शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधीचा हायड्रोजन बॉम्ब! 'एका महिलेचे 223 वेळा नाव; हरियाणात 25 लाख मतांची चोरी'
2
१ फोटो, १ मतदारसंघ अन् १०० मते...; राहुल गांधींच्या 'हायड्रोजन बॉम्ब'नं निवडणूक आयोगाची उडाली झोप
3
UPI की Net Banking? पर्सनल लोनचा EMI भरण्यासाठी सर्वात प्रभावी पर्याय कोणता? जाणून घ्या फायदे आणि तोटे
4
Rahul Gandhi : कधी सीमा, कधी स्वीटी, कधी सरस्वती... हरियाणात एका तरुणीची २२ मतं, राहुल गांधींचा मोठा दावा
5
“मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीवर अनेकांची वक्रदृष्टी, पंचांग काढून राहु-केतु...”; ठाकरेंचा टोला
6
थंडीच्या दिवसांत घरातील फ्रीजचं तापमान नेमकं किती ठेवावं? एका चुकीमुळे भरमसाठ वाढू शकतं बिल!
7
ट्रम्प, थोडा आवाज वाढवा, ज्या न्यूयॉर्क शहराने तुम्हाला जन्माला घातले...; ममदानींचा राष्ट्राध्यक्षांना थेट इशारा
8
Devendra Fadnavis: "विकास सोडून फक्त विधानेच!" उद्धव ठाकरेंच्या दौऱ्यावर फडणवीसांची तिखट प्रतिक्रिया
9
BSNL Recharge Plan: ५०० रुपयांपेक्षा कमी किंमतीचा रिचार्ज प्लान आहेत बेस्ट; मिळणार जबरदस्त बेनिफिट्स, जाणून घ्या
10
Bilaspur Train Accident : सीटमध्ये पाय अडकलेला, डोळ्यांसमोर मृतदेहांचा खच...; बिलासपूर अपघाताचं भीषण दृश्य!
11
शरद पवारांची यादी मान्य! कोकणवासीयांना मोठा दिलासा; ‘या’ २ ठिकाणी ८ सुपरफास्ट ट्रेनना थांबा
12
एसटी चालक, वाहकाचे प्रसंगावधान; एमएसईबीच्या माजी अधिकाऱ्याची तब्येत बिघडली, वेगाने नातेपुते गाठत वाचविले...
13
रितेश देशमुखच्या 'राजा शिवाजी'मध्ये सलमान खानची एन्ट्री, 'या' भूमिकेत दिसणार भाईजान
14
Monorail Accident: ट्रॅक सोडला, मधोमध अडकली! मोनोरेलचा वडाळ्याजवळ अपघात, ट्रायल रनवेळी घडली घटना
15
Shocking! संतापलेल्या पतीने पत्नीचे नाक कापले, ब्लेडने बोटांवरही वार केले; त्यानंतर जे घडलं...
16
'आम्हालाही दिलासा द्या..,' Vi ला मिळालेल्या दिलास्यानंतर Airtel नं का म्हटलं असं? सरकारकडे जाणार कंपनी
17
वयाच्या तिशीत ‘हे’ ५ आर्थिक नियम शिका! तुम्हाला श्रीमंत होण्यापासून कोणीही रोखू शकणार नाही
18
Swapna Shastra: स्वप्नात स्वतःचा मृत्यू पाहणे हे शुभ की अशुभ लक्षण? स्वप्नशास्त्र काय सांगते पाहू
19
"लाडली, लक्ष्मी, बहीण..."; निवडणूक वर्षात महिलांसाठी रोख रकमेचा महापूर; सरकारं घाट्यात! आरबीआयनं आधीच दिलाय मोठा इशारा
20
मिर्झापूरजवळ भीषण अपघात; रेल्वे रुळ ओलांडताना 'कालका मेल'खाली चिरडून ६ भाविकांचा मृत्यू

निधीअभावी मानोरा तालुक्यातील ३८ अंगणवाड्या अर्धवट 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 20, 2017 16:04 IST

वाशिम: जिल्ह्यात तालुक्यात जवळपास ८ वर्षांपूर्वी मंजूर झालेल्या अंगणवाड्यांचे बांधकाम निधीअभावी अर्धवट अवस्थेत पडून आहे.

ठळक मुद्दे चिमुकल्यांची शाळा उघड्यावर

वाशिम: जिल्ह्यात तालुक्यात जवळपास ८ वर्षांपूर्वी मंजूर झालेल्या अंगणवाड्यांचे बांधकाम निधीअभावी अर्धवट अवस्थेत पडून आहे. या प्रकारामुळे अंगणवाडी सेविकांना चिमुकल्याचा पोषण आहार देणे कठीण झाले आहेच शिवाय त्यांना उघड्यावर बसवून शासनाचे विविध उपक्रम पार पाडावे लागत आहेत. एकट्या मानोरा तालुक्यातच अशा ३८ अंगणवाडी केंद्रांचे काम निधीअभावी रखडले आहे. 

ग्रामीण भागांमध्ये चालवल्या जाणाºया अंगणवाडी केंद्रांत महिला आणि बालकांच्या सर्वांगीण विकासावर अधिक भर दिला जातो. ० ते ५ वर्ष वयोगटातील बालकांना पूर्व प्राथमिक शिक्षण देणे तसेच माता-बालकांचे आरोग्य, आहार, कुपोषण या अन्य बाबीं कडे लक्ष पुरवणे अशा कार्यांचा समावेश अंगणवाडी केंद्रांत समावेश असतो. त्याशिवाय पालकांना वेळोवेळी मार्गदर्शन करणे, ग्रामीण भागातील महिलांना आहार व आरोग्य याविषयी योग्य मार्गदर्शन करणे हे देखील अंगणवाडी केंद्रांचे मुलभूत कार्य आहे. यासाठी जिल्ह्यात ११ अंगणवाडी केंद्र कार्यरत आहेत. त्यामध्येच मानोरा तालुक्यातील अर्धवट अवस्थेत असलेल्या ३८ केंद्रांचाही समावेश आहे. शासनाकडून मंजुरी मिळाल्यानंतर या अंगणवाड्या कागदावर सुरू आहेत; परंतु या अंगणवाड्यांच्या इमारतीच पूर्ण नसल्याने अंगणवाडी सेविका, मदतनिसांना आपले कर्तव्य पार पाडणे कठीण झाले आहे. आसोला खु., आमकिन्ही वाईगौळ, शेंदोणा, पोहरादेवी, फुलउमरी, सोमेश्वर नगर, म्हसणी, वापटा कुपटा, विठोली आदिंसह एकूण ३८ गावांसाठी २००८-०९ मध्ये अंगणवाडी केंद्रांना मंजुरी मिळाली होती. या अंगणवाड्यांचे बांधकाम करण्यासाठी त्यावेळी निधीही प्राप्त झाला आणि अंगणवाड्यांचे बांधकामही सुरू झाले; परंतु हे काम पूर्ण करण्यासाठी पुढे आवश्यक असलेला निधी मात्र मिळालाच नाही. त्यामुळे गेल्या ८ वर्षांपासून या अंगणवाड्यांच्या इमारती अर्धवटच आहेत. 

 बांधकामाची होतेय दूरावस्था 

मानोरा तालुक्यातील मंजूर झालेल्या ३८ अंगणवाड्यांचे काम निधीअभावी अर्धवट अवस्थेत आहे. आता गेल्या ८ वर्षांपासून हिच स्थिती असल्याने या बांधकामाकडेही प्रशासनाचे दुर्लक्ष असल्याने बांधकाम ढासळू लागले आहे. काही इमारतीच्या दारे, खिडक््यांची मोडतोड झाली असून, या इमारतींचा वापर लघूशंका उरकण्यासाठी केला जात आहे. इमारतीच्या परिसरात ग्रामस्थांकडून घरातील घाणकचरा टाकल्या जात असल्याने या परिसरात उकंडेही तयार झाले आहेत. त्यावरून शासनाकडून मंजूर निधीचा एक प्रकारे अपव्ययच झाल्याचेही स्पष्ट होत आहे.