शहरं
Join us  
Trending Stories
1
'आमच्यासाठी शेतकरी महत्वाचे; कितीही दबाव टाका, आम्ही...', ट्रम्प टॅरिफवर PM मोदींचे मोठे विधान
2
Mig 21 : ६० वर्षांत पाकिस्तानला अनेकदा दिली मात; निरोप घेण्यापूर्वी लढाऊ विमान 'मिग-२१'ने केले शेवटचे उड्डाण!
3
Rain Update : बाप्पाच्या स्वागतासाठी पावसाच्या 'पायघड्या'; पुढचे चार दिवस 'झोडपणार', कोणत्या भागांना इशारा?
4
जगातील सगळ्यात महागडी ७ शहरे! 'या' ठिकाणी राहायचा विचार करत असाल तर आताच जाणून घ्या...
5
नागपुरातील रस्त्यांवर कुत्र्यांना खाऊ घालाल तर खबरदार! कारवाईसाठी रहा तयार
6
पंतप्रधान मोदींची डिग्री सार्वजनिक होणार नाही, दिल्ली उच्च न्यायालयाकडून CIC चा आदेश रद्द
7
‘रोजगार महाकुंभ’चे आयोजन; ५०,००० हून अधिक तरुणांना नोकऱ्या देणार योगी सरकार!
8
विमान हवेतच गायब झालं! २२ दिवसापूर्वी तस्मानियाहून उड्डाण केलं होतं; नेमकं काय घडलं?
9
Beed: लक्ष्मण हाके यांच्या गाडीवर गेवराईत हल्ला; आमदार पंडित यांचे कार्यकर्ते आक्रमक
10
क्षुल्लक कारणावरून वाद झाला, बॉयफ्रेंडने गर्लफ्रेंडच्या तोंडात बॉम्ब टाकला अन्...; घटना ऐकून होईल अंगाचा थरकाप!
11
Atharva Sudame : 'अक्कल शिकवतोय, तुझा धंदा मर्यादित ठेव'; अथर्व सुदामेला ब्राह्मण महासंघानेही सुनावले
12
एकाच घरात का केलं दोन्ही मुलींचं लग्न? निक्की भाटीच्या वडिलांनी सांगितलं कारण! म्हणाले...
13
"राज ठाकरे साहेब, आपण..."; हकालपट्टीनंतर वैभव खेडेकरांनी सोडलं मौन, राणेंच्या भेटीबद्दल काय सांगितलं?
14
"गौतम एका ठिकाणी बसून ओरडत होता"; सिंहगड किल्ल्यावरून बेपत्ता झालेल्या तरुणाला पोलिसांनी कसं शोधलं?
15
"कुटुंबाला सांगू नका, लोकांकडून पैसे घेऊन अंत्यसंस्कार करा"; मनातील वेदना कागदावर लिहून तरुणाने संपवलं आयुष्य
16
Video: कार चालकाने अचानक दरवाजा उघडला; क्रिकेटर थेट धडकला, जागीच मृत्यू
17
याला म्हणतात परतावा...! 11403% ने वाढला हा स्टॉक, आता कंपनीला DRDO कडून मिळाली ₹3.36 कोटींची ऑर्डर, शेअरची किंमत 200 हून कमी!
18
मोबाइल हॅक झाला आहे का? हे संकेत ओळखा आणि लगेच पावलं उचला
19
अथर्व सुदामेवर टीकेचा भडीमार, असिम सरोदे मैदानात; म्हणाले, "राज ठाकरेंनी तुझं कौतुक केलंय, तू..."
20
"पप्पांनीच मम्मीला काठीने मारलं, पंख्याला लटकवलं..."; ३ वर्षांच्या लेकीने केली हत्येची पोलखोल

दुष्काळाच्या दाहकतेवर कायमस्वरूपी उपाययोजना हव्यात!

By admin | Updated: January 26, 2016 02:21 IST

सरपंच परिषदेत वाशिम जिल्हा दुष्काळग्रस्त घोषित करण्याचा ठराव पारित.

वाशिम: गत तीन-चार वर्षांंपासून जिल्हय़ात नैसर्गिक आपत्ती कोसळत आहे. परिणामी दुष्काळाच्या दाहकतेत सर्वसामान्य नागरिकांसह शेतकरी होरपळून जात आहे. यातून शेतकर्‍यांना सावरण्यासाठी, दुष्काळाच्या दाहकतेवर कायमस्वरूपी उपाययोजना आवश्यक असल्याचा सूर सरपंच परिषदेतून निघाला. दुष्काळी परिस्थितीवर चर्चा, जिल्हा दुष्काळग्रस्त घोषित करण्याची आग्रही मागणी व शेतकर्‍यांना मार्गदर्शन या तीन उद्देशातून २५ जानेवारीला स्थानिक जुन्या जिल्हा परिषदेच्या जिजाऊ सभागृहात सरपंच परिषद पार पडली. या परिषदेचे उद्घाटन माजी खासदार अनंतराव देशमुख यांनी केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जि.प. अध्यक्ष सोनाली विनोद जोगदंड, प्रमुख मार्गदर्शक म्हणून भाई रजनीकांत व स्वागताध्यक्ष म्हणून कृषी व पशुसंवर्धन सभापती सुभाष शिंदे उपस्थित होते. यावेळी जि. प. उपाध्यक्ष चंद्रकांत ठाकरे, सभापती ज्योती गणेशपुरे, माजी जि.प. अध्यक्ष दिलीप जाधव, पं.स. सभापती विरेंद्र देशमुख, भास्कर पाटील, वर्षा नेमाने, धनङ्म्री राठोड, छाया पाटील, कुसुम लबडे आदींची उपस्थिती होती. यावेळी माजी खासदार अनंतराव देशमुख म्हणाले की, दुष्काळाच्या तीव्रतेची जाणीव सरकारला करून देण्यासाठी वाशिम येथे सरपंच परिषद होणे, ही स्तुत्य बाब आहे. पैसेवारी ५0 पेक्षा कमी असल्याने दुष्काळ घोषित करणे ही बेसिक बाब आहे. दुष्काळाच्या दाहकतेत शेतकरी होरपळून निघत असतानाही शासन काहीच उपाययोजना करीत नसेल तर शेतकर्‍यांच्या समस्येत भर पडल्याशिवाय राहणार नाही. दुष्काळाची दाहकता कमी करणे हे शासनाच्या हाती असून, कायमस्वरूपी उपाययोजनांसाठी सर्वांगीण प्रयत्नांची गरज आहे. दुष्काळावर उपाययोजना करताना विभागवार नियोजन करणे गरजेचे आहे. ठोस व कायमस्वरूपी उपाययोजनाच शेतकर्‍यांना दुष्काळी परिस्थितीत तारू शकतात, असे अनंतराव देशमुख यांनी स्पष्ट केले. भाई रजनीकांत यांनी पैसेवारी कशी काढतात, पैसेवारीची पद्धती, दुष्काळी परिस्थितीत शेतकर्‍यांनी काय करावे, आदीबाबत सविस्तर माहिती दिली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक आयोजक तथा वाशिम बाजार समितीचे संचालक राजू चौधरी व माजी पंचायत समिती सदस्य विनोद जोगदंड यांनी केले. राजू चौधरी व विनोद जोगदंड यांनी दुष्काळी परिस्थितीत शेतकर्‍यांना दिलासा मिळावा म्हणून सरपंच परिषदेचे आयोजन केल्याचे यावेळी सांगितले. परिषदेच्या यशस्वितेसाठी आयोजक तथा जि. प. सदस्य गजानन अमदाबादकर, सरपंच संघटनेचे जिल्हाध्यक्ष राजू पायघन यांच्यासह मान्यवरांनी परिश्रम घेतले. यावेळी जिल्हाभरातील सरपंचांची बहुसंख्येने उपस्थिती होती.