केनवड येथील अनेक शेतकऱ्यांची जमीन समृद्धी महामार्गालगत आहे. संबंधित कंत्राटदार कंपनीच्या चुकीमुळे रब्बी पिकांचे अतोनात नुकसान झाले. शिवसंग्रामचे जिल्हाध्यक्ष प्रशांत गोळे यांनी तहसीलदारांकडे निवेदन देऊन नुकसानाचे पंचनामे करावे, अशी मागणी मध्यंतरी केली होती. त्यानुसार, पंचनामे करण्यात येऊन संबंधित कंत्राटदार कंपनीने नुकसान भरपाई अदा करावी, असे कळविण्यात आले. ॲपको नामक कंपनीने नुकसानग्रस्त १८ शेतकऱ्यांना ३० ऑगस्ट रोजी नुकसान भरपाई दिली जाईल, अशी ग्वाही दिली ; मात्र अंमलबजावणी अद्याप झालेली नाही. याउलट आमच्या वाहनांमुळे उडणाऱ्या धुळीमुळे कोणत्याही शेतकऱ्याचे नुकसान झाले नाही, असा युक्तिवाद केला. यामुळे शेतकरी भरपाईपासून अद्याप वंचित आहेत.
..........
कोट :
ॲपको नामक कंत्राटदार कंपनी प्रशासकीय आदेशाला ही जुमानत नाही. संबंधित नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना भरपाई मिळाली नाही तर कंपनीला कुठल्याच प्रकारचे काम करू देणार नाही.
- प्रा. प्रशांत गोळे, जिल्हाध्यक्ष, शिवसंग्राम, वाशिम