शहरं
Join us  
Trending Stories
1
आपल्या आई, बहिणीचे मतदानावेळचे CCTV फुटेज द्यावे का? राहुल गांधींच्या मागणीवर आयोगाचा सवाल
2
जे भारतात तयार होते तेच खरेदी करा; दिवाळीत ‘डबल बोनस’ मिळणार आहे : पंतप्रधान मोदी
3
फक्त महिला रडत होती म्हणून हुंड्यासाठी छळाचा गुन्हा होत नाही- दिल्ली उच्च न्यायालय
4
लेख: कुठे नाचताय जनाब मुनीर, शुद्धीवर तरी आहात का? चेष्टामस्करीलाही काही मर्यादा असते!
5
पुन्हा निसर्ग कोपला, ढगफुटीने हाहाकार! जम्मू-काश्मिरातील कठुआमध्ये ७ मृत्युमुखी; अनेक जखमी
6
आजचा अग्रलेख: भारताच्या प्रवासाचा ‘रोडमॅप’! विक्रमांपेक्षाही भाषणाचा आशय अधिक महत्त्वाचा
7
वर्गात मुलांनी सरळ रांगेत बसावे की ‘यू’ आकारात? शिक्षकापेक्षा मुले एकमेकांकडून जास्त शिकतात!
8
निवडणूक आयोग भाजपशी हातमिळवणी करून करतोय मतांची चोरी: राहुल गांधींचा आरोप
9
बीड जिल्ह्यात मुसळधार पाऊस, नद्या-नाले तुडुंब; जीप वाहून सहा जण अडकल्याची भीषण घटना
10
चिनी बदकांमुळे ‘शटलकॉक’ महाग! लोकांच्या खानपानाच्या सवयी बदलल्या अन् परिणाम किमतींवर झाला...
11
कावड-पालखी सोहळ्यातील ट्रॅक्टरचा अकोला दगडीपुलाजवळ अपघात, २२ भाविक जखमी
12
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
13
कोल्हापूर सर्किट बेंच झाले, आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या; सरन्यायाधीश भूषण गवईंची सूचना
14
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
15
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
16
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
17
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
18
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
19
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
20
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार

वाढलेल्या सिंचन क्षमतेचा पुरेपूर वापर व्हावा

By admin | Updated: March 18, 2015 01:56 IST

‘आत्मा’नियामक मंडळ बैठकीत वाशिम जिल्हाधिका-यांनी दिल्या सूचना.

वाशिम : नरेगाच्या माध्यमातून जिल्ह्यात सुमारे पाच हजार नवीन विहिरी खोदण्यात आल्या आहेत. त्यामुळे सिंचन क्षमतेत वाढ झाली असून, त्याचा पुरेपूर वापर होण्याची गरज आहे. त्यासाठी कृषी विभाग व आत्माने प्रयत्न करावेत, अशा सूचना जिल्हाधिकारी रामचंद्र कुलकर्णी यांनी आत्मा नियामक मंडळाच्या बैठकीत दिल्या. यावेळी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी हिंदुराव चव्हाण, आत्माचे प्रकल्प संचालक विजय चवाळे, प्रकल्प उपसंचालक ए. जी. वाघमारे, कृषी विकास अधिकारी चंद्रकांत सूयर्वंशी, विभागीय कृषी अधिकारी इंगळे यांच्यासह विविध विभागांचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते. पुढे बोलताना जिल्हाधिकारी कुलकर्णी म्हणाले की, जिल्ह्यात रब्बी हंगामातील पेरणीचे क्षेत्न वाढवण्यासाठी प्रयत्न होणे आवश्यक आहे. त्यासाठी शेतकरी मित्न व संबंधित अधिकार्‍यांनी शेतकर्‍यांशी चर्चा करून त्यांना पेरणीसाठी प्रोत्साहन देण्याची गरज आहे; तसेच आगामी खरीप हंगामात सोयाबीन पिकाला पर्याय देण्यासाठी ज्वारीची जास्तीत जास्त पेरणी करण्याबाबत शेतकर्‍यांमध्ये जागृती करण्याच्या सूचनाही जिल्हाधिकारी कुलकर्णी यांनी दिल्या. यावेळी जिल्हय़ाचा यथार्थ कृषी विस्तार आराखडा तयार करण्याबाबत चर्चा करण्या त आली. हा आराखडा तयार करण्यासाठी वापरल्या जाणार्‍या कार्यपद्धतीची माहिती आ त्माचे प्रकल्प संचालक चवाळे यांनी उपस्थितांना दिली. कृषी विस्तार आराखडा बनविला जात असताना जास्तीत जास्त बिनचूक माहितीची नोंद घेण्याची सूचना जिल्हाधिकार्‍यांनी यावेळी केली.