शहरं
Join us  
Trending Stories
1
"इंग्रजीचा पुरस्कार अन् भारतीय भाषांचा तिरस्कार हे योग्य नाही, आपली भाषा..."; CM फडणवीसांचे राज यांना उत्तर
2
हैदराबादच्या बेगमपेट विमानतळाला बॉम्बने उडवण्याची धमकी; सुरक्षा यंत्रणा अलर्टवर, शोधमोहिम सुरू
3
सोनमने २५ दिवसांत केला ११२ वेळा फोन, तो संजय वर्मा कोण? राजा रघुवंशी हत्या प्रकरणाला नवं वळण  
4
मुकेश अंबानींनी लावलं जबरदस्त डोकं, ५०० कोटींच्या गुंतवणूकीतून कमावले ९००० कोटी रुपये
5
पंतप्रधान नरेंद्र मोदी ३७ दिवस शांत बसले अन् आता..; मोदी-ट्रम्प चर्चेवर काँग्रेसचा निशाणा
6
खासगी टेलिकॉम कंपन्यांचे धाबे दणाणले; लवकरच सुरू होणार BSNL ची 5G सेवा; नावही ठरले...
7
करून दाखवलं! ११ व्या वर्षी लग्न... समाजासमोर 'तो' झुकला नाही, स्वप्नासाठी लढला; होणार डॉक्टर
8
BMC School: १३ वर्षांत मुंबई महापालिकेच्या १३१ मराठी शाळा बंद!
9
मुलांच्या उच्च शिक्षणाची चिंता सतावतेय? SIP, SSY आणि PPF मधून करा करोडपती होण्याची तयारी!
10
गुरुचरित्रात ‘असे’ येते गणेशाचे अद्भूत वर्णन; बाप्पाच्या महात्म्याचा संदर्भ कुठे, कसा येतो?
11
डोनाल्ड ट्रम्प यांनी विचारलं, कॅनडातून परतताना अमेरिकेत थांबू शकता? पंतप्रधान मोदींनी दिला नकार, म्हणाले...
12
'मम्मीने दरवाजा उघडला, काशी काका आता आले अन्...'; 9 वर्षाच्या मुलाने सांगितले कशी झाली बापाची हत्या?
13
'आता पुन्हा शरद पवारांकडे जायचे नाही, असं ठरवलंय'; पवारांचा निष्ठावंत दुखावला, बळीराम काका साठेंनी मन केलं मोकळं
14
Swami Samartha: 'भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे' हे स्वामींचे वचन; पण आहे 'ही' एक अट!
15
रोहित शर्माच्या पत्नीचा पाठलाग करत घरापर्यंत पोहोचला, फोटोही काढू लागला, पाहतात रितिकाचा राग अनावर, त्यानंतर...  
16
हिंदी सक्तीवरून राज ठाकरेंचं महाराष्ट्रातील शाळांच्या मुख्याध्यापकांना खुलं पत्र, वाचा जसच्या तसं...
17
कुंडलीत ‘या’ स्थानी राहु-केतु आहेत? अपार धनलाभ, भरघोस भरभराट; कुणी काही वाकडे करू शकणार नाही!
18
Mumbai: नियोजनाच्या अभावामुळे विक्रोळीत वाहतूककोंडी
19
Israel Iran War : 'मोसाद'ची नवीन खेळी!, इराण अलर्टवर, नागरिकांना मोबाईलमधून WhatsApp डिलिट करण्याचे आदेश
20
दूधवाल्याची चूक अन् छत्रपती संभाजीनगरजवळ कारसह दोन बस एकमेकांवर धडकल्या

नागरिकांच्या तक्रारींचा तातडीने निपटारा करण्याचा प्रयत्न ! - जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 8, 2018 16:12 IST

​​​​​​​वाशिम : जिल्ह्यातील नागरिकांच्या तक्रारी तातडीने निकाली काढण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात ‘ई-लोकशाही’ कक्ष स्थापन केला असून, नागरिकांनी तक्रारींचा निपटारा होण्यासाठी सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांनी सोमवारी केले. 

ठळक मुद्देनागरिकांना दूरध्वनीवरून आपली तक्रार दाखल करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात ‘ई-लोकशाही’ कक्ष सुरु करण्यात आला आहे.१०७७ या टोल फ्री क्रमांकद्वारे अथवा ०७२५२-२३११२० या दूरध्वनी क्रमांकावरून नागरिकांची तक्रार दाखल करून घेतली जाईल.. तालुकास्तरीय लोकशाही दिनात दाखल झाल्यानंतर तीन महिन्यापर्यंत निकाली न निघालेली तक्रार ई-लोकशाही कक्षात दाखल करता येईल.

वाशिम : जिल्ह्यातील नागरिकांच्या तक्रारी तातडीने निकाली काढण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात ‘ई-लोकशाही’ कक्ष स्थापन केला असून, नागरिकांनी तक्रारींचा निपटारा होण्यासाठी सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांनी सोमवारी केले. 

नागरिकांना आपल्या तक्रारी दाखल करण्यासाठी ग्रामीण भागातून जिल्हाधिकारी कार्यालयात यावे लागते. त्यामुळे त्यांचा वेळ व पैसा खर्च होतो. त्यामुळे नागरिकांना दूरध्वनीवरून आपली तक्रार दाखल करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी वाशिम जिल्हाधिकारी कार्यालयात ‘ई-लोकशाही’ कक्ष सुरु करण्यात आला आहे. प्रत्येक जिल्हास्तरीय लोकशाही दिनाच्या एकदिवस अगोदरच्या शासकीय कामकाजाच्या दिवशी सकाळी ११ ते ५ वाजेपर्यंत १०७७ या टोल फ्री क्रमांकद्वारे अथवा ०७२५२-२३११२० या दूरध्वनी क्रमांकावरून नागरिकांची तक्रार दाखल करून घेतली जाईल. त्याविषयीची आवश्यक कागदपत्रे ई-मेल अथवा ८३७९९२९४१५ या व्हाटसअप क्रमांकाद्वारे स्वीकारले जातील. तालुकास्तरीय लोकशाही दिनात दाखल झाल्यानंतर तीन महिन्यापर्यंत निकाली न निघालेली तक्रार ई-लोकशाही कक्षात दाखल करता येईल. ई-लोकशाही कक्षासाठी लवकरच नवीन संगणक प्रणाली विकसित करून त्याद्वारे संबंधित तक्रारदाराला त्याच्या तक्रार अर्जाविषयीची सद्यस्थिती मोबाईल क्रमांकावर कळविली जाणार आहे.

ई-लोकशाही कक्षात दाखल झालेली तक्रार संबंधित विभागाकडे पाठविण्यात येईल. या तक्रारींचा जलद गतीने निपटारा होण्यासाठी प्रत्येक आठवड्याला याविषयी आढावा घेण्यात येणार असल्याचे जिल्हाधिकारी श्री. मिश्रा यांनी यावेळी सांगितले. तसेच जिल्ह्यात जलयुक्त शिवार अभियान, गाळमुक्त धरण गाळयुक्त शिवार अभियान यासारख्या संरक्षित सिंचन सुविधा निर्मितीच्या योजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्यात येईल. कर्जमाफी योजना तसेच पीक कर्ज वाटपाच्या अनुषंगाने सर्व संबंधित बँकांना सूचना देण्यात आल्या असून दोन दिवसात सर्व बँक अधिकाºयांची बैठक घेऊन याबाबतचा आढावा घेणार असल्याचे जिल्हाधिकारी यावेळी म्हणाले.

टॅग्स :washimवाशिमcollectorतहसीलदार