शहरं
Join us  
Trending Stories
1
"सैनिकांचे मनोबल तोडू नका"; पहलगाम हल्ल्याची चौकशी करण्याची मागणी करणाऱ्यांना कोर्टाने फटकारले
2
महायुती सरकारचं १०० दिवसांचं प्रगती पुस्तक जाहीर; २४ टक्के मिळवत 'हा' विभाग ठरला नापास
3
३५ वर्ष हेच सुरू, काश्मिरींना खूप त्रास सहन करावा लागतो; पहलगामवरून फारूक अब्दुल्ला थेट बोलले
4
पहलगाम हल्ल्याच्या लिंक शोधतेय ATS! तपासला सुरुवा होताच रुग्णालयात पोहोचली सीमा हैदर; जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
5
UPI युजर्ससाठी दिलासादायक बातमी, आता प्रत्येक ट्रान्झॅक्शन १५ सेकंदात होणार; स्टेटसही लवकर कळणार
6
अमृता खानविलकरची Waves summit मध्ये हजेरी, 'थलायवा'सोबत फोटो शेअर करत म्हणाली...
7
“राज्य किती कमजोर झाले याची श्वेतपत्रिका काढा, दिल्लीसमोर झुकणारा महाराष्ट्र निर्माण झाला”
8
Pahalgam Terror Attack : "तुमची आजी जिवंत असती तर पहलगाम हल्ला झाला नसता"; राहुल गांधींना भेटताच शुभमचे वडील भावुक
9
“आरक्षणाची ५० टक्क्यांची मर्यादा हटवावी, जातनिहाय जनगणनेची कालमर्यादा जाहीर करावी”: काँग्रेस
10
"समस्या दाढीची नाही, तर..."; पतीला सोडून दीरासोबत पळाली होती वहिनी, कहानीत नवा ट्विस्ट
11
प्रत्येक पाकिस्तानीने भारत सोडला पाहिजे, भारत सरकारने परतण्याची अंतिम मुदत वाढवली
12
“जातनिहाय जनगणना निर्णयाचे श्रेय राहुल गांधींनाच, सरकारला गुडघे टेकायला लागले”: संजय राऊत
13
भरत जाधव यांनी शेतात बांधलंय राधाकृष्णाचं मंदिर, म्हणाले- "मुंबईत येताना वडिलांनी कृष्णाचा फोटो आणला आणि... "
14
भारतानं एअरस्पेस केली बंद, जाणून घ्या पाकिस्तानला कसा बसणार फटका; 'इतकं' होणार नुकसान
15
पतीला लागला नाद! एका महिलेसोबत रंगेहाथ पकडल्यानंतर दुसरीसोबत गेला पळून, पत्नीने...
16
इलेक्ट्रिक शॉक, हाडे मोडली, डोळे, मेंदूही काढला,अन्...: महिला पत्रकाराचा भयावह अंत
17
अजिबात 'या' वेळी करू नका ब्रश, नाहीतर लवकर किडतील दात; ९०% लोक करतात 'ही' चूक
18
दारूची बाटली फुटली अन् वाद झाला; मैत्री झाली पण, नंतर...; सीसीटीव्हीमुळे उलगडली व्यक्तीच्या हत्येची कहाणी
19
आजपासून ११ राज्यांतील १५ बँका बंद, ग्रामीण बँकांचं मर्जर; One State-One RRB पॉलिसी झाली लागू
20
भारताकडून पाकिस्तानचा गोल्ड मेडिलिस्ट अर्शद नदीमचे इंस्टाग्राम अकाऊंट ब्लॉक!

विर्सजित केलेल्या प्लास्टरच्या मूर्ती जलाशयातच आहेत पडून, पर्यावरणाचा होतोय -हास

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 3, 2017 15:02 IST

अलिकडेच पार पडलेल्या गणेशोत्सव आणि नवदुर्गोत्सवात अनेक मंडळांनी नेहमीप्रमाणे पर्यावरणास घातक असलेल्या प्लास्टर ऑफ पॅरिस मूर्तीचाच वापर केला. या मूर्तींच्या विसर्जनानंतर अद्यापही त्या मूर्ती पाण्यात तशाच पडून असल्याने त्याचा जलचरांसह मानवी जीवनावर मोठा विपरित परिणाम होणार असल्याचे स्पष्ट दिसत आहे. 

वाशिम (इंझोरी) : अलिकडेच पार पडलेल्या गणेशोत्सव आणि नवदुर्गोत्सवात अनेक मंडळांनी नेहमीप्रमाणे पर्यावरणास घातक असलेल्या प्लास्टर ऑफ पॅरिस मूर्तीचाच वापर केला. या मूर्तींच्या विसर्जनानंतर अद्यापही त्या मूर्ती पाण्यात तशाच पडून असल्याने त्याचा जलचरांसह मानवी जीवनावर मोठा विपरित परिणाम होणार असल्याचे स्पष्ट दिसत आहे. 

मानवाची हट्टखोरवृत्ती आणि अज्ञानामुळे पर्यावरणाचा दिवसेंदिवस -हास होतच असून, या संदर्भात मोठ्या शहरांपासून ते ग्रामस्तरापर्यंत विविध पद्धतीने करण्यात येत असलेल्या जनजागृतीचा काहीच फायदा होत नसल्याचे अलिकडेच पार पडलेल्या गणेश विसर्जन आणि दुर्गादेवी विसर्जन सोहळ्यातून स्पष्ट होत आहे. मोठ्या भक्तीभावाने हे उत्सव साजरे करणा-या मंडळांनी प्लास्टरच्या मूर्ती स्थापित करून त्यांचे विसर्जन मानोरा तालुक्यातून वाहणा-या अडाण नदीपात्रात केले.  

मुळात प्लास्टर ऑफ पॅरिस हे पाण्यात विरघळत नाही. त्यामुळे यापासून तयार केलेल्या मूर्तीचे विसर्जन केल्यानंतर हे प्लास्टर ऑफ पॅरिस आणि मूर्तीर्चे घातक रासायनिक रंग पाण्यातील मासे, अन्य जलचर यांच्या शरीरात जातात. त्यामुळे त्यांच्या जिवाला धोका निर्माण होतो. पाण्यातील वनस्पतींसाठीही प्लास्टर ऑफ पॅरिस आणि हे रासायनिक रंग धोकादायक आहेत. त्यामुळे विहिरी, तलाव, नदी, समुद्र यातील जलचरांसाठी ते घातक ठरते. प्लास्टरच्या मूर्तीमध्ये वापरल्या जाणा-या क्रोमियम, लेड, मक्युर्री, कॅडियम आदी घातक घटक या रासायनिक रंगांमध्ये असतात.

तसेच सल्फर, फॉस्फरस, मॅग्नेशियम या घातक गोष्टींचाही वापर यात केलेला असतो. हे सर्व घटक पाण्यात विरघळत नाहीत. त्यामुळे ते पर्यावरण व निसगार्साठी घातक आहेत. प्लास्टर ऑफ पॅरिसपासून तयार केलेल्या मूर्तींचे विसर्जन नदी, तलाव, विहिरी यात केल्यामुळे निसगार्ची पयार्याने पर्यावरणाची हानी होतेच, पण त्याचबरोबर पाण्यातील जलचरांसाठीही ते धोकादायक ठरते. तथापि, याकडे सुशिक्षित मंडळीही हेतूपरस्पर दुर्लक्ष करीत असल्याचे दिसत आहे.