शहरं
Join us  
Trending Stories
1
आयकर विभागाची मोठी कारवाई! १०५० पोलिसांना नोटीस; महाराष्ट्र पोलिस दलात खळबळ
2
विखे पाटलांनी उद्धव ठाकरेंना डिवचले, आजारी संजय राऊत संतापले; म्हणाले, 'तुम्ही...'
3
Gold-Silver Rate : सोन्या-चांदीचे दर आणखी कमी होणार? जाणून घ्या पुढचा अंदाज
4
पुण्यात बिबट्याची दहशत, स्वरक्षणासाठी गळ्यात टोकदार खिळ्यांचा पट्टा घालण्याची वेळ, ग्रामस्थांची नवी शक्कल
5
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
6
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
7
लहान बहिणीसोबत अनेकवेळा जबरदस्ती शरीरसंबंध, कुटुंबीयांना सांगायला गेली, तर म्हणाला, 'मी जीव देईन'
8
रशिया शांतपणे कशाची तयारी करतंय? पाश्चात्य देशांनी इशारा दिला; जगासाठी धोक्याची घंटा
9
बिहार निवडणुकीचा प्रचार संपला; दुसऱ्या टप्प्यासाठी ३.७ कोटी मतदार, मतदान, मतमोजणी कधी?
10
Mhada: ९० लाखांचा फ्लॅट २८ लाखांमध्ये, खरं की खोटं? 'म्हाडा'ने लोकांना केलं सावध, काय म्हटलं आहे?
11
Mumbai Weather: शीत वाऱ्यांमुळे पारा घसरला! मुंबईकरांना थंडीचा फील घेता येणार; आठवडाभर कसे राहणार हवामान?
12
धक्कादायक! रुग्णालयात उपचारासाठी आला, अचानक धारदार शस्त्राने डॉक्टरांची हत्या केली, नेमकं काय घडलं?
13
अक्कलकुवाजवळ शालेय बस दरीत कोसळली; अमलीबारी येथे भीषण अपघात, एका विद्यार्थ्याचा मृत्यू, १५ गंभीर
14
मामाची पोरगी पटवली! सूरज चव्हाण कधी करणार लग्न? तारीख आणि ठिकाण आलं समोर
15
बारामतीच्या नगराध्यक्षपद निवडणुकीबाबतच्या जय पवारांच्या चर्चेला अजित पवारांकडून पुर्णविराम
16
रवींद्र चव्हाणांच्या खेळीनं शिंदेसेना संतापली; "भाजपाला युती नको तर स्पष्ट सांगावे, आम्हीही..."
17
RSS मध्ये मुस्लीम सहभागी होऊ शकतात का? मोहन भागवतांनी दिलं असं उत्तर, सभागृहात टाळ्यांचा एकच कडकडाट झाला!
18
निवडणुका जवळ आल्यावर आमच्यावर आरोप होतात; आता आमची बदनामी झाली, अजित पवारांची खंत
19
Digital Gold SEBI: डिजिटल गोल्ड खरेदी असाल, तर थांबा! ऑनलाईन सोने खरेदी करणाऱ्यांना सेबीचा सावधगिरीचा इशारा
20
शशी थरूर यांनी अडवाणींचे कौतुक केले, नेहरू आणि इंदिरा गांधींबद्दल धक्कादायक विधान केले

नागरिकांच्या तक्रारींचा तातडीने निपटारा करण्याचा प्रयत्न ! - जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 8, 2018 16:12 IST

​​​​​​​वाशिम : जिल्ह्यातील नागरिकांच्या तक्रारी तातडीने निकाली काढण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात ‘ई-लोकशाही’ कक्ष स्थापन केला असून, नागरिकांनी तक्रारींचा निपटारा होण्यासाठी सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांनी सोमवारी केले. 

ठळक मुद्देनागरिकांना दूरध्वनीवरून आपली तक्रार दाखल करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात ‘ई-लोकशाही’ कक्ष सुरु करण्यात आला आहे.१०७७ या टोल फ्री क्रमांकद्वारे अथवा ०७२५२-२३११२० या दूरध्वनी क्रमांकावरून नागरिकांची तक्रार दाखल करून घेतली जाईल.. तालुकास्तरीय लोकशाही दिनात दाखल झाल्यानंतर तीन महिन्यापर्यंत निकाली न निघालेली तक्रार ई-लोकशाही कक्षात दाखल करता येईल.

वाशिम : जिल्ह्यातील नागरिकांच्या तक्रारी तातडीने निकाली काढण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात ‘ई-लोकशाही’ कक्ष स्थापन केला असून, नागरिकांनी तक्रारींचा निपटारा होण्यासाठी सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांनी सोमवारी केले. 

नागरिकांना आपल्या तक्रारी दाखल करण्यासाठी ग्रामीण भागातून जिल्हाधिकारी कार्यालयात यावे लागते. त्यामुळे त्यांचा वेळ व पैसा खर्च होतो. त्यामुळे नागरिकांना दूरध्वनीवरून आपली तक्रार दाखल करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी वाशिम जिल्हाधिकारी कार्यालयात ‘ई-लोकशाही’ कक्ष सुरु करण्यात आला आहे. प्रत्येक जिल्हास्तरीय लोकशाही दिनाच्या एकदिवस अगोदरच्या शासकीय कामकाजाच्या दिवशी सकाळी ११ ते ५ वाजेपर्यंत १०७७ या टोल फ्री क्रमांकद्वारे अथवा ०७२५२-२३११२० या दूरध्वनी क्रमांकावरून नागरिकांची तक्रार दाखल करून घेतली जाईल. त्याविषयीची आवश्यक कागदपत्रे ई-मेल अथवा ८३७९९२९४१५ या व्हाटसअप क्रमांकाद्वारे स्वीकारले जातील. तालुकास्तरीय लोकशाही दिनात दाखल झाल्यानंतर तीन महिन्यापर्यंत निकाली न निघालेली तक्रार ई-लोकशाही कक्षात दाखल करता येईल. ई-लोकशाही कक्षासाठी लवकरच नवीन संगणक प्रणाली विकसित करून त्याद्वारे संबंधित तक्रारदाराला त्याच्या तक्रार अर्जाविषयीची सद्यस्थिती मोबाईल क्रमांकावर कळविली जाणार आहे.

ई-लोकशाही कक्षात दाखल झालेली तक्रार संबंधित विभागाकडे पाठविण्यात येईल. या तक्रारींचा जलद गतीने निपटारा होण्यासाठी प्रत्येक आठवड्याला याविषयी आढावा घेण्यात येणार असल्याचे जिल्हाधिकारी श्री. मिश्रा यांनी यावेळी सांगितले. तसेच जिल्ह्यात जलयुक्त शिवार अभियान, गाळमुक्त धरण गाळयुक्त शिवार अभियान यासारख्या संरक्षित सिंचन सुविधा निर्मितीच्या योजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्यात येईल. कर्जमाफी योजना तसेच पीक कर्ज वाटपाच्या अनुषंगाने सर्व संबंधित बँकांना सूचना देण्यात आल्या असून दोन दिवसात सर्व बँक अधिकाºयांची बैठक घेऊन याबाबतचा आढावा घेणार असल्याचे जिल्हाधिकारी यावेळी म्हणाले.

टॅग्स :washimवाशिमcollectorतहसीलदार