शहरं
Join us  
Trending Stories
1
तुमच्या अनुभवाचा राज्याला काय उपयोग? कुंडमाळा पूल दुर्घटनेवरुन राज ठाकरेंचा सत्ताधाऱ्यांना सवाल
2
Uddhav Thackeray: विधानसभेची चूक पुन्हा करू नका, उद्धव ठाकरेंचा शाखाप्रमुखांना दम!
3
Air India Plane Crash: चित्रपट निर्माता बेपत्ता! विमान पडलेल्या ठिकाणाजवळ मोबाइलचं शेवटचं लोकेशन
4
१०-१५ हजारांत संसाराचा गाडा हाकायचा कसा? राज्यातील शिक्षणसेवकांचा सवाल
5
₹१७०० घेऊन गाझियाबादवरून अमेरिकेला पोहोचले; आज झुकरबर्ग, सुंदर पिचाईंपेक्षाही अधिक आहे सॅलरी
6
विशेष लेख: हवाई सुरक्षेबाबत भारत इतका मागास का?
7
तेजीसह शेअर बाजाराच्या कामकाजाला सुरुवात, Sensex ८१,१०० च्या वर; Nifty मध्येही तेजी, 'हे' स्टॉक्स वधारले
8
Ashish Shelar: गणेशोत्सव बंद होऊ देणार नाही, आशिष शेलार यांची ग्वाही; कोर्टात ३० जूनपर्यंत बाजू मांडणार!
9
लॅम्बोर्गिनी चलायी जाने हो...; राम कपूरने घरी आणली लक्झरियस कार, कोटींमध्ये आहे किंमत
10
लाईक्स आणि फॉलोअर्ससाठी आम्हाला त्रास का देता? विमानातल्या व्हायरल फोटोशी इन्फ्लुएन्सरकडून छेडछाड, कुटुंबियांचा संताप
11
Sharad Pawar: आगामी निवडणुकीत युतीबाबतचा निर्णय स्थानिक पातळीवर घेणार- शरद पवार
12
आजचा अग्रलेख: मध्य पूर्वेत पुन्हा आगडोंब!
13
मलायका अरोरा आणि अर्जुन कपूरचं झालं पॅचअप? या पोस्टनंतर चर्चेला उधाण
14
तुलाच पत्नी बनवेन! तरुणाने मृत प्रेयसीसोबत लग्न करून पूर्ण केलं वचन, नातेवाईक भावूक  
15
Matheran: माथेरानमधील तलावात नवी मुंबईचे तिघे बुडाले, एकाला वाचवण्यासाठी दोघांनी घेतल्या उड्या
16
आजचे राशीभविष्य - १६ जून २०२५, लाभदायी दिवस, व्यापार, व्यवसायात अपेक्षित यश मिळण्याची शक्यता
17
इस्रायल आणि इराणचे एकमेकांवरील हल्ले सुरूच, आतापर्यंत दोन्ही देशांचे किती नुकसान? जाणून घ्या
18
Kedarnath helicopter crash: पत्नीच्या ‘बर्थडे’साठी गेलेले यवतमाळचे कुटुंब केदारनाथला हेलिकॉप्टर अपघातात ठार
19
Pune Maval bridge collapses: कुंडमळाचा ३५ वर्षे जुना पूल कोसळला, इंद्रायणीत अनेक पर्यटक वाहून गेले, ५२ जणांना वाचविले 
20
कुंडमळा पूल दुर्घटनेतील मृतांचा आकडा चारवर; पाच वर्षांच्या बालकासह चौघांचा मृत्यू

शेतकरी बिजोत्पादन केंद्र करणार अनुदानित बियाण्यांपेक्षा कमी दराने विक्री!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 22, 2017 22:31 IST

बिजोत्पादन करणारे शेतकरी गट अडचणीत आले असून, शासनाच्या या धोरणाचा निषेध करण्यासाठी वाशिम जिल्ह्यातील अशा पाच खासगी शेतकरी बिजात्पादन केंद्रांनी शासनाच्या अनुदानित हरभरा बियाण्यांच्या दरापेक्षा क मी दराने हरभरा बियाणे विकण्याचा निर्णय घेत आहे. 

ठळक मुद्देशासनाच्या धोरणाचा निषेधवाशिम जिल्ह्यातील पाच गटांचा निर्णय

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम: विदर्भातील शेतकरी आत्महत्यांचे प्रमाण कमी करण्यासाठी शासनाने शेतकºयांचे गट तयार करून त्यांना बिजोत्पादन कंपन्या सुरू करण्याचे आवाहन करतानाच त्यांनी उत्पादित केलेल्या बियाण्यांची खरेदी करून ते बियाणे अनुदानावर विकण्याचा निर्णयही घेतला; परंतु विद्यमान शासनाने या संदर्भातील पूर्वी अध्यादेश बदलला आहे. त्यामुळे बिजोत्पादन करणारे शेतकरी गट अडचणीत आले असून, शासनाच्या या धोरणाचा निषेध करण्यासाठी वाशिम जिल्ह्यातील अशा पाच खासगी शेतकरी बिजात्पादन केंद्रांनी शासनाच्या अनुदानित हरभरा बियाण्यांच्या दरापेक्षा क मी दराने हरभरा बियाणे विकण्याचा निर्णय घेत आहे. महाराष्ट्रातील आघाडी शासनाने शेतकरी गटाच्या माध्यमातून बीज उत्पादन केंद्र सुरू करण्याचा निर्णय घेतला. या कंपन्यांकडून बियाणे खरेदी करून शेतकºयांना अनुदानावर वितरीत करण्यासाठी शासन निर्णय जारी करून शेतकरी बीजोत्पादन केंद्रांना कोट्यवधींचे अनुदान देण्यात आले. या शेतकरी कंपन्यांकडून हरबरा बियाणे ९० रुपये प्रतिकिलो दराने घेऊन ६५ रुपये प्रमाणे अनुदानावर शेतकºयांना वितरीत केल्या जात होते. त्यामुळे वाशिमसारख्या लहान जिल्ह्यातही शेलगाव, बोरगाव, बाळखेड, किनखेडा तसेच चांभई याठिकाणी शेतकरी गट स्थापन करून शासनाच्या राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियानाअंतर्गत पाच बीजोत्पादन कंपन्या उभ्या राहिल्या. मात्र, यंदा महाबीज, एन. एस. सी. या कंपन्यांकडून ९० रुपये किलो याप्रमाणे हरबरा बियाणे खरेदी करून शेतकºयांना ६५ रुपये प्रमाणे अनुदानावर देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. यामुळे जिल्ह्यातील पाचपैकी एका कंपनीला त्यांनी तयार केलेले ७ हजार क्विंटल हरबरा बियाणे मातीमोल भावाने विकावे लागणार आहे. परिणामी, शेतकºयांच्या या कंपनीला तब्बल १ कोटी ७५ लाख रुपयांचे नुकसान होणार आहे. शासनाच्या निर्णयामुळे वाशिम जिल्ह्यातील पाचही शेतकरी बीज उत्पादन कंपन्यांचा अडचणीत आल्याने कोट्यवधींचा फटका सहन करावा लागणार आहे. शासनाच्या शेतकरी विरोधी निर्णयाचा निषेध करण्यासाठी या शेतकरी कंपन्यांनी अनुदानित हरभरा बियाण्यांच्या ६५ रुपये दरापेक्षा कमी दराने हरभरा बियाणे विकण्याचा निर्णय घेतला आहे. 

टॅग्स :agricultureशेती