शहरं
Join us  
Trending Stories
1
आयकर विभागाची मोठी कारवाई! १०५० पोलिसांना नोटीस; महाराष्ट्र पोलिस दलात खळबळ
2
तीन दिवस झाले, लिंगनिहाय आकडेवारी कुठे आहे? तेजस्वी यादव यांनी निवडणूक आयोगावर डेटा लपवल्याचा आरोप केला
3
विखे पाटलांनी उद्धव ठाकरेंना डिवचले, आजारी संजय राऊत संतापले; म्हणाले, 'तुम्ही...'
4
मावळतीच्या सुवर्णकिरणांनी अंबाबाईच्या कानांना केले स्पर्श, पारंपरिक दक्षिणायन किरणोत्सवाचे हजारो भाविक ठरले साक्षीदार
5
Gold-Silver Rate : सोन्या-चांदीचे दर आणखी कमी होणार? जाणून घ्या पुढचा अंदाज
6
पुण्यात बिबट्याची दहशत, स्वरक्षणासाठी गळ्यात टोकदार खिळ्यांचा पट्टा घालण्याची वेळ, ग्रामस्थांची नवी शक्कल
7
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
8
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
9
लहान बहिणीसोबत अनेकवेळा जबरदस्ती शरीरसंबंध, कुटुंबीयांना सांगायला गेली, तर म्हणाला, 'मी जीव देईन'
10
रशिया शांतपणे कशाची तयारी करतंय? पाश्चात्य देशांनी इशारा दिला; जगासाठी धोक्याची घंटा
11
बिहार निवडणुकीचा प्रचार संपला; दुसऱ्या टप्प्यासाठी ३.७ कोटी मतदार, मतदान, मतमोजणी कधी?
12
Mhada: ९० लाखांचा फ्लॅट २८ लाखांमध्ये, खरं की खोटं? 'म्हाडा'ने लोकांना केलं सावध, काय म्हटलं आहे?
13
Mumbai Weather: शीत वाऱ्यांमुळे पारा घसरला! मुंबईकरांना थंडीचा फील घेता येणार; आठवडाभर कसे राहणार हवामान?
14
धक्कादायक! रुग्णालयात उपचारासाठी आला, अचानक धारदार शस्त्राने डॉक्टरांची हत्या केली, नेमकं काय घडलं?
15
अक्कलकुवाजवळ शालेय बस दरीत कोसळली; अमलीबारी येथे भीषण अपघात, एका विद्यार्थ्याचा मृत्यू, १५ गंभीर
16
मामाची पोरगी पटवली! सूरज चव्हाण कधी करणार लग्न? तारीख आणि ठिकाण आलं समोर
17
बारामतीच्या नगराध्यक्षपद निवडणुकीबाबतच्या जय पवारांच्या चर्चेला अजित पवारांकडून पुर्णविराम
18
रवींद्र चव्हाणांच्या खेळीनं शिंदेसेना संतापली; "भाजपाला युती नको तर स्पष्ट सांगावे, आम्हीही..."
19
RSS मध्ये मुस्लीम सहभागी होऊ शकतात का? मोहन भागवतांनी दिलं असं उत्तर, सभागृहात टाळ्यांचा एकच कडकडाट झाला!
20
निवडणुका जवळ आल्यावर आमच्यावर आरोप होतात; आता आमची बदनामी झाली, अजित पवारांची खंत

जिल्ह्यातील बहुतांश आधार नोंदणी संच निकामी!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 2, 2017 02:26 IST

वाशिम : शासनाने साधारणत: पाच वर्षांपूर्वी जिल्ह्याला ८0  आधार नोंदणी संच दिले होते. मात्र, सन २0१४ मध्ये  वाशिममधील एका संस्थेला दिलेले २६ संचांचा अद्याप मेळ  लागला नसून उर्वरित ५४ पैकी २0 संच यवतमाळ जिल्ह्याला  देण्यात आले; तर उर्वरित ३४ संच बहुतांशी ‘भंगार’ झाले आहे त. त्यामुळे आधार नोंदणी प्रक्रियेत अनेक अडथळे उद्भवत  असून, नागरिकांसोबतच आधार कार्ड तयार करून देणारे  महा-ऑनलाइन सेतू सुविधा केंद्रांचे संचालकही हैराण झाले  आहेत. 

ठळक मुद्देनोंदणी प्रक्रियेत अडथळे नवीन मशीन देण्याबाबत शासनाची उदासीनता

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : शासनाने साधारणत: पाच वर्षांपूर्वी जिल्ह्याला ८0  आधार नोंदणी संच दिले होते. मात्र, सन २0१४ मध्ये  वाशिममधील एका संस्थेला दिलेले २६ संचांचा अद्याप मेळ  लागला नसून उर्वरित ५४ पैकी २0 संच यवतमाळ जिल्ह्याला  देण्यात आले; तर उर्वरित ३४ संच बहुतांशी ‘भंगार’ झाले आहे त. त्यामुळे आधार नोंदणी प्रक्रियेत अनेक अडथळे उद्भवत  असून, नागरिकांसोबतच आधार कार्ड तयार करून देणारे  महा-ऑनलाइन सेतू सुविधा केंद्रांचे संचालकही हैराण झाले  आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आजमितीस जिल्ह्यातील एकूण  लोकसंख्येच्या ९६ टक्के नागरिकांना आधार कार्ड तयार करून  देण्यात आले आहेत. मात्र, आधार कार्ड नोंदणी मोहिमेदरम्यान  राबविण्यात आलेल्या प्रक्रियेदरम्यान नावात चुका झाल्या असून,  अनेकांची जन्मतारीख, रहिवासी पत्ते चुकीचे नोंदविल्या गेले.  यासह विविध स्वरूपातील गंभीर चुका झाल्या असून, त्याची  दुरुस्ती अद्यापपर्यंत पूर्ण झालेली नाही. परिणामी, सुमारे ५0 ट क्के नागरिकांच्या आधार कार्डांमध्ये विविध स्वरूपातील त्रुटी  राहिल्याने कार्ड जवळ असतानाही ते निरूपयोगी ठरत  असल्याची अनेक उदाहरणे सभोवताल घडत आहेत. त्यामुळे  शासकीय आकडेवारीनुसार जिल्ह्यात आधार कार्ड नोंदणीचे  प्रमाण ९६ टक्के दिसत असले, तरी बिनचूक नोंदणी केवळ ४६  टक्क्यांच्याच आसपास असल्याची माहिती सूत्रांनी दिली. दरम्यान, आधार कार्डांपासून अद्याप वंचित असलेले नागरिक,  शालेय विद्यार्थी, नवजात बालकांचे आधार कार्ड तयार करून  देण्यासोबतच त्रुटींची पूर्तता करणे, आधार कार्डशी मोबाइल  क्रमांक संलग्नित करून अद्ययावत करणे, ही कामे सध्या प्रथम  प्राधान्याने केली जात आहेत. त्यानुसार, १६ सप्टेंबर २0१७ च्या  अध्यादेशानुसार रस्त्यांवरील आधार नोंदणी केंद्र बंद करून,  केवळ प्रशासकीय कार्यालयांमध्येच कायमस्वरूपी केंद्र सुरू  करण्याचा निर्णय शासनाने घेतला असून, त्याची  अंमलबजावणीदेखील सुरू झाली आहे. मात्र, मुळातच आधार  नोंदणी संच कमी असणे आणि त्यातच ते वारंवार नादुरुस्त  होण्याचे प्रमाण वाढल्याने नागरिक त्रस्त झाले असून,  प्रशासनाचीही डोकेदुखी वाढली आहे.  तथापि, आधार नोंदणी  मोहिमेत उद्भवलेल्या या अडचणींवर मात करण्यासाठी  जिल्ह्याला किमान १00 अतिरिक्त आधार नोंदणी संच मिळणे  गरजेचे आहे, असे सूत्रांनी सांगितले.

धडधाकट असताना अनेकांची दिव्यांग म्हणून नोंद!आधार नोंदणी संचामधील हाताच्या बोटांचे ठसे घेणारे  अधिकांश ‘स्कॅनर’ नादुरूस्त आहेत. त्यामुळे ‘स्कॅनर’वर हात  ठेवूनही बोटांचे ठसे नोंदणी अर्जांवर उमटत नसल्याचे प्रकार  अनेक ठिकाणी घडले आहेत. याच कारणामुळे बहुतांश  नागरिकांची नोंद चक्क दिव्यांग म्हणून झाली. असे असताना ही  गंभीर त्रुटी अद्याप दूर झालेली नाही. आजही जिल्ह्यातील  आधार नोंदणी संचांमधील ‘स्कॅनर’मध्ये हा ‘फॉल्ट’ कायम  असल्याचे सूत्रांनी सांगितले.

आधार नोंदणी संचांचा मेळ लागेना!आधार नोंदणीचे साहित्य विहित मुदतीत परत न केल्यामुळे सन  २0१४-१५ मध्ये वाशिममधील एका संस्थेवर पोलीस कारवाई  करण्यात आली होती. सदर संस्थेकडे २६ आधार नोंदणी संच  होते, ते दरम्यानच्या काळात वाशिम शहर पोलीस ठाण्यात जमा  करण्यात आले असून, त्यातील २३ संच जिल्हा प्रशासनाकडे  हस्तांतरित करण्यात आले आहेत; तर २ संच चोरीला गेल्याची  नोंद असून, १ संच आजही संबंधित संस्थेकडे असून तो परत  घेण्याबाबत पोलीस प्रशासनाला सूचना देण्यात आल्याची माहि ती निवासी उपजिल्हाधिकारी शैलेश हिंगे यांनी दिली.