शहरं
Join us  
Trending Stories
1
"...त्यामुळे मी भारतावरील टॅरिफ भरपूर वाढवणार आहे"; अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा इशारा
2
Pahalgam Attack: ते दहशतवादी पाकिस्तानी असल्याचे लष्कराने म्हटले नाही; संरक्षण मंत्रालयाचा खुलासा
3
१२,००० सॅमसंग स्मार्टफोनने भरलेला ट्रक चोरीला गेला; चोरट्यांनी ९१ कोटींच्या वस्तू लंपास केल्या
4
IND vs ENG : एक मालिका अन् दोन मालिकावीर! गंभीरमुळं गिलसोबत हॅरी ब्रूकला मिळाला हा पुरस्कार
5
अमित शाह मोडणार देशाच्या गृहमंत्र्यांचा रेकॉर्ड! जम्मू काश्मीरबद्दल सरकार घेणार आणखी एक मोठा निर्णय?
6
मारहाण, शिवीगाळ असं काहीच घडलं नाही; पुणे पोलिसांनी मुलींचे सगळेच आरोप फेटाळले
7
'भारत आगीशी खेळत आहे'; डोनाल्ड ट्रम्प, एस. जयशंकर यांच्याबद्दल खोटी विधाने केली पोस्ट, 'एक्स'ने खातीच केली बंद
8
iPhone 16: पहिल्यांदाच आयफोन १६ च्या खरेदीवर एवढी मोठी सूट!
9
भारत रशियाला युक्रेनविरुद्ध युद्धासाठी अप्रत्यक्षपणे निधी पुरवतोय, अमेरिकेचा आरोप!
10
येमेनमध्ये निमिषा प्रियाच्या अडचणी वाढल्या! मृताच्या भावाने पत्र लिहून केली मोठी मागणी
11
Siraj, IND vs ENG: 'तो' एक शब्द अन् सिराजने फिरवला अख्खा सामना... टीम इंडियाच्या विजयानंतर उघड केलं गुपित
12
आपच्या सत्येंद्र जैन यांना दिलासा, CBIच्या क्लोजर रिपोर्टवर कोर्टाचं शिक्कामोर्तब
13
माझा 'तो' व्हिडीओ रोहित पवारांना कुणी पाठवला? मंत्री मेघना बोर्डीकर म्हणाल्या...
14
राज ठाकरेंच्या 'मराठी'नंतर नितीश कुमारांची 'बिहारी' घोषणा; शिक्षक भरतीत नोकरी बिहारींनाच मिळणार
15
Siraj, IND vs ENG: ‘पूरा खोल दिए पाशा...’; सिराजच्या 'मॅचविनिंग' गोलंदाजीवर ओवेसींची हैदराबादी शैलीत स्तुती
16
कमाल झाली राव! रशियन महिलेने सांगितली भारतीय पुरुषाशी लग्न करण्याची खास कारणं, जिंकलं मन
17
क्रिस वोक्स स्ट्राइकवर आला असता तर...? इंग्लंडच्या लढवय्याबद्दल काय म्हणाला मॅच विनर सिराज?
18
'तिचे ओठ असे हलतात जणू मशीनगनच'; डोनाल्ड ट्रम्प कॅरोलिन लेविट यांच्याबद्दल काय बोलून गेले?
19
Maharashtra Rain: जून महिन्यात धो-धो; जुलैत पावसाला ब्रेक! 
20
प्रत्यक्षात घडली Jolly LLB 2 सारखी घटना, ३० वर्षे साधूच्या वेशात लपून होता बांगलादेशमधील गुन्हेगार, अखेर…

जिल्ह्यातील बहुतांश आधार नोंदणी संच निकामी!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 2, 2017 02:26 IST

वाशिम : शासनाने साधारणत: पाच वर्षांपूर्वी जिल्ह्याला ८0  आधार नोंदणी संच दिले होते. मात्र, सन २0१४ मध्ये  वाशिममधील एका संस्थेला दिलेले २६ संचांचा अद्याप मेळ  लागला नसून उर्वरित ५४ पैकी २0 संच यवतमाळ जिल्ह्याला  देण्यात आले; तर उर्वरित ३४ संच बहुतांशी ‘भंगार’ झाले आहे त. त्यामुळे आधार नोंदणी प्रक्रियेत अनेक अडथळे उद्भवत  असून, नागरिकांसोबतच आधार कार्ड तयार करून देणारे  महा-ऑनलाइन सेतू सुविधा केंद्रांचे संचालकही हैराण झाले  आहेत. 

ठळक मुद्देनोंदणी प्रक्रियेत अडथळे नवीन मशीन देण्याबाबत शासनाची उदासीनता

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : शासनाने साधारणत: पाच वर्षांपूर्वी जिल्ह्याला ८0  आधार नोंदणी संच दिले होते. मात्र, सन २0१४ मध्ये  वाशिममधील एका संस्थेला दिलेले २६ संचांचा अद्याप मेळ  लागला नसून उर्वरित ५४ पैकी २0 संच यवतमाळ जिल्ह्याला  देण्यात आले; तर उर्वरित ३४ संच बहुतांशी ‘भंगार’ झाले आहे त. त्यामुळे आधार नोंदणी प्रक्रियेत अनेक अडथळे उद्भवत  असून, नागरिकांसोबतच आधार कार्ड तयार करून देणारे  महा-ऑनलाइन सेतू सुविधा केंद्रांचे संचालकही हैराण झाले  आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आजमितीस जिल्ह्यातील एकूण  लोकसंख्येच्या ९६ टक्के नागरिकांना आधार कार्ड तयार करून  देण्यात आले आहेत. मात्र, आधार कार्ड नोंदणी मोहिमेदरम्यान  राबविण्यात आलेल्या प्रक्रियेदरम्यान नावात चुका झाल्या असून,  अनेकांची जन्मतारीख, रहिवासी पत्ते चुकीचे नोंदविल्या गेले.  यासह विविध स्वरूपातील गंभीर चुका झाल्या असून, त्याची  दुरुस्ती अद्यापपर्यंत पूर्ण झालेली नाही. परिणामी, सुमारे ५0 ट क्के नागरिकांच्या आधार कार्डांमध्ये विविध स्वरूपातील त्रुटी  राहिल्याने कार्ड जवळ असतानाही ते निरूपयोगी ठरत  असल्याची अनेक उदाहरणे सभोवताल घडत आहेत. त्यामुळे  शासकीय आकडेवारीनुसार जिल्ह्यात आधार कार्ड नोंदणीचे  प्रमाण ९६ टक्के दिसत असले, तरी बिनचूक नोंदणी केवळ ४६  टक्क्यांच्याच आसपास असल्याची माहिती सूत्रांनी दिली. दरम्यान, आधार कार्डांपासून अद्याप वंचित असलेले नागरिक,  शालेय विद्यार्थी, नवजात बालकांचे आधार कार्ड तयार करून  देण्यासोबतच त्रुटींची पूर्तता करणे, आधार कार्डशी मोबाइल  क्रमांक संलग्नित करून अद्ययावत करणे, ही कामे सध्या प्रथम  प्राधान्याने केली जात आहेत. त्यानुसार, १६ सप्टेंबर २0१७ च्या  अध्यादेशानुसार रस्त्यांवरील आधार नोंदणी केंद्र बंद करून,  केवळ प्रशासकीय कार्यालयांमध्येच कायमस्वरूपी केंद्र सुरू  करण्याचा निर्णय शासनाने घेतला असून, त्याची  अंमलबजावणीदेखील सुरू झाली आहे. मात्र, मुळातच आधार  नोंदणी संच कमी असणे आणि त्यातच ते वारंवार नादुरुस्त  होण्याचे प्रमाण वाढल्याने नागरिक त्रस्त झाले असून,  प्रशासनाचीही डोकेदुखी वाढली आहे.  तथापि, आधार नोंदणी  मोहिमेत उद्भवलेल्या या अडचणींवर मात करण्यासाठी  जिल्ह्याला किमान १00 अतिरिक्त आधार नोंदणी संच मिळणे  गरजेचे आहे, असे सूत्रांनी सांगितले.

धडधाकट असताना अनेकांची दिव्यांग म्हणून नोंद!आधार नोंदणी संचामधील हाताच्या बोटांचे ठसे घेणारे  अधिकांश ‘स्कॅनर’ नादुरूस्त आहेत. त्यामुळे ‘स्कॅनर’वर हात  ठेवूनही बोटांचे ठसे नोंदणी अर्जांवर उमटत नसल्याचे प्रकार  अनेक ठिकाणी घडले आहेत. याच कारणामुळे बहुतांश  नागरिकांची नोंद चक्क दिव्यांग म्हणून झाली. असे असताना ही  गंभीर त्रुटी अद्याप दूर झालेली नाही. आजही जिल्ह्यातील  आधार नोंदणी संचांमधील ‘स्कॅनर’मध्ये हा ‘फॉल्ट’ कायम  असल्याचे सूत्रांनी सांगितले.

आधार नोंदणी संचांचा मेळ लागेना!आधार नोंदणीचे साहित्य विहित मुदतीत परत न केल्यामुळे सन  २0१४-१५ मध्ये वाशिममधील एका संस्थेवर पोलीस कारवाई  करण्यात आली होती. सदर संस्थेकडे २६ आधार नोंदणी संच  होते, ते दरम्यानच्या काळात वाशिम शहर पोलीस ठाण्यात जमा  करण्यात आले असून, त्यातील २३ संच जिल्हा प्रशासनाकडे  हस्तांतरित करण्यात आले आहेत; तर २ संच चोरीला गेल्याची  नोंद असून, १ संच आजही संबंधित संस्थेकडे असून तो परत  घेण्याबाबत पोलीस प्रशासनाला सूचना देण्यात आल्याची माहि ती निवासी उपजिल्हाधिकारी शैलेश हिंगे यांनी दिली.