शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
6
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
7
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
8
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
9
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
10
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
11
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
12
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
13
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
14
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
15
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
16
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
17
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
18
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
19
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
20
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  

कंकरवाडी आणि बोरखेडी येथे ग्रामस्थांसाठी खोदल्या कूपनलिका 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 31, 2018 14:52 IST

रिसोड : तालुक्यातील कंकरवाडी आणि बोरखेडी येथे निर्माण झालेली पाणीटंचाई लक्षात घेत. भाजयुमोचे जिल्हा सरचिटणीस  सुनिल कायंदे यांनी दोन्ही गावांत स्वखर्चाने कूपनलिका खोदून ग्रामस्थांला पाणीटंचाईच्या काळात मोठा दिलासा दिला आहे.

ठळक मुद्देसुनिल कायंदे यांनी दोन्ही गावांत स्वखर्चाने कूपनलिका खोदून ग्रामस्थांला पाणीटंचाईच्या काळात मोठा दिलासा दिला आहे. यापुर्वी त्यांनी कंकरवाडी येथे टँकरद्वारे मोफत पाणी पुरवठाही सुरू केला आहे.   पाणीटंचाईने त्रस्त असलेल्या हजारो ग्रामस्थांना त्यांच्या या सेवाभावी उपक्रमाचा मोठा दिलासा मिळू शकणार आहे. 

 

रिसोड : तालुक्यातील कंकरवाडी आणि बोरखेडी येथे निर्माण झालेली पाणीटंचाई लक्षात घेत. भाजयुमोचे जिल्हा सरचिटणीस  सुनिल कायंदे यांनी दोन्ही गावांत स्वखर्चाने कूपनलिका खोदून ग्रामस्थांला पाणीटंचाईच्या काळात मोठा दिलासा दिला आहे. त्याशिवाय भर जहागीर येथेही कूपनलिका खोदण्याचा मानस त्यांनी व्यक्त केला आहे.  कंकरवाडी आणि बोरखेडी येथे पाण्याची भीषण टंचाई आहे. आजुबाजुला पाण्याची कुठेही सोय उपलब्ध नसल्यामुळे ग्रामस्थांना मोठ्या प्रमाणात पाणी टंंचार्इृचा सामना करावा लागतो. टँकर सुरू करण्याची मागणी असतानाही, हा प्रश्न सुटू शकला नाही. पाणीटंचाईच्या काळात सरकारी मदत  न मिळाल्यामुळे गावकºयांची गरज लक्षात घेऊन कायंदे यांनी दोन्ही गावांत स्वखर्चाने कूपनलिका खोदली असूून, यावर हातपंप बसविण्यात येणार आहे.  कंकरवाडी गावाची लोकसंख्या सुमारे सात हजार असून, बोरखेडीची लोकसंख्याही सहा हजार आहे. या दोन्ही गावांत पाणीटंचाई निर्माण झाली असून, ग्रामस्थांचे पाण्याअभावी मोठे हाल होत आहेत.    दुष्काळी परिस्थितीत परिसरात जलस्त्रोत आटल्याने ग्रामस्थांना विकतच्या पाण्याने गरजा भागवाव्या लागत आहेत.  आता  कायंदे यांनी दोन्ही गावांत कूपनलिकांवर हातपंप बसविण्यात येणार असल्याने सामान्य जनतेला मोठा दिलासा मिळणार आहे. यापुर्वी त्यांनी कंकरवाडी येथे टँकरद्वारे मोफत पाणी पुरवठाही सुरू केला आहे.  आता भर जहाँगिर येथेही त्यांनी कंकरवाडी आणि बोरखेडीप्रमाणेच ग्रामस्थांच्या सोयीसाठी स्वखर्चातून कूपनलिका खोदण्याची तयारी केली असून, येत्या काही दिवसांतच हे काम पूर्ण करण्यात येणार आहे. या तिन्ही गावांतील कूपनलिकांवर ते स्वखर्चाने हातपंपह बसविणार आहेत. त्याशिवाय तालुक्यातील ज्या गावांना  पाणी टंचाईचा सामना करावा लागत आहे. त्या गावांतही मोफत पाणी पुरवठा करण्याचा मानस त्यांनी व्यक्त केला आहे. पाणीटंचाईने त्रस्त असलेल्या हजारो ग्रामस्थांना त्यांच्या या सेवाभावी उपक्रमाचा मोठा दिलासा मिळू शकणार आहे. 

टॅग्स :washimवाशिमRisodरिसोड