शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

जास्तीचे पाणीदेखील आरोग्याला अपायकारक!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 23, 2021 04:47 IST

वाशिम : संतुलित पाण्यामुळे मानवी आरोग्यावर कोणताही परिणाम होत नाही; परंतु आवश्यकतेपेक्षा कमी किंवा जास्त पाणी प्यायल्यास त्याचे परिणाम ...

वाशिम : संतुलित पाण्यामुळे मानवी आरोग्यावर कोणताही परिणाम होत नाही; परंतु आवश्यकतेपेक्षा कमी किंवा जास्त पाणी प्यायल्यास त्याचे परिणाम हळूहळू जाणवू लागतात. त्यामुळे शरीराची गरज, वातावरण या सर्व बाबी लक्षात घेऊनच पाणी प्राशन करावे, असा सल्ला तज्ज्ञ डॉक्टरांनी दिला.

पाणी ही शरीराची अत्यावश्यक गरज असून, पाण्याशिवाय माणूस जिवंत राहूच शकत नाही. त्यामुळे शरीराला जेवढे पाणी आवश्यक आहे, तेवढे पाणी प्रत्येक नागरिकाने पिणे आवश्यक आहे. मात्र, आवश्यकतेपेक्षा कमी पाणी प्यायल्यास जसे शरीराचे नुकसान होते, तसेच जास्तीचे पाणी पिणेसुद्धा आरोग्याला धोकादायक ठरू शकते. पाणी कमी पिल्याने जसा डिहायड्रेशनचा धोका वाढतो, तसेच शरीरातील पाण्याचे प्रमाण वाढले, तर ओव्हर-हायड्रेशनचा त्रास जाणवू शकतो. कोणत्या वयोगटातील नागरिकांनी दिवसाला साधारणत: किती लिटर पाणी प्यावे, याबाबत आरोग्य विभागाच्या मार्गदर्शक सूचना असून, त्यानुसार पाणी प्राशन केले, तर आरोग्यही चांगले राहू शकते, असा सल्ला डॉक्टरांनी दिला.

०००००००००

कोणी किती पाणी प्यावे

वयोगट दिवसाला किती पाणी (लिटर)

० ते ६ महिनेआवश्यकता नाही

६ महिने ते १ वर्षे २५० मिलिलिटर

१ ते ३ वर्ष १ लिटर

४ ते ८ वर्षे १.२ लिटर

९ ते १३ वर्षे १.८ लिटर

१४ ते १८ वर्षे २.५ लिटर

१८ वर्षांवरील ३ लिटर

......................

कमी पाणी प्यायले तर...

शरीराला आवश्यकतेपेक्षा कमी पाणी प्राशन केले, तर डोके दुखणे, चक्कर येणे, डिहायड्रेशन, लघवी कमी होणे, ओठ व त्वचा कोरडी पडणे, रक्तदाब कमी होण्याची शक्यता, बद्धकोष्ठता होणे आदी लक्षणे दिसून येतात. पाणी कमी प्राशन केल्यामुळे शरीराचे नुकसान होऊ शकते.

..................

शरीरात पाणी जास्त झाले तर...

साधारणत: नॉर्मल मनुष्य आवश्यकतेनुसार पाणी पितो. मेंदूचा आजार, किडनी रुग्णांनी कमी पाणी पिणे आवश्यक आहे. शरीरातील पाण्याचे प्रमाण वाढले, तर ओव्हर-हायड्रेशनचा त्रास जाणवू शकतो. ओव्हर-हायड्रेशनचा थेट परिणाम मूत्रपिंडावर होतो.

..................

कोट

नॉर्मल मनुष्य आवश्यकतेनुसार पाणी प्राशन करतो. ही समस्या मानसिक रुग्ण, मेंदूशी संबंधित आजार असलेल्या रुग्णांमध्ये जाणवते. पाण्याचे जास्त प्राशन केल्यामुळे शरीरातील सोडियमचे प्रमाण कमी होण्याचा धोका असतो.

-डॉ. सिद्धार्थ देवळे,

एमडी (मेडिसिन) वाशिम

......

निरोगी शरीरासाठी दिवसातून अडीच ते साडेतीन लिटरदरम्यान पाणी पुरेसे आहे. आवश्यकतेनुसार पाणी पिले, तर कोणतीची समस्या उद्भवत नाही. आवश्यकतेपेक्षा जास्त प्रमाणात पाणी पिले, तर ओव्हर-हायड्रेशन होण्याचा धोका संभवतो.

-डॉ. वैभव गाभणे,

एमडी (मेडिसिन) वाशिम