शहरं
Join us  
Trending Stories
1
बीसीसीआयला मिळाला नवा अध्यक्ष, या माजी क्रिकेटपटूच्या नावावर झालं शिक्कामोर्तब
2
पाकिस्तानच्या नकवींचा कांगावा! म्हणे, इस्त्रायलने आमच्या ऑईल टँकरवर हल्ला केला, नंतर हुतींनी कब्जा केला
3
डोंबिवलीत त्या तरुणाने ११ व्या मजल्यावरुन उडी का मारली; धक्कादायक कारण आले समोर
4
एक खेळाडू सामन्याचा निकाल फिरवू...; आशिया कप फायनलपूर्वी वसीम अक्रमची मोठी भविष्यवाणी
5
अभिनेता विजयच्या रॅलीत चेंगराचेंगरी कशी झाली? प्रत्यक्षदर्शींनी दिली धक्कादायक माहिती, म्हणाले...  
6
Tamilnadu Stampede : अभिनेता थलपती विजयची मोठी घोषणा; चेंगराचेंगरीतील मृतांच्या कुटुंबियांना देणार प्रत्येकी २० लाख
7
महेश मांजरेकरांची पहिली पत्नी दीपा मेहता यांचं निधन, आईच्या आठवणीत मुलाची पोस्ट
8
दिवाळीपूर्वी मोठी बातमी! फक्त १,२०० रुपयांमध्ये देशात कुठेही विमान प्रवासाची संधी; 'या' कंपनीने आणली ऑफर्स
9
Sheetal Devi : सुवर्णवेध! हातांशिवायही अचूक निशाणा; जागतिक तिरंदाजी स्पर्धेत शीतल देवीला गोल्ड मेडल, रचला इतिहास
10
स्वामी चैतन्यानंद फसवणुकीतही माहिर! लोकांवर प्रभाव पाडण्यासाठी बनावट UN-BRICS कार्ड; धक्कादायक माहिती उघड
11
Tamilnadu Stampede : "अभिनेत्याला यायला उशीर, पाण्याची कमतरता आणि..."; चेंगराचेंगरीबद्दल काय म्हणाले पोलीस?
12
IND vs PAK Final, Asia Cup 2025: फायनलमध्ये पाकिस्तानविरोधात भारताचा रेकॉर्ड फारसा चांगला नाही; आजपर्यंत १० वेळा भिडला, पण...
13
Rain Update : काळजी घ्या! बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा, आज मुसळधार; विदर्भ, मराठवाड्यासह या भागात बरसणार
14
'पीएम किसान'चा २१ वा हप्ता जाहीर! ३ राज्यांतील शेतकऱ्यांच्या खात्यात जमा, महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना कधी?
15
IND vs PAK Final, Asia Cup 2025: भारत-पाक अंतिम सामना: सूर्यकुमार पाकिस्तानी मंत्री मोहसिन नकवी यांच्या हस्ते ट्रॉफी स्वीकारणार?
16
Video - तामिळनाडूतील चेंगराचेंगरीत मृत्युमुखी पडलेल्यांचे मृतदेह पाहून शिक्षणमंत्री ढसाढसा रडले
17
LPG ते पेन्शन, UPI पासून रेल्वे तिकीटापर्यंत... १ ऑक्टोबरपासून 'हे' ५ नियम बदलणार
18
आधी मसाज करायला आले अन्..; हायकोर्टाच्या वकिलाकडून ब्लॅकमेलिंगद्वारे पैसे उकळले!
19
IND vs PAK Final, Asia Cup 2025 Marathi : आज 'ऑपरेशन पाकिस्तान'! फायनलमध्ये भारतीय संघात दोन मोठे बदल होणार; अशी असेल प्लेइंग 11 
20
वाट चुकलेले दुचाकीस्वार थेट बेलापूर खाडीत; दोन महिन्यांतील दुसरी घटना; एक जण गेला वाहून

आठ हजारांवर कृषी पंप जोडण्या प्रलंबित!

By admin | Updated: April 19, 2017 01:08 IST

वाशिम : जिल्ह्यात ८ हजार ७९४ शेतकऱ्यांनी रितसर कोटेशन भरूनही त्यांना अद्याप कृषीपंपासाठी वीज जोडणी मिळू शकली नाही.

जिल्ह्यातील वास्तव : बहुतांश अर्ज दोन वर्षांपूर्वीचे! वाशिम : जिल्ह्यात ८ हजार ७९४ शेतकऱ्यांनी रितसर कोटेशन भरूनही त्यांना अद्याप कृषीपंपासाठी वीज जोडणी मिळू शकली नाही. यातील ७० टक्के अर्ज दोन वर्षांपूर्वीचे असून, अनुकूल वातावरणातही काम संथगतीने होत असल्याने शेतकऱ्यांना वीज जोडणीपासून वंचित राहावे लागत असल्याचे दिसत आहे.शेतकऱ्यांचा सर्वांगीण विकास साधण्याचा शासनाचा प्रयत्न आहे. यासाठी शासनाच्यावतीने सिंचन, विहिरी, शेततळे, सूक्ष्म सिंचन योजनांसारखे उपक्रम शासनाच्यावतीने राबविले जात आहेत. या योजनांचा लाभ घेण्यासाठी शेतकरीही उत्सुक आहेत; परंतु प्रशासकीय स्तरावरील तांत्रिक अडचणींमुळे शासनाच्या बव्हंशी योजनांचा पुरेपूर लाभ शेतकऱ्यांना मिळत नाही. यात प्रामुख्याने कृषी पंपांच्या रखडलेल्या वीज जोडण्यांचा मुद्दा समाविष्ट आहे. जिल्ह्यात सद्यस्थितीत ८ हजार ७९४ कृषी पंप वीज जोडण्या प्रलंबित आहेत. यामध्ये २०११-१२ पासून ते २०१५-१६ पर्यंतच्या ५ हजार ७९५ जोडण्यांचा समावेश आहे, तर यंदा मार्च अखेरपर्यंत आणखी २ हजार ९९९ श्ेतकऱ्यांनी कृषी पंप जोडणीसाठी महावितरणकडे अर्ज सादर केले आहेत. त्यातही पायाभूत सुधारणा आराखडा-२ आणि विशेष अनुदानांतर्गत एकूण ६ हजार ५४ प्रस्ताव प्रलंबित आहेत. यामधील पायाभूत सुधारणा आराखडा-२ मधील ६४९ जोडण्यांसाठी १४.५२ कोटी, तर विशेष अनुदान योजनेंतगर्तच्या ३ हजार ६६६ जोडण्यांसाठी ४५.६९ कोटींचा नियतव्यय उपलब्ध असल्याची माहिती असून, मार्च अखेर या दोन्ही योजनांत प्रलंबित असलेल्या एकूण ६ हजार ६४ कृषी वीज जोडण्या पूर्ण करण्यासाठी अतिरिक्त निधी म्हणून २१.९७ कोटींच्या मागणीचा प्रस्ताव महावितरणच्या जिल्हा कार्यालयाकडून वरिष्ठ स्तरावर पाठविण्यात आला असल्याची माहिती आहे. खरीप आणि रब्बी हंगामात शेतात पिके असल्यामुळे कृषी पंप जोडण्यांची कामे प्रामुख्याने प्रलंबित राहतात. तथापि, जिल्ह्यातील बव्हंशी क्षेत्र खरीप हंगामानंतर मोकळे असते. वीज जोडणीच नसल्यामुळे अनेक शेतकरी सिंचनही करू शकत नसल्याने या एप्रिलपासून कृषी पंप जोडण्यांच्या कामाला वेग मिळणे अपेक्षित असते; परंतु तसे होत असल्याचे दिसत नाही. याची प्रचिती २०११ पासून आजवरच्या सहा वर्षांच्या कालावधित कृषी पंप जोडण्यांच्या वाढतच असलेल्या संख्येवरून दिसत आहे. जिल्ह्यातील विभागवार प्रलंबित वीज जोडण्यांचा विचार केल्यास वाशिम उपविभागात १ हजार ५०९ जोडण्या प्रलंबित आहेत. मालेगावात १ हजार ४७४, रिसोडमध्ये १ हजार ४७३, मंगरुळपीर उपविभागात ४८५, मानोऱ्यात १ हजार १७५, तर कारंजा उपविभागात १ हजार ८९६ वीज जोडण्या प्रलंबित आहेत. जिल्ह्यातील प्रलंबित कृषी पंप जोडणीच्या कामांना वेग देण्यात आला आहे. यासाठी टेंडरिंंगचे काम पूर्ण झाले आहे. येत्या दोन महिन्यांत ६० टक्क्यांहून अधिक वीज जोडण्यांचे काम पूर्ण करण्याचा निर्धार आहे. यासंदर्भात सर्व कंत्राटदारांना सूचनाही देण्यात आल्या आहेत.-दत्तात्रय बनसोडे, अधीक्षक अभियंता, महावितरण, वाशिम.