शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठा-ओबीसी वाद तापला, मकरंद अनासपुरे यांची मोठी प्रतिक्रिया; सरकारले केले महत्त्वाचे आवाहन
2
मणिपूर अशांतच! आसाम रायफल्सच्या ताफ्यावर गोळीबार; दोन जवानांना हौतात्म्य, अनेक जखमी
3
मारुती व्हिक्टोरिसचं खरं माइलेज आलं समोर, 1L पेट्रोलमध्ये फक्त 'एवढंच' धावली; कंपनीनं केलाय 21Kmpl चा दावा!
4
IND vs Oman : टॉस वेळी सूर्याचा झाला 'गजनी'; मग त्याने रोहितच्या नावे फाडलं बिल! नेमकं काय घडलं?
5
जीएसटी कपातीनंतरही गाड्या स्वस्त होणार नाहीत? सणासुदीच्या काळातही डिस्काउंट नाही, 'हे' आहे कारण
6
ज्योतिरादित्य शिंदेंच्या ४०,००० कोटींच्या संपत्तीच्या वादावर मोठी अपडेट; तीन आत्यांसोबत मिळून वाद सोडवावा लागणार
7
भारताला घेरण्याचा प्रयत्न? सौदीनंतर कतार-UAE देणार पाकला साथ? MEA ची पहिली प्रतिक्रिया आली
8
२०२७ मध्ये भारताला मिळणार पहिली बुलेट ट्रेन; आतापर्यंत किती काम झाले? पाहा Video...
9
जीएसटी कपातीनंतर MRP चा गोंधळ: केंद्र सरकारचा मोठा निर्णय
10
आयटीआर भरताच आरबीआयचा मोठा निर्णय; क्रेडिट कार्डद्वारे करता येणार नाही हे काम...
11
"20 रुपयांच्या 6 ऐवजी फक्त 4 च पाणीपुरी दिल्या..."; गुजरातमध्ये भररस्त्यात महिलेनं सुरू केलं आंदोलन, अन् मग...!
12
लाडकी बहीण योजना: यापुढेही १५००₹ हवे असल्यास ‘हे’ काम करणे अनिवार्य; पाहा, संपूर्ण प्रक्रिया
13
'लवकरच व्यापार करार...', ट्रम्प टॅरिफबाबत परराष्ट्र मंत्रालयाने दिली महत्वाची माहिती
14
IND vs PAK: "जसप्रीत बुमराहला मैदानात.."; सुनील गावसकरांचा एक सल्ला, पाकिस्तानची निघाली लाज
15
“१०० वर्षे पूर्ण करणाऱ्या RSSने आता संविधान अन् गांधी विचार स्वीकारावा”: हर्षवर्धन सपकाळ
16
"सकाळी उठा, व्होटर डिलीट करा अन् पुन्हा झोपी जा...", राहुल गांधींचा ECI वर पुन्हा हल्लाबोल; BJP चा पलटवार!
17
१८ वर्षांनी पुनरावृत्ती, आता मीनाताई ठाकरे पुतळा रक्षणासाठी मोठा निर्णय; ठाकरे गट काय करणार?
18
हायव्होल्टेज ड्रामा! २० रुपयांत ६ ऐवजी दिल्या ४ पाणीपुरी; 'ती' ढसाढसा रडली, रस्त्यामध्येच बसली अन्...
19
लवकरच नवी Thar लाँच करण्याच्या तयारीत महिंद्रा, आधीच्या तुलनेत मोठे बदल होणार; जाणून घ्या, किती असणार किंमत?
20
फिटनेस मंत्र! सरळ तर सर्वच चालतात, कधीतरी उलटं चालून पाहा; फक्त ५ मिनिटंही पुरेशी

वाशिम जिल्ह्यात स्वच्छ सर्वेक्षण मोहिमेची प्रभावी जनजागृती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 27, 2019 17:44 IST

लवकरच कलापथक आणि रथयात्रेव्दारा जिल्हाभरात स्वच्छतेचा जागर केला जाणार आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : जिल्हा परिषदेच्या पाणी व स्वच्छता विभागाच्या वतीने गुरूवार, २३ आॅगस्टपासून ग्रामीण भागात स्वच्छ सर्वेक्षण मोहिमेस प्रारंभ झाला. याअंतर्गत नेमणूक करण्यात आलेल्या ११ नोडल अधिकाºयांच्या मार्गदर्शनाखाली प्रभावी जनजागृती केली जात आहे. लवकरच कलापथक आणि रथयात्रेव्दारा जिल्हाभरात स्वच्छतेचा जागर केला जाणार असल्याची माहिती मुख्य कार्यकारी अधिकारी दीपक कुमार मीना यांनी दिली.गावात शाश्वत स्वच्छता राखण्यासाठी शौचालयाचा नियमित वापर, सांडपाणी व घनकचºयाचे व्यवस्थापन होणे आवश्यक आहे. त्यानुषंगाने स्वच्छ सर्वेक्षण मोहिमेचा प्रथम टप्पा यशस्वी झाल्यानंतर आता दुसºया टप्प्यातील ‘ओडीएफ’ पडताळणी प्रक्रिया राबविण्यात येत आहे. ग्रामपंचायत स्तरावर प्राथमिक पडताळणी समिती गठीत करण्यात येऊन आली असून फेरपडताळणी देखील केली जाणार आहे. प्राथमिक पडताळणी तपासणी समितीने गावस्तरावर कशाप्रकारे पडताळणी करायची, याबाबत मार्गदर्शन करण्यासह विस्तार अधिकारी (पंचायत) हे पडताळणी प्रक्रिया सुरू असताना सनियंत्रण करणार आहेत. प्राथमिक पडताळणी तपासणी समितीमध्ये केंद्र प्रमुख, अंगणवाडी पर्यवेक्षिका, संबंधित ग्रामपंचायतींमधील एक अंगणवाडी सेविका, एक मुख्याध्यापक अथवा त्यांचे प्रतिनिधी, एक स्वच्छाग्रही, ग्रामीण पाणी पुरवठा व स्वच्छता समिती सदस्य, आशा सेविका, महिला बचत गटाची एक सदस्य, जलसुरक्षक आदींपैकी सहा सदस्य असणार आहेत. दरम्यान, या मोहिमेंतर्गत जिल्ह्यातील सर्व गावांमध्ये स्वच्छताविषयक जनजागृतीस प्रारंभ झाला असून लवकरच कलापथक आणि रथयात्रेच्या माध्यमातूनही स्वच्छतेचा जागर केला जाणार आहे. यासाठी वाशिमसह जिल्ह्यातील सहा तालुक्यांमधून ११ नोडल अधिकारी नेमण्यात आले आहेत, अशी माहिती मुख्य कार्यकारी अधिकारी मीना यांनी दिली.

टॅग्स :washimवाशिमSwachh Bharat Abhiyanस्वच्छ भारत अभियान