शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बोलावली महत्त्वाची बैठक; ७ केंद्रीय मंत्री राहणार उपस्थित
2
राष्ट्राध्यक्ष पुतिन यांचा PM मोदींना फोन; अलास्कामध्ये ट्रम्प यांच्याशी झालेल्या चर्चेची दिली माहिती
3
बंगाली स्थलांतरितांनी घरी परतावं, दरमहिना ५ हजार देऊ; CM ममता बॅनर्जी यांची मोठी घोषणा
4
Thane Rain Alert: ठाण्याला अतिवृष्टीचा इशारा; महापालिकेने शाळा-महाविद्यालयांबद्दल घेतला निर्णय
5
वाल्मीक कराडच्या वकिलाने १ तास ४५ मिनिटे युक्तीवाद केला; उज्ज्वल निकम म्हणतात...
6
Airtel Down! कॉल आणि इंटरनेटवर परिणाम; हजारो युजर्सनी नोंदवल्या तक्रारी
7
आता Zepto वर १० मिनिटांत मिळणार प्लॉट? 'या' रिअल इस्टेट कंपनीसोबत केला मोठा करार
8
'वरण भात म्हणजे गरिबांचं जेवण', विवेक अग्निहोत्रींच्या वक्तव्यावर मराठी अभिनेत्रीचा संताप
9
प्रीमियम लक्झरीमध्ये 'स्पोर्टी' टच! टोयोटा कॅमरीची नवीन 'स्प्रिंट एडिशन' भारतात लॉन्च
10
Sarfaraz Khan Century : ज्याला टीम इंडियातून बाहेर काढलं; त्या पठ्ठ्यानं संधी मिळताच शतक ठोकलं
11
Vladimir Putin High-Level Security : पुतिन यांची 'विष्ठा'ही परत नेली रशियात, अलास्काच्या दौऱ्यात लघवीसाठी होती खास सुटकेस; कारण...
12
'त्यांचा दीर्घ अनुभव देशाच्या कामी येणार', सीपी राधाकृष्णन यांच्या भेटीनंतर PM मोदींची प्रतिक्रिया
13
Maharashtra Rain: अचानक इतका पाऊस का पडतोय? अजून किती दिवस पावसाचा जोर कायम राहणार?
14
पोलीस कॉन्स्टेबलचा पत्नी-मुलावर तलवारीनं हल्ला; मग स्वत: धावत्या ट्रेनसमोर घेतली उडी, त्यानंतर...
15
CCTV देणं प्रायव्हेसी उल्लंघन कसं?; दिल्लीत पत्रकार परिषद घेत विरोधकांचा ECI वर हल्लाबोल
16
सलग ४३ व्या दिवशी 'या' शेअरला अपर सर्किट; किंमत ₹१०० पेक्षाही कमी, २ महिन्यांत केलं मालामाल
17
Aja Eakadashi 2025: श्रावणातले अजा एकादशीचे लाभदायी व्रत; का आणि कसे करावे? वाचा!
18
लेकी- सुनांवर अन्याय करणाऱ्यांना इथून पुढे...; महिलांच्या संरक्षणासाठी शिंदेंनी उचलला विडा
19
उपराष्ट्रपतीपदासाठी विरोधक तामिळनाडूचाच उमेदवार देणार; ठरल्यात जमा, बलाबल काय...
20
आर्यन खानच्या 'बॅड्स ऑफ बॉलिवूड'मध्ये दिसणारी अभिनेत्री कोण? सनी देओलशी आहे कनेक्शन

पाणी टंचाईमुळे जनतेचे हाल

By admin | Updated: April 30, 2015 01:47 IST

पाण्यासाठी भटकंती; ११ गावात टँकरने पाणीपुरवठा.

वाशिम: जिल्हय़ात उद्भवणारी पाणीटंचाई लक्षात घेता त्यावर उपाययोजना करण्यासाठी पाणीटंचाई आराखड्यानुसार जानेवारी २0१५ ते जून २0१५ या सहा महिन्यांमध्ये जिल्हय़ातील ४३९ गावांमध्ये ६0१ विविध उपाययोजना राबविण्यात येणार आहेत. त्यासाठी एकूण ५ कोटी ४७ लाख ९८ हजार रुपयांचा निधी खर्च केला जाणार असला तरी जिल्हय़ात आज घडीला जाणवत असलेल्या तीव्र पाणी टंचाईला जिल्हावासीयांना सामोरे जाण्याची वेळ आली आहे. जिल्हय़ात खेड्या पाड्यात, रानात जावून ग्रामस्थांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत असताना पाहिजे त्या प्रमाणात उपाययोजना प्रशासनाच्यावतीने झालेल्या दिसून येत नाहीत. जिल्हय़ातील तहसीलदारांकडून प्राप्त माहितीनुसार ११ गावात टँकरने पाणी पुरवठा तर ४१ गावात विहीर अधिग्रहण केल्याची माहिती २९ एप्रिलला दिली. जिल्हय़ातील १0८ गावांमधील १0९ विहिरींचे खोलीकरण करण्याच्या कामास आराखड्यात समावेश करण्यात आला हो ता. तसेच जिल्हय़ातील २७९ गावांमधील २८४ खासगी विहिरी अधिग्रहित केल्या जाणार होत्या; मात्र २९ एप्रिलपर्यंत ४१ विहिरीच अधिग्रहीत करण्यात आल्या आहेत. यामध्ये मंगरूळपीर तालुक्यातील १८, कारंजा तालुक्यातील ७, रिसोड तालु क्यातील १0, मालेगाव व मानोरा तालुक्यातील प्रत्येकी ४ व वाशिम तालुक्यातील ८ विहिरींचा समावेश आहे. टंचाई काळा त पाणीपुरवठा करण्यासाठी टँकरचाही आधार घेतला जाणार असल्याचे आराखडयात होते. ९३ गावांकरिता ९५ टँकर सुरू करण्यात येणार होते; मात्र प्रस्तावच न आल्याने केवळ जिल्हय़ात ११ टँकरने पाणीपुरवठा केल्या जात आहे. मालेगाव येथे १0 टँकरचे प्रस्ताव सादर असून, अद्याप एकही सुरू करण्यात आला नाही. आराखड्यानुसार सर्वाधिक २५ टँकर मालेगाव तालुक्यात सुरू केले जाणार होते. मालेगाव तालुक्यात १0 गावातील टँकरचे प्रस्ताव तर मालेगाव शहरात ६ टँकर सुरू करण्याचे प्रस्ताव आल्यानंतरही तालुक्यात एकही टँकर सुरू करण्यात आला नाही. वाशिम तालुक्यातील माळेगाव येथे एका गावात टँकर सुरू करण्यात आला आहे. मंगरूळपीर तालुक्यात ५, कारंजा तालुक्यात १, रिसोड तालुक्यात १ , मानोरा तालुक्यात ३ टँकर सुरू करण्यात आले आहेत.