शहरं
Join us  
Trending Stories
1
'काळजी करू नका; तुम्हाला जे हवे, तेच होणार', पहलगामबाबत राजनाथ सिंह यांचे सूचक विधान
2
कुख्यात नक्षलवाद्याला दहशतवाद विरोधी पथकाने केली अटक, ६-७ वर्षांपासून होता फरार
3
PBKS vs LSG : बॅटिंग-बॉलिंगमध्ये 'सिंग इज किंग शो'; पंतच्या लखनौसमोर श्रेयस अय्यरच्या पंजाबचा 'भांगडा'
4
"...त्यासाठी सुंदर महिलांना अमेरिकेत पाठवा’’, ज्येष्ठ पत्रकाराचा पाकिस्तानला अजब सल्ला, आता होतेय टीका   
5
सीमेवर तणाव, त्यात पाकिस्तानच्या या मित्रदेशाने थेट कराचीला पाठवली युद्धनौका, कारण काय?
6
विमानतळावर उतरताना भिंतीवर आदळले विमान, वैमानिकाने उडी मारून वाचवले प्राण
7
नागपुरात शिंदेसेनेच्या पदाधिकाऱ्याविरोधात विनयभंग, फसवणुकीचा गुन्हा दाखल
8
पाच लग्नं केली, सहाव्याच्या तयारीत होता, पण पीडित पत्नीने घेतली पोलिसांत धाव, पोलिसाचाच कारनामा झाला उघड
9
सेंच्युरी हुकली; फिफ्टी प्लस धावसंख्येसह प्रभसिमरन याने साधला मोठा डाव; गेलच्या विक्रमाशी बरोबरी
10
मोदी पहलगाममधील दहशतवाद्यांना धडा कधी शिकवणार? काँग्रेस नेत्याचा सवाल, राफेलला म्हटलं खेळणं  
11
अजिंक्य रहाणेनं घेतलेला कॅच भारीच! याशिवाय या दोन गोष्टींची रंगली चर्चा (VIDEO)
12
चार पैकी दोन दहशतवादी काश्मिरी, पर्यटकांशी मैत्री केली आणि..., पहलगाम हल्ल्याबाबत सर्वात मोठा गौप्यस्फोट  
13
KKR vs RR : "हम तो डूबे हैं सनम तुम को भी ले डूबेंगे..." गाणं वाजलंच होतं, पण कॅसेट गुंडाळलं अन्...
14
परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी चालवली रिक्षा
15
IPL 2025 : रियान परागचा मोठा पराक्रम; ६ चेंडूत सलग ६ षटकार मारत सेट केला नवा रेकॉर्ड
16
IND W vs SL W: श्रीलंकेच्या नीलाक्षी दा सिल्वाचं वादळी अर्धशतक; भारताचा तीन विकेट्सने पराभव
17
तेल अवीव विमानतळाजवळ क्षेपणास्त्र हल्ला; दिल्लीहून इस्रायलला जाणारे एअर इंडियाचे विमान वळवले
18
१५ दिवसांपूर्वीच दुकान सुरु केले अन् हल्ल्याच्याच दिवशी गायब झाला; पहलगाममध्ये NIA कडून एकाची चौकशी
19
'आम्हाला मित्रांची गरज आहे, उपदेश देणाऱ्यांची नाही', जयशंकर यांनी युरोपला खडसावले...
20
HSC Result 2025: १२ वीच्या निकालाची प्रतिक्षा संपली; उद्या दुपारी होणार जाहीर, कुठे व कसा पहाल? जाणून घ्या

पाणी टंचाईमुळे जनतेचे हाल

By admin | Updated: April 30, 2015 01:47 IST

पाण्यासाठी भटकंती; ११ गावात टँकरने पाणीपुरवठा.

वाशिम: जिल्हय़ात उद्भवणारी पाणीटंचाई लक्षात घेता त्यावर उपाययोजना करण्यासाठी पाणीटंचाई आराखड्यानुसार जानेवारी २0१५ ते जून २0१५ या सहा महिन्यांमध्ये जिल्हय़ातील ४३९ गावांमध्ये ६0१ विविध उपाययोजना राबविण्यात येणार आहेत. त्यासाठी एकूण ५ कोटी ४७ लाख ९८ हजार रुपयांचा निधी खर्च केला जाणार असला तरी जिल्हय़ात आज घडीला जाणवत असलेल्या तीव्र पाणी टंचाईला जिल्हावासीयांना सामोरे जाण्याची वेळ आली आहे. जिल्हय़ात खेड्या पाड्यात, रानात जावून ग्रामस्थांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत असताना पाहिजे त्या प्रमाणात उपाययोजना प्रशासनाच्यावतीने झालेल्या दिसून येत नाहीत. जिल्हय़ातील तहसीलदारांकडून प्राप्त माहितीनुसार ११ गावात टँकरने पाणी पुरवठा तर ४१ गावात विहीर अधिग्रहण केल्याची माहिती २९ एप्रिलला दिली. जिल्हय़ातील १0८ गावांमधील १0९ विहिरींचे खोलीकरण करण्याच्या कामास आराखड्यात समावेश करण्यात आला हो ता. तसेच जिल्हय़ातील २७९ गावांमधील २८४ खासगी विहिरी अधिग्रहित केल्या जाणार होत्या; मात्र २९ एप्रिलपर्यंत ४१ विहिरीच अधिग्रहीत करण्यात आल्या आहेत. यामध्ये मंगरूळपीर तालुक्यातील १८, कारंजा तालुक्यातील ७, रिसोड तालु क्यातील १0, मालेगाव व मानोरा तालुक्यातील प्रत्येकी ४ व वाशिम तालुक्यातील ८ विहिरींचा समावेश आहे. टंचाई काळा त पाणीपुरवठा करण्यासाठी टँकरचाही आधार घेतला जाणार असल्याचे आराखडयात होते. ९३ गावांकरिता ९५ टँकर सुरू करण्यात येणार होते; मात्र प्रस्तावच न आल्याने केवळ जिल्हय़ात ११ टँकरने पाणीपुरवठा केल्या जात आहे. मालेगाव येथे १0 टँकरचे प्रस्ताव सादर असून, अद्याप एकही सुरू करण्यात आला नाही. आराखड्यानुसार सर्वाधिक २५ टँकर मालेगाव तालुक्यात सुरू केले जाणार होते. मालेगाव तालुक्यात १0 गावातील टँकरचे प्रस्ताव तर मालेगाव शहरात ६ टँकर सुरू करण्याचे प्रस्ताव आल्यानंतरही तालुक्यात एकही टँकर सुरू करण्यात आला नाही. वाशिम तालुक्यातील माळेगाव येथे एका गावात टँकर सुरू करण्यात आला आहे. मंगरूळपीर तालुक्यात ५, कारंजा तालुक्यात १, रिसोड तालुक्यात १ , मानोरा तालुक्यात ३ टँकर सुरू करण्यात आले आहेत.