शहरं
Join us  
Trending Stories
1
केंद्र सरकारने अचानक जातीय जनगणनेचा निर्णय का घेतला? काँग्रेसचा सवाल...
2
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
3
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
4
विनायक चतुर्थी: गणपती पूजनात ‘या’ गोष्टी हव्यातच, कसे कराल व्रत? पाहा, सोपी पद्धत अन् मान्यता
5
जातिनिहाय जनगणना होणार, मोदींनी राहुल गांधींच्या हातून मोठा मुद्दा हिसकावला, असे आहेत फायदे तोटे  
6
विनायक चतुर्थी: ६ राशींना अनुकूल, अडकलेले पैसे मिळतील; नोकरीत पदोन्नती, बाप्पा चांगलेच करेल!
7
"सुप्रीम कोर्टाच्या आदेशाने गुन्हा दाखल झालेल्या मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचा राजीनामा कधी घेणार?’’ काँग्रेसचा सवाल 
8
IPL 2025: रोबोट कुत्र्यामुळे BCCI अडचणीत, उच्च न्यायालयाकडून मिळाली नोटीस, पण कशासाठी?
9
देवेंद्र फडणवीसांच्या लेकीला दहावीत 92 टक्के; 'वर्षा'मध्ये गृहप्रवेश केल्यावर अमृता फडणवीसांनी दिली आनंदाची बातमी
10
'अब तो नाम पूछना ही पडेगा...'; भोपाळमध्ये विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलानं लावले पोस्टर!
11
काय सांगता? 'असं' चालाल तर नक्कीच लवकर वजन कमी कराल; होतील फायदेच फायदे
12
दहशतवाद्यांचे लॉन्च पॅड, हाफिज सईद, मसूदचे अड्डे, कारवाईदरम्यान या पाच ठिकाणांना भारत करू शकतो लक्ष्य
13
कुछ तो बडा होने वाला है...! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा रशिया दौरा रद्द; भारताने नाही पुतीन यांच्या खास नेत्याने जाहीर केले...
14
चांगले संकेत असूनही बाजारात घसरण कायम! कोणते शेअर वधारले; कुठे बसला फटका
15
जिद्दीला सलाम! मुलाच्या जन्मानंतर १७ दिवसांनी दिली UPSC; IAS होण्याचं स्वप्न केलं साकार
16
रोहित शर्माच्या आईने 'हे' खास १२ फोटो वापरून आपल्या मुलाला दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा
17
राज्यातील ओबीसी आरक्षण संपल्यात जमा; आरक्षणाला कसलाही धक्का लागू नये, हीच मागणी - लक्ष्मण हाके
18
"सर, माझ्याकडे १२ सेकंदांचा Video..."; आवाज ऐकताच वाजू लागले फोन? NIA टीम एक्टिव्ह
19
सुनील नारायणची विश्वविक्रमाशी बरोबरी; केकेआरसाठी केली खास कामगिरी!
20
सिक्स बॉल चॅलेंज! नेटमध्ये धोनीने मारले गगनचुंबी षटकार, व्हिडीओ व्हायरल

नागरिकांच्या तक्रारींचा तातडीने निपटारा करण्याचा प्रयत्न ! - जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 8, 2018 16:12 IST

​​​​​​​वाशिम : जिल्ह्यातील नागरिकांच्या तक्रारी तातडीने निकाली काढण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात ‘ई-लोकशाही’ कक्ष स्थापन केला असून, नागरिकांनी तक्रारींचा निपटारा होण्यासाठी सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांनी सोमवारी केले. 

ठळक मुद्देनागरिकांना दूरध्वनीवरून आपली तक्रार दाखल करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात ‘ई-लोकशाही’ कक्ष सुरु करण्यात आला आहे.१०७७ या टोल फ्री क्रमांकद्वारे अथवा ०७२५२-२३११२० या दूरध्वनी क्रमांकावरून नागरिकांची तक्रार दाखल करून घेतली जाईल.. तालुकास्तरीय लोकशाही दिनात दाखल झाल्यानंतर तीन महिन्यापर्यंत निकाली न निघालेली तक्रार ई-लोकशाही कक्षात दाखल करता येईल.

वाशिम : जिल्ह्यातील नागरिकांच्या तक्रारी तातडीने निकाली काढण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात ‘ई-लोकशाही’ कक्ष स्थापन केला असून, नागरिकांनी तक्रारींचा निपटारा होण्यासाठी सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांनी सोमवारी केले. 

नागरिकांना आपल्या तक्रारी दाखल करण्यासाठी ग्रामीण भागातून जिल्हाधिकारी कार्यालयात यावे लागते. त्यामुळे त्यांचा वेळ व पैसा खर्च होतो. त्यामुळे नागरिकांना दूरध्वनीवरून आपली तक्रार दाखल करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी वाशिम जिल्हाधिकारी कार्यालयात ‘ई-लोकशाही’ कक्ष सुरु करण्यात आला आहे. प्रत्येक जिल्हास्तरीय लोकशाही दिनाच्या एकदिवस अगोदरच्या शासकीय कामकाजाच्या दिवशी सकाळी ११ ते ५ वाजेपर्यंत १०७७ या टोल फ्री क्रमांकद्वारे अथवा ०७२५२-२३११२० या दूरध्वनी क्रमांकावरून नागरिकांची तक्रार दाखल करून घेतली जाईल. त्याविषयीची आवश्यक कागदपत्रे ई-मेल अथवा ८३७९९२९४१५ या व्हाटसअप क्रमांकाद्वारे स्वीकारले जातील. तालुकास्तरीय लोकशाही दिनात दाखल झाल्यानंतर तीन महिन्यापर्यंत निकाली न निघालेली तक्रार ई-लोकशाही कक्षात दाखल करता येईल. ई-लोकशाही कक्षासाठी लवकरच नवीन संगणक प्रणाली विकसित करून त्याद्वारे संबंधित तक्रारदाराला त्याच्या तक्रार अर्जाविषयीची सद्यस्थिती मोबाईल क्रमांकावर कळविली जाणार आहे.

ई-लोकशाही कक्षात दाखल झालेली तक्रार संबंधित विभागाकडे पाठविण्यात येईल. या तक्रारींचा जलद गतीने निपटारा होण्यासाठी प्रत्येक आठवड्याला याविषयी आढावा घेण्यात येणार असल्याचे जिल्हाधिकारी श्री. मिश्रा यांनी यावेळी सांगितले. तसेच जिल्ह्यात जलयुक्त शिवार अभियान, गाळमुक्त धरण गाळयुक्त शिवार अभियान यासारख्या संरक्षित सिंचन सुविधा निर्मितीच्या योजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्यात येईल. कर्जमाफी योजना तसेच पीक कर्ज वाटपाच्या अनुषंगाने सर्व संबंधित बँकांना सूचना देण्यात आल्या असून दोन दिवसात सर्व बँक अधिकाºयांची बैठक घेऊन याबाबतचा आढावा घेणार असल्याचे जिल्हाधिकारी यावेळी म्हणाले.

टॅग्स :washimवाशिमcollectorतहसीलदार