शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
2
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
3
२६ निष्पाप लोकांना मारणारा हाशिम मुसा निघाला स्पेशल पॅरा कमांडो; हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचा सहभाग असल्याची शंका
4
भारताच्या प्रतिका रावलने एकदिवसीय क्रिकेटमध्ये रचला इतिहास, केली 'अशी' कामगिरी!
5
CMF Phone 2 Pro लाँच, किंमत एवढी स्वस्त की...; या रेंजमध्ये पहिल्यांदाच टेलिफोटो कॅमेरा सेटअप...
6
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला करतात चैत्र गौरीची पाठवणी; पण कशी? जाणून घ्या!
7
मोफत रेशनचा लाभ घेणाऱ्यांसाठी शेवटची संधी? हे काम आजच करा अन्यथा कार्डवरुन नाव वगळणार
8
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
9
मराठमोळ्या अभिनेत्रीने अमेरिकेत बनवलं पापड आणि कुरडई, व्हिडीओ केला शेअर
10
मुकेश अंबानींनी जगातील अब्जाधीशांना टाकलं मागे, एका दिवसात कमावले ₹४४,२९३ कोटी रुपये
11
Vaibhav Suryavanshi : "आई ३ तास ​​झोपायची, वडिलांनी नोकरी सोडली...", वैभव सूर्यवंशीने सांगितला IPL पर्यंतचा प्रवास
12
काश्मीरमध्ये ४८ पर्यटन स्थळे बंद; दहशतवाद्यांची घरे पाडल्यामुळे स्लिपर सेलकडून मोठ्या हल्ल्याची शक्यता
13
'फॅमिली मॅन' फेम अभिनेत्याची हत्या? मित्रांसोबत गेला होता पिकनिकला, कुटुंबियांनी व्यक्त केला संशय
14
पाकिस्तानने भारतासाठी हवाई क्षेत्र बंद केले, परंतू भारताचे वापरतोय; ते ही बंद करण्याचा विचार...
15
आप पदाधिकाऱ्याच्या मुलीचा कॅनडामध्ये संशयास्पद मृत्यू; आठवडाभरापासून होती बेपत्ता
16
"गावातल्या मुलाला आपण स्वीकारणारच नाही का?"; 'झापुक झुपूक'च्या ट्रोलिंगबद्दल केदार शिंदे स्पष्टच बोलले
17
'भालू' फेम अभिनेते, निर्माते आणि दिग्दर्शक प्रकाश भेंडे यांचं निधन
18
कॅनडामध्ये ट्रम्प विरोधाने निवडणूक फिरली; ट्रुडोंच्या पक्षाचे मार्क कार्नी नवे पंतप्रधान होणार
19
Akshaya Tritiya 2025: सोने खरेदी शक्य नाही? मग अक्षय्य तृतीयेला घरी आणा कामधेनुची मूर्ती!
20
वैभव सूर्यवंशीच्या तुफान फटकेबाजीवर बॉलिवूडकरही फिदा! युवा क्रिकेटपटूवर केला कौतुकाचा वर्षाव

बालकांमधील रक्तक्षयाचे प्रमाण कमी करण्याचा प्रयत्न!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 18, 2018 12:24 IST

वाशिम : केंद्र शासनाच्या पोषण अभियानांतर्गत ० ते ६ वर्षे वयोगटातील बालके तसेच १५ ते ४९ वर्षे वयोगटातील मुली व महिलांमधील रक्तक्षयाचे प्रमाण ९ टक्क्यांवरून ३ टक्क्यांवर आणण्याचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले आहे.

ठळक मुद्दे या अभियानाच्या पहिल्या टप्प्यात राज्यातील ३० जिल्ह्यांमध्ये वाशिमचा समावेश आहे.कमी वजनाचे असणाऱ्या बालकांचे प्रमाण ६ टक्क्यांवरून प्रतिवर्ष दोन टक्क्यांवर आणणे आदी उद्दिष्टे निश्चित करण्यात आली आहेत. विविध विभागांशी समन्वय साधून महिला व बालकल्याण विभागाला नियोजन करावे लागणार आहे.

 - संतोष वानखडेवाशिम : केंद्र शासनाच्या पोषण अभियानांतर्गत ० ते ६ वर्षे वयोगटातील बालके तसेच १५ ते ४९ वर्षे वयोगटातील मुली व महिलांमधील रक्तक्षयाचे प्रमाण ९ टक्क्यांवरून ३ टक्क्यांवर आणण्याचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले आहे. या अभियानाच्या पहिल्या टप्प्यात राज्यातील ३० जिल्ह्यांमध्ये वाशिमचा समावेश आहे.राष्ट्रीय पोषण मिशनचे नाव बदलून पोषण अभियान असे नामकरण मे २०१८ मध्ये करण्यात आले असून, राज्यातील ३० जिल्ह्यांत पोषण अभियानाची अंमलबजावणी सुरू आहे, तर उर्वरित जिल्ह्यांमध्ये २०१९-२० या आर्थिक वर्षात पोषण अभियानाची अंमलबजावणी केली जाणार आहे. या अभियानांतर्गत एकूण पाच उद्दिष्टे साधली जाणार आहेत.अंगणवाडी केंद्रातील बालकांना पोषण आहार पुरविला जातो. या अभियानांतर्गत आता महिला व बालकल्याण विभागाला अधिक सतर्क राहून उद्दिष्टपूर्तीच्या दृष्टीने विविध विभागांशी समन्वय साधून कामकाज करावे लागणार आहे. ० ते ६ वर्षे वयोगटातील बालकांमधील खुजे, बुटकेपणाचे प्रमाण हे ६ टक्क्यांवरून प्रतिवर्षे २ टक्क्यांवर आणणे, ० ते ६ वर्षे वयोगटातील बालकांमधील कुपोषणाचे प्रमाण हे ६ टक्क्यांवरून प्रतिवर्ष २ टक्क्यांवर आणणे, ६ ते ५९ महिने वयोगटातील बालकांमधील रक्तक्षयाचे प्रमाण हे ९ टक्क्यांवरून प्रतिवर्ष ३ टक्क्यांवर आणणे, १५ ते ४९ वर्षे वयोगटातील किशोरवयीन मुली व महिलांमधील रक्तक्षयाचे प्रमाण हे ९ ठक्क्यांवरून प्रतिवर्ष ३ टक्क्यांवर आणणे, जन्मत: कमी वजनाचे असणाऱ्या बालकांचे प्रमाण ६ टक्क्यांवरून प्रतिवर्ष दोन टक्क्यांवर आणणे आदी उद्दिष्टे निश्चित करण्यात आली आहेत. त्यानुषंगाने विविध विभागांशी समन्वय साधून महिला व बालकल्याण विभागाला नियोजन करावे लागणार आहे.विविध स्तरावर उपक्रम राबविण्याच्या सूचनापोषण दर्जा सुधारणे तसेच कुपोषणाचे प्रमाण कमी करण्यासाठी ठरविण्यात आलेली उद्दिष्टे साध्य करण्याकरिता विविध स्तरावर उपक्रम राबविण्याच्या सूचना शासन स्तरावरून जिल्हास्तरीय यंत्रणेला प्राप्त झालेल्या आहेत. त्यानुषंगाने शासनाकडून अंगणवाडी केंद्रांसाठी साहित्य व साधनसामग्रीदेखील टप्प्या-टप्प्याने उपलब्ध करून दिली जाणार आहे. अंगणवाडी सेविकांना मोबाइल फोन व सीमकार्ड डाटाप्लॅनसह पुरविले जाणार आहे.अंगणवाडीतील पोषण आहारासंदर्भात सर्वांना सूचना दिलेल्या आहेत. शासन परिपत्रक व वरिष्ठांच्या सूचनेनुसार वाशिम जिल्ह्यात अंमलबजावणी केली जाईल.- दीपककुमार मीणा, मुख्य कार्यकारी अधिकारी, वाशिम.

 

टॅग्स :washimवाशिम