शहरं
Join us  
Trending Stories
1
Pune Crime: 'किती मुलांसोबत झोपलात?', कोथरुडमधील प्रकरण; रोहित पवार 'त्या' तरुणींसह पोलीस आयुक्तालयात, काय घडलं?
2
IND vs ENG 5th Test Day 4 Stumps : कोण जिंकणार? 'दिल अन् दिमाग' यांची 'टेस्ट' घेणाऱ्या प्रश्नासह थांबला खेळ
3
भगवा दहशतवादी असेल, तर तुम्ही त्याची पूजा करणार का?; शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांचा सवाल
4
IND vs ENG : टेस्टमध्ये ट्विस्ट; खांदा बांधून बसलेला क्रिस वोक्स एका हाताने बॅटिंग करण्याच्या तयारीत
5
मुलींवर हात टाकणाऱ्यांना हातपाय तोडून पोलिसांकडे दिले पाहिजे; अमित ठाकरे यांचे विधान
6
हा दरोडा भारतातील सर्वात मोठा होता; एका रात्रीत ८० किलो सोने गेले होते चोरीला
7
विमानतळावर मारहाण करणाऱ्या लष्करी अधिकाऱ्याच्या अडचणी वाढणार! भारतीय लष्कराने निवेदन प्रसिद्ध केले
8
महादेवी हत्तीण वनतारामधून परत आणणार?  मुख्यमंत्र्यांनी ५ ऑगस्टला बोलावली बैठक, फडणवीसांनी सांगितला पुढचा प्लॅन
9
Joe Root Century : शतक साजरे करताच हेल्मट काढलं अन् Headband बांधला; जो रुटनं असं का केलं?
10
पत्नी आजारी म्हणून लिव्ह इनमध्ये राहू लागला अन् प्रेयसीनेच केली हत्या; दोघांमध्ये कशावरून बिनसलं?
11
युगेंद्र पवार-तनिष्का कुलकर्णींचा मुंबईत झाला साखरपुडा, कोण आहेत तनिष्का?
12
IND vs ENG : ...अन् सिराजनं कॅच घेऊन दिलेला 'तो' सिक्सर Harry Brook नं सेंच्युरीत बदलला!
13
एका फिचरमुळे ChatGPT चॅट्स लीक होण्याचा धोका! गुगल सर्चमध्ये खाजगी गोष्टी दिसतात?
14
"लोकांचा सहभाग वाढवून...", उद्योजकांसमोर नितीन गडकरींनी मांडले गांधी-नेहरूंचे विचार; नागपूरमध्ये काय बोलले?
15
IND vs ENG : जो रुटनं साधला मोठा डाव! WTC मध्ये ६००० धावांचा पल्ला गाठणारा ठरला पहिला फलंदाज
16
कोल्हापुरात १९३१ मध्ये होते त्याच जुन्या सर्वोच्च न्यायालयाच्या इमारतीत नवे सर्किट बेंच
17
संजय शिरसाटांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून पाठराखण; म्हणाले, "मंत्री कधी कधी..."
18
धक्कादायक! मित्रांनी केला मित्राचा घात, बाकाचा वाद बेतला जीवावर; अल्पवयीन गुन्हेगारीचा प्रश्न पुन्हा गंभीर
19
VIDEO : इथंही सिराज ठरला कमनशिबी! हॅरी ब्रूकचा कॅच घेतला; पण सीमारेषेवर अंदाज चुकला अन्...
20
विमानतळावर लष्करी अधिकाऱ्याची गुंडगिरी, स्पाइसजेट कर्मचाऱ्यांना मारहाण; पाठीचा कणा फ्रॅक्चर झाला

कंकरवाडी आणि बोरखेडी येथे ग्रामस्थांसाठी खोदल्या कूपनलिका 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 31, 2018 14:52 IST

रिसोड : तालुक्यातील कंकरवाडी आणि बोरखेडी येथे निर्माण झालेली पाणीटंचाई लक्षात घेत. भाजयुमोचे जिल्हा सरचिटणीस  सुनिल कायंदे यांनी दोन्ही गावांत स्वखर्चाने कूपनलिका खोदून ग्रामस्थांला पाणीटंचाईच्या काळात मोठा दिलासा दिला आहे.

ठळक मुद्देसुनिल कायंदे यांनी दोन्ही गावांत स्वखर्चाने कूपनलिका खोदून ग्रामस्थांला पाणीटंचाईच्या काळात मोठा दिलासा दिला आहे. यापुर्वी त्यांनी कंकरवाडी येथे टँकरद्वारे मोफत पाणी पुरवठाही सुरू केला आहे.   पाणीटंचाईने त्रस्त असलेल्या हजारो ग्रामस्थांना त्यांच्या या सेवाभावी उपक्रमाचा मोठा दिलासा मिळू शकणार आहे. 

 

रिसोड : तालुक्यातील कंकरवाडी आणि बोरखेडी येथे निर्माण झालेली पाणीटंचाई लक्षात घेत. भाजयुमोचे जिल्हा सरचिटणीस  सुनिल कायंदे यांनी दोन्ही गावांत स्वखर्चाने कूपनलिका खोदून ग्रामस्थांला पाणीटंचाईच्या काळात मोठा दिलासा दिला आहे. त्याशिवाय भर जहागीर येथेही कूपनलिका खोदण्याचा मानस त्यांनी व्यक्त केला आहे.  कंकरवाडी आणि बोरखेडी येथे पाण्याची भीषण टंचाई आहे. आजुबाजुला पाण्याची कुठेही सोय उपलब्ध नसल्यामुळे ग्रामस्थांना मोठ्या प्रमाणात पाणी टंंचार्इृचा सामना करावा लागतो. टँकर सुरू करण्याची मागणी असतानाही, हा प्रश्न सुटू शकला नाही. पाणीटंचाईच्या काळात सरकारी मदत  न मिळाल्यामुळे गावकºयांची गरज लक्षात घेऊन कायंदे यांनी दोन्ही गावांत स्वखर्चाने कूपनलिका खोदली असूून, यावर हातपंप बसविण्यात येणार आहे.  कंकरवाडी गावाची लोकसंख्या सुमारे सात हजार असून, बोरखेडीची लोकसंख्याही सहा हजार आहे. या दोन्ही गावांत पाणीटंचाई निर्माण झाली असून, ग्रामस्थांचे पाण्याअभावी मोठे हाल होत आहेत.    दुष्काळी परिस्थितीत परिसरात जलस्त्रोत आटल्याने ग्रामस्थांना विकतच्या पाण्याने गरजा भागवाव्या लागत आहेत.  आता  कायंदे यांनी दोन्ही गावांत कूपनलिकांवर हातपंप बसविण्यात येणार असल्याने सामान्य जनतेला मोठा दिलासा मिळणार आहे. यापुर्वी त्यांनी कंकरवाडी येथे टँकरद्वारे मोफत पाणी पुरवठाही सुरू केला आहे.  आता भर जहाँगिर येथेही त्यांनी कंकरवाडी आणि बोरखेडीप्रमाणेच ग्रामस्थांच्या सोयीसाठी स्वखर्चातून कूपनलिका खोदण्याची तयारी केली असून, येत्या काही दिवसांतच हे काम पूर्ण करण्यात येणार आहे. या तिन्ही गावांतील कूपनलिकांवर ते स्वखर्चाने हातपंपह बसविणार आहेत. त्याशिवाय तालुक्यातील ज्या गावांना  पाणी टंचाईचा सामना करावा लागत आहे. त्या गावांतही मोफत पाणी पुरवठा करण्याचा मानस त्यांनी व्यक्त केला आहे. पाणीटंचाईने त्रस्त असलेल्या हजारो ग्रामस्थांना त्यांच्या या सेवाभावी उपक्रमाचा मोठा दिलासा मिळू शकणार आहे. 

टॅग्स :washimवाशिमRisodरिसोड