शहरं
Join us  
Trending Stories
1
९ जुलैला भारत बंद, २५ कोटी कामगार संपावर; शाळा, कॉलेज, बँका आणि बाजारासह काय-काय बंद राहणार? जाणून घ्या
2
तिरुपतीला गेलेल्या अहिल्यानगरच्या तिघांचा दुर्वैवी मृत्यू; कार उलटल्याने झाला भीषण अपघात
3
'भारतासह ब्रिक्स देशांना द्यावा लागणार अतिरिक्त १० टक्के कर"; व्यापार करारापूर्वी ट्रम्प यांचे विधान
4
"एक स्पष्ट आदेश... पक्षातील कोणीही..."; मराठीचा मुद्दा गाजत असतानाच राज ठाकरेंची फेसबूक पोस्ट
5
"रेल्वे कर्मचाऱ्याला तमीळ येत नव्हतं, म्हणून दुर्घटना घडली", आता तामिळनाडू रेल्वे-व्हॅन अपघातातही भाषेची एन्ट्री!
6
२ कोटींच्या विम्यासाठी मित्राला गाडीत जिवंत जाळलं; नऊ महिने सुरु होती प्लॅनिंग, पत्नीचाही सहभाग
7
भारताचे INS महेंद्रगिरी शत्रूला पाणी पाजायला तयार! चीन-पाकिस्तानची झोप उडणार, काय आहे यात खास? जाणून थक्क व्हाल!
8
ठाकरे बंधूंची युती होईल का, किती टिकेल? स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वतींची मोठी भविष्यवाणी
9
मराठी शाळा बंद, ५००० शिक्षकाचं आंदोलन, मुख्यमंत्र्यांनी त्याकडे लक्ष द्यावं- सुप्रिया सुळे
10
“ज्येष्ठ कलाकार मनमोहन माहिमकर यांना बेघर होऊ देणार नाही”; DCM एकनाथ शिंदेंनी दिली ग्वाही
11
महाराष्ट्रातील सीईटी कक्षाकडून घेण्यात येणाऱ्या प्रवेश नोंदणीला मुदतवाढ; विद्यार्थी हितासाठी निर्णय!
12
टॉप 10 अब्जाधिशांच्या यादीतून बिल गेट्स बाहेर, संपत्तीत मोठी घसरण
13
कोट्यवधी लोकांना खूशखबर, पीएफच्या खात्यात जमा झाले व्याजाचे पैसे, असा तपासा बॅलन्स
14
१४ वर्षांच्या पोराचा आणखी एक पराक्रम! आता वैभव सूर्यंवशीनं मोडला शुबमन गिलचा विक्रम
15
११ तासांत काय घडलं? अविनाश जाधव यांनी सगळं सांगितलं; अटक, सुटका ते मोर्चाची Inside Story
16
येमेनमध्ये भारतीय नर्स निमिषा प्रियाला फाशीची शिक्षा; न्यायालयाने तारीख ठरवली
17
इतके पैसे कुठून आणता? निशिकांत दुबेंचा ठाकरे बंधूंवर निशाणा; मालमत्तांची यादीच शेअर केली
18
हिंदी भाषेची सक्ती कुणी केली? अजित पवार आणि एकनाथ शिंदेंचं नाव घेत सुप्रिया सुळे म्हणाल्या...
19
भारतीय क्रिकेटर स्मृती मन्धानाला इंग्लंडमध्ये मिळाला 'लाल गुलाब'; फोटो व्हायरल, रंगली चर्चा
20
गोपाल खेमका हत्याकांडात मोठा गौप्यस्फोट, एका व्यावसायिकानेच दिली होती सुपारी, समोर आलं असं कारण

ग्रामीण भागात आकोडे टाकून वीजचोरी

By admin | Updated: January 21, 2015 01:29 IST

लोकमत स्टिंगने फोडले बिंग ;उघड्या तारांतून होत असलेल्या चोरीमुळे जनतेच्या जिवास धोका.

वाशिम: महावितरण कंपनीला अंधारात ठेवून परस्पर सर्व्हिस लाईन टाकून वीज चोरी करण्याचे प्रकार सुरू असल्याचे लोकमतकडून करण्यात आलेल्या स्टिंग ऑपरेशनमध्ये आढळून आले . कारंजा तालुक्यातील इंझोरी, कामरगाव तर मालेगाव तालुक्यातील खैरखेडा येथे वीज चोरीचा प्रकार सर्रास दिसून येत आहे.वाशिम जिल्हय़ात होत असलेल्या वीज चोरीबाबत लोकमत चमूच्यावतीने स्टिंग ऑपरेशन करण्यात आले. त्यामध्ये कित्येक ठिकाणच्या शेतशिवारात वीज चोरी करून महावितरणला लाखो रुपयांचा चुना लावल्या जात असल्याचे स्पष्ट झाले आहे. या वीज चोरीने मात्र नियमित विजेचे बिल भरणार्‍यांवर भुर्दंड बसत आहे. महावितरण कंपनीची फसवणूक करून परस्पर वीज जोडणी केल्या जाते, त्याशिवाय मीटर असतानाही त्याला बायपास करून थेट विजेचा वापर करणे, असे प्रकार नवीन नाहीत. यापूर्वी कित्येकदा वीज चोरीच्या घटना उघडकीस आल्या असून, वीज चोरी उघडकीस आणण्यासाठी वीज वितरणकडून अनेकदा मोहीम राबविण्यात आली. या मोहिमेत शेकडो जणांवर कारवाई करण्यात आली असून, त्यांच्याकडून लाखो रुपयांचा दंडही कंपनीने वसूल केला आहे. वीज चोरी हा कायद्यानुसार गुन्हा ठरविण्यात आला असून, यासंदर्भात दोषी आढळणार्‍यावर कारवाई करण्याची, त्याला दंड ठोठावण्याची तरतूद आहे. वीज चोरी रोखण्यासाठी वीज वितरण कंपनीकडून सतत प्रयत्न करण्यात येत आहेत. यासंदर्भात त्यांच्याकडून विशेष मोहीम राबविण्यात येत असून, त्याचाच एक भाग म्हणून वीज चोरी उघडकीस आणून देणार्‍यास रोख बक्षीसही देण्याचे आवाहन त्यांच्याकडून करण्यात आले आहे. ह्यवीज चोरी कळवा आणि लाखो रूपये मिळवाह्ण, असे घोषवाक्य वीज वितरणने त्यांच्या संकेत स्थळावर टाकले आहे. तथापि, त्याचा फारसा परिणाम झालेला नसल्याचे दिसत आहे. शेतशिवारात अधिकृत वीज जोडणी नसतानाही विजेच्या खांबावर थेट तार टाकून वीज चोरी करण्यात येते. या वीज चोरीमुळे महावितरणला लाखोंचा चुना लावला जातोच, शिवाय विजेचा दाब कमी होऊन रोहित्र जळण्याच्या घटनाही घडतात. याशिवाय वीज चोरी करण्याच्या प्रयत्नांत काहींनी आपले प्राणही गमावण्याच्या घटनासुद्धा घडल्या आहेत. असे असले तरी, वीज चोरांवर कोणताही परिणाम होत नसून, त्यांच्याकडून वीज खांबावर तार टाकून पिकांना पाणी देण्यासाठी वीज चोरी करण्यात येत असल्याचे दिसत आहे. वीज चोरी ही शेतात पाण्याची सोय असलेल्यांकडून होण्याचे प्रकार फारसे नाहीत; परंतु जलप्रकल्प, तलाव, धरणे, बंधार्‍यांच्या जवळच असलेल्या शेतशिवारात असे प्रकार प्रामुख्याने होत असल्याचे लोकमतच्या चमूकडून करण्यात आलेल्या स्टिंग ऑपरेशनमध्ये उघडकीस आले आहे. वीज चोरी मोठय़ा प्रमाणात वाढल्यामुळे त्याचे परिणाम नियमित ग्राहकांवर झाले आहेत. अधिकृत जोडणी घेऊन रितसर बिलभरणा करणार्‍यांना नाहक त्रास सहन करावा लागतो. वाशिम जिल्हय़ातील वीज चोरीच्या घटना पाहता २0 जानेवारी रोजीच जिल्हय़ातील सर्व कनिष्ठ अभियंत्यांची बैठक घेऊन वीज चोरीप्रकरणी कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. महिन्यातून किमान १0 केसेस दाखल करण्याचे उद्दिष्ट्य यावेळी देण्यात आले असल्याचे महावितरणचे कार्यकारी अभियंता एस.के. झळके यांनी स्पष्ट केले.