शहरं
Join us  
Trending Stories
1
Solapur Municipal Election: काँग्रेसने २० उमेदवारांच्या नावाची केली घोषणा, पहिल्या यादीत कुणाची नावे?
2
शिंदेसेनेच्या बैठकीत राडा? शहरप्रमुख नाना भानगिरे रागारागात बाहेर पडले आणि गेले निघून; व्हिडीओ आला समोर
3
विराट कोहलीचा VIDEO घेण्यासाठी बस ड्रायव्हरची भन्नाट 'आयडिया', सोशल मीडियावर क्लिप VIRAL
4
Sukesh Chandrashekhar : "२१७ कोटी देण्यास तयार, पण...", महाठग सुकेश चंद्रशेखरचा मास्टरस्ट्रोक; खंडणी प्रकरणात मोठी ऑफर
5
राजकारण पेटलं! कर्नाटकमध्ये काँग्रेस सरकारची बुलडोझर कारवाई; ४०० हून अधिक घरं पाडली
6
"भाजपाने आमच्या पाठीत खंजीर खुपसला, मतदारांचाही विश्वासघात करेल"; राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष मुळीक यांचे टीकास्त्र
7
Battle Of Galwan Teaser: मौत से क्या डरना...! 'बॅटल ऑफ गलवान'चा टीझर, 'या' दिवशी सिनेमा रिलीज होणार
8
जिवलग जीवाचा... विराट कोहली!! स्वत:चीच विकेट घेणाऱ्या गोलंदाजाला दिलं एकदम खास 'गिफ्ट'
9
सोन्या-चांदीची भरारी, विदेशींची माघार अन् भारतीयांचा एल्गार! हे वर्ष कोणासाठी ठरलं फायद्याचं
10
जिममध्ये जाणाऱ्यांनो सावधान! १९ वर्षीय विद्यार्थ्याचा प्रोटीन शेक प्यायल्याने मृत्यू; नेमकं काय घडलं?
11
प्रशासनाचा गलथान कारभार! निवडणूक एका ठिकाणी, अधिकाऱ्यांनी प्रक्रिया केली दुसरीकडे; उमेदवाराच्या विजयानंतर शासनाला आली जाग
12
बांगलादेशमध्ये उलटफेर! शेख हसीना यांना विरोध करणारा पक्ष फुटला,जमातमध्ये आश्रय घेतला
13
TATA Steel विरोधात खटला दाखल; १४८ अब्ज रुपयांच्या नुकसान भरपाईची मागणी, प्रकरण काय?
14
IT Manager Gang Rape: हॉटेलमध्ये आले, दीड वाजेपर्यंत पार्टी आणि गुप्तांगावर जखमा; मॅनेजर सामूहिक बलात्कार प्रकरणाची Inside Story
15
Ashes मध्ये तुफान राडा! जो रूटने मार्नस लाबुशेनचा कॅच घेण्यावरून मैदानात गोंधळ, पाहा VIDEO
16
क्रूरतेचा कळस! जावई झाला हैवान; सासू-सासरे आणि बायकोवर तलवारीने केले सपासप वार
17
एकावर मिळणार ४ बोनस शेअर्स; रेकॉर्ड डेट २०२६ च्या पहिल्या आठवड्यात, वर्षभरात 'या' शेअरनं केलाय पैसा दुप्पट
18
VIDEO: डिटर्जंट, युरिया अन् रिफाईंड तेल; अंधेरीत नामांकित ब्रँड्सच्या पिशव्यांमध्ये भरलं भेसळयुक्त दूध, घरात सुरु होतं रॅकेट
19
"फक्त बांगलादेशातच नाही, तर बंगालमध्येही हिंदू सुरक्षित नाहीत"; भाजपाचा ममता बॅनर्जींवर गंभीर आरोप
20
दोन वर्षांत २९००० डॉक्टर, अभियंते, अकाउंटंट्सनी पाकिस्तान सोडले, जगभरात आसिम मुनीर यांची नामुष्की
Daily Top 2Weekly Top 5

आठ हजारांवर कृषी पंप जोडण्या प्रलंबित!

By admin | Updated: April 19, 2017 01:08 IST

वाशिम : जिल्ह्यात ८ हजार ७९४ शेतकऱ्यांनी रितसर कोटेशन भरूनही त्यांना अद्याप कृषीपंपासाठी वीज जोडणी मिळू शकली नाही.

जिल्ह्यातील वास्तव : बहुतांश अर्ज दोन वर्षांपूर्वीचे! वाशिम : जिल्ह्यात ८ हजार ७९४ शेतकऱ्यांनी रितसर कोटेशन भरूनही त्यांना अद्याप कृषीपंपासाठी वीज जोडणी मिळू शकली नाही. यातील ७० टक्के अर्ज दोन वर्षांपूर्वीचे असून, अनुकूल वातावरणातही काम संथगतीने होत असल्याने शेतकऱ्यांना वीज जोडणीपासून वंचित राहावे लागत असल्याचे दिसत आहे.शेतकऱ्यांचा सर्वांगीण विकास साधण्याचा शासनाचा प्रयत्न आहे. यासाठी शासनाच्यावतीने सिंचन, विहिरी, शेततळे, सूक्ष्म सिंचन योजनांसारखे उपक्रम शासनाच्यावतीने राबविले जात आहेत. या योजनांचा लाभ घेण्यासाठी शेतकरीही उत्सुक आहेत; परंतु प्रशासकीय स्तरावरील तांत्रिक अडचणींमुळे शासनाच्या बव्हंशी योजनांचा पुरेपूर लाभ शेतकऱ्यांना मिळत नाही. यात प्रामुख्याने कृषी पंपांच्या रखडलेल्या वीज जोडण्यांचा मुद्दा समाविष्ट आहे. जिल्ह्यात सद्यस्थितीत ८ हजार ७९४ कृषी पंप वीज जोडण्या प्रलंबित आहेत. यामध्ये २०११-१२ पासून ते २०१५-१६ पर्यंतच्या ५ हजार ७९५ जोडण्यांचा समावेश आहे, तर यंदा मार्च अखेरपर्यंत आणखी २ हजार ९९९ श्ेतकऱ्यांनी कृषी पंप जोडणीसाठी महावितरणकडे अर्ज सादर केले आहेत. त्यातही पायाभूत सुधारणा आराखडा-२ आणि विशेष अनुदानांतर्गत एकूण ६ हजार ५४ प्रस्ताव प्रलंबित आहेत. यामधील पायाभूत सुधारणा आराखडा-२ मधील ६४९ जोडण्यांसाठी १४.५२ कोटी, तर विशेष अनुदान योजनेंतगर्तच्या ३ हजार ६६६ जोडण्यांसाठी ४५.६९ कोटींचा नियतव्यय उपलब्ध असल्याची माहिती असून, मार्च अखेर या दोन्ही योजनांत प्रलंबित असलेल्या एकूण ६ हजार ६४ कृषी वीज जोडण्या पूर्ण करण्यासाठी अतिरिक्त निधी म्हणून २१.९७ कोटींच्या मागणीचा प्रस्ताव महावितरणच्या जिल्हा कार्यालयाकडून वरिष्ठ स्तरावर पाठविण्यात आला असल्याची माहिती आहे. खरीप आणि रब्बी हंगामात शेतात पिके असल्यामुळे कृषी पंप जोडण्यांची कामे प्रामुख्याने प्रलंबित राहतात. तथापि, जिल्ह्यातील बव्हंशी क्षेत्र खरीप हंगामानंतर मोकळे असते. वीज जोडणीच नसल्यामुळे अनेक शेतकरी सिंचनही करू शकत नसल्याने या एप्रिलपासून कृषी पंप जोडण्यांच्या कामाला वेग मिळणे अपेक्षित असते; परंतु तसे होत असल्याचे दिसत नाही. याची प्रचिती २०११ पासून आजवरच्या सहा वर्षांच्या कालावधित कृषी पंप जोडण्यांच्या वाढतच असलेल्या संख्येवरून दिसत आहे. जिल्ह्यातील विभागवार प्रलंबित वीज जोडण्यांचा विचार केल्यास वाशिम उपविभागात १ हजार ५०९ जोडण्या प्रलंबित आहेत. मालेगावात १ हजार ४७४, रिसोडमध्ये १ हजार ४७३, मंगरुळपीर उपविभागात ४८५, मानोऱ्यात १ हजार १७५, तर कारंजा उपविभागात १ हजार ८९६ वीज जोडण्या प्रलंबित आहेत. जिल्ह्यातील प्रलंबित कृषी पंप जोडणीच्या कामांना वेग देण्यात आला आहे. यासाठी टेंडरिंंगचे काम पूर्ण झाले आहे. येत्या दोन महिन्यांत ६० टक्क्यांहून अधिक वीज जोडण्यांचे काम पूर्ण करण्याचा निर्धार आहे. यासंदर्भात सर्व कंत्राटदारांना सूचनाही देण्यात आल्या आहेत.-दत्तात्रय बनसोडे, अधीक्षक अभियंता, महावितरण, वाशिम.