शहरं
Join us  
Trending Stories
1
Satyapal Malik Death: माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांचे निधन; राम मनोहर लोहिया रुग्णालयात त्यांनी घेतला अखेरचा श्वास
2
“मुंबई महानगरपालिका निवडणुकीत ठाकरे बंधूंना चांगले यश मिळेल”; महायुतीतील नेत्याचा मोठा दावा
3
डोनाल्ड ट्रंप टॅरिफविरोधात भारतीय सैन्याची एन्ट्री; ५४ वर्षांपूर्वीची कारस्थाने बाहेर काढली...
4
'विरोधकांनी स्वतःच्या पायावर धोंडा मारुन घेतला', 'ऑपरेशन सिंदूर'बाबतच्या चर्चेवरून PM मोदींचा टोला
5
शर्टचा फोटो, अज्ञात चेहरा...४३४ कोटींच्या एमडी ड्रग्जबाबत खुलासा; कर्नाटकातून मुंबईत कसं यायचे?
6
शांतता अन् निसर्ग सौंदर्याचा अनोखा मिलाफ; बीच लव्हर असाल तर भारतातील 'या' समुद्र किनाऱ्यांना नक्की भेट द्या!
7
"कोण खरा भारतीय, कोण नाही हे कोर्ट ठरवू शकत नाही’’, प्रियंका गांधींनी केला राहुल गांधींचा बचाव
8
ये वर्दी सिर्फ हिंमत नही बलिदान भी मांगती है! फरहान अख्तरच्या '१२० बहादुर'चा टीझर रिलीज
9
राज ठाकरेंशी युतीला कौल? इंडिया-मविआवर पाणी सोडण्याची तयारी? दिल्लीत उद्धव ठाकरेंची परीक्षा
10
Anil Ambani at ED Office : अनिल अंबानी ED च्या कार्यालयात दाखल; १७ हजार कोटींच्या कर्जाच्या फसवणुकीप्रकरणी झाले हजर
11
मी तिचा पहिला रूग्ण, ती माझी शेवटची डॉक्टर, १३ दिवसांचा ड्रामा नको...; इंजिनिअरनं संपवलं जीवन
12
बँकेचा CEO बदलताच शेअरला 'रॉकेट' स्पीड! एका झटक्यात गुंतवणूकदारांना झाला इतका फायदा
13
'या' महिला खासदाराचे क्रश आहेत पंकज त्रिपाठी, कॉफी डेटची दिलेली ऑफर, म्हणाल्या- "मी त्यांना पत्रही लिहिलं होतं पण..."
14
Mahabharat: महाभारतात ४५ लाख योद्ध्यांसाठी १८ दिवस कोण करत होतं स्वयंपाक?
15
ऑपरेशन सिंदूरचा जोरदार दणका! पाकिस्तानचं रहीम यार खान एअरबेस अजूनही बंद; पुन्हा जारी करण्यात आला NOTAM
16
IND vs ENG: 'या' विकेटने सामना फिरला...; सुनील गावसकरांनी सांगितला सामन्याचा 'टर्निंग पॉईंट'
17
खळबळजनक! एकतर्फी प्रेमात वेडा झाला तरुण, १५ वर्षांच्या मुलीवर दिवसाढवळ्या झाडल्या गोळ्या
18
"लाल किल्ल्यावर भगवा फडकवा पण तिरंगा मानलाच पाहिजे"; संभाजी भिडेंच्या विधानाची चर्चा
19
'दीवार'मधला चिमुकला आहे 'या' मराठी अभिनेत्रीचा मोठा भाऊ, कुटुंबासोबत परदेशात झाला स्थायिक
20
FD की सोने? गुंतवणुकीचा राजा कोण? बहुतेकांना यातील फायदे तोटे माहिती नाही, कशी करायची योग्य निवड?

३५ पैकी २५ किलोमीटर अंतरावर खड्ड्यांचेच साम्राज्य!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 22, 2017 22:36 IST

वाशिम: जिल्ह्यातील मंगरुळपीर-अनसिंग या ३५ किलोमीटर अंतराच्या मार्गावर जवळा ते धानोरादरम्यानच्या २५ किलोमीटर अंतरावर केवळ मोठमोठ्या खड्ड्यांचेच साम्राज्य आहे. त्यामुळे या मार्गावर वाहन चालविणाºयांना आपला जीव मुठीत घेऊनच वाहने चालवावी लागत आहेत. 

ठळक मुद्देअनसिंग-मंगरूळपीर मार्गाची दशाजीव मुठीत घेऊन वाहनधारकांचे मार्गक्रमण 

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम: जिल्ह्यातील मंगरुळपीर-अनसिंग या ३५ किलोमीटर अंतराच्या मार्गावर जवळा ते धानोरादरम्यानच्या २५ किलोमीटर अंतरावर केवळ मोठमोठ्या खड्ड्यांचेच साम्राज्य आहे. त्यामुळे या मार्गावर वाहन चालविणाºयांना आपला जीव मुठीत घेऊनच वाहने चालवावी लागत आहेत. अनसिंग-मंगरुळपीर हा मार्ग सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारित येतो. या मार्गावर मंगरुळपीर ते अनसिंग दरम्यान एसटी बसगाड्यांशिवाय काळीपिवळी, आॅटोरिक्षा या खाजगी प्रवासी वाहनांसह मालवाहू ट्रक मोठ्या संख्येने धावतात. आता या रस्त्याची अवस्था अत्यंत गंभीर झाली असल्याने अपघाताची शक्यता बळावली आहे. तथापि, गेल्या दिड वर्षापासून या मार्गावर जागोजागी खड्डे पडले असतानाही मार्गाची दुरुस्ती करण्याची तसदी मात्र घेण्यात आलेली नाही. ठिकठिकाणी मार्गावर मोठमोठे खड्डे पडले आहेतच शिवाय कुठे कुठे, तर आठ फुट अंतरापर्यंतच मार्गच उखडला असून, निव्वळ खडीवरून वाहने धावत आहेत. यामुळे मार्गावर प्रवास करताना केवळ शिल्लक वेळच लागत नाही, तर खड्डे वाचविण्याचा प्रयत्न चालक करीत असल्याने वाहन सारखे आदळत असल्याने प्रवाशांची हाडेही खिळखिळी होत आहेत. या मार्गावर चालकाचे दुर्लक्ष म्हणजे मृत्यूला आमंत्रण अशीच स्थिती निर्माण झाल्याचे दिसत आहे.  याच मार्गावरील तीन नाल्यांवर असलेल्या पुलांची उंची आधीच कमी असताना त्या ठिकाणी मार्गाची अत्यंत दूरावस्था झाल्याने एखादवेळी खड्डे वाचविताना वाहन पुलात कोसळण्याची भितीही आहे. यातील एक पुल नांदगावनजिक, दुसरा कुंभीनजिक, तर तिसरा पुल जवळ्यानजिक आहे.  

मंगरुळपीर आगाराची हिंगोली बसफेरी बंद मंगरुळपीर येथून हिंगोलीकडे जाण्यासाठी अनसिंग मार्ग जवळचा असल्याने या मार्गावर मंगरुळपीर आगाराकडून वर्षभरापूर्वी हिंगोलीसाठी बसफेरी सुरू करण्यात आली होती; परंतु अवघ्या काही दिवसांतच या मार्गाची दूरवस्था झाल्याने या मार्गावरून बस चालविणे कठीण झाले, तसेच मार्गावरील खड्ड्यांमुळे वृद्ध प्रवाशांसह बालकांना प्रवासादरम्यान अतोनात त्रास सहन करावा लागत होता. त्याशिवाय बसचेही नुकसान होण्याची शक्यता होती. याच कारणामुळे मंगरुळपीर आगाराकडून ही बसफेरी बंद करण्यात आली.  

टॅग्स :road safetyरस्ते सुरक्षा