शहरं
Join us  
Trending Stories
1
पहिली ते चौथी हिंदी भाषा नको, अजित पवारांची स्पष्ट भूमिका; एकनाथ शिंदेंचं मौन, भाजपामुळे होतेय कोंडी?
2
कोलकाता हादरलं! लॉ कॉलेजमधील विद्यार्थीनीवर सामूहिक अत्याचार, तीन आरोपींना अटक
3
वृद्ध महिलांना बांधून ठेवलं, पुरुषांच्या अंगावर कपडेही नाहीत! आश्रमातील धक्कादायक प्रकार उघड
4
मास्क लावून नको त्या खासगी क्षणाचे करायचे 'लाईव्ह स्ट्रिमिंग'; जोडप्याला पोलिसांनी केली अटक
5
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
6
महाराष्ट्रातील खासदाराच्या ड्रायव्हरला १५० कोटी रुपयांची जमीन कोणी भेट दिली?,चौकशी सुरू
7
एकाच दिवसात या शेअरमध्ये ६२० रुपयांची तेजी, ब्रोकरेजनं दिलं ₹२१,४०९ चं टार्गेट; तुमच्याकडे आहे का?
8
हे आहेत अंतराळात सर्वाधिक दिवस घालवणारे अंतराळवीर; जाणून घ्या पहिल्या क्रमांकावर कोण..?
9
कर्नाटकात वाघीण अन् तिच्या ४ बछड्यांचा दुर्दैवी मृत्यू; विष देऊन मारल्याला संशय
10
भाविकांसाठी आनंदवार्ता! आषाढी यात्रेनिमित्त विठुरायाचं २४ तास दर्शन सुरू
11
"एक-दोन नव्हे, माझ्या जावयाच्या १२ गर्लफ्रेंड"; पत्नीला संपवणाऱ्या पतीची सासूने केली पोलखोल
12
Jio-Blackrock ला मिळाला ब्रोकिंग लायसन्स; अंबानींच्या या कंपनीचे शेअर्स सुस्साट, तुमच्याकडे आहे का?
13
"चौथीपर्यंत हिंदी लादणं योग्य नाही, पण देशात ५० टक्के लोक हिंदीत बोलतात, त्यामुळे...’’ शरद पवारांनी मांडलं स्पष्ट मत  
14
ब्रिटनचे मालवाहू विमान भारताकडे झेपावले, युद्धनौका समुद्रात नांगर टाकून; लढाऊ विमान दुरुस्तीसाठी ४० अभियंते येणार...
15
ना नतांज, ना फोर्डो...! इस्रायलच्या नादात अमेरिकाही फसली? इराणने चकवत दुसरीकडेच सिक्रेट अण्वस्त्र अड्डा बनविलेला...
16
एवढे कोणीच करत नाही, पण ग्रुपने रतन टाटांचा वारसा जपला; मृतांच्या कुटुंबीयांसाठी ट्रस्ट स्थापणार
17
शिखर धवन लपून छपून गर्लफ्रेंडला टीम इंडियाच्या हॉटेल रुममध्ये आणायचा! रोहितनं केली होती तक्रार
18
Jagannath Yatra 2025 : जगन्नाथाच्या गाभाऱ्यात समुद्राची गाज अडवण्यास हनुमंत ठरले कारणीभूत!
19
"राजकारणात फक्त आशिष शेलारांना ओळखते..."; ठाकरे बंधूंच्या मराठी मोर्चावर आशा भोसले काय म्हणाल्या?
20
तुम्ही ज्या विमानातून प्रवास करणार, ते किती जुने? सर्व्हिसिंग कधी केलेली? अशाप्रकारे जाणून घ्या...

पाणी टंचाईमुळे जनतेचे हाल

By admin | Updated: April 30, 2015 01:47 IST

पाण्यासाठी भटकंती; ११ गावात टँकरने पाणीपुरवठा.

वाशिम: जिल्हय़ात उद्भवणारी पाणीटंचाई लक्षात घेता त्यावर उपाययोजना करण्यासाठी पाणीटंचाई आराखड्यानुसार जानेवारी २0१५ ते जून २0१५ या सहा महिन्यांमध्ये जिल्हय़ातील ४३९ गावांमध्ये ६0१ विविध उपाययोजना राबविण्यात येणार आहेत. त्यासाठी एकूण ५ कोटी ४७ लाख ९८ हजार रुपयांचा निधी खर्च केला जाणार असला तरी जिल्हय़ात आज घडीला जाणवत असलेल्या तीव्र पाणी टंचाईला जिल्हावासीयांना सामोरे जाण्याची वेळ आली आहे. जिल्हय़ात खेड्या पाड्यात, रानात जावून ग्रामस्थांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत असताना पाहिजे त्या प्रमाणात उपाययोजना प्रशासनाच्यावतीने झालेल्या दिसून येत नाहीत. जिल्हय़ातील तहसीलदारांकडून प्राप्त माहितीनुसार ११ गावात टँकरने पाणी पुरवठा तर ४१ गावात विहीर अधिग्रहण केल्याची माहिती २९ एप्रिलला दिली. जिल्हय़ातील १0८ गावांमधील १0९ विहिरींचे खोलीकरण करण्याच्या कामास आराखड्यात समावेश करण्यात आला हो ता. तसेच जिल्हय़ातील २७९ गावांमधील २८४ खासगी विहिरी अधिग्रहित केल्या जाणार होत्या; मात्र २९ एप्रिलपर्यंत ४१ विहिरीच अधिग्रहीत करण्यात आल्या आहेत. यामध्ये मंगरूळपीर तालुक्यातील १८, कारंजा तालुक्यातील ७, रिसोड तालु क्यातील १0, मालेगाव व मानोरा तालुक्यातील प्रत्येकी ४ व वाशिम तालुक्यातील ८ विहिरींचा समावेश आहे. टंचाई काळा त पाणीपुरवठा करण्यासाठी टँकरचाही आधार घेतला जाणार असल्याचे आराखडयात होते. ९३ गावांकरिता ९५ टँकर सुरू करण्यात येणार होते; मात्र प्रस्तावच न आल्याने केवळ जिल्हय़ात ११ टँकरने पाणीपुरवठा केल्या जात आहे. मालेगाव येथे १0 टँकरचे प्रस्ताव सादर असून, अद्याप एकही सुरू करण्यात आला नाही. आराखड्यानुसार सर्वाधिक २५ टँकर मालेगाव तालुक्यात सुरू केले जाणार होते. मालेगाव तालुक्यात १0 गावातील टँकरचे प्रस्ताव तर मालेगाव शहरात ६ टँकर सुरू करण्याचे प्रस्ताव आल्यानंतरही तालुक्यात एकही टँकर सुरू करण्यात आला नाही. वाशिम तालुक्यातील माळेगाव येथे एका गावात टँकर सुरू करण्यात आला आहे. मंगरूळपीर तालुक्यात ५, कारंजा तालुक्यात १, रिसोड तालुक्यात १ , मानोरा तालुक्यात ३ टँकर सुरू करण्यात आले आहेत.