शहरं
Join us  
Trending Stories
1
कबुतरखान्यांबद्दल 'सर्वोच्च' निर्णय आला, आता सरकार काय करणार? CM फडणवीसांनी सांगितला पुढचा प्लॅन
2
Donald Trump's Tariffs : मोठी तयारी! कर लादणाऱ्या अमेरिकेला धक्का बसणार! भारत या शस्त्राचा वापर करणार
3
नाशिकमध्ये शिंदेसेनेच्या बैठकीत अहिल्यानगरचे दोन गट भिडले; शरद पवार गटाचा पदाधिकारी बैठकीत शिरल्याचा दावा
4
Bank Job: बँकेत नोकरी करण्याचे स्वप्न पूर्ण होणार; आयओबीमध्ये भरती, महाराष्ट्रासाठी 'इतक्या' जागा राखीव
5
Dadar Kabutarkhana Ban : मोठी बातमी! कबुतरखान्यांवरील बंदीबाबत सुप्रीम कोर्टाने दिला महत्वाचा निर्णय
6
Ramdas Athawale : Video - "राहुल गांधी निवडणूक आयोगाला घाबरतात, म्हणूनच ते..."; रामदास आठवलेंचा हल्लाबोल
7
अरेरेरे! तीन वर्षांच्या लेकीलाच बापाने खाऊ खातले विषारी बिस्किट; पत्नीचा पतीवर गंभीर आरोप
8
सोन्याचं नक्षीकाम, एकधारी पातं, मुल्हेरी मूठ... महाराष्ट्राने लिलावात जिंकली 'फिरंग' तलवार (PHOTOS)
9
Rahul Gandhi's Allegations Against Election Commission : 'मी सही करणार नाही, हा निवडणूक आयोगाचा डेटा..', राहुल गांधींचे प्रत्युत्तर, म्हणाले- निवडणूक आयोग दिशाभूल करतेय
10
'आम्ही अशा धमक्यांपुढे झुकणार नाही', असीम मुनीरच्या धमकीवर भारताचे सडेतोड उत्तर
11
ट्रेनच्या फूटबोर्डवर बसताच गर्दुल्ल्याचा हल्ला; तोल जाऊन खाली पडलेल्या प्रवाशाने पाय गमावला, आरोपीला अटक
12
ChatGPT चा सल्ला घेणं बेतलं जीवावर, मिठाऐवजी खाल्लं 'विष', नेमकं काय आहे हे प्रकरण?
13
शेकडो वाहनांचा ताफा, फुलांचा वर्षाव, इंग्लंड दौरा गाजवणाऱ्या आकाश दीपचं घरी जंगी स्वागत
14
लंडन: शूर मराठा सरदार रघुजी भोसले यांची ऐतिहासिक तलवार महाराष्ट्र सरकारच्या ताब्यात
15
याला म्हणतात शेअर...! 39 दिवसांपासून सातत्याने लागतंय अप्पर सर्किट, ₹63 वर आलाय भाव; करतोय मालामाल
16
भाजपच्या उपमुख्यमंत्र्यांकडेच दोन मतदान ओळखपत्र; निवडणूक आयोगाची नोटीस, बिहारमध्ये काय घडलं?
17
"माझं घर वाचवा...", कवी सौमित्र यांची मुख्यमंत्र्यांना कळकळीची विनंती, बिल्डरकडून फसवणुकीचा आरोप
18
Uddhav Thackeray: निवडणूक आयोग हे राष्ट्रपतींपेक्षाही मोठे झाले का? उद्धव ठाकरेंचा कडवट सवाल!
19
दिवसाढवळ्या बँकेवर दरोडा, बंदुकीच्या धाकावर हिसकावू लागला पैसे, पण कर्मचाऱ्यांनी हिंमत दाखवली आणि...  
20
राहुल गांधींविरोधात वक्तव्य भोवले; काँग्रेसच्या मंत्र्याला द्यावा लागला राजीनामा, नेमकं काय म्हणाले?

बीज गुणन केंद्राच्या माध्यमातून उत्पादकता वाढीचे प्रयत्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 20, 2020 15:28 IST

बीज गुणन केंद्राच्या माध्यमातून उत्पादकता वाढीचे प्रयत्न

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम:   जिल्ह्यातील प्रमुख पीक असलेल्या सोयाबीनचे अपेक्षीत प्रमाणात उत्पादन होत नसल्याने शेकºयांना फारसा फायदा होत नाही. कृषी विभाग आत्माकडून याचे निरीक्षण करण्यात आल्यानंतर सारखे एकच वाण पेरल्याने हा प्रकार घडत असल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे शेतकºयांना सोयाबीनच्या वेगवेगळ्या वाणांची माहिती देऊन सोयाबीची पिकाची उत्पादकता वाढविण्यासाठी कृषी विभागाची धडपड सुरू आहे. यासाठी आत्माच्यावतीने जिल्ह्यातील चार बीज गुणन केंद्रावर सोयाबीनच्या विविध सहा वाणांची पेरणी करून त्यांची शास्त्रशुद्ध माहिती देण्याचा प्रयत्न केला जात आहे.जिल्ह्यातील शेतकरी  अनेक वर्षांपासून सोयाबीनच्या एकाच वाणाची पेरणी करीत आहेत. त्यामुळे सोयाबीनच्या उत्पादकतेत प्रचंड घट येत आहे.  ही समस्या लक्षात घेत प्रकल्प संचालक (आत्मा) कार्यालय वाशिमकडून जिल्ह्यातील शेतकºयांना सोयाबीनच्या वेगवेगळ्या वाणांची माहिती देऊन. त्यांना आपल्या जमिनीच्या प्रकारानुसार सोयाबीन पेरणीसाठी प्रोत्साहित करण्याचा प्रयत्न केला जात आहे. यासाठी जिल्ह्यातील चार बीज गुणन केंद्रावर सोयाबीनच्या वेगवेगळ्या सहा वाणांची  बीबीएफ पद्धतीने पेरणी करून त्यांची उत्पादकता, कालावधी, तसेच किड प्रतिकार शक्तीसह इतर बाबींची पडताळणी केली जात आहे.  त्यात लवकर येणारे वाण, उशिरा येणारे वाण, पावसाचा ताण सहन करणाºया वाणांचा समावेश आहे. यामुळे  कोणतं वाण आपल्या भागांत अधिक फायदेशीर ठरेल, त्याचा अंदाज घेऊन शेतकºयांना त्याचा वाणाची निवड करता येणार आहे. विशेष म्हणजे या पद्धतीने पेरणी केल्यानंतर केवळ एकरी २० किलो बियाणे लागते. आत्माच्यावतीने या प्रयोगासाठी एमएयूस-१६२, एमएयूस-१५८, जेएस-३३५, केडीएस-७२६ आणि एमएयूएस-६१२ , जेएस-९३०५  या सहा वाणांचा आधार घेण्यात आला आहे. बीज गुणन केंद्राच्या प्रक्षेत्रावर या वाणांची पेरणी करून त्यांची उत्पादकता, कालावधी, वाण प्रसारीत झाल्याचे वर्ष आदिंची माहिती देणारे फलक लावले आहेत. या वाणांना किती शेंगा लागल्या, शेंगांची स्थिती कशी आहे, यासह इतर सर्व माहिती संबंधित बीज गुणन केंद्र प्रमुखांच्यावतीने शेतकºयांना दिली जात आहे.  सहा वाणांची विस्तृत माहिती जिल्ह्यात एकूण खरीप क्षेत्राच्या ७५ टक्के क्षेत्रावर सोयाबीन पिकाची पेरणी केली जाते. तथापि, पेरणीसाठी वारंवार एकच वाण वापरण्यात येते. त्यामुळे अपेक्षीत उत्पादन होत नाही. ही बाब लक्षात घेऊन जिल्ह्यातील कारंजा, मंगरुळपीर तालुक्यातील वाढा, रिसोड तालुक्यातील वनोजा आणि मानोरा तालुक्यातील विठोली येथील बीज गुणन केंद्राच्या प्रक्षेत्रावर सहा सोयाबीन वाणांची पेरणी करून त्यांच्या उत्पादकतेसह इतर माहिती कृषी विभागाच्यावतीने देण्यात येत असून, त्याची पाहणी करण्यासाठी अनेक शेतकरी भेटी देत आहेत.

टॅग्स :washimवाशिमAgriculture Sectorशेती क्षेत्र