शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यातील बहुतांश आधार नोंदणी संच निकामी!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 2, 2017 02:26 IST

वाशिम : शासनाने साधारणत: पाच वर्षांपूर्वी जिल्ह्याला ८0  आधार नोंदणी संच दिले होते. मात्र, सन २0१४ मध्ये  वाशिममधील एका संस्थेला दिलेले २६ संचांचा अद्याप मेळ  लागला नसून उर्वरित ५४ पैकी २0 संच यवतमाळ जिल्ह्याला  देण्यात आले; तर उर्वरित ३४ संच बहुतांशी ‘भंगार’ झाले आहे त. त्यामुळे आधार नोंदणी प्रक्रियेत अनेक अडथळे उद्भवत  असून, नागरिकांसोबतच आधार कार्ड तयार करून देणारे  महा-ऑनलाइन सेतू सुविधा केंद्रांचे संचालकही हैराण झाले  आहेत. 

ठळक मुद्देनोंदणी प्रक्रियेत अडथळे नवीन मशीन देण्याबाबत शासनाची उदासीनता

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : शासनाने साधारणत: पाच वर्षांपूर्वी जिल्ह्याला ८0  आधार नोंदणी संच दिले होते. मात्र, सन २0१४ मध्ये  वाशिममधील एका संस्थेला दिलेले २६ संचांचा अद्याप मेळ  लागला नसून उर्वरित ५४ पैकी २0 संच यवतमाळ जिल्ह्याला  देण्यात आले; तर उर्वरित ३४ संच बहुतांशी ‘भंगार’ झाले आहे त. त्यामुळे आधार नोंदणी प्रक्रियेत अनेक अडथळे उद्भवत  असून, नागरिकांसोबतच आधार कार्ड तयार करून देणारे  महा-ऑनलाइन सेतू सुविधा केंद्रांचे संचालकही हैराण झाले  आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आजमितीस जिल्ह्यातील एकूण  लोकसंख्येच्या ९६ टक्के नागरिकांना आधार कार्ड तयार करून  देण्यात आले आहेत. मात्र, आधार कार्ड नोंदणी मोहिमेदरम्यान  राबविण्यात आलेल्या प्रक्रियेदरम्यान नावात चुका झाल्या असून,  अनेकांची जन्मतारीख, रहिवासी पत्ते चुकीचे नोंदविल्या गेले.  यासह विविध स्वरूपातील गंभीर चुका झाल्या असून, त्याची  दुरुस्ती अद्यापपर्यंत पूर्ण झालेली नाही. परिणामी, सुमारे ५0 ट क्के नागरिकांच्या आधार कार्डांमध्ये विविध स्वरूपातील त्रुटी  राहिल्याने कार्ड जवळ असतानाही ते निरूपयोगी ठरत  असल्याची अनेक उदाहरणे सभोवताल घडत आहेत. त्यामुळे  शासकीय आकडेवारीनुसार जिल्ह्यात आधार कार्ड नोंदणीचे  प्रमाण ९६ टक्के दिसत असले, तरी बिनचूक नोंदणी केवळ ४६  टक्क्यांच्याच आसपास असल्याची माहिती सूत्रांनी दिली. दरम्यान, आधार कार्डांपासून अद्याप वंचित असलेले नागरिक,  शालेय विद्यार्थी, नवजात बालकांचे आधार कार्ड तयार करून  देण्यासोबतच त्रुटींची पूर्तता करणे, आधार कार्डशी मोबाइल  क्रमांक संलग्नित करून अद्ययावत करणे, ही कामे सध्या प्रथम  प्राधान्याने केली जात आहेत. त्यानुसार, १६ सप्टेंबर २0१७ च्या  अध्यादेशानुसार रस्त्यांवरील आधार नोंदणी केंद्र बंद करून,  केवळ प्रशासकीय कार्यालयांमध्येच कायमस्वरूपी केंद्र सुरू  करण्याचा निर्णय शासनाने घेतला असून, त्याची  अंमलबजावणीदेखील सुरू झाली आहे. मात्र, मुळातच आधार  नोंदणी संच कमी असणे आणि त्यातच ते वारंवार नादुरुस्त  होण्याचे प्रमाण वाढल्याने नागरिक त्रस्त झाले असून,  प्रशासनाचीही डोकेदुखी वाढली आहे.  तथापि, आधार नोंदणी  मोहिमेत उद्भवलेल्या या अडचणींवर मात करण्यासाठी  जिल्ह्याला किमान १00 अतिरिक्त आधार नोंदणी संच मिळणे  गरजेचे आहे, असे सूत्रांनी सांगितले.

धडधाकट असताना अनेकांची दिव्यांग म्हणून नोंद!आधार नोंदणी संचामधील हाताच्या बोटांचे ठसे घेणारे  अधिकांश ‘स्कॅनर’ नादुरूस्त आहेत. त्यामुळे ‘स्कॅनर’वर हात  ठेवूनही बोटांचे ठसे नोंदणी अर्जांवर उमटत नसल्याचे प्रकार  अनेक ठिकाणी घडले आहेत. याच कारणामुळे बहुतांश  नागरिकांची नोंद चक्क दिव्यांग म्हणून झाली. असे असताना ही  गंभीर त्रुटी अद्याप दूर झालेली नाही. आजही जिल्ह्यातील  आधार नोंदणी संचांमधील ‘स्कॅनर’मध्ये हा ‘फॉल्ट’ कायम  असल्याचे सूत्रांनी सांगितले.

आधार नोंदणी संचांचा मेळ लागेना!आधार नोंदणीचे साहित्य विहित मुदतीत परत न केल्यामुळे सन  २0१४-१५ मध्ये वाशिममधील एका संस्थेवर पोलीस कारवाई  करण्यात आली होती. सदर संस्थेकडे २६ आधार नोंदणी संच  होते, ते दरम्यानच्या काळात वाशिम शहर पोलीस ठाण्यात जमा  करण्यात आले असून, त्यातील २३ संच जिल्हा प्रशासनाकडे  हस्तांतरित करण्यात आले आहेत; तर २ संच चोरीला गेल्याची  नोंद असून, १ संच आजही संबंधित संस्थेकडे असून तो परत  घेण्याबाबत पोलीस प्रशासनाला सूचना देण्यात आल्याची माहि ती निवासी उपजिल्हाधिकारी शैलेश हिंगे यांनी दिली.