शहरं
Join us  
Trending Stories
1
Parth Pawar Land Deal: भूखंड खरेदी प्रकरणात तिघांविरोधात गुन्हा दाखल, FIR मध्ये पार्थ पवारांचे नाव नाही 
2
प्रसिद्ध गायिका आणि अभिनेत्री सुलक्षणा पंडित यांचं निधन, मुंबईतील रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
3
Mumbai Local Accident: लोकल रेल्वेने चार प्रवाशांना उडवले, दोघे ठार; सँडहर्स्ट रोड स्थानकावरील घटना
4
...अखेर मनोहर शिंदेंनी दाखवला काँग्रेसला 'हात'! पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह जिल्हाध्यक्षांना पाठवला राजीनामा
5
पुण्यातील इंजिनिअरचे साडेनऊ तोळे सोने घेऊन पळाला, पोलिसांनी 'साशी गँग'च्या सदस्याला हरयाणात केली अटक
6
जवाहर लाल नेहरू विद्यापीठात पुन्हा 'लाल सलाम', 'अभाविप'ला झटका; चारही जागा डाव्यांनी जिंकल्या
7
'...त्याच्यामुळेच युती होऊ शकली नाही'; नितेश राणेंचं नाव घेत दीपक केसरकर स्पष्टच बोलले
8
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
9
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
10
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
11
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
12
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
13
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
14
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
15
नागपुरात सडक्या सुपारीचे दलाल परत सक्रिय, सहा हजार किलोंहून अधिक माल जप्त
16
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
17
IND A vs SA A : पंत-KL राहुलसह सारेच ढेर; नाबाद शतकासह ‘ध्रुव’ तारा चमकला
18
राहुल गांधींनी हरियाणातील ज्या भाजप नेत्याच्या पत्त्यावर 66 मतं असल्याचा दावा केला, त्याचं सत्य काय? जाणून घ्या...!
19
Travel : हिवाळ्यात फिरायला जायचा विचार करताय? दक्षिण भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट
20
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात

बालकांमधील रक्तक्षयाचे प्रमाण कमी करण्याचा प्रयत्न!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 18, 2018 12:24 IST

वाशिम : केंद्र शासनाच्या पोषण अभियानांतर्गत ० ते ६ वर्षे वयोगटातील बालके तसेच १५ ते ४९ वर्षे वयोगटातील मुली व महिलांमधील रक्तक्षयाचे प्रमाण ९ टक्क्यांवरून ३ टक्क्यांवर आणण्याचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले आहे.

ठळक मुद्दे या अभियानाच्या पहिल्या टप्प्यात राज्यातील ३० जिल्ह्यांमध्ये वाशिमचा समावेश आहे.कमी वजनाचे असणाऱ्या बालकांचे प्रमाण ६ टक्क्यांवरून प्रतिवर्ष दोन टक्क्यांवर आणणे आदी उद्दिष्टे निश्चित करण्यात आली आहेत. विविध विभागांशी समन्वय साधून महिला व बालकल्याण विभागाला नियोजन करावे लागणार आहे.

 - संतोष वानखडेवाशिम : केंद्र शासनाच्या पोषण अभियानांतर्गत ० ते ६ वर्षे वयोगटातील बालके तसेच १५ ते ४९ वर्षे वयोगटातील मुली व महिलांमधील रक्तक्षयाचे प्रमाण ९ टक्क्यांवरून ३ टक्क्यांवर आणण्याचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले आहे. या अभियानाच्या पहिल्या टप्प्यात राज्यातील ३० जिल्ह्यांमध्ये वाशिमचा समावेश आहे.राष्ट्रीय पोषण मिशनचे नाव बदलून पोषण अभियान असे नामकरण मे २०१८ मध्ये करण्यात आले असून, राज्यातील ३० जिल्ह्यांत पोषण अभियानाची अंमलबजावणी सुरू आहे, तर उर्वरित जिल्ह्यांमध्ये २०१९-२० या आर्थिक वर्षात पोषण अभियानाची अंमलबजावणी केली जाणार आहे. या अभियानांतर्गत एकूण पाच उद्दिष्टे साधली जाणार आहेत.अंगणवाडी केंद्रातील बालकांना पोषण आहार पुरविला जातो. या अभियानांतर्गत आता महिला व बालकल्याण विभागाला अधिक सतर्क राहून उद्दिष्टपूर्तीच्या दृष्टीने विविध विभागांशी समन्वय साधून कामकाज करावे लागणार आहे. ० ते ६ वर्षे वयोगटातील बालकांमधील खुजे, बुटकेपणाचे प्रमाण हे ६ टक्क्यांवरून प्रतिवर्षे २ टक्क्यांवर आणणे, ० ते ६ वर्षे वयोगटातील बालकांमधील कुपोषणाचे प्रमाण हे ६ टक्क्यांवरून प्रतिवर्ष २ टक्क्यांवर आणणे, ६ ते ५९ महिने वयोगटातील बालकांमधील रक्तक्षयाचे प्रमाण हे ९ टक्क्यांवरून प्रतिवर्ष ३ टक्क्यांवर आणणे, १५ ते ४९ वर्षे वयोगटातील किशोरवयीन मुली व महिलांमधील रक्तक्षयाचे प्रमाण हे ९ ठक्क्यांवरून प्रतिवर्ष ३ टक्क्यांवर आणणे, जन्मत: कमी वजनाचे असणाऱ्या बालकांचे प्रमाण ६ टक्क्यांवरून प्रतिवर्ष दोन टक्क्यांवर आणणे आदी उद्दिष्टे निश्चित करण्यात आली आहेत. त्यानुषंगाने विविध विभागांशी समन्वय साधून महिला व बालकल्याण विभागाला नियोजन करावे लागणार आहे.विविध स्तरावर उपक्रम राबविण्याच्या सूचनापोषण दर्जा सुधारणे तसेच कुपोषणाचे प्रमाण कमी करण्यासाठी ठरविण्यात आलेली उद्दिष्टे साध्य करण्याकरिता विविध स्तरावर उपक्रम राबविण्याच्या सूचना शासन स्तरावरून जिल्हास्तरीय यंत्रणेला प्राप्त झालेल्या आहेत. त्यानुषंगाने शासनाकडून अंगणवाडी केंद्रांसाठी साहित्य व साधनसामग्रीदेखील टप्प्या-टप्प्याने उपलब्ध करून दिली जाणार आहे. अंगणवाडी सेविकांना मोबाइल फोन व सीमकार्ड डाटाप्लॅनसह पुरविले जाणार आहे.अंगणवाडीतील पोषण आहारासंदर्भात सर्वांना सूचना दिलेल्या आहेत. शासन परिपत्रक व वरिष्ठांच्या सूचनेनुसार वाशिम जिल्ह्यात अंमलबजावणी केली जाईल.- दीपककुमार मीणा, मुख्य कार्यकारी अधिकारी, वाशिम.

 

टॅग्स :washimवाशिम