शहरं
Join us  
Trending Stories
1
मेक्सिकोमध्ये GenZचे जोरदार आंदोलन, तरूण रस्त्यावर का उतरले? इतका तीव्र संताप कशासाठी?
2
Shubman Gill Hospitalised : शुभमन गिलला रुग्णालयात दाखल करण्याची वेळ; BCCI नं दिली मोठी अपडेट
3
आजचे राशीभविष्य, १६ नोव्हेेंबर २०२५: आर्थिक लाभ होतील, मित्र व स्नेह्यांची भेट आनंददायी राहील.
4
पाकिस्तानची सौदी अरेबियानंतर आता आणखी एका मुस्लिम देशाशी हातमिळवणी? नवा 'प्लॅन' काय?
5
'वाराणसी' एस एस राजामौलींच्या सिनेमाचं टायटल घोषित, महेश बाबूचा व्हिडीओ टीझर आऊट
6
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना घवघवीत यश, मनसोक्त जगण्याचा काळ; नोकरीत प्रगती, इच्छापूर्ती!
7
Bihar CM: मुख्यमंत्री कोण? एनडीएमध्ये चर्चा सुरूच; बिहारच्या नेतृत्वाबाबत गूढ कायम!
8
Kalyan: रेल्वेतून पडून जखमी; डॉक्टरांनी घरी पाठवले, काही तासांत मृत्यू!
9
ड्रायव्हिंग टेस्ट फक्त नावापुरती! मुंबई RTO मध्ये स्टिअरिंगवर हात ठेवताच मिळतंय लायसन्स
10
JJ Hospital: जेजे रुग्णालयाची कॅन्सर रुग्णांसाठी ११ एकर जागेची मागणी!
11
Mumbai: मुंबईत मोठी दुर्घटना! भायखळा येथे बांधकाम सुरू असताना माती कोसळली; २ ठार, ३ जखमी
12
Court: राजकारण्यांवरील खटल्यांचा निपटारा करा! महाराष्ट्र, गोव्यातील ४७८ प्रकरणांवर हायकोर्टाचे आदेश
13
Congress: ठाकरेंना मोठा धक्का! काँग्रेसची 'एकला चलो'ची घोषणा; मुंबई महानगरपालिका स्वबळावर लढणार
14
Akasa Air: नवी मुंबई विमानतळामुळे प्रवाशांना दिलासा; ख्रिसमसपासून दिल्ली, गोवासह ४ शहरांसाठी थेट सेवा
15
Vasai: बालदिनीच क्रूर शिक्षा! शाळेत उशिरा आली म्हणून १०० उठाबशा, विद्यार्थिनीचा दुर्दैवी मृत्यू
16
अमेरिकेत महागाई वाढली, डोनाल्ड ट्रम्प यांनी टॅरिफवर घेतला यू-टर्न; भारताला मोठा फायदा होणार
17
लालू प्रसाद यादवांच्या मुलीचा खळबळजनक आरोप! रोहिणी म्हणाल्या "तेजस्वीने मला घरातून बाहेर..."
18
Rohini Aacharya: लालू प्रसाद यादवांच्या घरात ज्यांच्यामुळे सुरू झालं 'महाभारत', ते संजय यादव कोण?
19
एका वर्षात तिसरी वेळ! भारताच्या शेजारी देशात सापडली तब्बल १००० टन सोन्याची खाण, कोणता आहे देश?
20
माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आज कराडात! सातारा जिल्ह्यामधील महाविकास आघाडी बाबत होणार निर्णय?
Daily Top 2Weekly Top 5

जास्तीचे पाणीदेखील आरोग्याला अपायकारक!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 23, 2021 04:47 IST

वाशिम : संतुलित पाण्यामुळे मानवी आरोग्यावर कोणताही परिणाम होत नाही; परंतु आवश्यकतेपेक्षा कमी किंवा जास्त पाणी प्यायल्यास त्याचे परिणाम ...

वाशिम : संतुलित पाण्यामुळे मानवी आरोग्यावर कोणताही परिणाम होत नाही; परंतु आवश्यकतेपेक्षा कमी किंवा जास्त पाणी प्यायल्यास त्याचे परिणाम हळूहळू जाणवू लागतात. त्यामुळे शरीराची गरज, वातावरण या सर्व बाबी लक्षात घेऊनच पाणी प्राशन करावे, असा सल्ला तज्ज्ञ डॉक्टरांनी दिला.

पाणी ही शरीराची अत्यावश्यक गरज असून, पाण्याशिवाय माणूस जिवंत राहूच शकत नाही. त्यामुळे शरीराला जेवढे पाणी आवश्यक आहे, तेवढे पाणी प्रत्येक नागरिकाने पिणे आवश्यक आहे. मात्र, आवश्यकतेपेक्षा कमी पाणी प्यायल्यास जसे शरीराचे नुकसान होते, तसेच जास्तीचे पाणी पिणेसुद्धा आरोग्याला धोकादायक ठरू शकते. पाणी कमी पिल्याने जसा डिहायड्रेशनचा धोका वाढतो, तसेच शरीरातील पाण्याचे प्रमाण वाढले, तर ओव्हर-हायड्रेशनचा त्रास जाणवू शकतो. कोणत्या वयोगटातील नागरिकांनी दिवसाला साधारणत: किती लिटर पाणी प्यावे, याबाबत आरोग्य विभागाच्या मार्गदर्शक सूचना असून, त्यानुसार पाणी प्राशन केले, तर आरोग्यही चांगले राहू शकते, असा सल्ला डॉक्टरांनी दिला.

०००००००००

कोणी किती पाणी प्यावे

वयोगट दिवसाला किती पाणी (लिटर)

० ते ६ महिनेआवश्यकता नाही

६ महिने ते १ वर्षे २५० मिलिलिटर

१ ते ३ वर्ष १ लिटर

४ ते ८ वर्षे १.२ लिटर

९ ते १३ वर्षे १.८ लिटर

१४ ते १८ वर्षे २.५ लिटर

१८ वर्षांवरील ३ लिटर

......................

कमी पाणी प्यायले तर...

शरीराला आवश्यकतेपेक्षा कमी पाणी प्राशन केले, तर डोके दुखणे, चक्कर येणे, डिहायड्रेशन, लघवी कमी होणे, ओठ व त्वचा कोरडी पडणे, रक्तदाब कमी होण्याची शक्यता, बद्धकोष्ठता होणे आदी लक्षणे दिसून येतात. पाणी कमी प्राशन केल्यामुळे शरीराचे नुकसान होऊ शकते.

..................

शरीरात पाणी जास्त झाले तर...

साधारणत: नॉर्मल मनुष्य आवश्यकतेनुसार पाणी पितो. मेंदूचा आजार, किडनी रुग्णांनी कमी पाणी पिणे आवश्यक आहे. शरीरातील पाण्याचे प्रमाण वाढले, तर ओव्हर-हायड्रेशनचा त्रास जाणवू शकतो. ओव्हर-हायड्रेशनचा थेट परिणाम मूत्रपिंडावर होतो.

..................

कोट

नॉर्मल मनुष्य आवश्यकतेनुसार पाणी प्राशन करतो. ही समस्या मानसिक रुग्ण, मेंदूशी संबंधित आजार असलेल्या रुग्णांमध्ये जाणवते. पाण्याचे जास्त प्राशन केल्यामुळे शरीरातील सोडियमचे प्रमाण कमी होण्याचा धोका असतो.

-डॉ. सिद्धार्थ देवळे,

एमडी (मेडिसिन) वाशिम

......

निरोगी शरीरासाठी दिवसातून अडीच ते साडेतीन लिटरदरम्यान पाणी पुरेसे आहे. आवश्यकतेनुसार पाणी पिले, तर कोणतीची समस्या उद्भवत नाही. आवश्यकतेपेक्षा जास्त प्रमाणात पाणी पिले, तर ओव्हर-हायड्रेशन होण्याचा धोका संभवतो.

-डॉ. वैभव गाभणे,

एमडी (मेडिसिन) वाशिम