटल दराने अनुदान देण्यात शासन निर्णय घेवुन जवळपास १० महिन्याचा कालावधी उलटुनही प्रत्यक्षात शेतकºयांच्या ही रक्कम पदरात पडलीच नाही. यावर्षी वाशिम जिल्ह्यात सर्वत्र सदोष दुष्काळदृष्य  परिस्थिती असुन आता शेतकरी वर्गाजवळ कवडीही नाही. अशा अंधकारमय परिस्थितीत सोयाबीन सोंगणी व काढणीसाठी  कोणत्याच शेतकºयांकडे पैसा नाही तेव्हा सदरची दोनची रुपये प्रती क्विंटल ची अनुदान  रक्कम त्वरित त्यांना देणे आवश्यक असताना याकडे संबधितांचे दुर्लक्ष दिसून येत आहे.  मागील वर्षी सोयाबीन पिकाच्या उत्पादनात वाढ झाल्याने अपेक्षीत बाजारभाव न मिळाल्यामुळे शेतकºयाची निराशा झाली होती. ही नाराजी दुर करुन आर्थिक आधार देण्याचे संकल्प राज्याच्या सहकार,पणन व वस्त्रोद्योग विभागाने १० जानेवारी २०१७ रोजी शासन निर्णय पारित करुन माहे आॅक्टोंबर ते डिसेंबर २०१६ या कालावधीत सोयाबीन विक्री केलल्या शेतकºयांना मोठ्या प्रमाणात  आर्थिक नुकसान सहन करावे लागले. अशा शेतकºयांना २०० रुपये प्रती क्विंटल दराने अनुदान देण्याच्या ठरविले. जिल्ह्यातील २३ हजार ९६१ शेतकºयांनी सदर अनुदानासाठी प्रस्ताव सादर केलेत. प्रस्तावानुसार २३ कोटी ८३ लाख एवढा अनुदान असुन १० महिन्याचा कालावधी उलटुनही सदर अनुदान लालफितशाहीच्या कारभारात अडकुन पडले असुन आता यावर्षी वाशिम  जिल्हयात पावसाने दांडी मारल्याने सर्वदुर दुष्काळग्रस्त  परिस्थती आहे. तेव्हा सोयाबीन काढणी व सोंगणी करण्याला पैसाच नाही आधीच कर्जमाफीचा गजर दाखवुन शेतकºयांच्या  जखमेवर मिठ चोळण्याचे प्रकार थांबवुन तात्काळ अनुदान देणे आवश्यक आहे.