शहरं
Join us  
Trending Stories
1
मेक्सिकोमध्ये GenZचे जोरदार आंदोलन, तरूण रस्त्यावर का उतरले? इतका तीव्र संताप कशासाठी?
2
Shubman Gill Hospitalised : शुभमन गिलला रुग्णालयात दाखल करण्याची वेळ; BCCI नं दिली मोठी अपडेट
3
आजचे राशीभविष्य, १६ नोव्हेेंबर २०२५: आर्थिक लाभ होतील, मित्र व स्नेह्यांची भेट आनंददायी राहील.
4
पाकिस्तानची सौदी अरेबियानंतर आता आणखी एका मुस्लिम देशाशी हातमिळवणी? नवा 'प्लॅन' काय?
5
'वाराणसी' एस एस राजामौलींच्या सिनेमाचं टायटल घोषित, महेश बाबूचा व्हिडीओ टीझर आऊट
6
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना घवघवीत यश, मनसोक्त जगण्याचा काळ; नोकरीत प्रगती, इच्छापूर्ती!
7
Bihar CM: मुख्यमंत्री कोण? एनडीएमध्ये चर्चा सुरूच; बिहारच्या नेतृत्वाबाबत गूढ कायम!
8
Kalyan: रेल्वेतून पडून जखमी; डॉक्टरांनी घरी पाठवले, काही तासांत मृत्यू!
9
ड्रायव्हिंग टेस्ट फक्त नावापुरती! मुंबई RTO मध्ये स्टिअरिंगवर हात ठेवताच मिळतंय लायसन्स
10
JJ Hospital: जेजे रुग्णालयाची कॅन्सर रुग्णांसाठी ११ एकर जागेची मागणी!
11
Mumbai: मुंबईत मोठी दुर्घटना! भायखळा येथे बांधकाम सुरू असताना माती कोसळली; २ ठार, ३ जखमी
12
Court: राजकारण्यांवरील खटल्यांचा निपटारा करा! महाराष्ट्र, गोव्यातील ४७८ प्रकरणांवर हायकोर्टाचे आदेश
13
Congress: ठाकरेंना मोठा धक्का! काँग्रेसची 'एकला चलो'ची घोषणा; मुंबई महानगरपालिका स्वबळावर लढणार
14
Akasa Air: नवी मुंबई विमानतळामुळे प्रवाशांना दिलासा; ख्रिसमसपासून दिल्ली, गोवासह ४ शहरांसाठी थेट सेवा
15
Vasai: बालदिनीच क्रूर शिक्षा! शाळेत उशिरा आली म्हणून १०० उठाबशा, विद्यार्थिनीचा दुर्दैवी मृत्यू
16
अमेरिकेत महागाई वाढली, डोनाल्ड ट्रम्प यांनी टॅरिफवर घेतला यू-टर्न; भारताला मोठा फायदा होणार
17
लालू प्रसाद यादवांच्या मुलीचा खळबळजनक आरोप! रोहिणी म्हणाल्या "तेजस्वीने मला घरातून बाहेर..."
18
Rohini Aacharya: लालू प्रसाद यादवांच्या घरात ज्यांच्यामुळे सुरू झालं 'महाभारत', ते संजय यादव कोण?
19
एका वर्षात तिसरी वेळ! भारताच्या शेजारी देशात सापडली तब्बल १००० टन सोन्याची खाण, कोणता आहे देश?
20
माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आज कराडात! सातारा जिल्ह्यामधील महाविकास आघाडी बाबत होणार निर्णय?
Daily Top 2Weekly Top 5

शेतमालाच्या किमतीत घसरण; शेतकऱ्यांना ‘अच्छे दिन’ येतील केव्हा?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 23, 2021 04:47 IST

वाशिम : सर्वसामान्य नागरिक आणि शेतकऱ्यांना ‘अच्छे दिन’चे स्वप्न दाखवून केंद्रात सत्तारूढ झालेल्या मोदी सरकारच्या काळात प्रत्यक्षात शेतकऱ्यांसाठी ‘अच्छे ...

वाशिम : सर्वसामान्य नागरिक आणि शेतकऱ्यांना ‘अच्छे दिन’चे स्वप्न दाखवून केंद्रात सत्तारूढ झालेल्या मोदी सरकारच्या काळात प्रत्यक्षात शेतकऱ्यांसाठी ‘अच्छे दिन’ हे स्वप्नच ठरत आहे. शेतमाल घरात येताच बाजारभाव कोसळत असल्याने शेतमालाच्या भावात वाढ करावी, अशी मागणी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष बाबूराव शिंदे यांनी २१ सप्टेंबर रोजी निवेदनाद्वारे जिल्हा प्रशासनामार्फत पंतप्रधानांकडे केली.

निवेदनात नमूद केले की, गेल्या काही दिवसांमध्ये शेतकऱ्यांच्या घरामध्ये सोयाबीन नसताना सोयाबीनचे भाव गगनाला भिडले होते. अर्थातच त्या वाढलेल्या भावाचा फायदा केवळ व्यापारी व प्रक्रिया उद्योगाला झाला. तरीही येणाऱ्या हंगामात सोयाबीनला चांगले भाव मिळतील या आशेवर शेतकरी होते. अशातच काही ठिकाणी अवकाळी पावसामुळे झालेले नुकसान वगळता इतरत्र सोयाबीनचे पीक हे चांगल्या प्रकारे आल्याचे दिसून येत आहे; परंतु शेतकऱ्याच्या घरात सोयाबीन येण्याची चाहूल लागताच गगनाला भिडलेले भाव जमिनीवर येऊन आदळले. नेमका हा फटका कशाचा? भारतात आयात केलेल्या सोयापेंड, सोया पदार्थांचा, की शेतकऱ्यांना जाणीवपूर्वक रसातळाला नेऊन घालण्याचा हा यशस्वी प्रयत्न तर नाही ना? असा प्रश्नही बाबूराव शिंदे यांनी निवेदनाद्वारे उपस्थित केला. गेल्या काही वर्षांपासून शेतकरी व शेतकरी कुटुंबांतील तरुणांना सोन्याचे दिवस येण्याचे स्वप्न दाखविले जात आहे. मात्र, सध्या शेतकऱ्यांच्या बाबतीत तरी त्याच्या उलट घडत आहे. कृषिप्रधान देशातील शेती व्यवस्थेचा कणा असलेल्या शेतकऱ्यांच्या शेतमालाला इतर भाववाढीच्या प्रमाणात योग्य भाव मिळणे आवश्यक आहे. योग्य भाव मिळाला तरच शेतकऱ्यांच्याही घरात आनंदाची दिवाळी साजरी होईल. शेतकरी कुटुंबातील विद्यार्थी जगाच्या स्पर्धेत टिकतील. म्हणून शेतकऱ्यांना केंद्रस्थानी ठेवून सर्वच शेतमालाचे भाव शेतकऱ्यांना परवडतील अशाच दराने द्यावेत, अशी मागणी बाबूराव शिंदे यांनी निवेदनाद्वारे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे केली.

.....

महागाईचा शेतकऱ्यांना फटका

जीवनावश्यक वस्तूंचे भाव गगनाला भिडत आहेत. एकीकडे इतर वस्तू, साहित्याचे भाव हे शेतकरी व सर्वसामान्य नागरिकांना परवडणार नाहीत, अशा पद्धतीने वाढत आहेत, तर दुसरीकडे शेतीमालाचे भाव आहेत तिथेच आहेत. त्यामुळे शेतकरी, शेतमजूर तसेच शेती व शेतकऱ्यांवर अवलंबून असलेले सर्वच घटक हतबल झाल्याचे दिसून येते, असे शिंदे यांनी निवेदनात नमूद केले.