शहरं
Join us  
Trending Stories
1
जिद्दीला सलाम! आई नोट्स बनवून वाचून दाखवायची; अंध मुलाने क्रॅक केली UPSC...
2
Cricket VIDEO: 'शायनिंग' नडली..!! हेल्मेट न घालता खेळायला गेला, तोंडावर चेंडू आदळला अन्...
3
आता ते दया-माया दाखवणार नाहीत! शास्त्रींनी युवा शतकवीर वैभव सूर्यंवशीला केलं सावध
4
काश्मीरच्या बडगाममध्ये CRPF च्या वाहनाचा अपघात; अनेक जवान जखमी
5
पहलगाम हल्ल्यानंतर घेतलेल्या भूमिकेवरून काँग्रेसनं मोदींना घेरलं, हे चार प्रश्न उपस्थित करून केली कोंडी
6
रेल्वे कर्मचाऱ्यांनी निवृत्त सहकाऱ्याला दिला 'असा' निरोप; ये- जा करणारे बघतंच राहिले!
7
INDW vs RSAW : प्रतिकाच्या विक्रमी खेळीनंतर स्नेह राणाचा 'पंजा'; टीम इंडियाचा सलग दुसरा विजय
8
बाबूरावला कंटाळले परेश रावल, म्हणाले- "हेरा फेरी म्हणजे गळ्याला लागलेला फास..."
9
१८ वर्षांची तरुणी पडली ५५ वर्षीय व्यक्तीच्या प्रेमात, पुढं घडलं भयंकर, ऐकून पायाखालची जमीन सरकेल
10
गुगलचे सीईओ सुंदर पिचाई यांचा पगार किती? कंपनीने फक्त सुरक्षेवरच खर्च केले ७१ कोटी रुपये
11
बंगळुरूत 'पाकिस्तान जिंदाबाद' म्हणणाऱ्या व्यक्तीला बेदम मारहाण, जागीच मृत्यू; गृहमंत्री म्हणाले...
12
झिपलाईन ऑपरेटर अल्लाहू अकबर का म्हणत होता? पीडीपी, नॅशनल कॉन्फरन्सच्या नेत्यांचा वेगळाच दावा...
13
तणावपूर्ण परिस्थितीदरम्यान पाकिस्तानकडून सायबर ‘वार’, भारतीय लष्कराची वेबसाईट हॅक करण्याचा प्रयत्न 
14
१ लाखांपेक्षा अधिक गुंतवणूकदार कंगाल झाले; ९२% आपटला हा शेअर, आता विकणंही झालं कठीण
15
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
16
बाजार सपाट पातळीवर बंद; रिलायन्सचा शेअर पुन्हा आला धावून, 'या' सेक्टरवर दबाव
17
ATM मधून वारंवार पैसे काढायची सवय असेल तर ती बदला, नाहीतर १ मे पासून होईल नुकसान
18
अण्वस्त्रांची धमकी देणाऱ्या पाकिस्तानच्या संरक्षण मंत्र्यांचे तोंड भारताने केले बंद; एक्स अकाउंटवर घातली बंदी
19
Viral Video: बिबट्या थेट पोलीस ठाण्यातच आला! पोलिसाने पाहिलं, पण नंतर काय घडलं?
20
इलेक्ट्रिक व्हेईकल घेणाऱ्यांसाठी CM फडणवीसांची मोठी घोषणा; टोलमाफी देण्याचा मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय

शेतमालाच्या किमतीत घसरण; शेतकऱ्यांना ‘अच्छे दिन’ येतील केव्हा?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 23, 2021 04:47 IST

वाशिम : सर्वसामान्य नागरिक आणि शेतकऱ्यांना ‘अच्छे दिन’चे स्वप्न दाखवून केंद्रात सत्तारूढ झालेल्या मोदी सरकारच्या काळात प्रत्यक्षात शेतकऱ्यांसाठी ‘अच्छे ...

वाशिम : सर्वसामान्य नागरिक आणि शेतकऱ्यांना ‘अच्छे दिन’चे स्वप्न दाखवून केंद्रात सत्तारूढ झालेल्या मोदी सरकारच्या काळात प्रत्यक्षात शेतकऱ्यांसाठी ‘अच्छे दिन’ हे स्वप्नच ठरत आहे. शेतमाल घरात येताच बाजारभाव कोसळत असल्याने शेतमालाच्या भावात वाढ करावी, अशी मागणी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष बाबूराव शिंदे यांनी २१ सप्टेंबर रोजी निवेदनाद्वारे जिल्हा प्रशासनामार्फत पंतप्रधानांकडे केली.

निवेदनात नमूद केले की, गेल्या काही दिवसांमध्ये शेतकऱ्यांच्या घरामध्ये सोयाबीन नसताना सोयाबीनचे भाव गगनाला भिडले होते. अर्थातच त्या वाढलेल्या भावाचा फायदा केवळ व्यापारी व प्रक्रिया उद्योगाला झाला. तरीही येणाऱ्या हंगामात सोयाबीनला चांगले भाव मिळतील या आशेवर शेतकरी होते. अशातच काही ठिकाणी अवकाळी पावसामुळे झालेले नुकसान वगळता इतरत्र सोयाबीनचे पीक हे चांगल्या प्रकारे आल्याचे दिसून येत आहे; परंतु शेतकऱ्याच्या घरात सोयाबीन येण्याची चाहूल लागताच गगनाला भिडलेले भाव जमिनीवर येऊन आदळले. नेमका हा फटका कशाचा? भारतात आयात केलेल्या सोयापेंड, सोया पदार्थांचा, की शेतकऱ्यांना जाणीवपूर्वक रसातळाला नेऊन घालण्याचा हा यशस्वी प्रयत्न तर नाही ना? असा प्रश्नही बाबूराव शिंदे यांनी निवेदनाद्वारे उपस्थित केला. गेल्या काही वर्षांपासून शेतकरी व शेतकरी कुटुंबांतील तरुणांना सोन्याचे दिवस येण्याचे स्वप्न दाखविले जात आहे. मात्र, सध्या शेतकऱ्यांच्या बाबतीत तरी त्याच्या उलट घडत आहे. कृषिप्रधान देशातील शेती व्यवस्थेचा कणा असलेल्या शेतकऱ्यांच्या शेतमालाला इतर भाववाढीच्या प्रमाणात योग्य भाव मिळणे आवश्यक आहे. योग्य भाव मिळाला तरच शेतकऱ्यांच्याही घरात आनंदाची दिवाळी साजरी होईल. शेतकरी कुटुंबातील विद्यार्थी जगाच्या स्पर्धेत टिकतील. म्हणून शेतकऱ्यांना केंद्रस्थानी ठेवून सर्वच शेतमालाचे भाव शेतकऱ्यांना परवडतील अशाच दराने द्यावेत, अशी मागणी बाबूराव शिंदे यांनी निवेदनाद्वारे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे केली.

.....

महागाईचा शेतकऱ्यांना फटका

जीवनावश्यक वस्तूंचे भाव गगनाला भिडत आहेत. एकीकडे इतर वस्तू, साहित्याचे भाव हे शेतकरी व सर्वसामान्य नागरिकांना परवडणार नाहीत, अशा पद्धतीने वाढत आहेत, तर दुसरीकडे शेतीमालाचे भाव आहेत तिथेच आहेत. त्यामुळे शेतकरी, शेतमजूर तसेच शेती व शेतकऱ्यांवर अवलंबून असलेले सर्वच घटक हतबल झाल्याचे दिसून येते, असे शिंदे यांनी निवेदनात नमूद केले.