शहरं
Join us  
Trending Stories
1
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
2
पाकिस्तानला जाणारे असे किती पाणी रोखू शकतो भारत? सिंधू जल कराराने तीन युद्धे झेलली, पण...
3
Western Railway Megablock: पश्चिम रेल्वेवर ३५ तासांचा मेगाब्लॉक, २६ ते २८ एप्रिलदरम्यान तब्बल १६३ लोकल फेऱ्या रद्द
4
पुढील ४ दिवस 'या' बँका बंद राहणार! आरबीआयकडून ३० एप्रिलपर्यंत सुट्ट्यांची यादी जाहीर
5
"न्यूयॉर्क टाइम्स, तो दहशतवादी हल्लाच होता!’’ त्या उल्लेखावरून आघाडीच्या वृत्तपत्राला अमेरिकन सरकारने झापले  
6
बदल्याची आग पेटली! लश्कर-ए-तोयबाच्या टॉप कमांडरला भारतीय जवानांनी ठार केले
7
रेल्वे स्थानकावर ओळखीतून आठ महिन्यांच्या बाळाचे अपहरण..! रिक्षाचालकाच्या मदतीने असा उलगडला गुन्हा
8
EPFO ३ दिवसांत देणार ५ लाख रुपये, कागदपत्रांशिवायच होईल काम; काय आहे सुविधा?
9
मुलाला चांगले मार्क्स देऊन वर्गात पहिला आणतो; शिक्षकांकडून महिला पालकावर वारंवार बलात्कार
10
याचीच तर वाट पाहत होता...! आता भारताला एलओसी बंधनकारक नाही, सैन्य आरपार घुसू शकते; शिमला कराराच्या बेड्या तुटल्या
11
Navi Mumbai Crime: बेलापूरमध्ये विकासकाने घरातच गोळी झाडून केली आत्महत्या, प्रकरण काय?
12
टॅरिफमुळे जागतिक व्यापार घसरणार; जागतिक व्यापार संघटनेने व्यक्त केली भीती
13
ISI ची साथ, ५ दहशतवाद्यांना घेऊन सैफुल्लाहनं रचला कट; पहलगाम हल्ल्यात पाकचा बुरखा फाटला
14
Shakti Dubey : शाब्बास पोरी! ४ वेळा अपयश अन् पाचव्या प्रयत्नात 'नंबर वन'; शक्ती दुबेची अभिमानास्पद कामगिरी
15
भारतात पाकिस्तानी डिग्री अवैध, तरीही एवढे भारतीय विद्यार्थी शिक्षण घेतायत; ना मिळणार नोकरी, ना उच्चशिक्षण... 
16
Pahalgam Terror Attack : "विनय नरवाल यांच्या पत्नीला खोटं सांगितलं की ते जिवंत आहेत, त्यानंतर मी खूप वेळा रडलो"
17
Swami Samartha: स्वामी पुण्यतिथीनिमित्त जाणून घ्या स्वामींनी भक्तांना दिलेला आदेश, उपासना आणि संकल्प!
18
जागतिक बाजारपेठेत तेजी असूनही भारतीय शेअर बाजार का कोसळला? 'ही' आहेत ३ मोठी कारणे
19
"पीडितांना सतत तेच बोलायला लावणं क्लेशदायक आहे", मीडिया आणि राजकारण्यांवर संतापली मराठी अभिनेत्री
20
Gensol Engineering च्या प्रमोटरना ईडीनं घेतलं ताब्यात, फंड डायव्हर्जन प्रकरणी मोठी कारवाई

वाशिममध्ये महिलांसाठी राबविला जातोय ई-लोकशाही दिन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 15, 2018 17:44 IST

महिला व बालविकास विभागाने ई-लोकशाही दिनाचे दालन खुले करून दिले असून त्यास महिलांकडूनही प्रतिसाद मिळत असल्याची माहिती प्रकल्प अधिकारी सुभाष राठोड यांनी सोमवारी दिली.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : ग्रामीण भागातील शेवटच्या घटकातील महिलेस तिच्यावर होत असलेल्या अन्याय-अत्याचाराची तक्रार करता यावी आणि यासाठी प्रशासकीय कार्यालयात येण्याची गरज तिला भासू नये, या उद्देशाने वाशिम जिल्ह्यातील सर्वच तालुक्यांमध्ये महिला व बालविकास विभागाने ई-लोकशाही दिनाचे दालन खुले करून दिले असून त्यास महिलांकडूनही प्रतिसाद मिळत असल्याची माहिती प्रकल्प अधिकारी सुभाष राठोड यांनी सोमवारी दिली.प्रत्येक महिन्याच्या पहिल्या सोमवारी तालुकास्तरावर; तर तिसºया सोमवारी जिल्हास्तरावर महिला लोकशाही दिनाचे आयोजन केले जाते. मात्र, ग्रामीण भागातील महिलांना आपल्या तक्रारी, गाºहाणे लिखीत स्वरूपात मांडण्यासाठी प्रशासकीय कार्यालयांमध्ये वारंवार चकरा मारणे परवडत नाही. त्यामुळेच महिला लोकशाही दिनाच्या उपक्रमास पिडित महिलांकडून म्हणावा तसा प्रतिसाद मिळत नव्हता. ही बाब लक्षात घेवून जिल्ह्यातील महिलांकरिता ई- लोकशाही दिनाचे दालन खुले करून देत सेतू सुविधा केंद्रांमार्फत महिलांना तक्रारी सादर करण्याची सोय उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्याचा परिणामकारक फायदा होत असून गेल्या दोन महिन्यात यामाध्यमातून अनेक पिडित महिलांनी प्रशासनाकडे स्वयंस्फूर्तीने तक्रारी दाखल केल्या आहेत. त्यांच्या समस्यांचे निराकरणही विनाविलंब केले जात असल्याची माहिती वाशिम येथील महिला व बालविकास प्रकल्प अधिकारी सुभाष राठोड यांनी दिली.

टॅग्स :washimवाशिमWashim Collector officeवाशिम जिल्हाधिकारी कार्यालय