शहरं
Join us  
Trending Stories
1
"तर मी फडणवीसांना या जन्मी माफ करणार नाही", अंजली दमानियांची पोस्ट, 'तो' फोटोही केला शेअर
2
"पंडित नेहरूंची पत्रे अजूनही सोनिया गांधींकडेच"; केंद्राचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'हा देशाचा वारसा'
3
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
4
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
5
गुरुवारी मार्गशीर्ष शिवरात्रि २०२५: ‘असे’ करा व्रत, शिवाचे विशेष पूजन; काही कमी पडणार नाही!
6
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
7
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
8
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
9
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
10
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
11
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
12
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
13
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
14
९९६६ धावा आणि ७०५ विकेट्स…तरीही तो अनसोल्ड! देशांतर्गत क्रिकेटमधील ‘कपिल देव’ची अनटोल्ड स्टोरी
15
"दिल्लीत प्रदूषण वाढवण्यासाठी ठिकठिकाणी कचरा जाळतेय AAP"; पर्यावरण मंत्र्यांचा गंभीर आरोप
16
गडकिल्ल्यांवरील अतिक्रमण हटवण्यासाठी समिती; नितेश राणेंची माहिती, सरकारचा महत्त्वाचा निर्णय
17
भारतात टीशर्टवर राहणाऱ्या राहुल गांधींना जर्मनीत भरली 'हुडहुडी'! स्वेटरवर दिसले
18
आई-वडिलांचा केला खून, मृतदेहांचे तुकडे करून गोणीत भरले, अन् नदीत फेकले, मुलाचं धक्कादायक कृत्य 
19
‘महाराष्ट्रात येणाऱ्या सर्व विमानांमध्ये मराठी भाषेत उद्घोषणा करा’, नाना पटोले यांची मागणी 
20
हृदयद्रावक! 'तो' सेल्फी ठरला अखेरचा; लग्नाच्या वाढदिवशी पतीसमोर पत्नीचा पाय घसरला अन्...
Daily Top 2Weekly Top 5

पाणी टंचाईमुळे जनतेचे हाल

By admin | Updated: April 30, 2015 01:47 IST

पाण्यासाठी भटकंती; ११ गावात टँकरने पाणीपुरवठा.

वाशिम: जिल्हय़ात उद्भवणारी पाणीटंचाई लक्षात घेता त्यावर उपाययोजना करण्यासाठी पाणीटंचाई आराखड्यानुसार जानेवारी २0१५ ते जून २0१५ या सहा महिन्यांमध्ये जिल्हय़ातील ४३९ गावांमध्ये ६0१ विविध उपाययोजना राबविण्यात येणार आहेत. त्यासाठी एकूण ५ कोटी ४७ लाख ९८ हजार रुपयांचा निधी खर्च केला जाणार असला तरी जिल्हय़ात आज घडीला जाणवत असलेल्या तीव्र पाणी टंचाईला जिल्हावासीयांना सामोरे जाण्याची वेळ आली आहे. जिल्हय़ात खेड्या पाड्यात, रानात जावून ग्रामस्थांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत असताना पाहिजे त्या प्रमाणात उपाययोजना प्रशासनाच्यावतीने झालेल्या दिसून येत नाहीत. जिल्हय़ातील तहसीलदारांकडून प्राप्त माहितीनुसार ११ गावात टँकरने पाणी पुरवठा तर ४१ गावात विहीर अधिग्रहण केल्याची माहिती २९ एप्रिलला दिली. जिल्हय़ातील १0८ गावांमधील १0९ विहिरींचे खोलीकरण करण्याच्या कामास आराखड्यात समावेश करण्यात आला हो ता. तसेच जिल्हय़ातील २७९ गावांमधील २८४ खासगी विहिरी अधिग्रहित केल्या जाणार होत्या; मात्र २९ एप्रिलपर्यंत ४१ विहिरीच अधिग्रहीत करण्यात आल्या आहेत. यामध्ये मंगरूळपीर तालुक्यातील १८, कारंजा तालुक्यातील ७, रिसोड तालु क्यातील १0, मालेगाव व मानोरा तालुक्यातील प्रत्येकी ४ व वाशिम तालुक्यातील ८ विहिरींचा समावेश आहे. टंचाई काळा त पाणीपुरवठा करण्यासाठी टँकरचाही आधार घेतला जाणार असल्याचे आराखडयात होते. ९३ गावांकरिता ९५ टँकर सुरू करण्यात येणार होते; मात्र प्रस्तावच न आल्याने केवळ जिल्हय़ात ११ टँकरने पाणीपुरवठा केल्या जात आहे. मालेगाव येथे १0 टँकरचे प्रस्ताव सादर असून, अद्याप एकही सुरू करण्यात आला नाही. आराखड्यानुसार सर्वाधिक २५ टँकर मालेगाव तालुक्यात सुरू केले जाणार होते. मालेगाव तालुक्यात १0 गावातील टँकरचे प्रस्ताव तर मालेगाव शहरात ६ टँकर सुरू करण्याचे प्रस्ताव आल्यानंतरही तालुक्यात एकही टँकर सुरू करण्यात आला नाही. वाशिम तालुक्यातील माळेगाव येथे एका गावात टँकर सुरू करण्यात आला आहे. मंगरूळपीर तालुक्यात ५, कारंजा तालुक्यात १, रिसोड तालुक्यात १ , मानोरा तालुक्यात ३ टँकर सुरू करण्यात आले आहेत.