शहरं
Join us  
Trending Stories
1
"अमेरिकेचे जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
2
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
3
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
4
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
5
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
6
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
7
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
8
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
9
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
10
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
11
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
12
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
13
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
14
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
15
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
16
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
17
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
18
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
19
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
20
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
Daily Top 2Weekly Top 5

‘प्रवासी वाढवा अभियान’ वांध्यात

By admin | Updated: August 23, 2014 23:36 IST

सोयीसुविधांचा अभाव : भंगार बसेस, वाहक-चालकांची मनमानी

वाशिम: महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाकडून (एसटी) प्रवासी संख्या वाढवून महामंडळाची आर्थिकस्थिती मजबूत करण्यासाठी प्रवासी वाढवा विशेष अभियान राबविण्यात येत आहे; परंतु कित्येक ठिकाणच्या बसस्थानकावर प्रवाशांसाठी मुलभूत सोयीसुविधाच उपलब्ध नसून, वाहक, चालक ांच्या मनमानी कारभारामुळे या योजनेच्या यशस्वीतेबाबत प्रश्न उपस्थित होत असून, प्रवाशांची संख्या वाढण्याऐवजी दिवसेंदिवस कमी होत आहे. महाराष्ट्र्र राज्य परिवहन महामंडळाकडून गत १ ऑगष्ट २0१४ पासून प्रवासी वाढवा अभियानाची सुरुवात करण्यात आली आहे. हे अभियान येत्या ३0 सप्टेंबरपर्यंत चालणार आहे. यास अभियानांतर्गत किमान १ काऊंटने भारमान वाढविणार्‍या आगार, विभागास बक्षीस, प्राप्त परिणामांच्या दैनंदिन पृथ्थकरणासह असमाधानकारक नोंदणी करणार्‍या घटक कार्यालयांना मार्गदर्शन, प्रवाशाभिमूख योजनांची प्रसिद्धी आणि विविध पासचा खप वाढविण्याचे प्रयत्न, प्रवासी संख्या वाढविण्यासाठी विनंतीनुसार नियोजित बसथांब्याव्यतिरिक्त इतर ठिकाणी प्रवासी चढउतार, उद्दिष्ट पूर्तीसाठी सकारात्मक प्रयत्न न करणार्‍या अधिकारी, पर्यवेक्षकांच्या कामगिरीची गंभीर दखल, अशा प्रकारच्या काही योजना महामंडळाने आखल्या आहेत. त्याशिवाय अभियान कालावधीत उत्कृष्ट कामगिरी करणारे विभाग, आगार आणि वाहकांसाठी पुरस्कारही महामंडळाकडून देण्यात येणार आहेत. प्रवाशांनी महामंडळाच्या बसने प्रवास करावा म्हणून त्यांना आकर्षित करण्याचे प्रयत्नही करण्यात येत आहेत; परंतु ह्यप्रवाशांच्या सेवेसाठीह्ण हे ब्रिदवाक्य असलेल्या महामंडळाकडे प्रवाशांना आर्कषित करण्यासाठी काहीही असल्याचे दिसत नाही. महामंडळाच्या बसेसची नेहमीची अनियमितता, बसेसची भंगार अवस्था, बसस्थानकावरील मुलभूत सोयीसुविधांचा अभाव आणि सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे न परवडणारे भाडे, या कारणांमुळे राज्य परिवहन महामंडळाच्या बसकडे प्रवासी पाठ फिरवित आहेत. अनेक ठिक ाणच्या बसस्थानकावर घाण कचर्‍याचे साम्राज्य असून, बसस्थानकावरील डांबरीकरण केलेले परिसर खड्डेमय झाले आहेत. गावांची नावे दर्शविणारे फलकही संबंधित फलाटावर दिसत नाहीत. महिलांच्या सोयीसाठी असलेले हिरकणी कक्षही काही ठिकाणांवर नाहीत. काही बसस्थानकावर पिण्याच्या पाण्याची योग्य व्यवस्था नाही. प्रवासी वाढवा अभियान यशस्वी करण्यासाठी नियोजित बसथांब्याव्यतिरिक्त इतर ठिकाणी प्रवाशांच्या विनंतीनुसार बस थांबविण्याच्या सूचना असतानाही काही वाहक, चालक तसे करीत नसल्याच्या तक्रारी आहेत. एसटी महामंडळाने काही उद्दिष्टे डोळय़ांसमोर ठेवली आहेत. त्यामध्ये प्रवाशांसाठी आरामदायी, सुरक्षित व अपघात विरहित सेवा, खासगी प्रवास वाहतुकीशी सक्षमपणे स्पर्धा, प्रवाशांशी सौज्यपूर्ण वागणूक, गाव तेथे एसटी, ग्रामीण भागात नवीन बसेस, अत्याधुनिक बसगाड्यांचा वापर, गर्दी व कमी गर्दीच्या हंगामानुसार स्पर्धात्मक प्रवासभाडे, बसस्थानकांचे सौंदर्यीकरण व स्वच्छता, आदिंचा समावेश आहे. एसटीची महत्त्वाची समस्या म्हणजे भंगार बसेस. एसटीच्या कित्येक बसेस नादुरुस्त असतानाही या बस रस्त्यावर धावतात. त्यामुळे एखादी बसमध्येच बंद पडते आणि प्रवाशांना नाहक मनस्ताप सहन करावा लागतो. अशा बसमध्ये बसलेल्या काही प्रवाशांची महत्त्वाची कामे वेळ निघून गेल्यामुळे पूर्ण होऊ शकत नाहीत, तसेच उपचारासाठी जात असलेल्या रुग्णांची प्रकृती गंभीर होण्याची शक्यता असते. त्याशिवाय सततचीे अनियमितता हीसुद्धा एसटीची महत्त्वाची समस्या असून, बसेसच्या अनियमिततेचा फ टका प्रवांना सहन करावा लागतो. ग्रामीण भागातील अनेक बसफेर्‍याही महामंडळाकडून मध्येच बंद करण्यात येत असल्यामुळे प्रवाशांची गैरसोय होते. त्यामुळे प्रवाशांचा कल खासगी वाहतुकीकडे वळत असल्याचे दिसून येत आहे.